शिवाजी मंदिर!!!!
तिथं जाण हा मनोरंजन नव्हे तर संस्कृतीचा भाग होता. सण असल्यासारखं वाटायचं.त्या बाबतीत माझं भूत झालंय. म्हणजे त्या काळात अडकून पडलोय.
बाबा आवर्जून सर्वांच बुकिंग करीत असत.आधी स्वतः पण लवकरच ती जबाबदारी माझ्यावर आली. दरवेळी बाबा निक्षून सांगत.मिळेल तेव्हड पुढचं न गॅंग वे जवळच बुक कर.तीच सवय मलाही लागली होती.मग प्रयोगाच्या दिवशी मस्त कपडे घालून निघायचं.बाबांना अत्तराचा षोक होता.ते अत्तर आम्हाला ही लावत.मग आईला मध्ये ठेऊन आजूबाजूला आपण बसायचं हे सांगणे होई.तिथं गेलं कि जाहिराती बघायच्या.आगामी आकर्षण कुठलंय,आपण पाहिलंय का? मग काका तपकीर वाले होते तिथं बाबा तपकीर ही घेत.जिन्यात लावलेला मोठा आरसा लक्ष वेधून घेई.पब्लिक ,विशेषतः स्त्री वर्ग तिथून रेंगाळत च चाले.थिएटर मध्ये शिरलं कि सुखद गारवा स्वागत करायचा. डोअर किपर सीट दाखवायला असेच.सर्व मराठी माणस लग्नाला आल्यासारखी आलेली असायची.अत्तर,गजरे याचा मंद सुगन्ध दरवळू लागे. तरी गोंगाट नसे.स्थानापन्न झालं कि समोर शिवकालीन महाला समोर बसल्या सारख वाटे.सज्जा ,खिडक्या अस दृश्य.वर मखमली पडदा.त्यावर हार.दोन्ही कोपऱ्यात ढाल तलवारी मोठ्या साईझ च्या.हळू हळू दिवे मंद होत तिसरी घंटा होई.सर्व जण कान अन डोळ्यात प्राण आणून स्टेज कड पाहू लागत.मग आकाशवाणी झाल्या सारखी उदघोषणा होई,
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम.
चंद्रलेखा सादर करीत आहे तीन अंकी नाट्य प्रयोग
गारंबीचा बापू,,,
मग सर्व माहिती झाली कि,
आणि dr काशीनाथ घाणेकर,,,
मग टाळ्यांचा प्रचंड कडकडाट.
पडदा हळुवार वर जाई एकेक घडी आवरत.समोर साकारलेल नेपथ्य परत टाळी घेई अन रंग देवता प्रसन्न होई.
मध्यनतरात बाहेर वडा आईस्क्रीम वाट बघत असे.नाटक सम्पल कि तृप मनाने परतत असता कुणी कलाकार अवचित दिसे,मग त्याच्या भोवती गराडा होई.येताना बाबा हॉटेलात नेत ती वेगळी मेजवानी.आईला परत गेलं कि जेवण करायला नको म्हणून.
दादरला रहात असल्याने नातेवाईक,ओळखीचे,त्यांच्या ओळखीचे खरेदी किंवा शिवाजी ला नाटक पाहायला येत ते आमच्या कडेच उतरत.यायच्या आधी निरोप येई,मामा सल्याला पाठवून बुकिंग कर अमुक नाटक अमुक दिवशी आहे ते पहायला येतोय. मग मी बुकिंग करायचो.कधी कधी मला ही सोबत म्हणून नेत. मग त्यांची तान्ही बाळ संभाळायला आई कड ठेवीत.कधी रडू लागली तर त्यांना फिरवून आणायचं काम ही करावं लागे. पण त्यात हि आनंद होता.
मग आमचा बब्या नावाचा मित्र तिथं डोअर किपर म्हणून लागला.मग ऑर्केस्ट्रा वग्रे असला कि तो सांगे,या भाई आज.म पव्या ,मी गेलेलो आठवतंय.
प्रदीप,प्रशांत दामले शिवाजी च्या कट्ट्यावर बसलेले दिसत.दामल्या तर मस्त पैकी मळी काढताना पाह्यलाय. मग कलाकारांच्या विषयी बऱ्या वाईट खबरा हि बब्या मुळ कानी पडत.घाणेकर युग सम्पत आलं होतं. दामले,विजय चव्हाण,प्रदीप ,लक्ष्या अन मग भरत जाधव यांचं वादळ आलं.नंतर दादर शी सम्पर्क तुटला.
आता त्या नाट्य संस्था ही नाहीत,ते कलाकार,ते लेखक ही नाहीत.जरा वेगळं वाटत.हल्ली तर जावसच वाटत नाही.त्या वेळी कलाकार कोण या बरोबर लेखक ही जबरदस्त होते.कानिटकर,दळवी सारखे.
आता हि आहेत नवे जुने लोक पण ती मजा येत नाही.तेंव्हा कोवळ्या मनावर कोरल गेलेलं अजून पुसलं जात नाही इतकंच.
तर शिवाजी मंदिर ला साभार दंडवत.अन त्या सर्व लोकांनाही ज्यांनी अश्या आठवणी चा खजिना आमच्या हवाली कायमचा करून दिला.🙏🏻🌹
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा