सोमवार, ९ एप्रिल, २०१८

गिर अभयारण्य

टायगर च्या निमित्ताने वाचन केल तर गिर च अभयारण्य वाचनात आलं. त्याच तसही कुतूहल होतंच. तिथं फॉरेस्ट गार्ड म्हणून महिलांची टीम कार्यरत आहे. त्या रात्री ही बाईकवर पेट्रोलिंग करतात.सोबत टॉर्च,असलं तर पिस्तूल आणि वॉकी टॉकी. एकूण हे सर्व गार्ड सिंहांच्या अंगवळणी पडलेत.सिंहाचा कळप विसावलेला असतो आणि त्याच्या समोर हे गार्ड शेकोटी पेटवून डबे खायला बसतात.त्यांची मोजणी करतात.
    तर फार पूर्वी वाघ सिंह खूप होते.त्यांची शिकार इतकी झाली कि अशी अभयारण्य उभारावी लागली.हळूहळू हा प्रयत्न यशस्वी झाला.आज मला वाटत 500 वाघ सिंह आहेत तिथं.गावकरी हि या सिंहाना सरावलेत.त्यांच्या झोपडी बाहेर गावकुसाबाहेर सिंह एखादी म्हैस मारून खात बसलाय आणि थोड्या अंतरावर त्या झोपडीचा मालक आणि अन्य गावकरी हे दृश्य बघतायत.आणि त्यांच्या वर सिंह हल्ला करत नाहीत.गावात जाताना छोटा ओहोळ बाईक वर बसून दोन गावकरी पार करतायत आणि त्यांच्या बाईकला अगदी जवळून सिंहिण आपल्या पिल्लांना घेऊन निघून जातेय.हे दोघे ही बाईक उभी करून तिला जाऊ देतायत.जस पाळीव कुत्रा बाजूनं जावा.
झालं काय कि, अभय मिळाल्याने हरीण,माकड आणि सिंह यांची संख्या वाढली.आता सिंहाना खायला पंचाईत पडणार नाही असं वाटत आपल्याला पण झालं उलट.
माकडं हरिणांच्या कळपा सोबत फिरतात.त्यांची दोस्तीच झाली म्हणाना. मग सिंहाची चाहूल लागली कि माकड आरडा ओरडा करून हरिणांना सावध करतात आणि हरण पळून जातात.सिंहाची शिकार निसटते.
    इकडं गावकऱ्यांची शेत आहेत त्यातील पीक तयार झालं कि हि हरण रात्री येऊन पिकावर तुटून पडतात.त्यांना मारता येत नाही.मग गावकऱ्यांनी अनुभवांती एक इंटरेस्टिंग युक्ती सुरू केलीय.रात्री शेतात जातात आणि हरणांचा आवाज काढतात.त्या हाकेला फसून हरण शेतात येतात.
तिकडं सिंहाचा कळप गावा बाहेर जमलेला असतो रात्र अजून व्हायची वाट बघत.कारण जो वर गावकरी झोपत नाहीत आणि शेवटचा दिवा जात नाही तोवर वाट बघावी लागते.त्यात कुत्रे वेशीवर असतात ते लगेच भुंकू लागतात.तर हा दबा धरून बसलेला कळप गावकऱ्यांनी काढलेल्या हरिणांच्या आवाजात ओळखतो.हळूच खाली येऊन पोझीशन घेतात.हरणांचा कळप टप्प्यात आला कि चारी कडून योजनाबद्ध हल्ला करून शिकार साधली जाते.त्यांच्या कुटुंबाचं पोट भरत आणि गावकऱ्यांच पीक वाचत.कधी मधी एखाद गावातील जनावर किंवा कुत्र सिंहानी मारलं तर लोक समजून घेतात.अशी परस्पर सामंजस्य साधत सिंह आणि माणूस एक ठिकाणी राहायला शिकलेत.
वर म्हणलो तसे फॉरेस्ट गार्ड आणि गावकरी यांचे सिंहाचा कळपा जवळचे व्हिडीओ तू नळीवर बघायला मिळतील.
नुकताच मागील आठवड्यात आजोबा सिनेमा बघितला त्यात ही हे जाणवत आपण त्यांच्या घरात घुसलोयत लोकसंख्या वाढी मूळ.अर्थात हे समजून गिर च्या लोकांसारखं जिओ और जीने दो केलं तर हि वन्य संपत्ती आणि दुर्मिळ होत जाणारे प्राणी पुढील पिढीला प्रत्यक्ष जिवन्त बघायला मिळतील अन्यथा फक्त पुस्तकात किंवा ज्या फ्लिम्स केल्या आहेत त्यात बघावे लागतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा