*राहुल*
आज दुपारी झोपायला जाणार इतक्यात फोन वाजला.व्हिडीओ कॉल होता.म्हटलं बालम क काय?पण राहुल चा फोन होता.उचलला तर म्हणला,
अरे साहब कहा हो आप ? कितने दिन हुए पता भी है यहा आये हुए?
हा यार बहोत दिन हुए, पर आजकाल मेरा आना उस तरफ होता हि नही इसलीये नही आ सका. बाकी आपकी याद तो रोज आती है भाई.
अच्छा तो आज आ हि जाइये आपसे मिलने को दिल कर रहा है.फिर अगले महिने तो मै गाव जा रहा हूं पेहली तारीख को.
हा और जून के एन्ड मे आओगे.और मिलने पर आख मे पानी लाते हुए कहोगे के ,घर पर तो सब ठीक ठाक है पर याद आती है परिवार कि.
मी अस म्हणल्यावर हसत म्हणला,हा क्या करे याद तो आती हि है घर कि. पर आज आपकी आ रही है आजाइये .
हा भाई पक्का आता हूं.
म्हणत फोन ठेवला.
हा राहुल माझा पाणी पुरी वाला.गेली कैक वर्ष रात्री त्याच्याकडं खाऊन येतोय घरी.त्याच्याशी इतकं नात जमलंय कि घरचा वाटतो.आत्ता येताना त्याच्या कडे गेलो.मला बघितल्यावर मिठी मारलीन.खूप दिवसांनी हवासा वाटणारा जवळचा नातेवाईक,त्याहून दुसर म्हणायच तर मित्र भेटल्यावर वाटत तस वाटलं.लगेच एकाला थंड पाण्याची बाटली माझ्या करता आणायला पाठवलन.
साहब आप पिछले बरस आये थे 7 महिने हो गये तबसे आज आये हो. वो भी बुलाने पर.लेकिन आये तो अच्छा लगा मुझे.एकूण त्याच सर्व ठीक चाललं होतं.आम्ही दोघांनी एकमेकांची सुख दुःख एकमेकांना सांगितलीयत. म्हटलं राहुल घरी सगळं ठीक.तर सर्व ठीक आहे म्हणला.मुलाला या खेपी इकडेच शिकायला आणतोय माझ्या बरोबर. घर बांधून झालं.तिथं एक बाईक हि घेऊन ठेवलीय.आता गेल्या सात महिन्यात दीड लाख फायदा कमावला. त्यातले 50 हजार पोरांच्या आजारपण वग्रे करता घरात देणारेय.50 इथं ठेवलेत.आणि 50 पोरींच्या लग्ना करता पुंजी जमवतोय त्यात टाकणार.3 मुली 1 मुलगा आहेत त्याला. आणि सासुरवाडीला एक बोअर मारायचीय त्याला पस्तीस हजार खरच येईल. वसईत आला तेंव्हा पासून मी त्याच्याकडे जातोय.अतिशय अदबीने,प्रेमानं आणि आपुलकीनं खाऊ घालतो.जे दुर्मिळ होत चाललंय हल्ली.पण रस्त्यावर भेटलेली अशी काही माणसं मात्र खूप जवळची झालीत माझ्या.आणि ही दोघे तिघे आहेत.याची पाणी पुरीची गाडी नाहीये.बांबू चा ठेला घेऊन असतो.सर्वांशी हसून खेळून बोलतो.गिर्हाईक नेहमीच बांधलेलं आहे.खूप बायका यांच्याच कडे विश्वासानं येत असतात.काही कुटुंब ही.आज भरपूर गप्पा मारल्या.तोवर मला बसायला स्टूल दिल होतन.मी नेहमी एक पाणीपुरी आणि एक रगडा पुरी खायचो त्याच्या कडे ते लक्षात असतच त्याच्या. ते खाऊन मी निघतो म्हणलो तर अजून थांबा म्हणला म्हणून परत बसलो.मग काही गिर्हाईक गेल्यावर परत एक भेळीची पुडी समोर धरलन.नको नको म्हणलो तरी नाही खा च म्हणला.निघताना शंभर रु काढून दिले तर डोळे ओले करत म्हणला,पैसे के लिये थोडे ही बुलाया आपको. पैसे दे के तो खाते हि आ रहे हो आप, आज ये प्यारसे खिलाया है उसके पैसे दे के दिल मत तोडो.
काय बोलणार यावर ? मग माग पार्क केलेल्या बाईक च्या माग लोकांनी त्यांच्या गाड्या लावलेल्या.माझ्या कडून चावी घेऊन त्यानं गाडी त्या गर्दीतून काढून दिलीन आणि परत मिठी मारून म्हणला,साहब हो सके तो मेरे गाव जाने से पेहले एक बार फिर आना.बच्चा भी याद करता है आपको घर पर.वो अंकल आते है या नही .म्हटलं नक्की भेटून जाईन.
अशी जीव लावणारी माणसं रस्त्यावर मिळलीत.
आज दुपारी झोपायला जाणार इतक्यात फोन वाजला.व्हिडीओ कॉल होता.म्हटलं बालम क काय?पण राहुल चा फोन होता.उचलला तर म्हणला,
अरे साहब कहा हो आप ? कितने दिन हुए पता भी है यहा आये हुए?
हा यार बहोत दिन हुए, पर आजकाल मेरा आना उस तरफ होता हि नही इसलीये नही आ सका. बाकी आपकी याद तो रोज आती है भाई.
अच्छा तो आज आ हि जाइये आपसे मिलने को दिल कर रहा है.फिर अगले महिने तो मै गाव जा रहा हूं पेहली तारीख को.
हा और जून के एन्ड मे आओगे.और मिलने पर आख मे पानी लाते हुए कहोगे के ,घर पर तो सब ठीक ठाक है पर याद आती है परिवार कि.
मी अस म्हणल्यावर हसत म्हणला,हा क्या करे याद तो आती हि है घर कि. पर आज आपकी आ रही है आजाइये .
हा भाई पक्का आता हूं.
म्हणत फोन ठेवला.
हा राहुल माझा पाणी पुरी वाला.गेली कैक वर्ष रात्री त्याच्याकडं खाऊन येतोय घरी.त्याच्याशी इतकं नात जमलंय कि घरचा वाटतो.आत्ता येताना त्याच्या कडे गेलो.मला बघितल्यावर मिठी मारलीन.खूप दिवसांनी हवासा वाटणारा जवळचा नातेवाईक,त्याहून दुसर म्हणायच तर मित्र भेटल्यावर वाटत तस वाटलं.लगेच एकाला थंड पाण्याची बाटली माझ्या करता आणायला पाठवलन.
साहब आप पिछले बरस आये थे 7 महिने हो गये तबसे आज आये हो. वो भी बुलाने पर.लेकिन आये तो अच्छा लगा मुझे.एकूण त्याच सर्व ठीक चाललं होतं.आम्ही दोघांनी एकमेकांची सुख दुःख एकमेकांना सांगितलीयत. म्हटलं राहुल घरी सगळं ठीक.तर सर्व ठीक आहे म्हणला.मुलाला या खेपी इकडेच शिकायला आणतोय माझ्या बरोबर. घर बांधून झालं.तिथं एक बाईक हि घेऊन ठेवलीय.आता गेल्या सात महिन्यात दीड लाख फायदा कमावला. त्यातले 50 हजार पोरांच्या आजारपण वग्रे करता घरात देणारेय.50 इथं ठेवलेत.आणि 50 पोरींच्या लग्ना करता पुंजी जमवतोय त्यात टाकणार.3 मुली 1 मुलगा आहेत त्याला. आणि सासुरवाडीला एक बोअर मारायचीय त्याला पस्तीस हजार खरच येईल. वसईत आला तेंव्हा पासून मी त्याच्याकडे जातोय.अतिशय अदबीने,प्रेमानं आणि आपुलकीनं खाऊ घालतो.जे दुर्मिळ होत चाललंय हल्ली.पण रस्त्यावर भेटलेली अशी काही माणसं मात्र खूप जवळची झालीत माझ्या.आणि ही दोघे तिघे आहेत.याची पाणी पुरीची गाडी नाहीये.बांबू चा ठेला घेऊन असतो.सर्वांशी हसून खेळून बोलतो.गिर्हाईक नेहमीच बांधलेलं आहे.खूप बायका यांच्याच कडे विश्वासानं येत असतात.काही कुटुंब ही.आज भरपूर गप्पा मारल्या.तोवर मला बसायला स्टूल दिल होतन.मी नेहमी एक पाणीपुरी आणि एक रगडा पुरी खायचो त्याच्या कडे ते लक्षात असतच त्याच्या. ते खाऊन मी निघतो म्हणलो तर अजून थांबा म्हणला म्हणून परत बसलो.मग काही गिर्हाईक गेल्यावर परत एक भेळीची पुडी समोर धरलन.नको नको म्हणलो तरी नाही खा च म्हणला.निघताना शंभर रु काढून दिले तर डोळे ओले करत म्हणला,पैसे के लिये थोडे ही बुलाया आपको. पैसे दे के तो खाते हि आ रहे हो आप, आज ये प्यारसे खिलाया है उसके पैसे दे के दिल मत तोडो.
काय बोलणार यावर ? मग माग पार्क केलेल्या बाईक च्या माग लोकांनी त्यांच्या गाड्या लावलेल्या.माझ्या कडून चावी घेऊन त्यानं गाडी त्या गर्दीतून काढून दिलीन आणि परत मिठी मारून म्हणला,साहब हो सके तो मेरे गाव जाने से पेहले एक बार फिर आना.बच्चा भी याद करता है आपको घर पर.वो अंकल आते है या नही .म्हटलं नक्की भेटून जाईन.
अशी जीव लावणारी माणसं रस्त्यावर मिळलीत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा