मंगळवार, ५ डिसेंबर, २०१७

भटकंती,वडोदरा

भटकंती करताना काही ठिकाण खूप प्रेमात पाडतात. जी थोडीशी भटकंती केली ती गडांवर आणि काही शहरात .
गड भटकताना गडावर त्या ठिकाणीच पावित्र्य न जपणारे बेजबाबदार लोक सोडले तर बहुतांश ठिकाणी गड पायथ्याशी असणारे गावकरी सज्जन,प्रेमळ च भेटले. काही लोक गडावर येणाऱ्या लोकांच्या खाण्याची रहाण्याची सोय उदरनिर्वाहा करता करतात.पण व्यवहार जपून ही अधिकच अगत्य इतकं दाखवतात कि ऐतिहासिक वास्तू इतकच त्या लोकांकरिता  त्या ठिकाणी परत जावंसं वाटत रहात.
कोल्हापूर आणि बडोदा हि मला आवडलेली ठिकाण .तिथल्या इतर प्रसिद्ध गोष्टीं पेक्ष्या लोकांच्या वागणुकीमुळे. पैकी बडोद्यात तर जाऊन स्थायिक व्हावं अस मनात आहे.
का ? तर,
तिथले लोक वागताना अतिशय सौजन्याने वागले असा अनुभव.रोजच्या व्यवहारात कुठं राग ,चिडचिड नाही.आवो भाई म्हणून स्वागत करतील.कंडक्टर प्रवासी लोकांशी सौजन्य सप्ताह नसताना सौजन्याने वागतो. जुन्या फाटक्या नोटा प्लास्टिक च्या छोट्या पिशवीत घालून एका आजीने दिल्यानंतर त्या स्वीकारताना पाह्यला जुनागड गिरनार ला जाताना.शेजारी प्रेमानं वागताना पाह्यलं.परवाच बसने गेलो.उतरायचं ठिकाण मला माहित नव्हतं.भावाचा फोन आला ,कुठं उतरवतोय विचार ?त्याला फोन जोडून दिला ड्राईव्हर सोबत.ड्रायव्हर न सांगितलं चकली सर्कल.भाऊ म्हणला,जमत असेल तर गोत्री जवळ उतरवून दे मला आणायला जवळ पडेल.यावर ड्रायव्हर आपुलकीनं म्हणला,जो भाई मारी 3 सीट खाली छे. ए जो ना भराय न त्यारे भाई ने गोत्री उतारी देऊ छु.
जो न जमतु होय तो सारू .फोन करीन जणावसो मारे तो हूं त्या आवि जाऊ अने लेवा.
फिकर नही करता भाई आऊ छु चालो तमारा भाईन लैने गोत्री.एक लेफ्ट मारवी पडशे खरी मारे पण आऊ छु हं.
अस आऊट ऑफ द वे जाऊन मला घराजवळ उतरवलंन.परत उतरताना,जय श्रीकृष्ण हं भाई,अवजो हा फरी थी. म्हणून मला निरोप ही दिलन प्रेमानं.
आत्ता येताना ही गाडी बुकिंग वेळी ठरल्या वेळे आधी 2 तास आली. फोन आला,कुठं आहात साहेब गाडी येऊन राह्यलीय.म्हटलं बुकिंग केलं तर 12 च टाईम होत तुम्ही 2 तास आधी कस येता ?भावानं फोन घेतला न तेच पुन्हा शांतपणे सांगितलं.तो म्हणला, ऑफिस वाल्यांचा काहीतरी गोंधळ झाला बहुतेक पण गाडी तुमच्या करता थांबलीय. भाऊ म्हणला,जाऊ नका मी येतोय घेऊन भावाला.तर तो ही म्हणला ,या सर घाई करू नका थांबतो तुमच्या करता.
मी मुंबईकर, टाईम दिल न आधी गाडी कशी येते ? म्हणून डोकं फिरलं.पण भाऊ बडोदेकर.शांतपणे म्हणला,अरे होत असं कधी कधी.ऑफिसमध्ये घोळ असेल काहीतरी झालेला. किंवा काल आपण बुक केली सीट तेंव्हा फक्त तुझंच बुकिंग होत बाकी गाडी खाली होती.अमदाबाद वरून बुकिंग नसेल तर त्यांनी दुसऱ्या गाडीत सोय केली असेल.चल जाऊ आपण.त्यानं हायवे ला आणलं.गाडी आली.मी त्या माणसाला म्हणलो,तुम्ही टाईम 12 च दिल न 2 तास आधी आलात आमची धावपळ झाली.
तो शांत पण म्हणला, भाई कुछ गडबड हुई खरी.ऑफिसमध्ये लोकांनी चुकून दिली असेल वेळ
सॉरी हं.
मग शांतपणे विचार केला,ज्या करता बडोदा आवडलं त्याच उदाहरण भावानं शांतपणे वागून दिल कि! मग मी ही त्या अटेंडन्ट ला म्हणलो,जाने दो चलो.सोपारा फाटा उतारदो. तो ही मंद हसत म्हणला,हा भाई.
तर असा अनुभव.कुठं घाई गडबड, राग,चिडचिड नाही.
अर्थात तिकडं अस काही शंभर टक्के असेलच असे नाही,पण मला आलेले अनुभव चांगलेच होते.मामा कुणा कुणाकडे नेत होता. हा माझा भाचा आहे.तबला शिकवतो.त्याला इकडं आणायचा विचार आहे माझा.यावर ते लोक म्हणत,जरूर या.इकडं असे लोक हवेच आहेत आम्हाला.आमच्याकडुन होईल ते नक्की करू.काही ना काही होईलच जरूर या.
बाकी रस्ते उत्तम नी प्रशस्त.खाण्यापिण्याच्या मुबलक जागा.फूड कोर्ट कल्पना उत्तम राबवली जातेय.
एकूण बडोदा अनुभवायला हवं असं शहर.
कोल्हापूर विषयी पुन्हा लिहिन.
तो वर भटकत रहा.मजा येते.नवी ठिकाण आणि त्या ही पेक्षा माणसं अनुभवायला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा