मंगळवार, ९ जून, २०२०

मालक

-----: *घराचा मालक*:-----
माझं निरीक्षण या बाबतीत सांगतो बघा तुम्हाला पटत का.
मालकाच्या नावाची पाटी दारा बाहेर, घरावर आणि सरकारी कागदोपत्री नोंद राखून असते.
पण त्या वास्तू चा खरा मालक तो असतो का?
माझ्या मते बरेचदा नाही.का?तर मी माझं मत सांगतो.
एखाद्या घरी आपण गेलं तर त्या वास्तू च आणि घरात रहाणाऱ्या लोकांचं नीट निरीक्षण करा.
घरात जास्त वस्तू,सामान कुणाच आहे?एक कुणीतरी जे बोलतो ते इतर मुकाट ऐकतात.तो एक कुणी जनरली बोलताना त्याचा अधिकार बोलण्यातून दर्शवत असतो.त्याची हालचाल देखील बेपर्वा असते.तो हजर नसला तरी त्याची दहशत तिथल्या लोकांचं मन व्यापून असते.हे नको उचलू त्याला आवडणार नाही.तो नाहीये तोवर करून घे.त्याच्या येण्याची चाहूल सारखी घेतली जाते.हळू बोल तो/ती झोपलाय न.
आत्ता फोनवर बोलत बसू नको यायची वेळ झालीय.ते उचलून ठेव त्यानं बघितलन तर पंचाईत होईल.
एकूण तो,हजर असला किंवा नसला तरी इतर लोक त्याच्या दहशतीत असतात.जरा नीट बघितलं तर यातली कुठली तरी गोष्ट आपल्याला जाणवते.
मग इथं तो,मालक हा घरचा कर्ता पुरुष अथवा स्त्री असू शकतेच पण काही घरात बिघडलेली कन्या किंवा पुत्र रत्न असू शकतात.
आणि काही ठिकाणी त्या मालकाच्या स्थानी घरात नवीन जन्माला आलेल मूल असू शकत.म्हणून मग ,तो आताच झोपलाय उठेल हं तो हळू बोल.
त्याची खेळणी जागेवर ठेव नाही मिळालं तर घर डोक्यावर घेईल रडून.नुकतच विसरत जातोय तर त्याच्या हाती परत मोबाईल नको देऊ.
पहिल्या प्रकारात मालकाची दहशत आणि एकाधिकार शाही दिसते.
दुसऱ्या प्रकारात त्याच मालकत्व आनंदाने स्वीकारलेलं असत.
मग असत कि नाही मी म्हणलो तस.दारावर पाटी कुणाची आहे हे बघून मालक तोच असेल अस आपण धरून चालतो.पण ती पाटी इतकंच सांगते सरकार दरबारी या वास्तूची नोंद कुणाच्या नावे आहे.मग पाटी पुरुषाच्या नावे असली तरी आत सत्ता मुलाची किंवा बायकोची च चालते.पाटी बायकोच्या नावाची असली तरी घरात दरारा नवऱ्याचाच असतो.आणि नवा संसार असलेले दोघांच्या नावाने पाटी लावतात अगदी रोमन अँटिक पद्धतीत हिंदी फ्लिम स्टाईल,घर अमर मानसी का,,,,वग्रे.पण नव्याने आगमन झालेलं चिमुकल बाळ त्या दोघांवर हुकूमत गाजवून असत.अर्थात हि हुकमत प्रेमाने स्वीकारलेली असते.पालक म्हणून.
बरेच ठिकाणी खऱ्या मालकांबद्दल आदरयुक्त भीती असते.जी उत्तम.
आणि ते काहीही असलं तरी मालकाने कधीही त्या दारावरील आपल्या नावाच्या पाटीचा अहंकार करूच नये.तो सोडला तर ती वास्तू सर्वांची होते.अन्यथा त्या मालकाचा तो कैद खाना होतो.आणि तिथं रहाणारे वेळ येताच त्या कैदेतून आपली सुटका करून घेण्याचे प्रयत्न करतात.काही त्यात यशस्वी हि होतात.मग उरतात त्या फक्त चार भिंती आणि छप्पर आणि त्यात तो सो कॉलड मालक.
त्यानं हे नक्की मनावर ठसवून घ्यावं कि उगा छाती फुगवण्यात अर्थ नाही. किती मी मी म्हटलं तरी जे काही नावावर आहे अस वाटतं ते हुकूम होता क्षणी जिथं आहे जस आहे तसेच सोडून त्याच बोट धरून निघून जायचय.
मग तोवर त्या वास्तूत मालक होऊन तिचा कैद खाना करण्या पेक्ष्या घर का करू नये???
आणि अशी खऱ्या अर्थाने घराला घरपण देणारी मालक आणि इतर सदस्य मंडळी मी खूप बघितली आहेत.त्या करता dsk लागत नाहीत.
पण काही घर ती सुद्धा बऱ्याच प्रमाणात मी वर म्हटल्या प्रमाणे जो कुणी असेल मालक त्याचा कैद खाना असलेली हि बघितलीयत.
आता कुठं गेलात तर किंवा आत्ता वाचलीत पोस्ट कि नेहमी बघण्यात असलेली घर आठवा आणि ठरवा किती घर घरपण राखून आहेत.
काही घरात दहशत इतकी असते कि तो मालक आणि त्याचे कैदी वास्तू ची वस्तुस्थिती बेमालूम लपवून मालक गिरी आणि गुलाम गिरी बाळगून असतात.अशी घर पूर्णपणे काल बाह्य होवोत अशीच शुभेच्छा.
एक वेगळा विचार मनात आला तो मांडला.🙏🏻

गुरुवार, २ एप्रिल, २०२०

कृष्णाप्पा

आमचे कृष्णाप्पा आठवले.70च वय.वरच्या बांधण वरून येत .म्हणजे चांगलं चार पाच किमी चालून.जुन्या फॅशन चा सदरा. धोतर.हातात काठी.डोईवर गांधी टोपी.तांबूस होत पोहोचे पर्यंत.गोरे होते न.काठी शिवाय हाती दोन शिसे भरलेले असत.आणि त्यांना सुतळीने गाठ मारून हातात धरायची सोय केलेली असे.शिसे बुचाने बंद केलेले असत.खनन आवाज करत ते दोन्ही शिसे झोपाळ्यावर बसताना जमिनीवर ठेवत.हुश्श असा आवाज करून टोपी काढून मांडीवर ठेवत.
एकदा मी त्यांना येताना बघून आधीच आत जाऊन पाणी आणून दिलं. अप्पा फुलपात्रात पाणी ओतून ते परत झोपाळ्यावर ठेवत मला म्हणले,हं.काय तुझं नाव ते,पाणी न मागता आणलंस ते चांगलय. पण सोबत गुळाची वाटी द्यायची शिकवलन नाही का तुझ्या आयशीन.
मी पळत स्वयंपाक घरात गेलो.आजीने गूळ वाटीत टाकून तयार ठेवला होता.गधड्या मला म्हणायच होतंस अप्पा आलेत म्हणून.ते जुन्या वळणाचे आहेत.गूळ पाणी देतात पाहुण्याला आधी.जा नेऊन दे वाटी.मग त्यांना वाटी नेऊन दिली.
हं,आता कसं. अरे मुंबईकरा हि रीत आहे आपली.लक्ष्यात ठेव.अस बाहेरून आलं कि पाणी उभ्या उभ्या प्यायचं नाही.आधी नीट बसावं.मग गुळाचा खडा तोंडात धरावा.मग पाणी घोट घोट प्यावं. आता हे शिसे आत नेऊन दे.आणि जपून ठेवायला सांग.मला परत लागतील ते.मागील खेपी तुझ्या आत्या बाईन एक फोडलन होतन.
ते ज्याला शिसा म्हणत ती काचेची बाटली मी नीट बघितली.हिरव्या रंगांची वर बूच बसवलेली आणि आत ओवा अर्क.
असे आमचे कृष्णाप्पा. दरवर्षी न चुकता तो ओवा अर्क घेऊन येत.तात्या पैसे देत.मग जरा गप्पा मारून परत जात.मितभाषी माणूस.ते रहात ते ठिकाण न घर खूप लांब होत गावापासून वेगळं अस.
मग त्यांच्या घरी आईला हळद कुंकूवास बोलवण आलं म्हणून सोबत गेलो होतो.मोठं आवारात घर होत.प्रशस्त अंगणी. गोठा. चाऱ्याचा साठा ठेवायला जागा बघून मस्त वाटलं.घरा मागे ओढा होता तो मे पर्यंत वहात असे.पण आजूबाजूला वस्ती नव्हती.दोन नोकर वस्तीस असत.झक्क बाजणारी आंब्याची झाड होती.आधी कातकरी आधी आंबे,फणस आणि बांबू चोरायला येत.पण कृष्णाप्पा खमके होते.हाती काठी न विजेरी घेऊन रात्री त्यांचा पाठलाग दूरवर करीत.सोबत त्यांचा गावठी कुत्रा हि असे.मग कातोडी समजले. बामण ऐकत नाय.मग चोऱ्या थांबल्या.कृष्णाप्पा चा मुलगा त्यांच्या सारखाच धीट.नोकरीत देखील होता कुठंतरी.एक दिवस सुट्टीत आलेला असता जनावर निघालं म्हटल्यावर खोचेरा घेऊन निघाला.जनावर चपळ निघालं.त्याला डसून पळू लागलं. मला डसून जाशील तसाच?म्हणत तो त्याही अवस्थेत त्याच्या मागे गवतात घुसला.जनावर मारलन न परत घरी आला.पण तोवर विष भिनल आणि गेला.
मग अप्पा आणि सुनबाई ,नातवंड राहिली फक्त.आधीच अबोल असलेला म्हातारा आणखी अबोल झाला.
एकदा मी असताना ते आले. मागची आठवण ठेऊन त्यांना गूळ पाणी नेऊन दिलं.तेंव्हा मात्र,आयुष्यमान भव. बाळ चा थोरला न रे तू?
हो.
रित बरी लावलीन आहे आईन .घे ते शिसे नेऊन दे घरात न सांडता.आणि म्हणावं पुढील वर्षी काही अर्क मिळणार नाही.अजून हवे असतील तर उदईक घरी येऊन घेऊन जा.
न राहवून मी म्हणलो,
अस का म्हणता अप्पा. तुमचा ओवा अर्क आम्ही पण नेतो मुंबईला.मला आवडतो.तिथं मिळतो पण तुमच्या सारखा नसतो.
थोडं हसून म्हणले,अरे तो अर्क आवडतो काय म्हणतायस.ते औषध आहे.आणि मी काही धंदा म्हणून करत नाही.तुमचे आमचे जुने समंध आहेत म्हणून मी घराकर्ता करतो तेंव्हा तुमच्या सारख्या आणखी एक दोन घरी द्यायला करतो.आता मात्र थकलोय.तो उपद्व्याप आता जमेलस वाटत नाही.आणि इथवर येताना अलीकडं धाप हि लागू लागलेय म्हणून म्हटलं हा बहुतेक माझ्या कडून शेवटचा अर्क.
आणि ते खरं हि झालं.अप्पा गेले काही दिवसात.पण त्यांचा ओवा अर्क त्याच्या ठसक्या सह आणि उग्र पण खमंग वासा सह अजून तसाच्या तस्सा आठवणीत आहे.

बुधवार, ८ जानेवारी, २०२०

बाल भारतीतला भैरू.

पहाट झाली. मी उठलो. ब्रश करून चहा घेतला. मोबल्या काढून वर काय ,बघू लागलो. (व्हाट्सप च मराठी भाषांतर:-वर काय
)
अरेच्या रात्री मस्त मैफल जमली होती तर? मग पोस्टवून प्रभात फेरीस निघालो.


भैरू आठवला का बाल भारतीतला बालक विहाऱ्यांनो? तो भैरू आता रिटायर्ड होऊन कैक वर्ष झाली असतील. कदाचित, त्याच्या मुलांची लग्न झाली असतील. मग दोन सुनांमध्ये,भला उसके पास मुझसे अच्छी साडी क्यो?असा प्रश्न उभा राहिला असेल. मग भैरू च्या मुलांची गोची झाली असेल.त्यांनी भैरू कडे वाटणी मागितली.भैरूने नाईलाजाने जमिनीची वाटणी करून घर तीन हिश्यात वाटून एक घराची तीन वेगळी घर केली असतील.तुम्हाला वाटणी दिली पण मी माझा नांगर मात्र माझ्याकडे ठेवणार कारण तो माझा ट्रेड मार्क आहे.त्या मूळच आजचा प्रौढ वर्ग मला ओळखतो.
मुलं म्हणली असतील ठेवा बाबा. तुमच्या मनासारखं होऊ दे. नाहीतरी जमीन राहिलीय कुठं. आम्ही ती विकून बंगले बांधले, गाडी घेतलीय. या घरातील हिश्यात आलेल्या रूम भाड्यावर दिल्यात.
किंवा
 भैरू आता शेतावर ट्रॅक्टर घेऊन जातो. इस्रायली पद्धतीने हायड्रो फार्मिंग शिकून एक मुलगा आलाय त्यानं शेती आधुनिक पद्धतीनं करणं सुरू केलंय. भरघोस उत्पादन.  ऑरगॅनिक प्रकल्प असल्याने त्यांच्या पिकांना जबरा मागणी आहे. धाकटा मुलगा रत्नांग्री च्या पशु वैद्यकीय कालेजातून डिग्री घेऊन गोधन वाढवतोय. त्याच्या गायीच्या दुधास न तुपास चढा भाव मिळतो. तुपाला तर 2 हजार भाव असून देखील वेटिंग असत. जोड धंदा म्हणून गांडूळ खत, गोमूत्र, शेणी पासून मच्छर मारक औषध अशी प्रोडक्टस ही जोरात विक्री होत्ये. एक सून पशु वैद्यक असल्याने घरचा Dr गुरांना मिळतो आणि आजूबाजूस असलेल्या सर्व गावातील जनावरे तिच्याच अंडर ट्रिटमेंट घेऊन मस्त असतात. दुसरी सून स्वखुशीने घर सांभाळते. तिच्या हाताखालील टीम घर आणि शेत दोन्हीकडच्या भोजन आदी ची व्यवस्था बघतेच पण ती इतर खाद्य पदार्थ तयार करून विकते ज्याला चांगली डिमांड आहे. शेतातील आंबे,फणस,आवळा,जांभूळ, केळी वग्रे फळांची वेगवेगळी उत्पादने करून ती उत्तम नफ्यात विकली जातायत. तिची आणखी एक टीम बाहेरची लग्न मुंजीची ची ऑर्डर घेऊन कॅटरिंग व्यवसाय जोरात सुरुय. नातवंडे इंग्रजी शाळेत शिकतात.
आणि भैरू आणि त्याची बायको अत्यंत समाधानाने हा सगळा व्यवहार भरल्या हृदयी पहात शेतातल्या स्वतः च्या विठुरायाच्या मंदिरात हात जोडत असतात. तिथं नेमाने किर्तन प्रवचन सुरू असतं आणि गाव दर्शनास येत असत.
आणखीन तिथं गेलात ,तर विस्तीर्ण गेट वर पाटी दिसते. भैरू फार्म हाऊस!!! पुढं आलात की गोल आयलंड मध्ये सुबक गार्डन फुललेली असून मध्यभागी तोच जो तुम्हाला आठवतो तो भैरूचा प्रसिद्ध आणि तुमच बालमन व्यापून राहिलेला नांगर त्यांच्या फार्म चा ट्रेड मार्क म्हणून तिथं कायमचा दिमाखात विराजमान झालेला दिसेल. दोन पैकी तुम्हाला आवडेल तो भैरू तुम्ही आपला मानून घ्या. मी निघतो प्रभात फेरीस। दिवस आनंदी जावो। 

सलील जोशी।

रविवार, २९ डिसेंबर, २०१९

*अभ्रक!*
याला मायका म्हणतात.इस्त्री बिघडली कि कुणी बघितलं असेल कॉईल बदलताना तर मायका दिसला असेल.दोन मायका च्या लेअर मधून कॉईल गेलेली असते.ती कॉईल हिट होते ज्याने इस्त्री गरम होते.इथं मायका इन्सुलेटर म्हणून काम करतो.
या गोष्टीची माझी ओळख झाली ती बाबांच्या गणपती च्या कारखान्यात. तिथं मूर्तीस चकाकी देण्या करता याचा उपयोग करतात.हा मायका खनिज पदार्थ आहे.याचे तुकडे भूगर्भात मिळतात.पारदर्शक असतात.ते आम्ही धुवून भिजत ठेवत असू.मग मऊ झाले कि भाताच्या तुसात एका फडक्यात घालून पाणी लावत घासत बसलं कि पाण्यात या मायकाची वस्त्र गाळ पावडर उतरते.हे द्रावण मग थोडं गम घालून तयार मूर्तीवर स्प्रे केलं कि मूर्तीला नैसर्गिक चमक येते.पण अति कौशल्याने आणि योग्य प्रमाणात झालं पाह्यजे. गणपती जरा घाम आल्या सारखाही वाटतो मग.आणि चमक अतिशय सुंदर दिसते.तयार पूड मध्ये हे साधत नाही.
आज मुद्दाम हा विषय लिहायच कारण एक माहितीपट.जो एका विदेशी महिलेने तयार केला होता.तिला मायका सौंदर्य प्रसाधनात सर्रास वापरला जातो हे कळलं.ज्या मूळ चकाकी येते जिथं लावला जातो त्या भागावर.सोबत हे हि कळलं कि याची आयत मुख्यत्वेकरून भारतातून होते.आणि या कामात लहान मुलांना कामगार म्हणून वापरलं जातं.मग ती इकडं आली. बिहार झारखंडमध्ये याच्या खाणी आहेत हे कळलं.मग थेट तिथं गेली.चित्रफीत बघितली मी.
तिथं गरीबी खूप आहे.त्या मूळ या खाणीत काम करतात त्या 4/5 ते 14/15वर्ष्याच्या मुली आणि काही मुलं हि. गावाबाहेर किंवा कुणाच्या घर वा गोठ्या खाली खूप घुशी ची बीळ होतात तेंव्हा आदिवासी लोक बोलावून त्यांना त्या घुशीना हुसकवण्याचं काम दिलं जात.ते धूर करून घुशी बाहेर काढून मारतात आणि खायला नेतात.तर ती बीळ असतात तश्या त्या खाणी वाटल्या.त्या चिमुकल्या मुली जमीन खणत खड्डा करत जातात भूगर्भात.आत मायका मिळेल तस खणत भुयार तयार होत. आतली माती घमेल्यात भरून बाहेर आणतात.तिथं ती चाळणी वर टाकून मायका वेगळा केला जातो.आत कुठंही आधार केला जात नाही माती ढसू नये म्हणून.अपघात होत असतात.मुली मातीत गाडल्या जातात.खाणी पासून जवळ विट भट्टी आहे तिथं त्यांचे आई बाप काम करत असतात.तेच येऊन मग अश्या वेळी त्यांना आतून काढतात.एकिला विचारलं हे नको वाटत का?यावर ती छोटी म्हणली,मग खाऊ कसं?
आता तिथं त्यांच्यातली एक छोटी मुलगी त्यांना अक्षर शिकवते.एक स्वयंसेवी संस्था काम करतेय तिथं.पण त्या पोरींचे बालपण अश्या धोकादायक मजुरीतच सुरू होतय. आणि हा असा मिळवलेला मायका मग मोठं मोठ्या सौंदर्य पसाधन तयार करणाऱ्या कंपन्या विकत घेतात.आता विदेशात या बाबत जागरूकता तयार होत्येय.काही कंपनीच्या धोरणात बदल होऊन त्या कंपनी आता या नैसर्गिक मायका ऐवजी सिंथेटिक मायका वापरू लागल्यात या बाल मजुरी मूळ.
सहज कळलं पण बघून मन उदास झालं.मागे ब्लड डायमंड बघून असच वाटलं.कुणी महागडा हिरा फुकट दिला तरी नको वाटलं तिथं हिऱ्या च्या खाणीतले अत्याचार बघून.

शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१९

पितरास एक पत्र.

माननीय पितर गण,
विनंती न लिहिण्यास कारण कि,

पत्रिकेत पितृदोष आहे.शांती करून घ्या.
अस वारंवार ऐकतो.आपले म्हणे मृत पूर्वज आपल्याला त्रास देत असतात.अकाली निधन,अविवाहित असता निधन,कुणी कर्ज न फेडता गेला, कुणी चोरी केली,कुणी कुणास मारहाण केली,फसवणूक केली असेल,कुणी कसली इच्छा पूर्ण न होता गेला,कुणाचा आपल्यावर राग असतो पण बोलून दाखवली नसत आपल्या पूर्वजांनी तर तो दोष म्हणे आपल्यास लागतो.
एक तर आमचे तुम्ही पारंपरिक घरातले लोक. मग आपल्याच खानदानात जन्माला आलेल्या जातकास कसला त्रास देता?तुम्हाला काही आपुलकीची वग्रे भावना दाटून येत कशी नाही.तुमच्या जीवनात काही अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत किंवा तुम्हास करता आल्या नाहीत यात आम्हा नवजात लोक्स चा काय दोष? मी तर म्हणतो हे अस अपेक्षा भंग तुम्ही अनुभवलेत मग उलटपक्षी आम्हाला आमच्या अपेक्षा पूर्ण करायला मदत करा न.हे कसं बॉ चिवित्र वागणं तुमच.आमचं भल नाही न झालं म खानदानात कुणाच भल होऊ देणार नाही हि आपल्याच लोकांशी कसली दुष्मनी करता राव? त्या पेक्ष्या आपल्या खानदानाचे कुणी दुष्मन असतील त्यांना जाऊन छळा न!किंवा तुम्हाला ज्याने त्रास दिला त्यालाच पकडून धडा शिकवा.बरं आम्ही आमच्या परीने तुम्ही गेल्यावर श्राद्ध कर्म केलं न परवडत नसलं तरी?म आमची चूक कसली आली?आम्हाला का उगा छळतायत.त्या पेक्ष्या कुणी निर्धन असेल त्याला संपत्ती मिळवून द्या.निपुत्रिक असेल त्याला पुत्र किंवा कन्या रत्न प्रदान करा.कुणी अविवाहित असेल त्याच्या करता ग्यारेंटेड योग्य स्थळ जमवून द्या.मग बघा तुमची पुढली पिढी कशी सुखात नांदते आणि तुम्हास पूजितें का नाही ते.बाबांनो इहलोकी सर्व भोग बघूनही तुम्हास या लोकीची ओढ का अजून? बक अप भिडू.पुढच्या प्रवासास लागा. त्या करता आम्ही काही करावं याची वाट का बघता?मग तुम्हास या जन्मी जिवंत असताना काही करणं जमलं नाही तेच त्या जन्मात किंवा अवस्थेत टिकून आहे.म तुमचा नाकर्तेपणा कि आमचा?आमच्या जीवनात काही भली भर घालू शकत नसाल तर चैला अडचणी तरी निर्माण करू नका.या तुमच्या वागण्यान मला आता एक प्रश्न उगा कारण नसताना पडून राह्यलाय.तो असा,
तुमची भडास काढायला आम्ही तुम्हाला आयते सापडलो.पण तुम्ही आमची गोची करून ठेवलीय याची कल्पना आहे का तुम्हाला?
कशी? आता ते हि ईस्कटून सांगतो. मी पण मनात म्हटलं कि, आम्हास जरा पितृ दोष लागलाय तसा मी पण कुणाला लावून देईन.पण चैला आहे कोण ? कोणाला देऊ हा तुमचा वसा?उतत नाही मातत नाही पण तुम्ही दिला वसा घ्यायला कुणी उरलाच नाही!!!!
तेंव्हा एक रिक्वेस्ट तुम्हास.मी काय म्हटलं ते विचारात घ्या आणि शहाण्या सारखे वागा बघू.
मग पितृपक्षात तुम्हाला सजवलेली थाळी प्रेमान ठेवता बघा.
समस्त पितृ देवो भ्यो नमः🙏🏻🌹

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१९

आठवणीतली गाणी.

या शांत वेळेस सांजवत असताना अचानक काही आठवणीतली गाणी मनात वाजू लागतात.त्यातलं अमर प्रेम मधलं रैना बीती जाये, आठवलं.
मलमली तारुण्य आठवलं.
लगेच सलामे इश्क मेरी जां आठवलं.
साला म्हटलं अस का झालं?तर प्रसंग आणि तो जिथं घडतोय ती जागा आणि पात्रांची मनोवस्था एकच आहे.त्याचा परिणाम देखील एकच आहे.हे लक्षात आलं कधी तुमच्या ?
प्रत्येक गाण्यात स्वतः ची खासियत आणि ओळख आहे.
रैना बीती जाये मध्ये राजेश खन्ना बायको असून नसल्या सारखा आहे.मलमली तारुण्य मध्ये अरुण सरनाईक तश्याच अवस्थेत.आणि सिकंदर देखील त्याच पठडीत मोडतोय.
हे नायक एकटेपणा बोचत असलेले आहेत.अश्या वेळी त्यांना कुणी टांगेवाला,ओम प्रकाश आणि प्यारेलाल गम गलत करने कोठीवर गाणं ऐकायला घेऊन आलाय.नायकच दुःख विसरून जावं म्हणून.
त्यात राजेश खन्ना नुसते सूर ऐकून वर खेचून आणल्या सारखा आलाय.आप रुक क्यो गयी गाइये न म्हणत गाणं रसिकतेने ऐकतो.नशेत असला तरी जाताना गायिकेच नाव विचारतोय.तिनं पुष्पा नाव आहे म्हटल्यावर त्याच्या तोंडून पटकन जात,मीरा होना चाहीये.इथं त्याचा वैचारिक दर्जा समजतो.अय्याशी करायला आलेला सामान्य ग्राहक नसून हि काही और चीज आहे हे त्या नायिकेला जाणवत.प्यारेलाल आणि सिकंदर जायला निघतात न जोहरा प्यारेलाल ला थांबवून विचारते,कोन है ये साहब?
हमारे दोस्त है नाम सिकंदर है.यावर जोहराची अफलातून कमेन्ट,यहा लोग चोट खा कर आते है.ये पेहले शख्स है जो चोट दे कर जा रहे है.अब इस कोठे के दरवाजे खुलेंगे तो सिर्फ इनके लिये.प्यारेलाल चाट पडतो.सिकंदर ला म्हणतो,अमा हम तो तुम्हे समुंदर मे डुबाने लाये थे तुम तो समुंदर पी कर निकले.
सिकंदर म्हणतो,वो ऐसा है.हम अपने गम मे इतने डूबे है के हम पर हमदर्दी कि नजर डालनेवाला खुद हमारे गम मे डूब जाता है.
आणि एक गाणं ज्यात संगीत विषय आहे.
प्रेम नगर च गाणं. हेमा मालिनी श्रीमंती महालात आहे.तिथं सर्वत्र श्रीमंती तर झळकते आहेच पण संगीत शोभेच्या वस्तू म्हणून मांडून ठेवलेल्या आहेत अस तिला जाणवतंय.मग,
ये कैसा सूर मंदिर है
जीसमे संगीत नही
गीत लिखे दिवारो पे
गाने कि रीत नही
अशी तिखट टीका श्रीमंती हुच्चभ्रु महालात करतेय.आम्ही उच्च अभिरुची राखून आहोत याच फक्त प्रदर्शन पण समज कसलीच नाही राहणार्यांना.
हाच धागा त्या वरच्या गाण्यात आहे.तिथं हि गाणं बजावणेच चालत पण रसिक मात्र भाग्यानेच एखादा येतो आणि जिंकून जातो गाणाऱ्याचे मन.
थोर लोक होती ज्यांनी हे सगळं निर्माण केलं आणि आपल्या पर्यंत पोहोचवलं.
कितीही वर्ष ऐकल तरी मन तृप्त होत नाही आणि तरीही ती गाणी ऐकली कि तृप्ती जाणवते.

सोमवार, २८ ऑक्टोबर, २०१९

दिवाळी

आज संध्याकाळी एक स्टुडंन्ट चा फोन आला,सर मी येतोय सहकुटुंब भेटायला.मग दूध आणायला खाली उतरलो.पोर खेळत होती.सर्वांनी दारात रांगोळ्या काढलेल्या ,रोषणाई केलेली बघून मस्त वाटलं.समोरून मुलं सुसाट सायकली फिरवत येत होती त्यांना चुकवत पुढं जाऊ लागलो.अचानक मागून हाक आली, ए काका तू हे चॉकलेट घे हं!चैला कोण हाक मारतय म्हणून बघितलं वळून.एक सायकल थांबवून उभी राहिलेली मुलगी हातात चॉकलेट घेऊन उभी होती.
कुणाला म्हणलीस?
अरे तुला तुलाच.
अग नको मला तूच खा ते.विचारल्स त्या बद्दल थांक्यू.
नाही  नाही तू घे हे.
बाळा खरच नकोय मला तू खा.उलट तुला कुठलं चॉकलेट हवंय सांग मी घेऊन येतो.
नाही हे तू घे आणि खाऊन टाक. ये न.
चैला मी त्या पोरीला ओळ्खतही नाही.ब्लॉक 60/65आहेत त्यात प्रत्येकाशी ओळख नाहीये आणि काही भाडेकरू हि येत जात असतात.मग ती अनोळखी मुलगी कोण होती आणि नेमकं मलाच हाक मारून चॉकलेट का दिलन? कळलं नाही.
पण मग खूप छान वाटलं.सरळ तिचं म्हणणं शहाण्या मुलासारखं ऐकल आणि चॉकलेट घेतलं.
दिवाळीची सर्वात बेस्ट भेट मिळाली नशिबाने.लहान लेकरांना स्वार्थाचं वग्रे वार शिवलेलं हि नसत.त्या मूळ एक जुनी आठवण जागी झाली.
फारा वर्ष्या पूर्वी मी मुंबईत जात होतो ट्रेन न.समोर एक कुटुंब बसल होत.आई,बाबा आणि एक छोटं बाळ.शेवटच्या सीट वर एक दाढीधारी साधू बसला होता.मी पुस्तक वाचत होतो.अचानक त्या मुलाने पुस्तकाला हात लावला.मी बघितलं आणि तो गालात खुदकन हसला.मग त्याने तस आणि दोन चार वेळा केलन.त्याची आई म्हणली,अगो बाई कसा हसतोय बघा जस ओळखच कुणी आहे.त्यावर तो साधू म्हणला,बेटा तू खूष हो ले आज.ये मासुम बच्चा 'तेरी तरफ देख के जो हसा वो सबके नसीब मे नही होता.समझले भगवान ने हस दिया हो 'तेरी तरफ देख के.
आज तो साधू परत आठवला.
हॅप्पी दिवाळी झाली आमची.दुसरं गिफ्ट तो स्टुडंन्ट सह परिवार आला भेटायला आठवणीने.
दिवाळी साजरी व्हायला अजून काय हवं?