*उस्ताद मेहदी हसन साहब*
गझल ऐकू लागलो ते tv वर मॉडेला वूल स्पॉन्सर्ड प्रोग्रॅम मूळ.तलत अझीझ,पंकज उधास ते अनुप जलोटा सारखे आर्टिस्ट त्यात गायचे.भाषेची नजाकत आवडली.मग वहीत शेकड्यानी गझल जमवल्या होत्या ,पण नंतर ती गहाळ झाली.कालांतराने परिस्थिचे थपडे पडल्याने वास्तव समजू लागलं. त्या मूळ असेल कदाचित पण गझल मध्ये लाचारी जाणवू लागली.सारख तो ,तिला विनवतोय.मला वाटत चाचा गालिब च म्हणून गेलेत कि, आग दोनो तरफ हो तो ईश्क मजा देता है.मग भाऊ साहेब पाटणकर वपुंच्या पुस्तकातून परिचयाचे झाले.उर्दूवर प्रचंड प्रभुत्व असलेला माणूस.मुशायऱ्या त जाऊन आपला ठसा उमटवला होता त्यांनी.त्यांना ही ,हि लाचारी पसंत नव्हती.त्यांना ऐकल म्हणजे कळेल मला काय म्हणायचंय.
अस असलं तरी सुरेश भटांची मलमली तारुण्य माझे ते तरुण आहे रात्र अजुनी अश्या गझला मनावर राज्य करत होत्या.मग तबल्यामुळं गुलाम अली यांची चुपके चुपके कैकदा ऐकली .त्यांची लय प्रधान गायकी आणि उस्ताद तारी खान यांच्या तबल्या करता.काय माहोल तयार होतो ,जवाब नही.
त्यातच काही जाणकार मेहदी हसन नाही ऐकला तर गझल काय ऐकली म्हणले.तारी खान त्यांचे तबला वादक असले तरी गाण्यात त्यांचे शिष्य होते अस ऐकल.अलीकडं तू नळी मूळ तारी खा साहेबाना रंजीश ही सही गझल पूर्ण तयारीनिशी आणि स्वतः तबला वाजवत गाताना ऐकल आणि अक्षरशः हात जोडले. कारण नुसता ठेका नाही तर उठाण लग्गी तिहाई ,मध्ये भरणा अस सर्व व्यवस्थित वाजत होत आणि गात ही होते.मग मेहदी हसन साहेबांची रेकॉर्डिंग ऐकली.खर्जा चा घोगरा तरी नजाकत भरा आवाज ऐकून लोक म्हणतात ते पटलं.ती गझल गावी तर त्यांनीच किंवा ऐकावी ती त्यांचीच.सोबत तारी खां असले तर सोने पे सुहागा.
तर मेहदी हसन खां मूळचे भारतातले.राजस्थान राजवाड्याचे दरबारी गायक त्यांचे वडील होते.
आता खान आणि खां साहेब यातला फरक त्यांनीच सांगितलाय एके ठिकाणी.
पठाण लोकांना खान म्हणतात.
पण ज्याच्या किमान तीन पिढ्यात उत्तम आणि लोकमान्य गवई किंवा वादक होऊन गेलेत त्यांच्या पुढील पिढीत जर कुणी कलाकार असेल तर त्याला खां हा बहुमान मिळत असे.यांचं घराणे तर कैक पिढ्या राज गायकांच्या होत्या अस होत.वडील जयपूर दरबारी होते.कसली तदात नव्हती.मेहदी हसन 12 का 13 व्या वर्षी बडोद्याच्या महाराजां समोर हजेरी लावते झाले.40 मिनिट गाणं झालं.महाराजांनी त्यांना सोन्याचं कड आणि पोषाख देऊन गौरवलंच पण आज पासून हा आमचा दरबारी गायक झाला म्हणून घोषित केले.
तोवर वातावरण बदलू लागलं होतं.वडील मग काही काळ नेपाळ वग्रे ठिकाणी ही दरबारी गायक म्हणून गेले.पण फाळणी झाली नी हे कुटुंब पाकिस्तानात गेले.सर्व शांत झाला कि येऊ परत म्हणून.पण वडील इकडं आल्यावर कळलं कि सर्व लुटल गेलंय. मग हाती लागल ते घेऊन परत गेले.
तिथं ही जे होत ते विकत राहून यांची गुजराण सुरू होती.तालीम तर जोरदार होतीच पण,गाणं करायचं तर तब्येत उत्तम हवी.छातीत दम हवा.या करता त्यांना वडील व्यायाम करायला लावत.बर तो ही साधा नव्हे.
पहाटे 3 वाजता उठायचं.आधी 500 मग 1200 वर गेलेल्या जोर आणि बैठका.3 मैल धावणे.गावात एक मैदान होत त्याला चक्कर धावत मारायची.पहिल्या ठिकाणी आल्यावर बैठका मारायच्या मग पुढं दुसरी फेरी.अश्या तीन फेऱ्या झाल्या कि शेवटची फेरी हळूहळू धावत मारायची.
हे करायला खुराक ही तसाच होता. सहा शेर दूध एक दमात प्यायचं.पाऊण शेर देशी तूप,1छटाक गोश्त आणि बदाम ,पिस्ते ,काजू असा आहार.संध्याकाळी 4,5 मल्लाना प्रत्येकी थकवायच यांनी तेही दहा मिनिटात.मग यांचे काका उतरत त्यांना थकवायच.
बाकी रियाज होताच.
करता करता एक दिवस वडील म्हटले,आता आपल्या जवळ विकायला काही नाही.तेंव्हा उदर निर्वाह करायला म्हणून मी धंदा करणारेय.त्या करता एकाला 10 हजार उरले होते ते दिलेत. तो उद्या लाकडं आणील.
म्हणजे तुम्ही काय धंदा करणार आहात?
लाकडाची वखार टाकतोय आपण.
पण मग तुम्हाला सगळे वखार वाले म्हणतील!
हो पण इलाज नाही.तुझी तालीम ,खुराक,कुटुंबाचा खर्च ही आहेच.
नाही हे नाही पटत मला.तुम्ही मला पैसे द्या मी काही धंदा करीन आणि कमवेन.
वडील हसले आणि दहा रु काढून दिले.
मग त्यांनी एक मातीच बांधलेलं दुकान त्यांना देण्यात आलं होतं ते चालवायचं ठरवलं.राजदरबारात बालपण गेल्याने राजाच्या मोटारी,पंप वग्रे रिपेअर करायला माणस होती.यांना त्या टेक्निकल गोष्टीं ची आवड असल्याने तिथं उभं राहून सर्व टिपलं होत. मग त्या दहा रुपयात दीड रुपयांचा पंप,जुने टायर,स्क्रू ड्रायव्हर अशी जुजबी खरेदी केली.5 दिवस रिकामे गेले.मग मात्र बाईक,सायकल,मोटारी रिपेअरिंग करता येऊ लागल्या.13 रु च्या आसपास रोज मिळकत होऊ लागली. वडिलांना रोज 5 रु दिले जात होते.ते ठीक आहे न म्हणून विचारलं तर वडील म्हणले,अरे यात सर्व होतय.
पण या धंद्यावर अवलंबून रहाणं ठीक नाही म्हणून भावाला तिथ बसवून हे लाहोर ला गेले.तिथं ट्रॅकटर कम्पनीत जाऊन आपली कहाणी सांगितली.त्या लोकांनी ही ठेऊन घेतलं.यांनी फिट केलेले 300 पंप होते त्या परिसरात.काम बघून फर्ग्युसन कम्पनी ने त्यांना उत्तम कारागीर म्हणून सर्टिफिकेट दिल.
मग एक माणूस म्हणला, हे काय करत राह्यलास माझ्याकडे ये.मला एक जमीन लीज वर मिळालीय.ती पडीक आहे. तिला उपजाऊ करायच आहे.हे ही गेले त्याच्या बरोबर.त्या गृहस्थाला इतर कंपनी नी सांगितलं होतं कि, या जमिनीस वसवायला तीन वर्षे हवीत आणि यंत्र सामुग्री हवी.
त्या माणसाकडे आता पैसे शिल्लक नव्हते.मेहदी हसन म्हणले मला फक्त एक ट्रॅक्टर आणून द्या.त्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने त्यांनी ती जमीन एक वर्षात नांदती केली.पीक नीट एक ओळीत लावलेली. ती बघायला लोक लांबून येत.
तेंव्हाच त्यांना एक पत्र आलं.त्यांचं गाणं नुसतच साथीला काही नसताना एक लग्नात ऐकल होत एकाने.तो इतका खूष झाला कि म्हणला,मी जेव्हा सिनेमा काढीन त्यात तूच गाशील.हे हजार रुपये हवं तर टोकन म्हणून ठेव किंवा बिदागी म्हणून.
तर त्यानं सिनेमा काढायचं ठरवलं तर याना करारपत्र न पैसे पाठवले आणि ये म्हटलं.मग ज्याची जमीन होती त्याला हे सांगून तिथून निघाले.गायलेली गाणी गाजली.रेडिओत बोलावलं. त्यांची ऑडिशन 5 तास झाली.धृपद ते सिने संगीत यांनी ऐकवलं.बुखारी साहेब म्हणले याल ठेऊन घ्या.पगार किती तर 35 रु म्हणले.बस इतकंच?तर समजलं इतरांना 12रु च मिळत.मग आणि काय देणार तर A ग्रेड रेडिओ ची मिळाली.मग हळूहळू नाव झालं आणि पसिद्ध झाले.लहानपणी लग्न झाल्यानं लग्नात बायको 13 वर्ष्याची होती.तिचे आई वडील गेल्याने तिला तू आता घेऊन जा म्हणाले.मग तिला स्वयंपाक वग्रे ही यांनीच शिकवलं.मग आणखी ही एक लग्न झालं होतं.,
मध्ये हिंदुस्थान मध्ये राजस्थान ला बोलावलं.ते आले गायले. पण त्यांच्या जन्म गावी भेट द्यायची म्हटल्यावर व्यवस्था केली गेली.तिथं जाऊन आल्यावर अधिकाऱ्याने विचारलं,कसं वाटलं जाऊन?सुधारणा आहे का नाही?तर तिथं आता खूप सुधारणा आहे पण अजून रस्ता ,वीज,पाणी नाहीये.मग इतर व्यवस्था केली गेली पण रस्ते झाले नाहीत.तेंव्हा मेहदी साहेब म्हणले, मला काही करायचंय गावकऱता करू का ?मग त्यांच्या कार्यक्रम ठेवला गेला गावात.दीड दोन लाख लोक होते आलेले आजूबाजुहून.ते उत्पन्न त्यांनी रस्त्याकरता दिले आणि रस्ता झाला., झून झून नाव मला वाटत गावाचं.
इकडं लता दीदी पासून सर्व त्यांचे चाहते होते. आले घरी कि दीदी स्वतः त्यांना करून वाढत.
त्यांचे शेवटचं दर्शन जे पाकिस्तान tv वर झालं ते मात्र बघवले नाही.सुन्न व्हायला झालं.पहाडा सारखा माणूस ओळखू येईना असा गलितगात्र झालेला.त्यांच्या मुलाने सांगितलं,हमारी दोनो अम्मा जबसे गयी तबसे इन्हो ने हाय ले ली है.
कलाकार म्हणून मोठे होतेच पण वेळ आली तेंव्हा कला बाजूस ठेऊन कुटुंबा करता अर्थार्जन इतर मार्गाने इमानदारीत आणि समर्थ पण केलं हे विशेष.,
ते म्हणले,जे ठरवलं ते करायचंच.होतच.अल्ला से मांगो दिल से तो वो दे देता है बस मांगनेका तरिका आना चाहीये.या दुसरे मायनो मे विल पॉवर स्ट्रॉंग होनी चाहीये.
हे सर्व त्यांच्या मुलाखतीतून समजलं.आणि कलाकारा मागचा माणूस ही समजला आणि 🙏🏻
गझल ऐकू लागलो ते tv वर मॉडेला वूल स्पॉन्सर्ड प्रोग्रॅम मूळ.तलत अझीझ,पंकज उधास ते अनुप जलोटा सारखे आर्टिस्ट त्यात गायचे.भाषेची नजाकत आवडली.मग वहीत शेकड्यानी गझल जमवल्या होत्या ,पण नंतर ती गहाळ झाली.कालांतराने परिस्थिचे थपडे पडल्याने वास्तव समजू लागलं. त्या मूळ असेल कदाचित पण गझल मध्ये लाचारी जाणवू लागली.सारख तो ,तिला विनवतोय.मला वाटत चाचा गालिब च म्हणून गेलेत कि, आग दोनो तरफ हो तो ईश्क मजा देता है.मग भाऊ साहेब पाटणकर वपुंच्या पुस्तकातून परिचयाचे झाले.उर्दूवर प्रचंड प्रभुत्व असलेला माणूस.मुशायऱ्या त जाऊन आपला ठसा उमटवला होता त्यांनी.त्यांना ही ,हि लाचारी पसंत नव्हती.त्यांना ऐकल म्हणजे कळेल मला काय म्हणायचंय.
अस असलं तरी सुरेश भटांची मलमली तारुण्य माझे ते तरुण आहे रात्र अजुनी अश्या गझला मनावर राज्य करत होत्या.मग तबल्यामुळं गुलाम अली यांची चुपके चुपके कैकदा ऐकली .त्यांची लय प्रधान गायकी आणि उस्ताद तारी खान यांच्या तबल्या करता.काय माहोल तयार होतो ,जवाब नही.
त्यातच काही जाणकार मेहदी हसन नाही ऐकला तर गझल काय ऐकली म्हणले.तारी खान त्यांचे तबला वादक असले तरी गाण्यात त्यांचे शिष्य होते अस ऐकल.अलीकडं तू नळी मूळ तारी खा साहेबाना रंजीश ही सही गझल पूर्ण तयारीनिशी आणि स्वतः तबला वाजवत गाताना ऐकल आणि अक्षरशः हात जोडले. कारण नुसता ठेका नाही तर उठाण लग्गी तिहाई ,मध्ये भरणा अस सर्व व्यवस्थित वाजत होत आणि गात ही होते.मग मेहदी हसन साहेबांची रेकॉर्डिंग ऐकली.खर्जा चा घोगरा तरी नजाकत भरा आवाज ऐकून लोक म्हणतात ते पटलं.ती गझल गावी तर त्यांनीच किंवा ऐकावी ती त्यांचीच.सोबत तारी खां असले तर सोने पे सुहागा.
तर मेहदी हसन खां मूळचे भारतातले.राजस्थान राजवाड्याचे दरबारी गायक त्यांचे वडील होते.
आता खान आणि खां साहेब यातला फरक त्यांनीच सांगितलाय एके ठिकाणी.
पठाण लोकांना खान म्हणतात.
पण ज्याच्या किमान तीन पिढ्यात उत्तम आणि लोकमान्य गवई किंवा वादक होऊन गेलेत त्यांच्या पुढील पिढीत जर कुणी कलाकार असेल तर त्याला खां हा बहुमान मिळत असे.यांचं घराणे तर कैक पिढ्या राज गायकांच्या होत्या अस होत.वडील जयपूर दरबारी होते.कसली तदात नव्हती.मेहदी हसन 12 का 13 व्या वर्षी बडोद्याच्या महाराजां समोर हजेरी लावते झाले.40 मिनिट गाणं झालं.महाराजांनी त्यांना सोन्याचं कड आणि पोषाख देऊन गौरवलंच पण आज पासून हा आमचा दरबारी गायक झाला म्हणून घोषित केले.
तोवर वातावरण बदलू लागलं होतं.वडील मग काही काळ नेपाळ वग्रे ठिकाणी ही दरबारी गायक म्हणून गेले.पण फाळणी झाली नी हे कुटुंब पाकिस्तानात गेले.सर्व शांत झाला कि येऊ परत म्हणून.पण वडील इकडं आल्यावर कळलं कि सर्व लुटल गेलंय. मग हाती लागल ते घेऊन परत गेले.
तिथं ही जे होत ते विकत राहून यांची गुजराण सुरू होती.तालीम तर जोरदार होतीच पण,गाणं करायचं तर तब्येत उत्तम हवी.छातीत दम हवा.या करता त्यांना वडील व्यायाम करायला लावत.बर तो ही साधा नव्हे.
पहाटे 3 वाजता उठायचं.आधी 500 मग 1200 वर गेलेल्या जोर आणि बैठका.3 मैल धावणे.गावात एक मैदान होत त्याला चक्कर धावत मारायची.पहिल्या ठिकाणी आल्यावर बैठका मारायच्या मग पुढं दुसरी फेरी.अश्या तीन फेऱ्या झाल्या कि शेवटची फेरी हळूहळू धावत मारायची.
हे करायला खुराक ही तसाच होता. सहा शेर दूध एक दमात प्यायचं.पाऊण शेर देशी तूप,1छटाक गोश्त आणि बदाम ,पिस्ते ,काजू असा आहार.संध्याकाळी 4,5 मल्लाना प्रत्येकी थकवायच यांनी तेही दहा मिनिटात.मग यांचे काका उतरत त्यांना थकवायच.
बाकी रियाज होताच.
करता करता एक दिवस वडील म्हटले,आता आपल्या जवळ विकायला काही नाही.तेंव्हा उदर निर्वाह करायला म्हणून मी धंदा करणारेय.त्या करता एकाला 10 हजार उरले होते ते दिलेत. तो उद्या लाकडं आणील.
म्हणजे तुम्ही काय धंदा करणार आहात?
लाकडाची वखार टाकतोय आपण.
पण मग तुम्हाला सगळे वखार वाले म्हणतील!
हो पण इलाज नाही.तुझी तालीम ,खुराक,कुटुंबाचा खर्च ही आहेच.
नाही हे नाही पटत मला.तुम्ही मला पैसे द्या मी काही धंदा करीन आणि कमवेन.
वडील हसले आणि दहा रु काढून दिले.
मग त्यांनी एक मातीच बांधलेलं दुकान त्यांना देण्यात आलं होतं ते चालवायचं ठरवलं.राजदरबारात बालपण गेल्याने राजाच्या मोटारी,पंप वग्रे रिपेअर करायला माणस होती.यांना त्या टेक्निकल गोष्टीं ची आवड असल्याने तिथं उभं राहून सर्व टिपलं होत. मग त्या दहा रुपयात दीड रुपयांचा पंप,जुने टायर,स्क्रू ड्रायव्हर अशी जुजबी खरेदी केली.5 दिवस रिकामे गेले.मग मात्र बाईक,सायकल,मोटारी रिपेअरिंग करता येऊ लागल्या.13 रु च्या आसपास रोज मिळकत होऊ लागली. वडिलांना रोज 5 रु दिले जात होते.ते ठीक आहे न म्हणून विचारलं तर वडील म्हणले,अरे यात सर्व होतय.
पण या धंद्यावर अवलंबून रहाणं ठीक नाही म्हणून भावाला तिथ बसवून हे लाहोर ला गेले.तिथं ट्रॅकटर कम्पनीत जाऊन आपली कहाणी सांगितली.त्या लोकांनी ही ठेऊन घेतलं.यांनी फिट केलेले 300 पंप होते त्या परिसरात.काम बघून फर्ग्युसन कम्पनी ने त्यांना उत्तम कारागीर म्हणून सर्टिफिकेट दिल.
मग एक माणूस म्हणला, हे काय करत राह्यलास माझ्याकडे ये.मला एक जमीन लीज वर मिळालीय.ती पडीक आहे. तिला उपजाऊ करायच आहे.हे ही गेले त्याच्या बरोबर.त्या गृहस्थाला इतर कंपनी नी सांगितलं होतं कि, या जमिनीस वसवायला तीन वर्षे हवीत आणि यंत्र सामुग्री हवी.
त्या माणसाकडे आता पैसे शिल्लक नव्हते.मेहदी हसन म्हणले मला फक्त एक ट्रॅक्टर आणून द्या.त्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने त्यांनी ती जमीन एक वर्षात नांदती केली.पीक नीट एक ओळीत लावलेली. ती बघायला लोक लांबून येत.
तेंव्हाच त्यांना एक पत्र आलं.त्यांचं गाणं नुसतच साथीला काही नसताना एक लग्नात ऐकल होत एकाने.तो इतका खूष झाला कि म्हणला,मी जेव्हा सिनेमा काढीन त्यात तूच गाशील.हे हजार रुपये हवं तर टोकन म्हणून ठेव किंवा बिदागी म्हणून.
तर त्यानं सिनेमा काढायचं ठरवलं तर याना करारपत्र न पैसे पाठवले आणि ये म्हटलं.मग ज्याची जमीन होती त्याला हे सांगून तिथून निघाले.गायलेली गाणी गाजली.रेडिओत बोलावलं. त्यांची ऑडिशन 5 तास झाली.धृपद ते सिने संगीत यांनी ऐकवलं.बुखारी साहेब म्हणले याल ठेऊन घ्या.पगार किती तर 35 रु म्हणले.बस इतकंच?तर समजलं इतरांना 12रु च मिळत.मग आणि काय देणार तर A ग्रेड रेडिओ ची मिळाली.मग हळूहळू नाव झालं आणि पसिद्ध झाले.लहानपणी लग्न झाल्यानं लग्नात बायको 13 वर्ष्याची होती.तिचे आई वडील गेल्याने तिला तू आता घेऊन जा म्हणाले.मग तिला स्वयंपाक वग्रे ही यांनीच शिकवलं.मग आणखी ही एक लग्न झालं होतं.,
मध्ये हिंदुस्थान मध्ये राजस्थान ला बोलावलं.ते आले गायले. पण त्यांच्या जन्म गावी भेट द्यायची म्हटल्यावर व्यवस्था केली गेली.तिथं जाऊन आल्यावर अधिकाऱ्याने विचारलं,कसं वाटलं जाऊन?सुधारणा आहे का नाही?तर तिथं आता खूप सुधारणा आहे पण अजून रस्ता ,वीज,पाणी नाहीये.मग इतर व्यवस्था केली गेली पण रस्ते झाले नाहीत.तेंव्हा मेहदी साहेब म्हणले, मला काही करायचंय गावकऱता करू का ?मग त्यांच्या कार्यक्रम ठेवला गेला गावात.दीड दोन लाख लोक होते आलेले आजूबाजुहून.ते उत्पन्न त्यांनी रस्त्याकरता दिले आणि रस्ता झाला., झून झून नाव मला वाटत गावाचं.
इकडं लता दीदी पासून सर्व त्यांचे चाहते होते. आले घरी कि दीदी स्वतः त्यांना करून वाढत.
त्यांचे शेवटचं दर्शन जे पाकिस्तान tv वर झालं ते मात्र बघवले नाही.सुन्न व्हायला झालं.पहाडा सारखा माणूस ओळखू येईना असा गलितगात्र झालेला.त्यांच्या मुलाने सांगितलं,हमारी दोनो अम्मा जबसे गयी तबसे इन्हो ने हाय ले ली है.
कलाकार म्हणून मोठे होतेच पण वेळ आली तेंव्हा कला बाजूस ठेऊन कुटुंबा करता अर्थार्जन इतर मार्गाने इमानदारीत आणि समर्थ पण केलं हे विशेष.,
ते म्हणले,जे ठरवलं ते करायचंच.होतच.अल्ला से मांगो दिल से तो वो दे देता है बस मांगनेका तरिका आना चाहीये.या दुसरे मायनो मे विल पॉवर स्ट्रॉंग होनी चाहीये.
हे सर्व त्यांच्या मुलाखतीतून समजलं.आणि कलाकारा मागचा माणूस ही समजला आणि 🙏🏻

