या वयात नवे पंख फुटतात.ते उत्सुकतेचे,शिक्षणाचे,धाडसाचे असे असतात.उत्साह खूप असतो.धोक्याच वळण देखील इथंच असत.या वळणावर जर गाडी घसरली तर पुन्हा मार्गावर येण खूप कठीण असत.बरेचदा आयुष्य नासून जात.फक्त एकच व्यक्तीचं नव्हे,तर कुटुंबाचे देखील.
व्यसन खुणावतात ती याचं वयात.त्या पासून दूर रहा.जाहिरातदारांना तुम्ही कस जगावं हे शिकवू देऊ नका.एखादा हिरो जाहिरातीत मस्त कपडे घालून,आलिशान गाडी चालवत सिगरेट ओढतांना बघून फसू नका.तस करण म्हणजे पौरुषत्व नसत.
पण मला दुसरी धोक्याची जागा सांगायचीय.
ती म्हणजे प्रेमात पडायची.तस होण साहजिक आहे.फक्त प्रेम म्हणजे काय? हे समजत नसत.बरेचदा ते शारीरिक आकर्षण असत. सहवासाने माणूस उलगडत जातो.कधी बरीच वर्ष जाऊन देखील अस होत नाही.तेंव्हा या वयातच हे ठरवावं कि, इथून पुढ प्रत्येक महत्वाचा निर्णय बुद्धी वर घासून घेईन.भावनेच्या आहारी जाऊन नाही.
जोडीदार आपल्या एकूण स्थितीला योग्य आहे का हे बघावं.
त्याची शरीर भाषा अभ्यासावी.त्यातून माणूस बराच प्रगट होत असतो.अधिकार गाजवत राहणारा आहे का? आपण जसे आहोत तसे स्वीकारणारा आहे का? संयमी आहे का?आपल्या मताची ,आवडीची किंमत ठेवणारा आहे का?अस बरंच तपासून पहावं. मग निर्णय घ्यावा.कारण हे नात आयुष्यभर सांभाळायचं आहे.नातेवाईक निवडून घेता येत नाहीत.मात्र मित्र नी जोडीदार निवडता येतात.
आणि समजा काही दिवसांनी बिनसलं,ब्रेकप झाला तर दुनिया संपत नसते हे नक्की.जन्मा पासून आपल्याला वाढवणारे जन्मदाते असतातच कि आपल्या सोबत.मित्र मैत्रिणी सुद्धा.त्यामुळं अचानक कुणीतरी आपल्या आयुष्यात येतो नी आपल्याला सोडून जातो तर जाऊ दे कि.त्या एक माणसा करता आपण आपल नी कुटुंबाच आयुष्य का खराब करायचं? तुम्हांला वाढवायला आई वडिलांनी मेहनत घेतलीय.शिक्षण आणि इतर उत्तम गोष्टी अंगीकरून तुम्ही स्वतः आपल व्यक्तिमत्व उभ केलंय.ते अस कुणा एकाच्या करता वाऱ्यावर सोडायला नक्कीच नाही.
हे लिहायचं कारण,
माझा भाऊ प्रेमात पडला.आम्ही घराच्यांनी काहीच आडकाठी घेतली नाही.पण त्या दोघांच आपसात काही बिनसलं.ती मुलगी घरी येऊन सांगून गेली,मला हा नकोय.आत्ता अस वागावतोय पुढ काय करेल?
बस्स.तिथ पासून बंधूनच वागणं बदललं.रागीट झाला.सारासार विचार संपला.उलट सुलट विचार करून तिचे भास होऊ लागले.स्किझोफ्रेनिया चा पक्का रुग्ण झालाय.हॉस्पिटल मध्ये शॉक ट्रीटमेन्ट झाली मग जरा हिंसक कमी झाला.बरंच भोगावे लागतंय मला अजूनही.आई बाबा गेले.मी लग्न केलच नाही.कारण याचं वागणं बेताल असत.सगळं नाही सांगत बसत.पण जिवंत नरक भोगत आयुष्य काढतोय.एका वेड्या सोबत त्याच्या लहरी नुसार .
तेंव्हा ब्रेकप न खचून जाऊ नका.आयुष्य कुणासाठी थांबत नसत.वेळ निघून गेली तर ती परत येत नाही.आपणच आपले नसतो.आपल कुटुंब देखील या आगीत अकारण होरपळून निघत याची जाणीव ठेवा.
आणखी एक गोष्ट मुलींकरता.
हल्ली लव्ह जिहाद सुरूय.तो खरा हि आहे.केरला स्टोरी बघून घ्या.
कंव्हर्नजन् सिनेमा देखील बघा.
आपला धर्मच उत्तम आहे.तो धर्म स्वीकारे पर्यंतच ,मेरा अब्दुल ऐसा नही है म्हणू शकाल.एकदा लग्न झाल कि किंवा मुलगी झाली नी मोठी झाली कि त्यांचं खर रूप समजेल.पण वेळ गेलेली असेल.
बरेचदा हे आधीच हळूहळू सुरु होईल.तु जरा दुपट्टा डोक्यावरून घे न.कुणाशी बोलत होतीस फोन वर इतका वेळ?अस पझेसिव्ह वागणं सुरु होईल.आधी धर्म बदलला नाहीस तरी चालेल म्हटलं जाईल.पण मग निदान अम्मी कि खातीर नमाज शुरु करो अस म्हटलं जाईल.घरचे लोक टोमणे सुरु करतील.हळूहळू धर्मांतर केलच जाईल.
त्या धर्मातील धक्कादायक गोष्टी आपल्याला माहित नसतात.त्या करता एक्स मुस्लिम लोकांचे व्हिडीओ युट्यूब वर बघा.उदाहरण म्हणूंन सांगून ठेवतो त्यांचे व्हिडीओ बघा.हे मुस्लिमच होते.पण जसा धर्माचा अभ्यास केला तशी त्यातलं खर स्वरूप त्यांना कळलं.आणि कुणी यात नव्याने फसू नये आणि जे त्या धर्मात आहेत त्यांना खर कळावं म्हणून स्वतः चा जीव धोक्यात घालून हे लोक समाज जागृतीच काम करतायत.एक्स मुस्लिम साहिल आणि एक्स मुस्लिम adam seekar हे ते दोघे.यांच्या कडून नुसतच त्या धर्माच खर स्वरूप कळेल इतक नाही.तर एखाद्या गोष्टी चा कसा अभ्यास करावा नी मग त्या गोष्टी वर वाद विवाद कसा अभ्यास पूर्ण करावा याचं उत्तम उदाहरण मिळेल.साहिल शांत पण ,समजूतीन पटवतो.adam मात्र रोखठोक आहे.समोरचा ज्या पातळीवर असेल तस बोलतो.पण दोघांचा अभ्यास मात्र कमालच आहे.
शेवटी खास करून मुलींनी,स्त्रियांनी सोबत मुलांनी देखील आपल बँक खात आपणच सांभाळावं.वाढवावं.त्याच्यात कुणाचीही भागीदारी नको.मुलींनी घरावर आपल नाव घातलं जावं याची कटाक्षाने दखल घ्यावी.मी पुरुष असून देखील सांगतो कि,पुरुषांचा भरवसा नाही.कधीही म्हणतील,हे घर माझं आहे.इथ मी म्हणीन तेच होईल.पटल तर रहा नाहीतर चालू पडा.
आपली पूर्ण आर्थिक सुरक्षा जपूनच रहायचं.म्हणजे कुणी उगा अधिकार गाजवत नाही.एखादी कला किंवा स्किल नक्की आत्मसात करावं.जे तुम्हांला अर्थार्जन कधीही कुठंही करून देईल.नोकरीला निवृत्ती असते.स्किल ला नाही.
जमेल तितकं मिळून मिसळून रहावच.थोडी आपल्या मताला मुरड हि घालावी दुसऱ्य करता.पण जोवर आपण गुलाम होत नाही तिथवरच.
आपले फक्त आपणच असतो दुसरं कुणीही नाही.बिरबलाची माकडीणीची गोष्ट खरी आहे.नाती ताणली जात नाही तोवर छान वाटतात.तणाव वाढला कि तुटतात तेंव्हा कळतात.अशी नाती तुटलेलीच उत्तम.
अनेक शुभेच्छा सहित...