रविवार, २८ डिसेंबर, २०२५

जुनी बिल्डिंग

 


आज एक मित्र भेटायला आला होता.छान गप्पा झाल्या.मी आधी रहायचो ती जागा त्यानं घेतली होती. मग तो हि सोडून मुंबईत गेला.आपली जुनी बिल्डिंग आहे का रे अजून?म्हटल चल दाखवतो.इमारत अजून तग धरून शेवटची घरघर सहन करत उभी आहे.अंगभर भेगांच्या जखमातून शरीराच्या नसा
भासत असलेल्या लोखंडी शिगा उघड्या पडलेल्या लेऊन.सर्वांची दारे निखळून पडलेली. एका दारावर मराविम.
ची नोटीस अजूनही काळी अक्षर फिकट असली तरी दाखवत होती.
होती.
एकेकाळी जिवंत असलेली वास्तू माणसाविना भकास झाली आहे.
सर्व घरातली माणसं आठवली.एकत्र जगलेले आयुष्य आठवल.सर्वात महत्वाच म्हणजे आम्ही तीन मित्रांनी त्या जागेत एकत्र केलेला तासनतास रियाज,एकमेकांची केलेली मस्करी,मारलेल्या गप्पा सगळ जसच्या तसं आठवल.
मित्रा,तू वॉल टू वॉल लावून घेतल्यास त्या टाईल्स बघ अजूनही तश्याच आहेत रे.
हो.त्यावेळी लाख भर रू खर्च करून लावल्या होत्या.
म्हटल त्या अजूनही ईमान राखून आहेत शाबूत.बाकी इमारत मात्र वार्धक्याने,दुर्लक्ष झाल्यामुळे फक्त शेवटचे श्वास घेत आहे.
त्या जराजर्जर वास्तूला सोडून निघालो.आज फक्त तिचा निरोप घेतला होता.पण ती जेव्हा पूर्ण नामशेष होईल तेव्हा मात्र आमची सगळ्यांच्या आठवणींच्या जुन्या खुणा बेघर होतील.पण नाही.त्यांना आमच्या मनात आम्ही असू तोवर तरी रहायला कायमची जागा नक्की राहील.शेवटी महत्त्व वास्तूला नसून तिच्यात राहणाऱ्या माणसांचं असत.दगड विटा सिमेंट नुसत्या भिंती तयार करतात.पण त्या रहाणारी माणसं आणि त्यांच्यातल आपसातील नातं त्या वास्तूला घर करतात.त्या घराला मग घर मिळत ते माणसांच्या मनात.

शुक्रवार, २८ मार्च, २०२५

मे महिन्याची आठवण.



कंच हिरवा रंग तिचा

 निवळू दे की जरा थांबा।

नका न पाडू अजून

हुंदे ( होऊन दे ) की तिचा आंबा।


पोयनाडला मित्राकडे झाडाचा मोहोर चांगला बाजलाय. मे महिन्याची चाहूल निसर्ग देऊ लागलाय. साली करवंदाची जाळी ही पिकेल. निसरडी जांभूळ फांदी फांदीत भरेल. रोज बकुळ अंगण भर पसरेल. परसातील आवळी हिरवी हून ( होऊन ) जाईल. बिट्टी गुडघ्याला बाशिंग बांधून पिवळी धमक होईल. मागच्या अंगणात तो मोरकिडा जमिनीत भोवरा फिरवल्या सारखं भोक करील. पांढरा चाफा भिरभिरत अलगद जमिनीवर उतरेल. कुठंतरी लपून हिरवा चाफा दरवळून जाईल. विहीर मात्र उन्हाच्या तडाख्याने हैराण होऊन खाली खाली जाईल! ,,,,

पण आम्हाला हे काहीही अनुभवता येणार नाही! 😔


असो पण कधीतरी अनुभवलेलं आजही मजा आणतं. ज्या मुलांना हे माहीतच नाही त्यांच्या बद्दल खंत वाटते. त्यांच्या नशिबी हे सुख नाही.


बुधवार, ४ डिसेंबर, २०२४

कमाल

 आखे ऐसी के गेहरी ताल

मोहिनी सुरत लंबे बाल 

चले है ऐसे हिरन कि चाल

गोरे गोरे गुलाबी गाल

जो भी देखे केहने लगे

उफ ये कमाल है बा कमाल



काल सिंहासनी  सुचली.

गुरुवार, १८ एप्रिल, २०२४

तलखी.

 लाईट गेलेत.खूप उकडतंय.घराची आठवण आली.तिथ सेम असंच असायचं.लाईटचा भरोसाच नाही.नेमक दुपारी आणि रात्री गायब.पण आता ब्लॉक मध्ये आणि त्या वेळच्या घरात यात बरीच तफावत आहे.

तेंव्हा,बाहेर पडवी च्या गजाना बाबांनी पडदे करून लावले होते.त्यावर मस्त पाणी शिंपडून घ्यायचं दुपारी जेवण झाली कि. अंगणातून झळ मारत असते गरम हवेची ती मग जाणवत नसे.उन्हाळा जरा कमी दाहक होई.आमचे तात्या तर उकाडा कमी करायला अंगावर पंचा ओला करून पांघरत. मग त्यांनी पूजेकर्ता वापरलेल्या चंदनाचा आणि फुलांचा सुगंध त्यांच्या भोवती दरवळू लागे. मी नी बाबा पण तसच करत असू.झोप झाली कि झोपाळ्यावर झोके घेत बसायच.माज घरात सारवलेल्या जमिनीवर अंग टाकून झोपलं कि गार वाटे.बाळंतीणी च्या खोलीतून आढी तले आंबे सुवासाने आमंत्रण देत.चहा झाला कि सर्व जण मागच्या पडवीत किंवा स्वयंपाक घराच्या उंबऱ्यात पिकलेल्या आंब्यांची रोवळीच घेऊन बसत.चुपून आंबे खायचे नी साली बकुळीच्या अंगणात टाकून ठेवायच्या. मग गोळा करून गायी बैलांना द्यायच्या. अख्खे रायवळ आंबे पण गुरांना देत असू.आवाडात मागच्या आंब्यावर कोकीळ कुहू कुहू करत बसे.

अंगणात पाणी शिंपडलं कि मस्त वाटे.संध्याकाळी कुपणी पलीकडील मोठ्या झाडाची पडलेली जांभळ वेचायला जायचं.मित्रांसोबत भरपूर खेळून दमल कि त्याच झाडा पुढून गेलेल्या रस्त्याच्या बैल गाडी नी st जाऊन पडलेल्या चाकोऱ्यात असलेल्या मऊ पण गरम लाल मातीत पाय बुडवून बसायच.मग पाय दुखत असतील तर बर वाटे.आणि गुर पाण्यावर न्यायची.तळ्यात आधी उभ राहून ती पाणी पिताना बघायला मस्त वाटे.बैलगाडी तळ्यात बैला सह उतरवून गुडघा भर पाण्या उभी करायची.मग बैलांना काथ्याच्या घासणी न घासून अंघोळ घालायची.बैल देखील सुखावून हि सेवा करू देत.तोवर उन्ह उतरली असत.संध्याकाळ वेगळी असे.

आत्ता सगळं आठवलं.पण आता ते सगळं नाही.उरली फक्त तलखी.


बुधवार, ३ एप्रिल, २०२४

लय

 तबल्याची किंवा गाण्याची मैफिल संथ लयीत सुरु होऊन मध्य नी मग दृत लयीत संपते.

पण आता वाटत,आयुष्याची मैफिल मात्र उलट प्रवास करते.बालपण, तारुण्य,दृत लयीत केंव्हा गेल समजतच नाही.मग मध्यवय आलं कि आयुष्य मध्य लयीत प्रवेश करत.मग येणार वार्धक्य शेवटी इतकी विलंबीत,संथ लय पकडत कि मैफिल शेवटा कड आली तरी संपता संपत नाही.


काही नाही,सहज आलं मनात.मध्य लयीत आहोत तिथंच मैफिल संपावी वाटत.हा उलट लयी चा प्रवास इथवरच ठिक. पण संगीतात रसिकांची इच्छा मैफिल लांबवते.आयुष्यात मात्र देवा च्या इच्छे वर भैरवी कधी ते ठरत.

सोमवार, १६ ऑक्टोबर, २०२३

दिवाळी

 

दिवाळी.
सणांची चाहूल आता tv आणि इतरत्र जाहिराती वरून लागते.
अलार्म काका ची जाहिरात बघितली नी दिवाळी जवळ आल्याची जाणीव झाली.
अश्या वेळी मग मन भूतकाळात जात.
गावाकडच मोठ घर.सभोवती भरपूर चौ.फु.जागा इतकी कि...
आधी शाळेत दिवाळीच्या अभ्यासाची वही सजवायची असे.
मुंबईत चाळीत आणि रस्त्यावर लगबग सुरु होई.बाजार पेठ बहरात आजही येते.पण त्यावेळच अप्रूप वेगळच होत.महागाई तेंव्हाही होती पण आजच्या इतकी जाणवत नव्हती मध्यम वर्गास.फटाके शे दीडशे मध्ये खूप येत.त्या लड्या एकदम न वाजवता सुट्या करून एकेक पुरवून फोडायची पद्धत होती.व्यापारी मात्र रस्त्यावर फटाक्याचा ढीग फोडत.
किल्ले व्हायचे बच्चा कम्पनीचे.गावी मस्त सारवलेली अंगणी भुरळ घालत.रात्री तिथ मांडवा खाली झोपायची ऐश उपभोगलीय याच समाधान आजही वाटत.
गावी व्यापारी लोक आजोबांना शिधा आणि टोपली भर फटाके घर पोच करत.फराळ तयार करायला शेजारणी मदतीस येत एकमेकींच्या.जाताना आणि दिवाळीत फराळाची देवाण घेवाण होत असे.अंघोळीस कुणी बसला कि अंगणात फटाके वाजत.घरीच केलेला पारंपरिक बांबू चा कंदील झक्कास दिसे.
मुंबईत आयते मिळत.चांदणी तीही फोल्डिंग ची फेमस होती.
एक आठवण आजही कोरून राहिलीय मेंदूत.
माझा मामा तेंव्हा गावाहून मुंबईस आमच्याकडं आला.तेंव्हा 15 वर्ष्य वय असावं त्याच.नोकरी नव्हतीच.आई वडील गेलेले लहानपणी म्हणून बाबांनी त्याला गावच्या घरी आणलं.तो तिथ आजी आजोबा सोबत राहत असे.आजोबानी प्रवास खर्च आणि थोडे जास्तीचे म्हणजे विस पंचवीस रु त्याला दिले होते.तो यायच्या आधी आई खुश होतीच पण तिन मला सांगितलं,मामा येतोय पण त्याला त्रास द्यायचा नाही हट्ट करून कसलाही म्हटलं,मी कधी कुणा कड तसा हट्ट केलाय का?
तस नाही रे.पण त्याला खर्चायला पैसे नसतात.तो कमवत नाही न अजून.तात्यांनी उतार खर्च दिला असेल तितकाच.
तू नको काळजी करू.मी नाही काही मागणार त्याच्या कड.
आणि एक दिवस आधी मामा आला.आजही लख्ख आठवतंय मला.किरकोळ शरीर्यष्टी चा मामा दोन जड पिशव्या घेऊन आला.खूप आनंद झाला तो आला म्हणून.मग आईन सांगितल्या प्रमाणे मी गप्प बसलो.त्याच चहा पाणी झाल नी तो मला म्हणला,तू का गप्प?ये इकडं.
आणि त्याम एक पिशवी मोकळी केली.त्यात आजीन दिलेला फराळ,मेतकूट अस काय काय होत.आणि दुसरी पिशवी मात्र मला जवळ घेऊन उघडत म्हणला,हे तुझ्या करता.
चक्क फटाके होते त्यात.इतक मस्त वाटलं.मग त्यातलं एक पाकिट काढत तो म्हणला,हे बघ हे विशेष आहे.नवीन आलंय अस दुकानदार म्हणाला.बघितलं तर ते स्वस्तिक च्या आकारातलं भुई चक्र होत.पेटवलं तर प्रत्येक दांडी वेगळी पेटली आणि उलट सुलट फिरली बराच वेळ.
आई म्हणाली,अरे इतका खर्च का केलास?कुठून आणलेस पैसे.
अगो तात्यांनी दिले मला त्यातले वापरले.मी कुठून आणणार पैसे?
अरे मग तुलाच ठेवायचे त्याला फटाके का आणलेस?
असू दे.भाचा आहे माझा तो.मग मला जवळ घेऊन एक पापी घेतलीन.त्या दिवशी इतका आनंद झाला ते चक्र बघून कि सांगता येत नाही.आणि तस चक्र दादरला देखील आलं नव्हतं म्हणून जास्तच खुशी.
पण आता इतकी वर्ष गेल्यावर आणि आयुष्याच्या थपडा खाल्ल्यावर त्या प्रसंगाचा वेगळा अर्थ समजून मामाला मनापासून दंडवत असत माझं.
लहानपणी आई वडील गेले.आधी वडील गेले.त्यांच्या घरी अन्न छत्र होत.रेवदंडा समुद्र किनाऱ्या लागत त्यांच घर होत.नारळाची वाडी होती.दुध दुभत घरच होत.पावसाळा सोडला तर बंदरात बोट लागली नी माणस उतरून जाऊ लागली कि आजोबा तिथ जाऊन मोठ्या आवाजात,कुणी अतिथ आहे का?अशी हाक देत.कुणी परगावं चा प्रवासी असेल तो हो म्हणत असे.मग त्याला घरी घेऊन येत.जेवायला वाढून दक्षिणा देऊन तृप्त करत.मग तो पुढील प्रवासास जाई.
तर अस सुरळीत चालू असता आजोबांची दृष्टी अचानक गेली.मग आजारपण त्यांना घेऊनच गेल.नातलगानी फसवलं. रहात घर सोडून म्हणजे,आल्या किमतीस विकून आजी मामाला घेऊन पेणं ला भाड्यान घर घेऊन राहिली.जिच अन्न छत्र होत,साई बाबा जिवंत असताना तिन लहानपणी शिर्डीत राहून त्यांची सेवा केली होती त्या बाईवर हि परिस्थिती आली.का? दैव कस वागेल सांगता येत नाही.मग आजी 4 घरी स्वयंपाक करून दिवस काढत होती मामा सोबत.मामाला काही ब्राह्मणांनी वार लावून दिले होते आपणहून.म्हणजे,रोज त्यांच्या दारी जाऊन ओम भवती भिक्षांदेही म्हणायचं.मग झोळीत घर धणीन जे वाढील ते घरी घेऊन यायच.आणि रोज फक्त एकच घर.तिथ जे मिळेल तेच .या श्रमान किंवा मला वाटत मानसिक खचून आजी लवकरच गेली.मामा एकटा पडला.मग बाबा आजीच्या दिवस कार्यास गेले ते त्याला घेऊनच आले.मग तो आमच्या गावी बरीच वर्ष राहिला.आजी आजोबांची सेवा केलीन.तिथ एकूण तीन वृद्ध माणसां ची त्यानं अहोरात्र सेवा केली.शेवटची दुखणी काढलीन.मग तो आमच्याकडं मुंबईत आला तो आजही माझ्या सोबत आहे.तो मला मामा न वाटता मोठा भाऊ वाटतो आणि आतातर वडिलांच्या जागी आहे.तिकड त्या माणसाचं केलंन तसच इकडं आमच्या घरी त्याच्या ताई च आणि मेव्हण्यांचं शेवटच आणि दीर्घ आजारपण देखील त्यानं काढलं.आम्ही यावेळी त्याच्या जोडीला होतो.तरी त्याची कमाल आहे.
आज त्याच वय 75 असावं.आजही पहाटे उठून कामाला लागतो.याच काम कमी व्हाव म्हणून मी केल तर हा दुसर काम करत बसेल.कधीही चिडत नाही.शांत असतो.कुणीही हाक मारली तरी हा जाऊन मदत करणारच.याला कसलं व्यसन नाही.कुठली छान छोकी नाही.फक्त रोज पेपर लागतो.
आजवर एकदाही त्याच्या तोंडून निराशेचा बोल ऐकला नाहीये.कधीही म्हणला नाही कि,काय साल नशीब आहे माझं!इतक सगळं माझ्याच वाट्याला का?अजिबात चकार तक्रार नाही.अजात शत्रू आहे.जातो तिथ सख्य होत याच.
त्या वर्षी दिवाळीत मला फटाके त्यान् आणलेन त्यातून आणि त्याच्या दीर्घ सहवासातून  मी  शिकलोय कि,
आपली ऐपत नसली तरी आपल्या वाटच आपल्या माणसाशी वाटून घ्यावं नव्हे तर त्याला ते देऊन टाकाव.कितीही विपरीत परिस्थिती असली तरी तोंडातून निराशा आणि संतापाचे बोल काढायचे नाहीत.सतत पडेल ते काम करत आनंदी रहावं .
पण मला ते त्याच्या सारखं खरच जमत नाही अजून.
कुणी माझ्याशी नीट वागला नाही मी नीट वागूनही तर मला चिड येते.मामा मात्र शांत राहील.उलट कुणी याला बेदम चोपला अकारण तरी हा त्याला म्हणेल,खूप दुखले असतील हात तुझे दाबून देऊ?
मामा हेच मला पटत नाही तुझं.अरे गांधी नी शाम व्हायचे दिवस गेले आता.जशास तस वाग.पण ते तुला जमणार नाही हे देखील कळतंय.तेंव्हा नको.तू आहेस तसाच रहा.मी जिवंत आहे तोवर त्या दिवाळीत तू मला दिलेला आनंद मला आयुष्य भर पुरेल रे.त्या करता दिवाळीची आवश्यकता नाही.रोज दिवाळीच असते अश्या आठवणींची.

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३

* तारुण्याच्या वेशी वरच्या सर्वांस*

 या वयात नवे पंख फुटतात.ते उत्सुकतेचे,शिक्षणाचे,धाडसाचे असे असतात.उत्साह खूप असतो.धोक्याच वळण देखील इथंच असत.या वळणावर जर गाडी घसरली तर पुन्हा मार्गावर येण खूप कठीण असत.बरेचदा आयुष्य नासून जात.फक्त एकच व्यक्तीचं नव्हे,तर कुटुंबाचे देखील.

व्यसन खुणावतात ती याचं वयात.त्या पासून दूर रहा.जाहिरातदारांना तुम्ही कस जगावं हे शिकवू देऊ नका.एखादा हिरो जाहिरातीत मस्त कपडे घालून,आलिशान गाडी चालवत सिगरेट ओढतांना बघून फसू नका.तस करण म्हणजे पौरुषत्व नसत.

पण मला दुसरी धोक्याची जागा सांगायचीय.

ती म्हणजे प्रेमात पडायची.तस होण साहजिक आहे.फक्त प्रेम म्हणजे काय? हे समजत नसत.बरेचदा ते शारीरिक आकर्षण असत. सहवासाने माणूस उलगडत जातो.कधी बरीच वर्ष जाऊन देखील अस होत नाही.तेंव्हा या वयातच हे ठरवावं कि, इथून पुढ प्रत्येक महत्वाचा निर्णय बुद्धी वर घासून घेईन.भावनेच्या आहारी जाऊन नाही.

जोडीदार आपल्या एकूण स्थितीला योग्य आहे का हे बघावं.

त्याची शरीर भाषा अभ्यासावी.त्यातून माणूस बराच प्रगट होत असतो.अधिकार गाजवत राहणारा आहे का? आपण जसे आहोत तसे स्वीकारणारा आहे का? संयमी आहे का?आपल्या मताची ,आवडीची किंमत ठेवणारा आहे का?अस बरंच तपासून पहावं. मग निर्णय घ्यावा.कारण हे नात आयुष्यभर सांभाळायचं आहे.नातेवाईक निवडून घेता येत नाहीत.मात्र मित्र नी जोडीदार निवडता येतात.

आणि समजा काही दिवसांनी बिनसलं,ब्रेकप झाला तर दुनिया संपत नसते हे नक्की.जन्मा पासून आपल्याला वाढवणारे जन्मदाते असतातच कि आपल्या सोबत.मित्र मैत्रिणी सुद्धा.त्यामुळं अचानक कुणीतरी आपल्या आयुष्यात येतो नी आपल्याला सोडून जातो तर जाऊ दे कि.त्या एक माणसा करता आपण आपल नी कुटुंबाच आयुष्य का खराब करायचं? तुम्हांला वाढवायला आई वडिलांनी मेहनत घेतलीय.शिक्षण आणि इतर उत्तम गोष्टी अंगीकरून तुम्ही स्वतः आपल व्यक्तिमत्व उभ केलंय.ते अस कुणा एकाच्या करता वाऱ्यावर सोडायला नक्कीच नाही.

हे लिहायचं कारण,

माझा भाऊ प्रेमात पडला.आम्ही घराच्यांनी काहीच आडकाठी घेतली नाही.पण त्या दोघांच आपसात काही बिनसलं.ती मुलगी घरी येऊन सांगून गेली,मला हा नकोय.आत्ता अस वागावतोय पुढ काय करेल?

बस्स.तिथ पासून बंधूनच वागणं बदललं.रागीट झाला.सारासार विचार संपला.उलट सुलट विचार करून तिचे भास होऊ लागले.स्किझोफ्रेनिया चा पक्का रुग्ण झालाय.हॉस्पिटल मध्ये शॉक ट्रीटमेन्ट झाली मग जरा हिंसक कमी झाला.बरंच भोगावे लागतंय मला अजूनही.आई बाबा गेले.मी लग्न केलच नाही.कारण याचं वागणं बेताल असत.सगळं नाही सांगत बसत.पण जिवंत नरक भोगत आयुष्य काढतोय.एका वेड्या सोबत त्याच्या लहरी नुसार .

तेंव्हा ब्रेकप न खचून जाऊ नका.आयुष्य कुणासाठी थांबत नसत.वेळ निघून गेली तर ती परत येत नाही.आपणच आपले नसतो.आपल कुटुंब देखील या आगीत अकारण होरपळून निघत याची जाणीव ठेवा.

आणखी एक गोष्ट मुलींकरता.

हल्ली लव्ह जिहाद सुरूय.तो खरा हि आहे.केरला स्टोरी बघून घ्या.

कंव्हर्नजन् सिनेमा देखील बघा.

आपला धर्मच उत्तम आहे.तो धर्म स्वीकारे पर्यंतच ,मेरा अब्दुल ऐसा नही है म्हणू शकाल.एकदा लग्न झाल कि किंवा मुलगी झाली नी मोठी झाली कि त्यांचं खर रूप समजेल.पण वेळ गेलेली असेल.

 बरेचदा हे आधीच हळूहळू सुरु होईल.तु जरा दुपट्टा डोक्यावरून घे न.कुणाशी बोलत होतीस फोन वर इतका वेळ?अस पझेसिव्ह वागणं सुरु होईल.आधी धर्म बदलला नाहीस तरी चालेल म्हटलं जाईल.पण मग निदान अम्मी कि खातीर नमाज शुरु करो अस म्हटलं जाईल.घरचे लोक टोमणे सुरु करतील.हळूहळू धर्मांतर केलच जाईल.

त्या धर्मातील धक्कादायक गोष्टी आपल्याला माहित नसतात.त्या करता एक्स मुस्लिम लोकांचे व्हिडीओ युट्यूब वर बघा.उदाहरण म्हणूंन सांगून ठेवतो त्यांचे व्हिडीओ बघा.हे मुस्लिमच होते.पण जसा धर्माचा अभ्यास केला तशी त्यातलं खर स्वरूप त्यांना कळलं.आणि कुणी यात नव्याने फसू नये आणि जे त्या धर्मात आहेत त्यांना खर कळावं म्हणून स्वतः चा जीव धोक्यात घालून हे लोक समाज जागृतीच काम करतायत.एक्स मुस्लिम साहिल आणि एक्स मुस्लिम adam seekar हे ते दोघे.यांच्या कडून नुसतच त्या धर्माच खर स्वरूप कळेल इतक नाही.तर एखाद्या गोष्टी चा कसा अभ्यास करावा नी मग त्या गोष्टी वर वाद विवाद कसा अभ्यास पूर्ण करावा याचं उत्तम उदाहरण मिळेल.साहिल शांत पण ,समजूतीन पटवतो.adam मात्र रोखठोक आहे.समोरचा ज्या पातळीवर असेल तस बोलतो.पण दोघांचा अभ्यास मात्र कमालच आहे.

शेवटी खास करून मुलींनी,स्त्रियांनी सोबत मुलांनी देखील आपल बँक खात आपणच सांभाळावं.वाढवावं.त्याच्यात कुणाचीही भागीदारी नको.मुलींनी घरावर आपल नाव घातलं जावं याची कटाक्षाने दखल घ्यावी.मी पुरुष असून देखील सांगतो कि,पुरुषांचा भरवसा नाही.कधीही म्हणतील,हे घर माझं आहे.इथ मी म्हणीन तेच होईल.पटल तर रहा नाहीतर चालू पडा.

आपली पूर्ण आर्थिक सुरक्षा जपूनच रहायचं.म्हणजे कुणी उगा अधिकार गाजवत नाही.एखादी कला किंवा स्किल नक्की आत्मसात करावं.जे तुम्हांला अर्थार्जन कधीही कुठंही करून देईल.नोकरीला निवृत्ती असते.स्किल ला नाही.

जमेल तितकं मिळून मिसळून रहावच.थोडी आपल्या मताला मुरड हि घालावी दुसऱ्य करता.पण जोवर आपण गुलाम होत नाही तिथवरच.

आपले फक्त आपणच असतो दुसरं कुणीही नाही.बिरबलाची माकडीणीची गोष्ट खरी आहे.नाती ताणली जात नाही तोवर छान वाटतात.तणाव वाढला कि तुटतात तेंव्हा कळतात.अशी नाती तुटलेलीच उत्तम.

अनेक शुभेच्छा सहित...