रविवार, २४ डिसेंबर, २०१७

उस्ताद मेहदी हसन खां

*उस्ताद मेहदी हसन साहब*

गझल ऐकू लागलो ते tv वर मॉडेला वूल स्पॉन्सर्ड प्रोग्रॅम मूळ.तलत अझीझ,पंकज उधास ते अनुप जलोटा सारखे आर्टिस्ट त्यात गायचे.भाषेची नजाकत आवडली.मग वहीत शेकड्यानी गझल जमवल्या होत्या ,पण नंतर ती गहाळ झाली.कालांतराने परिस्थिचे थपडे पडल्याने वास्तव समजू लागलं. त्या मूळ असेल कदाचित पण गझल मध्ये लाचारी जाणवू लागली.सारख तो ,तिला विनवतोय.मला वाटत चाचा गालिब च म्हणून गेलेत कि, आग दोनो तरफ हो तो ईश्क मजा देता है.मग भाऊ साहेब पाटणकर वपुंच्या पुस्तकातून परिचयाचे झाले.उर्दूवर प्रचंड प्रभुत्व असलेला माणूस.मुशायऱ्या त जाऊन आपला ठसा उमटवला होता त्यांनी.त्यांना ही ,हि लाचारी पसंत नव्हती.त्यांना ऐकल म्हणजे कळेल मला काय म्हणायचंय.
अस असलं तरी सुरेश भटांची मलमली तारुण्य माझे ते तरुण आहे रात्र अजुनी अश्या गझला मनावर राज्य करत होत्या.मग तबल्यामुळं गुलाम अली यांची चुपके चुपके कैकदा ऐकली .त्यांची लय प्रधान गायकी आणि उस्ताद तारी खान यांच्या तबल्या करता.काय माहोल तयार होतो ,जवाब नही.
त्यातच काही जाणकार मेहदी हसन नाही ऐकला तर गझल काय ऐकली म्हणले.तारी खान त्यांचे तबला वादक असले तरी गाण्यात त्यांचे शिष्य होते अस ऐकल.अलीकडं तू नळी मूळ तारी खा साहेबाना रंजीश ही सही गझल पूर्ण तयारीनिशी आणि स्वतः तबला वाजवत गाताना ऐकल आणि अक्षरशः हात जोडले. कारण नुसता ठेका नाही तर उठाण लग्गी तिहाई ,मध्ये भरणा अस सर्व व्यवस्थित वाजत होत आणि गात ही होते.मग मेहदी हसन साहेबांची रेकॉर्डिंग ऐकली.खर्जा चा घोगरा तरी नजाकत भरा आवाज ऐकून लोक म्हणतात ते पटलं.ती गझल गावी तर त्यांनीच किंवा ऐकावी ती त्यांचीच.सोबत तारी खां असले तर सोने पे सुहागा.
तर मेहदी हसन खां मूळचे भारतातले.राजस्थान राजवाड्याचे दरबारी गायक त्यांचे वडील होते.
आता खान आणि खां साहेब यातला फरक त्यांनीच सांगितलाय एके ठिकाणी.
पठाण लोकांना खान म्हणतात.
पण ज्याच्या किमान तीन पिढ्यात उत्तम आणि लोकमान्य गवई किंवा वादक होऊन गेलेत त्यांच्या पुढील पिढीत जर कुणी कलाकार असेल तर त्याला खां हा बहुमान मिळत असे.यांचं घराणे तर कैक पिढ्या राज गायकांच्या होत्या अस होत.वडील जयपूर दरबारी होते.कसली तदात नव्हती.मेहदी हसन 12 का 13 व्या वर्षी बडोद्याच्या महाराजां समोर हजेरी लावते झाले.40 मिनिट गाणं झालं.महाराजांनी त्यांना सोन्याचं कड आणि पोषाख देऊन गौरवलंच पण आज पासून हा आमचा दरबारी गायक झाला म्हणून घोषित केले.
तोवर वातावरण बदलू लागलं होतं.वडील मग काही काळ नेपाळ वग्रे ठिकाणी ही दरबारी गायक म्हणून गेले.पण फाळणी झाली नी हे कुटुंब पाकिस्तानात गेले.सर्व शांत झाला कि येऊ परत म्हणून.पण वडील इकडं आल्यावर कळलं कि सर्व लुटल गेलंय. मग हाती लागल ते घेऊन परत गेले.
तिथं ही जे होत ते विकत राहून यांची गुजराण सुरू होती.तालीम तर जोरदार होतीच पण,गाणं करायचं तर तब्येत उत्तम हवी.छातीत दम हवा.या करता त्यांना वडील व्यायाम करायला लावत.बर तो ही साधा नव्हे.
पहाटे 3 वाजता उठायचं.आधी 500 मग 1200 वर गेलेल्या जोर आणि बैठका.3 मैल धावणे.गावात एक मैदान होत त्याला चक्कर धावत मारायची.पहिल्या ठिकाणी आल्यावर बैठका मारायच्या मग पुढं दुसरी फेरी.अश्या तीन फेऱ्या झाल्या कि शेवटची फेरी हळूहळू धावत मारायची.
हे करायला खुराक ही तसाच होता. सहा शेर दूध एक दमात प्यायचं.पाऊण शेर देशी तूप,1छटाक गोश्त आणि बदाम ,पिस्ते ,काजू असा आहार.संध्याकाळी 4,5 मल्लाना प्रत्येकी थकवायच यांनी तेही दहा मिनिटात.मग यांचे काका उतरत त्यांना थकवायच.
बाकी रियाज होताच.
करता करता एक दिवस वडील म्हटले,आता आपल्या जवळ विकायला काही नाही.तेंव्हा उदर निर्वाह करायला म्हणून मी धंदा करणारेय.त्या करता एकाला 10 हजार उरले होते ते दिलेत. तो उद्या लाकडं आणील.
म्हणजे तुम्ही काय धंदा करणार आहात?
लाकडाची वखार टाकतोय आपण.
पण मग तुम्हाला सगळे वखार वाले म्हणतील!
हो पण इलाज नाही.तुझी तालीम ,खुराक,कुटुंबाचा खर्च ही आहेच.
नाही हे नाही पटत मला.तुम्ही मला पैसे द्या मी काही धंदा करीन आणि कमवेन.
वडील हसले आणि दहा रु काढून दिले.
मग त्यांनी एक मातीच बांधलेलं दुकान त्यांना देण्यात आलं होतं ते चालवायचं ठरवलं.राजदरबारात बालपण गेल्याने राजाच्या मोटारी,पंप वग्रे रिपेअर करायला माणस होती.यांना त्या टेक्निकल गोष्टीं ची आवड असल्याने तिथं उभं राहून सर्व टिपलं होत. मग त्या दहा रुपयात दीड रुपयांचा पंप,जुने टायर,स्क्रू ड्रायव्हर अशी जुजबी खरेदी केली.5 दिवस रिकामे गेले.मग मात्र बाईक,सायकल,मोटारी रिपेअरिंग करता येऊ लागल्या.13 रु च्या आसपास रोज मिळकत होऊ लागली. वडिलांना रोज 5 रु दिले जात होते.ते ठीक आहे न म्हणून विचारलं तर वडील म्हणले,अरे यात सर्व होतय.
पण या धंद्यावर अवलंबून रहाणं ठीक नाही म्हणून भावाला तिथ बसवून हे लाहोर ला गेले.तिथं ट्रॅकटर कम्पनीत जाऊन आपली कहाणी सांगितली.त्या लोकांनी ही ठेऊन घेतलं.यांनी फिट केलेले 300 पंप होते त्या परिसरात.काम बघून फर्ग्युसन कम्पनी ने त्यांना उत्तम कारागीर म्हणून सर्टिफिकेट दिल.
मग एक माणूस म्हणला, हे काय करत राह्यलास माझ्याकडे ये.मला एक जमीन लीज वर मिळालीय.ती पडीक आहे. तिला उपजाऊ करायच आहे.हे ही गेले त्याच्या बरोबर.त्या गृहस्थाला इतर कंपनी नी सांगितलं होतं कि, या जमिनीस वसवायला तीन वर्षे हवीत आणि यंत्र सामुग्री हवी.
त्या माणसाकडे आता पैसे शिल्लक नव्हते.मेहदी हसन म्हणले मला फक्त एक ट्रॅक्टर आणून द्या.त्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने त्यांनी ती जमीन एक वर्षात नांदती केली.पीक नीट एक ओळीत लावलेली. ती बघायला लोक लांबून येत.
तेंव्हाच त्यांना एक पत्र आलं.त्यांचं गाणं नुसतच साथीला काही नसताना एक लग्नात ऐकल होत एकाने.तो इतका खूष झाला कि म्हणला,मी जेव्हा सिनेमा काढीन त्यात तूच गाशील.हे हजार रुपये हवं तर टोकन म्हणून ठेव किंवा बिदागी म्हणून.
तर त्यानं सिनेमा काढायचं ठरवलं तर याना करारपत्र न पैसे पाठवले आणि ये म्हटलं.मग ज्याची जमीन होती त्याला हे सांगून तिथून निघाले.गायलेली गाणी गाजली.रेडिओत बोलावलं. त्यांची ऑडिशन 5 तास झाली.धृपद ते सिने संगीत यांनी ऐकवलं.बुखारी साहेब म्हणले याल ठेऊन घ्या.पगार किती तर 35 रु म्हणले.बस इतकंच?तर समजलं इतरांना 12रु च मिळत.मग आणि काय देणार तर A ग्रेड रेडिओ ची मिळाली.मग हळूहळू नाव झालं आणि पसिद्ध झाले.लहानपणी लग्न झाल्यानं लग्नात बायको 13 वर्ष्याची होती.तिचे आई वडील गेल्याने तिला तू आता घेऊन जा म्हणाले.मग तिला स्वयंपाक वग्रे ही यांनीच शिकवलं.मग आणखी ही एक लग्न झालं होतं.,
मध्ये हिंदुस्थान मध्ये राजस्थान ला बोलावलं.ते आले गायले. पण त्यांच्या जन्म गावी भेट द्यायची म्हटल्यावर व्यवस्था केली गेली.तिथं जाऊन आल्यावर अधिकाऱ्याने विचारलं,कसं वाटलं जाऊन?सुधारणा आहे का नाही?तर तिथं आता खूप सुधारणा आहे पण अजून रस्ता ,वीज,पाणी नाहीये.मग इतर व्यवस्था केली गेली पण रस्ते झाले नाहीत.तेंव्हा मेहदी साहेब म्हणले, मला काही करायचंय गावकऱता करू का ?मग त्यांच्या कार्यक्रम ठेवला गेला गावात.दीड दोन लाख लोक होते आलेले आजूबाजुहून.ते उत्पन्न त्यांनी रस्त्याकरता दिले आणि रस्ता झाला., झून झून नाव मला वाटत गावाचं.
इकडं लता दीदी पासून सर्व त्यांचे चाहते होते. आले घरी कि दीदी स्वतः त्यांना करून वाढत.
त्यांचे शेवटचं दर्शन जे पाकिस्तान tv वर झालं ते मात्र बघवले नाही.सुन्न व्हायला झालं.पहाडा सारखा माणूस ओळखू येईना असा गलितगात्र झालेला.त्यांच्या मुलाने सांगितलं,हमारी दोनो अम्मा जबसे गयी तबसे इन्हो ने हाय ले ली है.
कलाकार म्हणून मोठे होतेच पण वेळ आली तेंव्हा कला बाजूस ठेऊन कुटुंबा करता अर्थार्जन इतर मार्गाने इमानदारीत आणि समर्थ पण केलं हे विशेष.,
ते म्हणले,जे ठरवलं ते करायचंच.होतच.अल्ला से मांगो दिल से तो वो दे देता है बस मांगनेका तरिका आना चाहीये.या दुसरे मायनो मे विल पॉवर स्ट्रॉंग होनी चाहीये.
हे सर्व त्यांच्या मुलाखतीतून समजलं.आणि कलाकारा मागचा माणूस ही समजला आणि 🙏🏻

मंगळवार, ५ डिसेंबर, २०१७

भटकंती,वडोदरा

भटकंती करताना काही ठिकाण खूप प्रेमात पाडतात. जी थोडीशी भटकंती केली ती गडांवर आणि काही शहरात .
गड भटकताना गडावर त्या ठिकाणीच पावित्र्य न जपणारे बेजबाबदार लोक सोडले तर बहुतांश ठिकाणी गड पायथ्याशी असणारे गावकरी सज्जन,प्रेमळ च भेटले. काही लोक गडावर येणाऱ्या लोकांच्या खाण्याची रहाण्याची सोय उदरनिर्वाहा करता करतात.पण व्यवहार जपून ही अधिकच अगत्य इतकं दाखवतात कि ऐतिहासिक वास्तू इतकच त्या लोकांकरिता  त्या ठिकाणी परत जावंसं वाटत रहात.
कोल्हापूर आणि बडोदा हि मला आवडलेली ठिकाण .तिथल्या इतर प्रसिद्ध गोष्टीं पेक्ष्या लोकांच्या वागणुकीमुळे. पैकी बडोद्यात तर जाऊन स्थायिक व्हावं अस मनात आहे.
का ? तर,
तिथले लोक वागताना अतिशय सौजन्याने वागले असा अनुभव.रोजच्या व्यवहारात कुठं राग ,चिडचिड नाही.आवो भाई म्हणून स्वागत करतील.कंडक्टर प्रवासी लोकांशी सौजन्य सप्ताह नसताना सौजन्याने वागतो. जुन्या फाटक्या नोटा प्लास्टिक च्या छोट्या पिशवीत घालून एका आजीने दिल्यानंतर त्या स्वीकारताना पाह्यला जुनागड गिरनार ला जाताना.शेजारी प्रेमानं वागताना पाह्यलं.परवाच बसने गेलो.उतरायचं ठिकाण मला माहित नव्हतं.भावाचा फोन आला ,कुठं उतरवतोय विचार ?त्याला फोन जोडून दिला ड्राईव्हर सोबत.ड्रायव्हर न सांगितलं चकली सर्कल.भाऊ म्हणला,जमत असेल तर गोत्री जवळ उतरवून दे मला आणायला जवळ पडेल.यावर ड्रायव्हर आपुलकीनं म्हणला,जो भाई मारी 3 सीट खाली छे. ए जो ना भराय न त्यारे भाई ने गोत्री उतारी देऊ छु.
जो न जमतु होय तो सारू .फोन करीन जणावसो मारे तो हूं त्या आवि जाऊ अने लेवा.
फिकर नही करता भाई आऊ छु चालो तमारा भाईन लैने गोत्री.एक लेफ्ट मारवी पडशे खरी मारे पण आऊ छु हं.
अस आऊट ऑफ द वे जाऊन मला घराजवळ उतरवलंन.परत उतरताना,जय श्रीकृष्ण हं भाई,अवजो हा फरी थी. म्हणून मला निरोप ही दिलन प्रेमानं.
आत्ता येताना ही गाडी बुकिंग वेळी ठरल्या वेळे आधी 2 तास आली. फोन आला,कुठं आहात साहेब गाडी येऊन राह्यलीय.म्हटलं बुकिंग केलं तर 12 च टाईम होत तुम्ही 2 तास आधी कस येता ?भावानं फोन घेतला न तेच पुन्हा शांतपणे सांगितलं.तो म्हणला, ऑफिस वाल्यांचा काहीतरी गोंधळ झाला बहुतेक पण गाडी तुमच्या करता थांबलीय. भाऊ म्हणला,जाऊ नका मी येतोय घेऊन भावाला.तर तो ही म्हणला ,या सर घाई करू नका थांबतो तुमच्या करता.
मी मुंबईकर, टाईम दिल न आधी गाडी कशी येते ? म्हणून डोकं फिरलं.पण भाऊ बडोदेकर.शांतपणे म्हणला,अरे होत असं कधी कधी.ऑफिसमध्ये घोळ असेल काहीतरी झालेला. किंवा काल आपण बुक केली सीट तेंव्हा फक्त तुझंच बुकिंग होत बाकी गाडी खाली होती.अमदाबाद वरून बुकिंग नसेल तर त्यांनी दुसऱ्या गाडीत सोय केली असेल.चल जाऊ आपण.त्यानं हायवे ला आणलं.गाडी आली.मी त्या माणसाला म्हणलो,तुम्ही टाईम 12 च दिल न 2 तास आधी आलात आमची धावपळ झाली.
तो शांत पण म्हणला, भाई कुछ गडबड हुई खरी.ऑफिसमध्ये लोकांनी चुकून दिली असेल वेळ
सॉरी हं.
मग शांतपणे विचार केला,ज्या करता बडोदा आवडलं त्याच उदाहरण भावानं शांतपणे वागून दिल कि! मग मी ही त्या अटेंडन्ट ला म्हणलो,जाने दो चलो.सोपारा फाटा उतारदो. तो ही मंद हसत म्हणला,हा भाई.
तर असा अनुभव.कुठं घाई गडबड, राग,चिडचिड नाही.
अर्थात तिकडं अस काही शंभर टक्के असेलच असे नाही,पण मला आलेले अनुभव चांगलेच होते.मामा कुणा कुणाकडे नेत होता. हा माझा भाचा आहे.तबला शिकवतो.त्याला इकडं आणायचा विचार आहे माझा.यावर ते लोक म्हणत,जरूर या.इकडं असे लोक हवेच आहेत आम्हाला.आमच्याकडुन होईल ते नक्की करू.काही ना काही होईलच जरूर या.
बाकी रस्ते उत्तम नी प्रशस्त.खाण्यापिण्याच्या मुबलक जागा.फूड कोर्ट कल्पना उत्तम राबवली जातेय.
एकूण बडोदा अनुभवायला हवं असं शहर.
कोल्हापूर विषयी पुन्हा लिहिन.
तो वर भटकत रहा.मजा येते.नवी ठिकाण आणि त्या ही पेक्षा माणसं अनुभवायला.

मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०१७

किल्ले रोहिडा

रोहिडा बघायचा होता पण जमत नव्हतं.काल अचानक जावंस  वाटलं रात्री आठ च्या सुमारास निघालो परळ डेपोत दहा ला पोचल्यावर समजलं सव्वाअकरा न सव्वा बारा अश्या गाडया  आहेत. मग १तास वाट बघत सव्वा अकराची गाडीपकडली.पाचला भोरला उतरलो.दोन पेपर वाले पेपर लावताना दिसले स्टॅन्ड बाहेर. त्यांना विचारलं बाजारवाडी गाडी कधी आहे. एक म्हणला ,मी नवीन आहे इथं मला माहित नाही. दुसरा म्हणला आठ ला येईल गाडी. परत  स्टॅन्ड मध्ये गेलो .. मी आणि दोन म्हातारे गृहस्थ स्टॅन्ड मध्ये होतो .
भटकंती करताना अपरिचित लोकांची भेट होत होत असते . कधी चांगले कधी वाईट अनुभव मिळतात . पण मला जास्त चांगलेच लोक भेटलेत आजवर . सुरुवात या दोघांपासून झाली आजची . बाजारवाडी बस कधी विचारलं तर म्हणले सांगतो कि आली  कि .  गप्पा सुरु झाल्यावर तुम्ही कुठले वग्रे  झालं. तेंव्हा समजलं हे दोघेही बोरिवली च्या सरकारी ऍन गोदामात हमाली करतात. आधी १०० किलो ची गोण  असायची हो,आता आल्यात ४०न २५किलो च्या. मग तुम्हाला पाठदुखी लागली असेल.
तर काय हो ,हे गुढघे आता चालून देत नाहीत. इतक्यात एक गाडी लागली. चालक आणि महिला वाहक कुणी प्रवासी नाही म्हणून जाऊ लागले तर त्या काकांनी थांबवून मला हाक दिली,चला जा हि गाडी जाते बाजारवाडीहून . त्यांचे आभार मानून गाडीत बसलो. दहा मिनिटात बाजारवाडीत उतरलो. गाव शांत. अजून नीट उजाडलं हि नव्हतं . गड मात्र दिसत होता त्याच्या रोखाने पुढं निघालो. एक बाई शेणाची टोपली जमिनीवर रिकामी करत होत्या त्यांना विचारलं,
गडाची वाट हीच का ?
कुठून आला दादा ?
विरार .
मंजे आताच उतरला न ?
हो भोर वरून आलो ती गाडी गेली तिने.
मग चहा नाश्ता काही केलंच नसेल ?
नाही.
जरा थांब,या इतक्या लावतो मग माझ्या घरी ये चहा घे मग निघ गडावर.हे इतकं लावून झालं का निघू. हे काय हाय माहितीय का ?
हो,शेणी थापताय न.न.मग हसली न म्हणली, हा रे . हल्ली लोकांना माहित नसत म्हणून म्हणलो. तिच्या शेणी लावून झाल्यावर तिच्या सोबत निघालो. समोरच छोटं  घर होत. नवरा बाहेर अंघोळ करत बसला होता दारातच त्याला म्हणली,अवो बगा  गडावर निघालेत त्यांना घेऊन अली. चहा घेऊन निघा म्हणलो. तो हि पटकन म्हणला , या आत बसा जाऊन. जेमतेम बारा फुटी घर. दारा नंतर अगदी छोटी पडवी  तिच्यात म्हैस बांधलेली. पूढं  बाजेवर बस म्हणली तिथं बसलो. बाई चहा करायला लागल्या. काल  तर गडावर जत्राच होती माणसांची. शाळेच्या ट्रिपा , बाकी हि लोक. खालपासून वर पर्यंत रंग लागली होती .आम्ही हि देतो करून कुणी म्हणलं तर नाश्ता,जेवण . नवरा शर्ट चढवून आला. म्हैस आता ओरडू लागली न जागीच पुढं माग  होऊ लागली. तिचं खाण्याचं टाइम झालं का ?हा ,धार काढायची आहे तिची. तिला वर मंदिरा जवळ बांधली तर रहात नाही, आम्ही जवळ लागतो. इतक्यात चहा घेऊन बाई आल्या . स्टील चा ग्लास होता. तुम्हाला बशी लागलं का ? हो हे खूप गरम झालंय . मग त्यांनी बशी दिली. चहा पिऊन निघताना म्हटलं,पैसे किती द्यायचे?हट  , पैसे कसले? चहा  नाश्ता न करताच गडावर निघाला म्हणून बोलावलं ,पैसे नको. तरी मी ठेवले पैसे म्हटलं,अहो सकाळी सकाळी असच कसा घेऊ ?पुन्हा येईन तो कालवून येईन मग जाताना नाश्ता आणि जेवण तुमच्याकडे करीन . फोन नंबर देऊन ठेवा. त्यांनी दिला. मग बाई परत  मला वाट दाखवायला आल्या. या पाण्याच्या टाकी खालून जो रस्ता गेला न तो सोडायचा नाही. काही काळजीच कारण नाही वाट अगदी सरळ आहे. मग सुरुवात इतकी प्रेमळ माणसं  भेटून झाली म्हणल्यावर आनंदानं निघालो. गड दिसत होता पण वाट अजिबात नाही. जस जसा पुढं गेलो तशी वाट उलगडत गेली. एक गुराखी पोरगा भेटला त्याला म्हणलो, नीट चाललोय ना रे गडावर ? तो हि म्हणला , हि वाट सोडूच नका. पायवाट च आहे . बांधीव पायऱ्यांची ऐश नाही. चालायची सवय सुटल्याने दमछाक होत होती. पण ऊन चढलं नव्हतं न वातावरण हि गार  असल्यानं मस्त वाटत होत. मध्ये विश्रांतीला बाके हि ठेवलेली आढळली त्यांचा उपयोग केला . शेवटी दरवाजा दिसला पण तो हि आपल्याला सन्मुख नाही. राजांच्या गडाचं वैशिष्ट्य. दरवाजा दिसतच नाही समोरून. तीन दरवाजे पार करून गडावर पोचलो. बऱ्या पैकी विस्तीर्ण आहे गड . थोडाही तटबंदी आणि मला वाटत ७ बुरुज अजूनही उभे आहेत. पाण्याची टाकीही आहे मुबलक ज्यात पाणी आहे. एक तर पाहल्या दरवाजात आहे . रोहिडेश्वर मंदिर बंद होत. त्या समोर काही फुलझाडं लावलेली दिसली. जे कुणी हि बाग  फुलवतायत त्याचं कौतुक वाटलं . काही वाड्याचे अवशेष आहेत बाजूस त्या मध्ये गडावर सापडलेले जात्याचे,, मातीच्या मडक्याचे वगैरे तुकडे लोखण्डी टेबल वर  मांडून ठेवले आहेत. जे कुणी घेऊन न जाताट  तिथंच राहू दिलेत हे बघून बर  वाटलं. गवत गड भर वाढलं होत. आणि अख्ख्या गडावर मी एकटाच होतो. हँड पाहायला तासभर लागतो . बाकी गड  इथून दिसतात म्हण पण धुक्यामुळं दिसत नव्हतं. बाजी प्रभूंची आणि राजांची भेट इथंच झाली. मग खाली निघालो . गडाचा दरवाजा काम करतोय हे जाणवलं. उतरताना रस्त्यात तिघे वयस्क लोक गप्पा मारत  होते त्यांना रामराम केला. मग त्यानी चौकशी केली माझी.
कुठून आले दादा ?
विरार. तुम्ही इथलेच दिसता ?आज गडावर निघाले का ?
अहो रोज जातोय कि,फुलझाडं लावलीयत त्यांना पाणी घालायला.
बघितली तो उत्तम काम करताय . धन्यवाद तुम्हाला राजांचा गाद आज हि असा राखताय .
तुम्ही वस्तीला होता का /
नाही आज लवकर आलो न आलो गडावर जाऊन .
पण तुम्ही सर्व गड बघितला का नीट ?
हो तर . तुमची बाग बघितली,सर्व बुरुज आणि पाण्याची टाकी बघितलं .
हा , मग ठीकाय, पण अंघोळ केली का न्हाय ?
नाही हो.
बर बर . पुढल्या खेपी रहायला या. पाणी पाणी हाय अंघुळी ला ,राहायची बी सोय  हाय.
नक्की नक्की म्हणून त्यांचा निरोप घेऊन उतरू लागलो. एक वळणावर आलो त्या वाटेतून दुसरी वाट दिसली म्हटलं जावं बघून . पण ती बरीच निसरडी होती. बसूनच उतरावं लागलं सर्कस करत . हा माझा प्रयत्न एक माणूस खालून बघत होता. त्याच्या जवळ पोचल्या वर म्हणला ,
गेले त्या वाटंनंच उतरायचं हुत कि , तिकडन का आलात.
काही नाही उगा म्हटलं बघू जाऊन. मग त्यानं चौकशी केली कुठून आलात वगैरे. त्याचा निरोप घेऊन गाडी पकडायला चौकात आलो . भाड्याच्या गाड्या लागल्या होत्या त्यानी बघताच विचारलं,सर भोर ला जाणार का ? हो तुम्ही कधी निघणार ? हे काय माणसं  जमली का निघालो.मग जरावेळ वाट बघावी लागली. काही बाया न म्हातारे आले. आधी मी, एक आजोबा न ड्रायव्हर असे पुढं होतो. इतक्यात एक शाळेचा मुलगा हि येऊन बसला. तो उतरला थोडं पुढं गेल्यावर पण अजून एक आजोबा येऊन बसले . आता हा गाडी कशी चालविल?हा विचार आला मनात . बसलेले दोन्ही बाजूचे म्हातारे हि ऍडजेस्ट करत बसले, त्यांच्या पायाखाली हात घालून तो गियर बदलत होता . भोर येस्तोवर माझ्या उसण भरते तस  झालेलं. त्या ड्रायव्हरला म्हटलं कमल आहे बॉ तुंचीकाशी चालवू शकता गाडी तुम्ही इतक्या अडचणीत .
अहो सर सवय आहे आम्हाला आणि पासिंजर लोकांना हि. तुम्ही होते आज म्हणून एक सीट कमीच भरली मी. बापरे म्हणजे पुढं पाच लोक घेऊन जातात हे .
मग त्याला रायरी गड  किती लांब विचारलं.
तिकडं सर आज जाऊ नका तुम्ही जर परतायचं असेल लगेच आज तुम्हाला तर. कारण रस्त्याची काम सुरु आहेत म्हणून st  कमी आहेत. आमचे गाडीवाले हि तिकडं कमी असतात. तिथं जायला तास दीड तास ,वर  जाऊन यायला तीन तास परत उतरायला तासभर . म्हणजे खाली आल्यावर गाडी मिळालं नाय मिळेल . पुढं भोर ला हि गाडी पुण्याची नाही मिळाली तर मुक्काम करावा लागेल . त्या पेक्ष्या परत या जमलं तस. आपल्या कड तस  कुणी बाइकवाला  जात  असलं त्याला म्हणला  का मला सोड बाबा तर सोडतात हा लोक पण नाहीच मिळाला कुणी तर तुमची पंचाईत व्हायची.
मग राहूदे, तुमचे किती झाले .
दहा रुपये सर. मी वीस देऊ केले तर निग्रहाने घेतले नाहीत. पण म्हणला राजवाडा बघून जा तो जवळ आहे भोर स्टॅन्ड पासून . मग एक पासिंजर ला म्हणला सरांना  वाट दाखवून जा रे . त्या माणसाने दाखवलेल्या वाटेने जाऊन राजवाडा बघितला. आत कन्नड फिल्म च शूटिंग सुरु होत मग परत आलो. मिसळ ला तब्ब्ल पन्नास रुपये मोजावे लागले हाटेलात . पुणा  गाडी न पुण्याला उतरलो न बाजूला सोपारा गाडी लागलीच होती ती पकडली नि घरी सडे आठला  पोचलो . गड बघून झालाच पण इतकी चांगली माणसे भेटली याचा आनंद जास्त झाला .









शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७

आबा

*आबा*
त्याच नाव अर्जुन जाधव होत.पावणे सहा फूट उंच.भक्कम शरीर.माझी त्याची ओळख त्याच्या म्हातारपणी झाली.75 चा तरी असावा.
आमच्या आजोबांचा तांदळाचा व्यापार होता.शेती ,नाटकाचे थिएटर होत.त्या कारणाने बरीच भ्रमंती वेळी अवेळी होत असे.हा अर्जुन जाधव तेंव्हा तरुण होता.दिवसभर कुठं तरी काम करायचा न संध्याकाळी दारू पिऊन असायचा. मारामाऱ्या ही  करायचा कुणी काही वावग म्हणल तर.आजोबांकडे काम मागायला आला.त्यांनी हट्टाकट्टा गडी म त्याला बॉडी गार्ड म्हणून त्यांनी ठेऊन घेतला.तेंव्हा पासून जवळपास तो मरे पर्यंत आमच्याकडे च होता.त्याला का कुणास ठाऊक पण सर्व धोंड्या म्हणून हाक मारत.दारू पिणे सोडलं तर बाकी सज्जन माणूस.कामाला वाघ आणि इमानी.त्याला शरीर रक्षक म्हणून ठेवला पण आमच्याकड आल्या पासून मार खाऊन येऊ लागला.अस का रे ? विचारलं आजोबांनी तर म्हणला,अण्णा तुमच्या कडे आलो न डाळ भात खाऊन न तुमच्या संगती न क काय कळना पण हात उचलत च नाही मारामारी करायला.आजोबांची सावली च होता.ते गेले तेंव्हा घरातल्या माणसाहून अधिक तोच धाय मोकलून रडला अस माझे बाबा म्हणत.मग शेती वग्रे उरली नाही तशी त्याला काम च उरलं नाही.
खूप वर्षांनी आम्ही तिथं रहायला गेलो तेंव्हा हा सत्तरीच्या आसपास असावा.अचानक येऊन ओटीवर बसला.बाबांना म्हणला,बाळ आता तू अलायस बायका पोर घेऊन हिथ तर आता मी तुझ्या कडच रहाणार.
अरे पण आता शेती नाही आपली मग काम काय करशील.
आवडात खपीन. पडेल करीन.बाईंना पोरांना सोबत होईल माझी.बाहेर शेती ची काम असतील तर तिकडं जाईन पण आता आपल्या पायरीवर च राहीन.
मग तो आमच्याकडे राह्यला.माझ्यावर खूप जीव होता.सकाळी आई ऊठ ऊठ म्हणून रागवायची तर तिला हा म्हणत असे,असू दे तुम्ही नका तरास देऊ त्याला.
अरे त्याची अंघोळ व्हायचीय पाणी आटून जातंय न बाहेर चुलीवर.
ते मी बघतो तुम्ही जावा तो उठेल जराश्यान.
मी ही त्याला धोंड्या म्हणून एकदा हाक मारली तर बाबा ओरडले.तू त्याला आबा च म्हणायचं आमची गोष्ट वेगळी आहे.तुझ्या आजोबाच्या वयाचा आहे तो.
मग त्याची माझी गट्टी जमली.थोडी शेती होती तिकडं गाडी जोडून नेत असे.मे महिन्यात आमच्या सागर गडावर न्यायचा.जाळीतली करवंद,जांभळं,अळीव खाऊ घालायचा.आई कडून माझ्या करता गूळ पोहे बांधून घ्यायचा.
बाबांना एकदा म्हणला,बाळ मला देतोस ते पैसे तुझ्या कड जमा करून ठेव.फक्त 2रु तेव्हढे देत जा रात्री ग्लास करता.बाबांनी विचारलं,का साठवतायस पैसे.
तर,सलीन शेट न अण्णांची छकडी बघितली नाय.एकदा तरी त्याला घोड्या च्या छकडी त फ़िरवून आणीन मग हवं तर विकून टाकू.
असा प्रेम करणारा माझ्यावर आणि आमच्या घरावर.
बाबा शनिवारी यायचे.हा रात्री पिऊन मागच्या अंगणात झोपायचा.पण आम्ही tv लावला कि याची बडबड सुरू.
अरे ती काय काचेवर निर्जीव माणसं बघतोस.तुझ्या आज्याच थिएटर होत. खरी खुरी माणस काम करीत.मोठं मोठे लोक इकडं राहून न काम करून गेलेत.थिएटर ला मी तिकीट विक्री केलीय.नाटक झालं कि थेटर झाडताना आमची गडी माणसात भांडण होत कोण झाडणार या वरून.कारण चवली पावली पडलेली मिळायचीच.न तुम्ही हे त्या tv काय बघून राह्यलेत.
मग आई एकदाच दम द्यायची.आबा sss मी जागी आहे अजून.बडबड बंद कर पाहू झोपायचं मला.
मग हो हो बाई तुम्ही झोपा मी गप रहातो.म्हणून हा बकुळी खाली हांतरूण घेऊन जात असे.
शेवटी एकदा शेती च्या सिझन ला एका जवळच्या गावात कामाला गेला तो बरेच दिवस आलाच नाही.मला चैन पडना. चवकशी केली तर आबा आजारी आहे असं कळलं.मग त्या गावात प्रथमच गेलो सायकल घेऊन.आबा कुणाकडे कामाला आहे असं दिसेल त्याला विचारत गेलो.एक दोघे पटकन म्हणले,तू सलीन शेट काय ? सदू भडजींचा नातू! म्हटलं ,हो.
अरे तुझी आठवण काढत असतो म्हातारा सारखी.चल तिकडं त्या घरी आहे.ताप भरलाय त्याला.
त्या घरी गेलो त्यांनी ही कधी मला बघितलं नव्हतं पण आबा च्या बडबडी मूळ ओळखलं.म्हणले तापात पण तुझं नाव घेत असतो. सलीन शेट चला अंगुली धुवा.
हा माग गोठ्यात हांतरुणावर पहुडलेला.
आबा ,कसा आहेस रे ?
आवाज ऐकलन न म्हातारा उठून बसला.
या बया !बघ कस डुकली काढून बसलं ते.अरे बोलतच नव्हता काही.तू हाक दिलीस न बघ उठला.
ते माझं तस नकळत वय असलं तरी डोळ्यात पाणी आलं.
तुझीच वाट बघत होतो रे पोरा.
मला शोधत आलास, तुज्या पायरीवर जन्म काढला त्याच सार्थक झालं.त्याच्या ही डोळ्यात पाणी होत.हात लावून बघितलं तर अंग ऊन ऊन होत पण जास्त ताप वाटला नाही.
तू नको काळजी करू.आता बर वाटतय मला.दोन चार रोजात ठीक झालो कि यिन घरी सांग बाईंना न आत्या बाईला. या लोकांची पण शेतीची काम करायची आहेत.तू निघ अंधारू लागलंय बाई काळजी करतील.
मी माझ्या खिशात दहा रु होते ते त्याच्या भक्कम मुठीत कोंबले न निघालो.मग आणखी काही दिवसांनी बातमी आली ती घरून,तुझा आबा गेला रे.
अजून एक जोडी आमच्याकडे आयुष्यभर होती.गणपत आणि त्याची बायको सरस्वती.
तिला काही वर्ष्या पूर्वी तिकडं गेलो तेंव्हा भेटलो जाऊन.तिची नात घरी होती.डॉक्टरकी शिकतेय म्हणली.आजी आता पटकन कुणाला ओळखत नाही पण तुमच्या घराची आठवण सारखी काढत असते तुम्हाला ओळखेल बघा.आत गेलो तर सरस्वती बसलेली कोचावर.डोळ्यात फक्त पाणी न पांढर फुल.ओळखलं स का गो
म्हणलो न तिच्या पुढ्यात खाली बसलो.चेहेऱ्यावर हात फिरवलन न म्हणली, बाळा तू आलास मला भेटायला .तुझ्या पायरीवर जन्म काढला त्याच सार्थक केलंस रे.तुम्हाला भेटायची इच्छा राह्यली होती.आता दिसत नाही न चालवत नाही.
ही सुद्धा थेट आबा सारखच म्हणली.
तीही आता नसेल.
त्या काळची माणस वेगळी च होती.
न ती आम्हाला विसरली न आम्ही त्यांना.कुटुंबाचे च सदस्य होते.
अश्या लोकांना 🙏🏻🌹

मंगळवार, २४ ऑक्टोबर, २०१७

रंगावलीकार श्री.शैलेश पाटील.

जूचंद्र गावाचे नाव आता रांगोळी या कले करता सर्व ज्ञात झालंय. जवळ राहून हि कधी तिथं जाण जमलं नव्हतं.आज मी आणि भाऊ दोघे गेलो होतो.तिथलं देवीचं मंदिर हि बघायचं होत.आधी तिथं गेलो.मग आम्हाला तिथल्या रांगोळीच्या प्रदर्शनाची उत्सुकता होती.दिवाळीत होत ते,पण जाण जमलं नाही.आज आलो आहोत तर बघू असेल तर अजून म्हणून गेलो तर बघायला मिळाले. शाळेत दोन खोल्या मध्ये काढलेल्या रांगोळ्या बघितल्या.कलाकारांना भेटावं अस वाटलं.विचारपूस केली तर लोकांनी अतिशय आत्मीयते

शैलेश पाटील यांच्या घराचा पत्ता सांगितला. मग सरळ त्यांच्या घरी काही ओळख नसताना जाऊन उभे राह्यलो.
खालच्या मजल्यावर गणपतीच्या मुर्त्या बघायला मिळाल्या. वर गेलो तर ते स्वतः भेटले.मग त्यांच्याशी त्यांच्या कले विषयी जाणून घ्यायचाय म्हणलो तर ते अतिशय मन मोकळे बोलले.स्वागत तर इतकं आपुलकीने केलं कि भारावून जायला झालं.त्यांच्या पत्नी ने सरबत आणून दिल. मग त्यांनी माहिती सांगितली.
सगळं गाव कलाकारांचं आहे.मोदी दुबईत गेले होते तेंव्हा काढलेली रांगोळी यांचीच होती.गावात रांगोळी सोबत नाटक,संगीत चित्रकला यात ही लोक प्राविण्य मिळवून आहेत.जास्त जाणवलं ते हे कि, सर्वांना एकमेकांविषयी आपुलकी,प्रेम आणि आदर आहे.शैलेशजी रांगोळी ,वारली पेंटिंग,मूर्ती कला अशा विविध कलांमध्ये पारंगत आहेत.त्यांच्या काही कलाकृतींचे फोटो त्यांनी दाखवले.माग भिंतीवर दिसतंय ते वारली पेंटिंग त्यांचंच आहे. घरातलं इंटिरिअर ही त्यांची ओळख सांगत .रांगोळी कशी काढली जाते, रंग कुठले वग्रे माहिती हि दिली.ते स्वतः रांगोळी काढायला शिकवत असतात.इतका मोठा कलाकार असून हि त्यांच्यातली नम्रता प्रकर्षाने जाणवते.बोलताना कुठं ही गर्वाचा स्पर्श ही जाणवला नाही.संभाजी महाराजांच रांगोळी चित्र वॉट्स अप ला फेमस झालं.ते ज्यांनी ती भूमिका साकारली त्या ,श्री अमोल कोल्हे यांच्या पर्यंत पोचल्यावर त्यांनी स्वतः एक व्हिडिओ मेसेज त्यांना पाठवला तो ही त्यांनी दाखवला.इतकी दाद मिळवून निगर्वी आहे माणूस.त्यांचं वागणं बघून माझं जे मत आहे कलाकाराच्या बाबतीत ते अजून पक्क झालं.
कलाकार आत जसा असतो तेच कलेच्या रुपात बाहेर येत असत.माणूस म्हणून तो आधी चांगला हवा.शैलेश पाटील अगदी तसेच आहेत.कधी गेलात तर मुद्दाम भेटा. त्यांच्या रांगोळ्या आपण प्रसार माध्यमातून बघत असतोच.त्याच कौतूक ही वाटत पण हे सर्व त्यांना भेटून सांगता आलं तर जे समाधान मिळत ते और च असत.
शैलेश पाटील ,तुमच्यावर ईश्वराची अशीच कृपा राहो आणि उत्कृष्ट कलाकृती तुमच्या हातून घडत राहो अशी सदिच्छा देऊन त्यांच्या घरातून तृप्त मनाने बाहेर पडलो.

गुरुवार, ७ सप्टेंबर, २०१७

गणपती कारखान्यातली एक गंम्मत.

एक किस्सा बाबानी सांगितला होता. आमचा पोयनाडला गणपती चा कारखाना होता. तेंव्हा चा.
साच्या चा गणपती आतून पोकळ असतो.बाबा आठवण सांगायचे,पोयनाडी एक दीड शाना माणूस होता.गणपती आमच्या च कारखान्यात ला हवा असे.पण दरवर्षी येऊन मूर्ती खालून वरून तासभर बघायचा.मग ,ही ठेव बाळ मला म्हणायचा.आणि बदलली तर मला समजेल हो.चक्क टिचक्या मारायचा मूर्ती ला.
बाबांना एक दिवस राग आला.पण त्याला विचारली, का हे करता अस?आमच्यावर विश्वास नाही का ? आम्ही कुणालाही भंगलेली मूर्ती देत नाही.
तुमचं काय सांगता येत का ? बेमालूम चिकटवून दिलीत तर मला काय समजणार!
म्हणताय ते खरंय. नाहीच समजायचं तुम्हाला,आणि गणपती हि न मोडता विसर्जन होईल .पण आम्ही कधीही अस करत नाही.
तरी तो टिचकी वाजवायचा थांबला नाही.
मग बाबांनी त्याची खोड मोडायची ठरवलं.कामगार हि म्हणले,भाऊ लय च झालं याच .आम्ही बघितलंय तो विटेवर नखाने खूण करतो माग म्हणून त्याला मूर्ती त्यानं निवडलेली समजते.मग सर्वांनी ठरवलं याला त्याच साच्या चा दुसरा गणपती द्यायचा.
गणपती शाडू माती चे असत.करताना थोडी चिर जाणे ते कुठं विट फाटणे हे होत च असत.मग तो तयार होताना ते दुरुस्त केलं जातं.मग धोका नसतो.मग या लोकांनी त्यानं केलेली खूण जी विटेवर होती मागच्या बाजूस ती पॉलिश कामात गुळगुळीत केली.एक मूर्ती जरा तडली होती ती व्यवस्थित दुरुस्त केली.तयार झाल्यावर तो न्यायला आला तेंव्हा सर्व मूर्ती न्याहाळू लागला.बाळा यातली माझी कुठली ?बाबा म्हणले तू ओळ्खतोस न नेमकी?मग घे तुझी कुठली आहे ती.त्याला काही जमलं नाही.मग म्हणला,बाळ मी हरलो. तूच दे कुठली ती.मग त्याला ठेवलेली मूर्ती दिली गेली.त्यानं टिचकी मारून बघितली च.टण आवाज करून बघितलंन.हं हा च रे.
पुढील वर्षी अशी खूण वग्रे न करता म्हणला, बाळ मी काय म्हणतो,माझी मूर्ती खालून बंद करून दे.
साच्या ची मूर्ती आतून पोकळ असते.हे त्याला माहित होतं.तरी उगाच आपलं काही चालवायला म्हणत होता.
मग बाबांनी सांगितलं त्याला.
अरे तुला विश्वासाने आम्ही मूर्ती देत आलोय.कधी तरी भंग पावली का? तरी येऊन तयार गणपती वर टिचक्या कसला मारून बघतोस दर वर्षी.आता तुला खर सांगतो ऐक. तुझ्या या अति शहाणपणा मूळ वैतागून तुला तू ठरवलेली मूर्ती न देता दुसरी च पण त्या च साच्याची दिली गुदस्ता. जी थोडी भंगली हि होती.असे गणपती आम्ही परत भिजवून माती त घालून टाकतो.पण तुला मुद्दाम ती दिली.असा रिपेअर केलेला गणपती जास्त च तणतण वाजला.तू खूष होऊन घेऊन गेलास.तुझी खूण आम्हाला समजली जी आम्ही पुसून टाकली होती. आता या वर्षी म्हणतोस कि खालून माती न बंद करा मूर्ती.देतो करून.पण मग काय होईल ते सांगतो.आत भरपूर एअर बबल राहील.विसर्जन करताना मूर्ती पाण्यात बुडवलीस तर तुझ्या आधी गणपती वर येईल.बोल, म्हणत असशील तर खालून बंद करतो.मग मात्र बाबांच्या अक्षरशः पाया पडून म्हणला,माझे डोळे उघडलेस बाबा.या पुढं फक्त मूर्ती ठेव मला.तू देशील ती आनंदाने घेऊन जाईन.

शनिवार, १९ ऑगस्ट, २०१७

उस्ताद झाकीर हुसेन

*झाकीर भाई*
लहानपणी बाबांनी कॅसेट आणून दिली.तबला तबला करतोस न ऐक हे.ती ऐकून स्तिमित झालो.अरे हे काय ऐकलं !अस वाजत हातातून?ते झाकीर भाई होते.मग अब्बाजीं ना ही ऐकलं न उगम स्थान समजलं.बाबांना म्हटलं ,शिकीन तर हाच तबला.मग अब्बाजीं कडे शिकायला ही मिळालं.पण आत्ता फ़क्त झाकीर विषयी माझं मन काय म्हणत ते लिहितो.
झाकीर भाई उस्ताद अल्लारखा साहेब चे सुपुत्र.त्यांना दोन भाऊ आहेत ते ही उत्तम तबला वादक आहेतच.फजल भाई आणि तौफिक भाई.आणि बहिणी ही आहेत.
त्यांच्या घरात इंग्रजी माध्यमात शिकलेला प्रथम मुलगा तेच.
ते सकाळी उठत तबल्याचा रियाज करत.जे सरस्वती माते स वंदन करून.मग शाळेत ख्रिशन पद्धतीत प्रार्थना होई.मुसलमान आहेत म्हणून नमाज वग्रे ही असतच.त्या मूळ ते म्हणतात मी सर्व धर्मीय आहे.आणि सर्व धर्म मला तितकेच सारखे आहेत.त्यांना उत्तम तबला वादक म्हणून ओळखतात च लोक.पण ते आधी उत्तम माणूस आहेत हे प्रथम लक्ष्यात घेतलं पाह्यजे.माझं अस मत आहे,कुठलं ही काम करा त्यात तुम्ही हे आत असता तेच बाहेर देता. तर सर्वात आधी त्यांचा हा गुण अतिशय महत्वाचा आहे.
आता तबल्याविषयी सांगायच तर,
अब्बाजिनी त्यांच्या कानात बारश्याला काही कुराण च्या ओळी म्हणायच्या असतात वडिलांनी.त्या ऐवजी तबला च म्हटला. जे अब्बाजींच हि कलाकार म्हणून तबल्यावरच प्रेम ,भक्ती दर्शवत.असे संस्कार असल्याने तबल्याचा ओढा होताच.पण अब्बाजीं नी कधी ही शिक आता माझ्याकडे म्हटलं नव्हतं.त्यांच्या स्टुडंन्ट ना शिकवताना झाकीर भाई बघायचे.ऐकून वाजवू लागले थोडं. मग बऱ्या पैकी.तो वर गल्लीत मुस्लिम सणांना आणि हिंदू सणांना ढोल ताशा वाजवत असत.लहान पोर इतकं तयार वाजवतो म्हणून लोक बोलवून नेत आणि बक्षीस देत.एक दिवस मात्र अब्बाजिनी हे पाहून बसवलं जवळ आणि म्हटलं,तुझे सिखना है दिल से.हे हो म्हणले.फिर कल से तालीम शुरु 'तेरी.त्या दिवशी रात्री प्रोग्रॅम वाजवून घरी आल्यावर अब्बाजिनी उठवलं.हे बघ हे अस वाजवत ,तू ते कसं वाजवशील.अस करत शिक्षण सुरू झालं.
दरम्यान अब्बाजीना कार्यक्रमात वाजवायला या म्हणून पत्र येत जी इंग्रजी असत.झाकीर भाई वाचून परस्पर लिहीत,मैं नही आ सकता मेरा बेटा आयेगा.मग हे जाऊन वाजवून येत.वय पंधरा असावं.
शिव जी रेकॉर्डिंग ला वाजवायला नेत असत.हळू हळू नाव झालं.मग अमेरिकेत अली अकबर यांच्या संस्थेत तबला शिक्षक म्हणून नोकरीत राह्यले.तिथं अजून प्रोग्रॅम मिळाले.रवी जी नी ही साथीला घ्यायला सुरुवात केली.आणि झाकीर हे नाव चमकू लागलं.
फक्त हिंदुस्थानी संगीतात न रहाता तिथं फेमस बँड मध्ये यांनी वाजवायला सुरू केलं.अब्बाजिनी तबला तिकडं फेमस केला होताच तो झाकीर भाई मूळ अजून फेमस न आवडता झाला.सोलो कार्यक्रम ही सुरूच होते.जे आज तागायत सुरू आहेत.हा एक असा तबला वादक आहे ज्याला दुनियाभर सर्वात जास्त प्रोग्रॅम वाजवणारा म्हणून रेकॉर्ड आहे.
त्यांच्या वादन शैली विषयी म्हणायच तर अप्रतिम तयारी च वाजवणं.फक्त माझं घराणे चांगलं तेच वाजविन अस न करता सर्व घराण्यात जे जे उत्तम आहे ते त्या त्या उस्तादचे नाव घेऊन वाजवून दाखवतात आजही.त्यांचा बाया, म्हणजे डावीकडे असणारा डग्गा अतिशय बोलका असतो.थेट हृदयात उतरणारा. त्याना बाया प्लेअर ही म्हटत लोक.आणि दाया बाया च मिश्रण ही लाजवाब असत.तबल्याचा फिक्स कम्पोझिशन असतात च पण उपज नावाचा प्रकार हिंदूस्थानी संगीतात आहे.गुरू न शिकवलं त्या पलीकडं जाऊन वाजवणं.हे झाकीर भाई कडे आहे. त्यांचा तबला हा नुसता तयारीचा नसून प्रचंड बुद्धी चा तबला आहे.म्हणून त्यांनी आज वाजवलेला कायदा उद्या च्या प्रोग्रॅम ला ऐकलात तर काही नवे असत.म्हणून च लोक अजुनी त्यांना ऐकायला जातात.माझं निरीक्षण अस आहे कि, त्यांचे शेकडो कायदे तयार असतील पण कार्यक्रमात ठराविक कायदे ते बरेचदा वाजवत असतात पण आज वाजवला तसा तो उद्या नसतो.हा बुद्धी चा भाग असल्याने झाकीर च्या देह बोली ची किंवा तबल्याच्या टोन ची नक्कल करू शकाल एकवेळ पण तबल्यातील त्याच्या विचारांची नाहीच.तिथं तो माणूस अत्युच पातळी वर असतो नेहेमी.
तबलजी बरेच वेळी सोलो साठी,इन्स्ट्रुमेंटलिस्ट साठी,भक्ती संगीत किंवा नाट्य संगीत साठी,नृत्या करता,फिल्म संगीत करता आपलं प्रभुत्व मिळवून असतात.पण कुठल्याही प्रकारात आणि कुठल्याही आर्टिस्ट बरोबर कधीही उत्तम वाजवू शकेल असा झाकीर च.शिव जी म्हणतात,बाकी कुणी असलं साथीला तर मी त्याला सांगतो कि, मी हे वाजवतोय हा ठेका आहे.पण झाकीर असेल तर मी डोळे मिटून मनात येईल ते सुरू करतो आणि तो अगदी अचूक मला साथ देतो.
ते मान डोलवतात वग्रे म्हणून लोक म्हणतात गिमिक्स वापरतो झाकीर.पण याच उत्तर झाकीर भाईंनी दिल होत ते अस,
मी विदेशात रॉक जॅझ बरोबर वाजवतो.ते लोक केस वाढवून डोकं हलवीत मग मी ही केलं.आणि मी इतकं गुंग होतो लयीत कि ते आपोआप होत.दुसरं लोकांना ही त्यातून बोलांचा भाव समजतो.
त्यांना रेकॉर्डिंग आणि त्याची साधन याच उत्तम ज्ञान आहे.त्या मूळ अमुक गोष्टी ला नेमका इक्विलायजर कसा हवा हे ते नेमकं सांगू शकतात.
फक्त वादन नव्हे तर सिने संगीत ही त्यांनी कम्पोज केलंय. गाण्यात वाजवलाय ही.
उत्तम शिक्षण आणि व्यसनाधीन नसणं ही देखील त्यांची जमेची बाजू आहे.
देश विदेशात भ्रमण करून ही न थकता एअर पोर्ट वरून सरळ स्टेज वर वाजवलेल पाह्यलंय.थकवा नाहीच.कधी ही वेळेत च येतात.जबाबदारीने वागणं त्यांच्यात आहे.गोळ्या घेत वाजवताना पाह्यलंय.
नवीन कलाकारांना समभाळून आणि प्रोत्साहन देत त्यांच्या बरोबर वाजवणं,जुन्या लोकांच्या पाया पडून त्यांचा मान राखून रहाणं आणि समवयस्क लोकांत थोडी चेष्टा मस्करी करत वाजवणं हा ही वेगळं गुण च त्यांचा.
मीडिया समोर बोलताना कुठं ही भरकटुन कधी ही बोलत नाहीत.
देशाचा उल्लेख नेहेमी मेरा हिंदुस्थान असाच करतात.मंदिरात ,गुरुद्वारात ही जाऊन वाजवतात निःसंकोचपणे पण आणि आदर भक्ती न.सरस्वती वंदना संस्कृत मध्ये असख्लीत म्हणतात.गणेश परण न लाजता म्हणून तबल्यावर तसाच वाजवतात.
खूप खूप लिहिण्या सारख आहे.माणूस आभाळा इतका असल्यानं मी खुजा पडतोय लिहिताना.
थोडक्यात सांगायचे तर
अफाट परिश्रम,गजब हुकूमत वाद्यावर, प्रचंड बुद्धी च वादन
आणि माणूस म्हणून ही सर्वांग सुंदर अस लोभस व्यक्तीमत्व.बघितलं की आपोआप हात त्यांच्या पायाकडे च जातात.
त्यांचे दोन्ही भाऊ ही उत्तम वाजवतात.फजल भाई तबला च वाजवतात.तौफिक भाई मात्र झेंबे वादक झालेत.
नितीन झाकीर भाई वेगळे का ? तर त्याच उत्तर थोडं मला शक्य होत तस वर लिहिलंय.
पण त्यांचे सख्खे भाऊ मात्र हात तयार असून त्यांच्या सारखे होऊ शकले नाहीत.फजल भाई म्हणले होते, आमच्या घरी दोन वट वृक्षा सारखी मोठी माणसे असल्यानं आम्ही कितीही वाजवल तरी लोक म्हणतात,यार अब्बाजीं कि तरह नही या झाकीर कि तरह नही .तेच जर स्टुडंन्ट नी वाजवल तर कौतुक होईल पण आमची तुलना मात्र या दोन थोर कलाकारांशी होत राहते.म्हणून तौफिक भाई दुसऱ्या वाद्यांत तबल्याच ज्ञान वापरून वाजवू लागले नी यशस्वी झालेत.
शेवटी या प्रश्नाचं उत्तर असच
झाकीर ,अब्बाजीं सारखी माणसं येतानाच तयार होऊन येतात.अब्बाजीं झाकीर भाई विषयी म्हणले होते,
मैने उसे सिखाया जरूर पर उसे खुदा ने ही भेजा है के जा बेटा नीचे जा के लोगो को तबला सुना.
आणि काय लिहू ?
लेखन सीमा🖌

गुरुवार, १७ ऑगस्ट, २०१७

द वॉल

अमेरिकन स्नाईपर शेन त्याच्या स्पॉटर अॅलन सह एका साईटवर वाळवंटात आलेत.
स्पॉटर मंजे स्नाईपर च्या बाजूला च झोपून त्याच्या स्कोप मधून बघून सांगत असतो,
टार्गेट किती अंतरावर आहे.वारा कसा न किती वाहतोय.हवेत ह्युमीडिटी किती आहे.कारण या सर्व गोष्टी वर बुलेट चा प्रवास अवलंबून असतो.या सर्व गोष्टींचा अंदाज घेऊन ठरवलं जात कधी शॉट घ्यायचा.समोर च्या स्नाईपर न डागलेली गोळी सुटली कि जो आवाज येतो तो जरासा उशिरा येतो.त्या आवाजाला किती सेकंड लागले यावरून अंतर मोजल जात अदमासे.हे सगळं या प्रकारच्या सिनेमात बघायला मिळत.
तर हे दोघे साईट वर दबा धरून बसल्याला 22 तास झालेत.समोर वाळूत एकीकडे क्रेन आहे.एक गाडी आहे,कचऱ्याचा ढिगारा दूर आहे.आ8णि एक दगड रचून उभी केलेली भिंत आहे.
शेन उठून उभा रहातो.आता धोका नाही असं वाटून आणि मैदानात उतरतो खात्री करून घ्यायला कि धोका नाही .एक मुडदा गाडी च्या बाजूला पडलेला आहे.तिकडून जाताना त्याला काही जाणवत तोच एक गोळी त्याच्या शरीरात घुसते आणि तो कोसळतो.पलीकडचा स्नाईपर अजून दबा धरून असतो आणि हे गाफील पण त्याच्या समोर येतात.जोडीदार पडला म्हणल्यावर अॅलन झिग झ्याग धावत येतो.म्हणजे स्नाईपर ला निशाणा घेता येऊ नये म्हणून.पण त्याला ही अचूक टिपलं जात.पायात गोळी बसते.तो त्या भिंती च्या माग आश्रय घेतो.जोडीदाराशी वॉकि टॉकी वरून बोलू लागतो.जराही हलू नको सांगतो.रेडिओ वरून सुटके करता मदत मागू लागतो तर रेडिओ नाकाम होतो.
पायातली गोळी काढतो.इतक्यात वॉकि टॉकी वर आवाज येतो.तू कुठं आहेस.पोझिशन सांग.हा सांगू लागतो. पण बातचीत सुरू असताना त्याला पलीकडच्या ची भाषा अमेरिकन नसल्याच जाणवत.मग सरळ विचारतो तू कोण बोलतोयस ?
त्या स्नाईपर न त्यांची रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्यून करून तोच बोलत असतो.तो म्हणतो माझ्याशी बोलत रहा नाहीतर जोडीदाराला गोळी घालेन तो अजून मेला नाहीये. नाईलाजाने हा बोलत रहातो.दरम्यान शेन शुद्धीत येऊन रायफल घेऊन कचऱ्या च्या ढिगाऱ्याच्या दिशेने शॉट घेऊन बघतो तर पलीकडून गोळी खातो. आता भिंती माग अॅलन एकटाच आहे.तो युक्ती न रायफल हस्तगत करून घेतो.हेलिकॉप्टर चा आवाज ऐकू येऊ लागतो.आपली सुटका करायला येतायत हे दिसताच अॅलन ती भिंत हातानं ढकलतो.या मूळ येणाऱ्या ना आपली उपस्थिती ही कळेल आणि समोर चा स्नाईपर जर हलला किंवा शूट करू लागला तर ते ही समजेल.मग स्वतः रायफल हाती घेऊन त्या ढिगाऱ्याच्या दिशेने नेम धरतो. तिथून 2 बुलेट फायर होताना दिसतात.याच्या आजूबाजूने जातात.त्या फायर च्या रोखाने हा बंदुकीतली एकच असलेली गोळी फायर करतो.पलीकडून उत्तर येत नाही.म्हणजे समोरचा सम्पला. हेलिकॉप्टर लँड होत. दोघांना स्ट्रेचर वर घेऊन विमानात घेतलं जातं.टेक ऑफ होतो ,,,,,
मग
बघा.थ्रिलिंग आहे.

सोमवार, ७ ऑगस्ट, २०१७

मंगळा गौर

 काल आबांच्या वाड्यावर थोरल्या सून बै ची मंगळागौर झाली म्हण.जाता जाता गडबड दिसली म्हणून डोकावलो तेंव्हा समजलं.
लहानपणी माझ्या बहिणींच्या मंगळागौरी झाल्या त्या आठवल्या.
सगळ्या बायका रात्री जमत.पुरुषांना बाहेर पिटाळले जाई. ते सर्व लोक्स मग बाहेरच्या अंगणात पत्त्यांचा डाव मांडीत. आम्हाला ही बाहेर खेळा म्हणत.फक्त मुलींना न बरणी लोक ना आत एंट्री असायची.
आई ताई आत्या सकट सर्व जणी पूजा करायला जमल्यात मग आता जोरात हशा ,टाळ्या न बडबड ती ही मोठ्याने कसली चाललीय म्हणून डोकावलं तर वेगळंच दृश्य.
बसून घालतात म्हणून बस फुगडी,पिंगा,खुर्ची का मिरची वग्रे खेळ असतात ते बघितलं.प्रथमच.त्या ही पेक्ष्या आश्चर्य म्हणजे आई ला हे सगळं सॉलिड जमतंय न सर्वजणी मामी मामी करतायत!एला आई ती गाणी ही फटाफट म्हणतिय!!हे शिकली कधी?घरात एकदाही ऐकलं नाही.या धक्क्यातून बाहेर पडायच्या आधी ,ए मुला तिकडं जा पाहू बाहेत इकडं आज नाही यायच.आई काही यायची नाही.
ओ पण तहान लागलीय.
खेळतोय आम्ही न तुला रे कशी तहान लागते?
सल्या sss आलाच आहेस तर ते कॉफी च ताट ने न दे पुरुष मंडळी ना.पान सुपारी ही बघ बाहेरच्या ताटात सम्पलीय का ती.नसली तर आतून नेऊन दे.आम्ही ही विसावतोय पाच मिनिटं.मग परत आत नाही घेणार.मग कॉफी, पान सुपारी दिली नेऊन.आम्ही ही हाणली दोन दोन कप.मी न माझा आते भाऊ. खडाक, परत दार लागलं.मग आतून परत कल्ला सुरू झाला. या गावचा त्या गावचा पाटील नाही आला ,सुरू.
बाबा ना जाऊन म्हटलं,ओ तुमची बायको बघा कसली गाणी म्हणतिय,खेळतेय.
हा रे म्हैतीय.ताई ची मंगळागौर आहे न.म्हणून न आलोय इकडं.तेच सुरू आहे.मग परत वाटलेली पान हातात घेत म्हणले,किलवर किलवर हुकूम माझा. तिकडून नाना म्हणले,चैला बाळ माझ्या कडे बघायचस तरी करण्या पूर्वी.अस्सा घोटाळा करतोस.ए सल्या ती काता ची डबी दे इकडं.अन बडीशेप सारी सम्पवलीत न टोणग्यानो.
साला इकडं हे लोक बिझी तिकडं त्या आत घी ना त.
एक बरं होत इतक्या रात्री आम्ही क्रिकेट ची बॅट काढली तरी कुणी काही बोलत नव्हतं.हळूच रस्त्याकडेला असलेल्या विहिरी च्या काठावर बसून आलो तरी कुणी काही बोलत नाही.आजूबाजू च्या घराच्या बाहेर चे दिवे सुरू असल्याने लख्ख उजेड दिवाळी सारखा.
मग मध्यरात्री नंतर घुमून घुमून सर्व घुमा बाई दमल्यावर दार उघडलं बॉ एकदाच.त्या वेळी अश्या प्रसंगी ठेवणीतले अत्तर काढलं जाई त्याचा उग्र पण सण समारंभाची जाणीव करून देणारा सुगन्ध ही दारा बाहेर आला.
आटोपलं का तुमच,परत एकदा कॉफी येऊ द्या आमचं नाही झालं अजून.म्हणून पुरुष लोक पुन्हा डावात रंगले.
तर हे सर्व आठवलं हो आबांच्या वाड्यात डोकावून. थोरल्या सून बाई ही झक्क नटल्या होत्या.असो.
मग एक तीव्र इच्छा झाली .त्या लाम्ब नाव वाल्याला सांगावं जाऊन,बघ लेका अशी असते मंगळागौर.
तशी नाही जशी तू दाखवलीस.पेशवीण बाई न मस्तानी खुर्ची का मिरची खेळल्या नसतील तू दाखवल्यास तश्या.
हल्ली ची पिढी हे अनुभवेल का नाही कुणास ठाऊक.हल्ली मंगळागौर ही हॉल घेऊन करतात.त्यात मजा नाही राव.आपल्या घरी मग ते वाड्यात ल नसलं चाळीतील असलं तरी त्यात मंगळागौर साजरी करणं यात च गम्मत होती खरतर त्या खेळात सर्वांग सुंदर व्यायाम ही होतो अशी रचना आहे.पूर्वी बायका स्वयंपाक घरातच जास्त असत. सतत दडपणा खाली.त्यांना या निमित्ताने मोकळीक मिळावी,ऐकमेकींशी थट्टा विनोद करून ताज तवाने व्हावं ही भावना असली पाह्यजे त्यात.
माझ्या आईच च मला आश्चर्य ,कौतुक न अभिमान ही वाटला. आश्चर्य या करता कि या बाईला इतकं सगळं येत ?
अभिमान या करता,
सर्व जणी मामी मामी करीत असत.ए मामी मला बस फुगडी शिकव न.ए मामी परवा पासून आलीय न तुझ्या कड मग आधी काय झालं होतं शिकायला,आत्ता मामी आपण पिंगा च घालूयात.
असा घोळका असे आई भवती.तिला इतकी प्रसन्न पाहून आम्ही ही खूष व्हायचे.
बाकी ही बायकांचं चाले ते ऐकायला मजा यायची.
शके ss कसली भारी साडीय!विदेशी दिस्तीय.
हो म जारजेट आहे जारजेट.यजमानांनी आणलीय हो फारीन हुन.
हं ss नवराच अस्सा गटवलन बोटी वरचा तिचे स्प्रे ही इंपोर्टेड असतात हो,न ती लिपस्टिक ही.
सासू बाई तुम्ही ही सांगा जावयाला म्हणावं एखाद बाटली दिली स सासूला तर काही बिघडत नाही.
हो मी मागतीय.हे आणतात न मला.
अगो आत्ये ते आपलं देशी ,विदेशी बघ वापरून कसं दरवळ त ते.
नको बै ,नाना हपिसातून येतात त्या रस्त्यावर आहे त्यांच ठरलेलं दुकान तिथून आणतात खस,वाळा. आम्हाला नकोत बाई ते विदेशी फवारे महागडे.
शके ही साडी मला नाही हं दाखवलीस अल्ये होते काल तर तुझ्या कड.काय ग किंमत असेल.
रजे बस कर हो चवकशा. तुला ही बघू हो बोटीवरचा नवरा.
ए मग त्या तिच्या हपिसातल्या राजेश खन्ना च कस ग होईल.
तुम्ही उगा भलत सुरू करू नका हो,मामी चल ग आपण खेळू.
अस कै कै चालायचं.

गुरुवार, १३ जुलै, २०१७

दोस्त


 दोस्त लोग हो तो टेन्शन यू गायब होता है.
तिगस्ता माझे बाबा गेले.माझे पोयनाड चे मित्र भेटायला दुसऱ्या च दिवशी आले.मला फोन आला ,सल्या कुठं यायच रे समजत नाही जरा खाली येऊन उभा रहा.मी नाक्यावर उभा.प्रत्येक रिक्षा चेकवतोय.थोड्या वेळाने फोन आला,कुठायस ? म्हटलं ये मी आहे नाक्यावर वाट बघत उभा आहे.तर रव्या म्हणला तूच वर ये आम्ही पोचलो घरी.
वर गेलो न विचारलं ,मला दिसले कसे नाहीत?
तर म्हणॆ,तुला बघितलं न तुझ्या मागून गपचूप आलो वर.
मग म्हणलो,हलकटा मला हाक का नाही दिलीस ,उगा माझा पुतळा केलात न.
मग हसण्यात टेन्शन गुल.
सो
दोस्तो दोस्ती के लिय शुक्रिया
जरी मान्य नसला तुम्हांस तरी

मंगळवार, ३० मे, २०१७

प्रवास


प्रवास करताना ट्रेन बरी का लक्झरी ? माझे बडोद्याचे भाऊ आहेत त्यांना ट्रेन च आवडते.का ? तर अतिशय सेफ.निसर्गाची हाक आलीच तर ओ द्यायला डब्यातच सोय असते जी कधीही वापरता येते.बस न त्यांना भीती वाटते.
मला स्लीपर कोच आवडतो.पार्टिशन सारखा दरवाजा लावून घेतला कि आपण आपल्या रूम मध्ये असल्या सारखे निवांत.हवं तर खिडकी उघडा नाहीतर नको.ac चा व्हेंट हवा तसा अडजेस्ट करा.बरं गाडी ठराविक ठिकाणी खानपान करायला थांबवतात.निसर्गाची हाक आलीच तर तिथं सोय असते किंवा रात्री वग्रे ड्रायव्हर ला सांगितलं तर गाडी थांबवतात.
इतकी मोठी गाडी पण सस्पेंशन चांगलं असेल तर धक्का न देता नेते.
कधी कधी जोरात हॉर्न वाजवत ओव्हरटेक होतो. गाडी 90 अंशाचा कोन साधत गररकन वळते तेंव्हा ,
घाटात हेअर पिन बेंड ड्रायव्हर लीलया घेतो तेंव्हा शरीरातील आंड्रेलीन क काय ते वाढवलं जाऊन रोमांचकारी अनुभव ही येतो ज्याच वेगळं भाडं लागत नाही.ऑफ सिझन तर बऱ्याच कमी भाड्यात प्रवास होऊ शकतो. याच ही बुकिंग ऑन लाईन होत त्या मुळे ती ही सोय आहे.
ट्रेन मध्ये दिवसा बरेच विक्रेते येत असतात.रेल्वे चे लोक ही चहा वग्रे घेऊन सारखे फिरत असतात.रात्री हे नसत.पण दिवसा कुणी वर झोपत नसल्यानं खाली च बसतात .मग आडवं होता येत नाही.गुज्जू पब्लिक असेल तर बडबड आणि खाण्याचा सोहोळा रंगत असतो.म्हणून ट्रेन प्रवास करताना लोअर साईड बर्थ बरा वाटतो.
मग स्वतः च व्हेईकल सर्वात मस्त.बाईक प्रवास सबके बस कि बात नही.निसर्गाशी थेट जवळीक असते.थंड उष्ण जे असेल ते वार सरळ येत असत अंगावर.पाऊस ही तसाच भिडतो. पावसाचे थेंब तर चक्क चिंकुटा च काढतात जबरदस्त.मध्ये किंवा मुक्कामी थांबलं कि आरश्यात बघून किंवा नुसते हात बघून समजत किती प्रदूषण होत रस्त्यावर.शरीरभर काळा तपकिरी स्प्रे झालेला असतो.
पण हे अस निसर्गाशी सरळ जुडल जाणच मला आवडत.बाईकने अजून तरी दगा दिला नाही पण जर बया रुसून बसली तर तिला ढकलून न्यावं लागत ते टाके ढिल करणार असत.आधी न नंतर ऑइल चेंज वग्रे करावं लागतं.
पण दुसरे फायदे,
कुठलाही टोल नाका आला तरी त्याच्या नाकावर टिच्चून फु कट जाता येत.भयंकर जॅम मध्ये ही बायकर्स कडकडन पसार होतात.
मग चार चाकी.
हे प्रशस्त वग्रे वाहन.मस्त ac लावा.मुजिक सिस्टम वर आवडत संगीत ऐका. गाडी क्रूझ मोड वर टाका, एवंच ऐश असते.मध्ये खण असतो त्यातून थंड वाटली जी ठेवली असाल तिचा आस्वाद घ्या.पण जास्त गर्दी करू नये नाहीतर st बरी म्हणावं लागेल.तोटा म्हणजे गाडी बघून रस्त्यावर असणारे विक्रेते जास्त च भाव घेतात. पेट्रोल खर्च जास्त. पण गाडी बाळगणारा याची पर्वा करणारा नसतोच.
St प्रवास हि वेगळी मजा आहे.तिकिटाच्या किमतीत पूर्ण शरीराचा आटूक म्याटिक मसाज समाविष्ट असतो. सह प्रवासी वेगवेगळे नमुने भेटतात.कधी कधी मस्त दोस्ती होते.वाहकाशी लांबच्या प्रवासात ओळख होतेच, मग तो आपण चढलो का नाही हे बघूनच डबल बेल देतो.ड्रायव्हर बदलतात त्या मूळ दोन ड्रायव्हर ची ड्रायव्हिंग अनुभवता येते.गाडी मधेच बंद पडली तर डेपोतून दुसरी यायची शक्यता असते.किंवा वाहक दुसऱ्या st त सोय करून देतो.घाटावर च्या गाड्यात खिडकीत जवळ बसताना नीट बघून बसावे.तिकडच्या लोकांना गाडी बरीच लागते अस निरीक्षण आहे.त्या मूळ खिडकीततून ऑक केलेलं असत बरेचदा.हे लाल मातींन मढलेलं वाहन बऱ्याच लोकांच्या मनात जवळीक करून आहे अजूनही. गावाकडं नेणारी st.
सायकल ही उत्तम .पण ग्रुप हवा.कमीत कमी सामान घेऊन जाण महत्वाचं.शारीरिक क्षमता ही हवी.
शेवट आपल्या टू बाय टू न जाणे ही मस्तच.पाठ जितकं वाहून नेऊ शकेल तितकं गाठूड घ्यावं न निघावं.
प्रवास करणे म्हणजे अनुभव संपन्न होणं.तो मात्र घाईघाईत करू नये.वाटेत भेटणारा निसर्ग आणि माणसं यांचा अनादर न करता भेटावं.हे सर्व पाय चालतायत तो वर जरूर करावं मग,
जिंदगानी तो रहेगी
नौ जवानी फिर कहा

गुरुवार, ११ मे, २०१७

मुकद्दर का सिकंदर

फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला होता. नंतर हि
 दोन तीन वेळा गेलो होतो बघायला .जॅम आवडला होता सिनेमा.अमिताभ च एकटेपण,त्यात ही आई सारखी माया करणारी आई नि बहीण मिळणं, बाल पणीच प्रेम,ती मोठेपणी परत भेटणं.जिवाभावाचा मित्र मिळणं. मग त्याच्या साठी त्याग वग्रे मसाला ठासून भरलेला.त्यात रेखा न अमजद,रणजित च कॅरेक्टर टाकलेलं.गीत सेठी ची योग्य प्रमाणात असलेली कॉमेडी.त्याचा न अमिताभ चा पिंटाक झाल्यावरचा झक्क जमलेला सीन.
तर अगदी cd संग्रही ठेवली होती.
पण नंतर बरेच वर्षांनी बघितला परत तर मात्र मत बदललं.त्या वेळी आयुष्याचा अनुभव नव्हता,आताही खूप आहे असं म्हणणं नाही.पण सोसलंय बरच ते ही जाणीव पूर्वक.
या सिनेमात त्याच प्रेम पात्र त्याचा आयुष्यात बालपणी आलंय. ती बिचारी सहानुभूतीने याच्याशी वागते त्याला हा प्रेम समजतो.
ते बालपणी ठिकय. साहेब मोठे झाले तरी तिला विसरू शकत नाही.हे ही ठीक.पण एक प्रसंगी ती याला स्पष्ट सांगतेय,कि बाबा झालं गेलं विसर.ते बालपणी घडलं.माझ्या मनात तुझ्या करता तस काही नाही.तेंव्हा दुसरी बघ न हो मोकळा. पण नाही,हे महाशय देवदास होऊन च बसलेत.
मग यांचा परम प्रिय मित्र आणि ती,यांचं जमत.आता मित्र म्हणतो तर सांग न त्याला खुल्लम खुला आधीच,कि बॉ मी या समोरच्या बंगलेवाली वर इतकुसा होतो तेंव्हा पडून टप्पे टाकून राह्यलोय. म्हणजे तो टप्पे टाकताच नाही.
मग येते जोहरा बाई. हे पात्र याच्या प्रेमात पडत.पण मित्र सांगून जातो सिकंदर च्या आयुष्यातून दूर हो तर ही हिरा चावून जीव देते.तीच एक ठीक .पण सिकंदर बंद दरवाजा ठोकत म्हणतो,
देख जोहरा दरवाजा खोल दे नही तो मैं दिल जला हूं दुनिया जलाकर राख कर दुंगा!!!!!!
क्यो भाई,दुनिया ने क्या बिगाडा तेरा इसमे , अगर जोहरा दरवाजा नही खोलती तो उस्को बोल खोलने को प्यार से.किंवा का उगा जीव आटवतो ,ती नाय म्हणते न म सम्पल न भौ. छोड दे.
त्या अमजद च कॅरेक्टर पण फुकट मरत.जोहरा सिकंदर पे मरती है बातमी बरोबर पण सिकंदर जोहरा को नही चाहता न भाय. वो बात समझ लेता तर शेवट,
या अल्ला ये आखरी वक्त मै भोत बडी गलती कर बैठा
म्हणावं लागलं नसत.
तर अस माझं मत बदललं नंतर.
तरीही सर्व कलाकारांचा अभिनय,स्क्रिप्ट न एकूण ट्रीटमेंट सिनेमा लक्ष्यात ठेवते.गाणी ही सर्व मस्त.रेखा चा कोठा तर मस्त उभा केला होता.मुजरा हा प्रकार करावा तर फक्त आणि फक्त रेखानेच.तिचा मुजरा यात आणि उमराव जान मध्ये बघताना सलाम करावा तिला.शृंगार रस किती खानदानी पद्धतीनं नृत्यविष्कारात उभा करते बाई कि वाह !कुठंही बटबटीत मादकता वग्रे नाही.शालीनता फक्त कुणा खानदानी घरातच नसते तर ती कोठ्यावर ही असते हे च ठासवते रेखा. अदबीने केलेला  आदाब म्हणजे काय तर रेखा चा बघावा.,
तर अस जाणवत जात आपल्याला आवडलेल्या सिनेमातील एकेक .त्या वेळी भयानक चांगला न त्रुटी हीन वाटलेला सिनेमा नंतर त्यातल्या चुका दिसू लागतात.तरीही तो मनात घर करून रहातोच.

रविवार, ७ मे, २०१७

शिवाजी मंदिर


शिवाजी मंदिर!!!!
तिथं जाण हा मनोरंजन नव्हे तर संस्कृतीचा भाग होता. सण असल्यासारखं वाटायचं.त्या बाबतीत माझं भूत झालंय. म्हणजे त्या काळात अडकून पडलोय.
बाबा आवर्जून सर्वांच बुकिंग करीत असत.आधी स्वतः पण लवकरच ती जबाबदारी माझ्यावर आली. दरवेळी बाबा निक्षून सांगत.मिळेल तेव्हड पुढचं न गॅंग वे जवळच बुक कर.तीच सवय मलाही लागली होती.मग प्रयोगाच्या दिवशी मस्त कपडे घालून निघायचं.बाबांना अत्तराचा षोक होता.ते अत्तर आम्हाला ही लावत.मग आईला मध्ये ठेऊन आजूबाजूला आपण बसायचं हे सांगणे होई.तिथं गेलं कि जाहिराती बघायच्या.आगामी आकर्षण कुठलंय,आपण पाहिलंय का? मग काका तपकीर वाले होते तिथं बाबा तपकीर ही घेत.जिन्यात लावलेला मोठा आरसा लक्ष वेधून घेई.पब्लिक ,विशेषतः स्त्री वर्ग तिथून रेंगाळत च चाले.थिएटर मध्ये शिरलं कि सुखद गारवा स्वागत करायचा. डोअर किपर सीट दाखवायला असेच.सर्व मराठी माणस लग्नाला आल्यासारखी आलेली असायची.अत्तर,गजरे याचा मंद सुगन्ध दरवळू लागे. तरी गोंगाट नसे.स्थानापन्न झालं कि समोर शिवकालीन महाला समोर बसल्या सारख वाटे.सज्जा ,खिडक्या अस दृश्य.वर मखमली पडदा.त्यावर हार.दोन्ही कोपऱ्यात ढाल तलवारी मोठ्या साईझ च्या.हळू हळू दिवे मंद होत तिसरी घंटा होई.सर्व जण कान अन डोळ्यात प्राण आणून स्टेज कड पाहू लागत.मग आकाशवाणी झाल्या सारखी उदघोषणा होई,
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम.
चंद्रलेखा सादर करीत आहे तीन अंकी नाट्य प्रयोग
गारंबीचा बापू,,,
मग सर्व माहिती झाली कि,
आणि dr काशीनाथ घाणेकर,,,
मग टाळ्यांचा प्रचंड कडकडाट.
पडदा हळुवार वर जाई एकेक घडी आवरत.समोर साकारलेल नेपथ्य परत टाळी घेई अन रंग देवता प्रसन्न होई.
मध्यनतरात बाहेर वडा आईस्क्रीम वाट बघत असे.नाटक सम्पल कि तृप मनाने परतत असता कुणी कलाकार अवचित दिसे,मग त्याच्या भोवती गराडा होई.येताना बाबा हॉटेलात नेत ती वेगळी मेजवानी.आईला परत गेलं कि जेवण करायला नको म्हणून.
दादरला रहात असल्याने नातेवाईक,ओळखीचे,त्यांच्या ओळखीचे खरेदी किंवा शिवाजी ला नाटक पाहायला येत ते आमच्या कडेच उतरत.यायच्या आधी निरोप येई,मामा सल्याला पाठवून बुकिंग कर अमुक नाटक अमुक दिवशी आहे ते पहायला येतोय. मग मी बुकिंग करायचो.कधी कधी मला ही सोबत म्हणून नेत. मग त्यांची तान्ही बाळ संभाळायला आई कड ठेवीत.कधी रडू लागली तर त्यांना फिरवून आणायचं काम ही करावं लागे. पण त्यात हि आनंद होता.
मग आमचा बब्या नावाचा मित्र तिथं डोअर किपर म्हणून लागला.मग ऑर्केस्ट्रा वग्रे असला कि तो सांगे,या भाई आज.म पव्या ,मी गेलेलो आठवतंय.
प्रदीप,प्रशांत दामले शिवाजी च्या कट्ट्यावर बसलेले दिसत.दामल्या तर मस्त पैकी मळी काढताना पाह्यलाय. मग कलाकारांच्या विषयी बऱ्या वाईट खबरा हि बब्या मुळ कानी पडत.घाणेकर युग सम्पत आलं होतं. दामले,विजय चव्हाण,प्रदीप ,लक्ष्या अन मग भरत जाधव यांचं वादळ आलं.नंतर दादर शी सम्पर्क तुटला.
आता त्या नाट्य संस्था ही नाहीत,ते कलाकार,ते लेखक ही नाहीत.जरा वेगळं वाटत.हल्ली तर जावसच वाटत नाही.त्या वेळी कलाकार कोण या बरोबर लेखक ही जबरदस्त होते.कानिटकर,दळवी सारखे.
आता हि आहेत नवे जुने लोक पण ती मजा येत नाही.तेंव्हा कोवळ्या मनावर कोरल गेलेलं अजून पुसलं जात नाही इतकंच.
तर शिवाजी मंदिर ला साभार दंडवत.अन त्या सर्व लोकांनाही ज्यांनी अश्या आठवणी चा खजिना आमच्या हवाली कायमचा करून दिला.🙏🏻🌹

रविवार, ३० एप्रिल, २०१७

रोमांच

काय झालं होतं रे ?
पित्ता मुळे रॅश आला होता,थोडा ताप अस सुरू होत.उन्हा मुळ झालं.
पण असं कसं? एकदम!
म्हटलं,
त्याच काय आहे,आयुष्यात रोमांच उभे राहावेत असा प्रसंग कधी आला नाही.बाहेर पडलोच सकाळी लवकर तर सूर्या कड पहात गायत्री मंत्र मनात म्हणतो कधी कधी.
त्या दिवशी ट्युशन ला 8ला बाहेर पडलो.सूर्य दिसला,नमस्कार केला.हेल्मेट मधून त्याला मनातनच विचारलं,
काय हो देवा हे रोमांच वग्रे लोक्स म्हणतात ते काय प्रकरण आहे.
तुला अजून अनुभव नाही?
नाय बॉ.
थांब माझ्या परीने तुला समजावून सांगतो,नव्हे प्रत्यक्ष अनुभव देववितो.
मी खुश.2 किमी.झाले तरी काही अनुभव नाही.
काय देवा चेष्टा केली का राव तुम्ही आमची.
तो गालात हसत म्हणला,
वत्सा,आज माझी ड्युटी समाप्त होण्या आधी तुला प्रत्यय येईल धीर धर.
मग काय संध्याकाळी पित्त वाढून पुळ्या आल्या.महाराज ड्युटी सम्पवून जात होते.त्यांना म्हणलो,
हे काय देवा! असा असतो होय रोमांच!चैला ब्र होत नव्हता अनुभव तर.
बालका,तस नसत ते.पण तू माझ्या कडे मागणी केलीस.तुझ्या वरच्या प्रितीने मी माझ्या पद्धतीनं तुझी मदत केली न अनुभव दिला.😅
तर असं झालं होतं आजाराचं कारण.
@सलील जोशी.

शनिवार, २९ एप्रिल, २०१७

मोबल्या घेताना

मोबल्या घेताना,
गेले महिनाभर मोबाईल बिघडला म्हणून नवा घेताना कुठला घ्यावा,याचा शोध घेताना काही माहिती जमा झाली.तुमच्या शी शेअर करतोय.उपयोग झाला तर बघा.
आखूड शिंगी बहु दुधी असच आपण शोधत असतो.हल्ली मार्केट मध्ये चायनीज कम्पन्यांचं वर्चस्व आहे.मोटोरोला हि लिनॉव्हो न घेतलीय.
फोन मध्ये काय हवं?आपला उपयोग काय ? यावर फोन कुठला घ्यावा हे ठरवावं.
जर तुम्ही टेक्नो सॅव्ही नाहीत,गेम वग्रे खेळत नाहीत.फोन जास्त करून दुसऱ्याशी बोलायला,मेसेज करायला आणि कॅलक्युलेटर सारखं ऍप वापरता,कधी नेट वर थोडं सर्च करता तर खूप लो बजेट फोन 4 हजार च्या आसपास मिळतील.
पण नेट वर असणार आहात, कॅमेरा वापरणार आहात, हाय एन्ड गेम खेळणारे आहात, मॅप भटकंतीत वापरता तर मात्र त्यात काही गोष्टी बघाव्या लागतील.
सर्व प्रथम मेमरी किती आहे,कॅमेरा कसा न किती mp आहे,os म्हणजे कार्य प्रणाली कुठली आहे ,सर्विस सेंटर जवळ आहे का? कम्पनी च आजवरचे रेप्युटेशन कस आहे,हे पहावं.
मोबाईल मध्ये असलेली app नीट चालायला त्याला उपयुक्त सेन्सर्स लागतात.
त्यातले काही बहुतेक सर्व फोन मध्ये असतात.
प्रोक्सीमेटी सेन्सर सारखे.म्हणचे फोन बोलायला गाला जवळ नेला कि स्क्रीन आपोआप बंद होतो,तो सेन्सर.
बाहेर किती प्रकाश आहे त्या नुसार तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून स्क्रीन कमी जास्त प्रमाणात प्रखर करणं हे काम करणारा सेन्सर.लाइट सेन्सर.
मॅग्नेटिक सेन्सर असतो ज्या मूळ होका यंत्र असणार app चालत.जर हा सेन्सर नसेल तर दिशा दर्शक app चालणार नाही.
जायरो स्कोप सेन्सर
तू नळी वर हल्ली 360 डिग्री व्हिडीओ आलेत ते बघायचे असतील किंवा गुगुल चा किंवा अन्य कँपन्यांचा vr बॉक्स काम करणार नाही.फोन फिरवला गेलाय याच ज्ञान सिस्टीम ला हा सेन्सर करून देतो.
एक हॉल सेन्सर हि येतो जो चुंबकीय क्षेत्र वग्रे मोजतो.
ब्यारो मीटर मला वाटत समुद्र सपाटी पासून किती उंचावर आहोत ते दाखवतो.
हिट सेन्सर तपमान दाखवतो.
तर आपल्याला काय वापरायचं आहे त्या नुसार सेन्सर फोन मध्ये आहेत का ? हे बघावं.सेन्सर मदर बोर्ड वर असतात.जे डाऊन लोड करता येत नाहीत.
दुसरं प्रोसेसर कुठला आहे,त्याला किती कोअर आहेत,त्याचा स्पीड किती आहे आणि सध्या कुठला प्रोसेसर नवा आलाय याची माहिती आंजावर घ्यावी.
Ram म्हणजे मेमरी किती आहे ते बघावं.ram जास्त असेल तर काम पटकन करतो फोन.
स्क्रीन साईझ किती आहे,त्यावर गोरिला ग्लास सारखं प्रोटेक्शन दिलंय का आपल्याला घ्यावं लागेल ते हि पहावं.
जो फोन निवडाल त्याच्या बद्दल वापर केलेल्या लोकांचं काय मत आहे ते जालावर शोधावं.
चायनीज कम्पन्या च आपल्या कडे न सर्वत्र जास्त आहेत.शाओ मी , कुल पॅड हे फोन मोदींच्या मेक इन इंडिया कॅम्पेन नुसार भारतात अनुक्रमे आंध्र आणि औरंगाबाद येथ तयार होतात.म्हणजे आपल्या देशात तयार होणारा फोन ज्या मूळ आपल्या बऱ्याच लोकांना रोजगार मिळतोय.सो आपली देश भक्ती,प्रेम अबाधित राहायला हि हरकत नाही.
आता सॅमसंग सारखी जुनी कम्पनी आहे जिचं नेटवर्क खूप आहे.सर्विस सेंटर खूप आहेत.
पण ते लोक उगा वेगळी मॉडेल आणून हे हवं ते न देता जास्त किमतीत देतात असं जाणवलं.त्यांचे फोन लवकर हँग होऊ लागतात असा सूर जालावर जाणवला.
ओपो व्हीव्हो सारख्या कम्पन्या चीन च्या असल्या तरी त्या जास्त किमतीत फोन विकतायत. त्या नुसार हवं ते फोन मध्ये नसत.हे लोक डीलर ला जास्त कमिशन देऊन धंदा वाढवतात असं वाटलं.
शाओ मी,कुल पॅड या कम्पन्या ऑन लाईन विक्री जास्त करतात.त्या मूळ डीलर च कमिशन व इतर खर्च कमी होऊन हे ग्राहकाला जास्त सुविधा देत आहेत.ज्या मुळ जालावर फ्लॅश सेल मध्ये हि कधी कधी मिळत नाहीत.
शाओ मी च्या साईट वर डायरेक्ट जाऊन प्री ऑर्डर करता येते.
कुल पॅड फोन खूप चांगला आहे पण माझा मदर बोर्ड निकामी झाला दीड वर्ष्यात .तो रिपेअर करायचा तर 3 हजार खर्च आणि 20 दिवस वेटिंग सांगितलं म्हणून शाओ मी घेतला.खूप चांगला वाटतोय आज तरी.काही ओळखीच्या लोकांकडे 4 वर्ष विना तक्रार चालू आहे म्हणून घेतलाय.शेवट हि उपकरण चालणं न चालणं यात नशिबाचा भाग हि आहेच.
आणि सांगायचं राह्यलं ते म्हणचे बॅटरी किती पॉवर ची आहे? हल्ली बऱ्याच फोन ची बॅटरी नॉन रीमुव्हेंबल असते.ते हि चेक करावं.हायब्रीड स्लॉट असतो ज्या मूळ 2 सिम किंवा एक सिम एक मेमरी कार्ड असच चालू शकत नव्या फोन मध्ये.
अजून एक गोष्ट फोन आवडला तरी तो कधो लॉन्च झालाय ते बघावं.कारण जुना असेल तर जिओ किंवा 4g त्यात चालणार नाही जर वापरणार असाल तर.
इतकं केलं कि पसंतीचा फोन जालावर तुलना करण्यास टाकावा म्हणजे जास्त कळेल.बरेच फोरम आहेत ते वाचावे.तू नळीवर प्रत्येक फोन चे रिव्ह्यू आहेत ते पाहावे.
मग फोन घेतला कि देवाचं नाव घेऊन वापरणं सुरु करावं.
लवकर बिघडला तर
सर्व अशाश्वत असत हे तत्वज्ञान आठवावे
समजा नीट चालला दोन तीन वर्षे तर खुशाल म्हणावं
म!घामाचा पैसा आहे अन नीट बघून घेतला होता😃
सो हैप्पी फोनिंग
सलील जोशी

गुरुवार, ६ एप्रिल, २०१७

कुणी तरी आहे घरात

परत यायला उशीर करू नको.आणि येताना त्या पडक्या धर्म शाळेत डोकवायला जाऊ नको.
अश्या सूचना गावी मिळत असत.रिकाम्या ,पडक्या वास्तूत भूत असत म्हणे. त्या ठिकाणी कसलेसे आवाज येतात.कुणी तरी कपडे धुतय असा आवाज येतो.काही वाटल्या सारख पाटावरवंट्याचा आवाज येतो.
            आता तस काही राहील नाही.पण नीट निरीक्षण केलं तर आजही हे होत असत.अद्ययावत साधनांनी युक्त घर आहेत.पण घरात राहायला कुटुंबियांना वेळ नाही.मग ही साधन घराचा ताबा घेतात.
       गृहिणी मशीन ला प्रोग्रॅम सेट करून बाहेर पडलेली असते.ते मशीन मग 10 वाजता प्रोग्रॅम सुरू करून तासाभरात कपडे ड्राय करून तश्रीफ हलवत उभं रहात.
       क्लास ला गेलेली तरुण कम्पनी सेट टॉप बॉक्स ला अमुक कार्यक्रम रेकॉर्ड कर म्हणून सूनवून गेलेली असतात.तो ही दिली वेळ सुरू होऊन कार्यक्रम रेकॉर्ड करून स्टॅन्ड बाय रहातो आपल्या फुल hd रेडी दोस्ता सकट.
         रात्र पाळी करून आले कि गरम मिळावा नाष्टा मालकांना म्हणून टैमर लावलेला मावे मालक यायच्या जरा आधी आपलं काम बजावून वाट बघत असतो.
       चिरंजीवानी विषाणू शोधून नष्ट कर न मग बंद हो रिपोर्ट ठेऊन सांगितलेला संगणक आपलं काम सम्पवून सिस्टीम बंद करून घेत असतो.
      काही फ्रीज तर आपले आपण पोटातले जिन्नस सम्पले कि मॉल ला ऑर्डर देतात ,पाठवा ही लिस्ट.
     Cctv डोळे न मिटता सर्व क्षण चित्र टिपून घरावर लक्ष ठेऊन असतात. मालकाला जीवन्त प्रक्षेपण ही उपलब्ध करून देत असतात.
     एखादं वेळी दिवे लागणी ला आपोआप सुरू होऊन सूर्य किरण आली कि  सैतान गायब होतो तशी बंद होणारी यंत्रणा ही आपलं काम चोख करीत असते.
        आणि ज्यांच्या साठी घर आहे ती जीवन्त माणसं मात्र काहीच तास इथं वास्तव्याला असतात. बरेचदा ती ही एकत्र एक वेळी नव्हे तर पाळी असेल तशी.
  तेंव्हा जुन्या काळी पडके वाडे हुडे भूत बंगले असतं, आता राहती घर ही तशीच होत चाललीत हळू हळू असं वाटत.