शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१९

आठवणीतली गाणी.

या शांत वेळेस सांजवत असताना अचानक काही आठवणीतली गाणी मनात वाजू लागतात.त्यातलं अमर प्रेम मधलं रैना बीती जाये, आठवलं.
मलमली तारुण्य आठवलं.
लगेच सलामे इश्क मेरी जां आठवलं.
साला म्हटलं अस का झालं?तर प्रसंग आणि तो जिथं घडतोय ती जागा आणि पात्रांची मनोवस्था एकच आहे.त्याचा परिणाम देखील एकच आहे.हे लक्षात आलं कधी तुमच्या ?
प्रत्येक गाण्यात स्वतः ची खासियत आणि ओळख आहे.
रैना बीती जाये मध्ये राजेश खन्ना बायको असून नसल्या सारखा आहे.मलमली तारुण्य मध्ये अरुण सरनाईक तश्याच अवस्थेत.आणि सिकंदर देखील त्याच पठडीत मोडतोय.
हे नायक एकटेपणा बोचत असलेले आहेत.अश्या वेळी त्यांना कुणी टांगेवाला,ओम प्रकाश आणि प्यारेलाल गम गलत करने कोठीवर गाणं ऐकायला घेऊन आलाय.नायकच दुःख विसरून जावं म्हणून.
त्यात राजेश खन्ना नुसते सूर ऐकून वर खेचून आणल्या सारखा आलाय.आप रुक क्यो गयी गाइये न म्हणत गाणं रसिकतेने ऐकतो.नशेत असला तरी जाताना गायिकेच नाव विचारतोय.तिनं पुष्पा नाव आहे म्हटल्यावर त्याच्या तोंडून पटकन जात,मीरा होना चाहीये.इथं त्याचा वैचारिक दर्जा समजतो.अय्याशी करायला आलेला सामान्य ग्राहक नसून हि काही और चीज आहे हे त्या नायिकेला जाणवत.प्यारेलाल आणि सिकंदर जायला निघतात न जोहरा प्यारेलाल ला थांबवून विचारते,कोन है ये साहब?
हमारे दोस्त है नाम सिकंदर है.यावर जोहराची अफलातून कमेन्ट,यहा लोग चोट खा कर आते है.ये पेहले शख्स है जो चोट दे कर जा रहे है.अब इस कोठे के दरवाजे खुलेंगे तो सिर्फ इनके लिये.प्यारेलाल चाट पडतो.सिकंदर ला म्हणतो,अमा हम तो तुम्हे समुंदर मे डुबाने लाये थे तुम तो समुंदर पी कर निकले.
सिकंदर म्हणतो,वो ऐसा है.हम अपने गम मे इतने डूबे है के हम पर हमदर्दी कि नजर डालनेवाला खुद हमारे गम मे डूब जाता है.
आणि एक गाणं ज्यात संगीत विषय आहे.
प्रेम नगर च गाणं. हेमा मालिनी श्रीमंती महालात आहे.तिथं सर्वत्र श्रीमंती तर झळकते आहेच पण संगीत शोभेच्या वस्तू म्हणून मांडून ठेवलेल्या आहेत अस तिला जाणवतंय.मग,
ये कैसा सूर मंदिर है
जीसमे संगीत नही
गीत लिखे दिवारो पे
गाने कि रीत नही
अशी तिखट टीका श्रीमंती हुच्चभ्रु महालात करतेय.आम्ही उच्च अभिरुची राखून आहोत याच फक्त प्रदर्शन पण समज कसलीच नाही राहणार्यांना.
हाच धागा त्या वरच्या गाण्यात आहे.तिथं हि गाणं बजावणेच चालत पण रसिक मात्र भाग्यानेच एखादा येतो आणि जिंकून जातो गाणाऱ्याचे मन.
थोर लोक होती ज्यांनी हे सगळं निर्माण केलं आणि आपल्या पर्यंत पोहोचवलं.
कितीही वर्ष ऐकल तरी मन तृप्त होत नाही आणि तरीही ती गाणी ऐकली कि तृप्ती जाणवते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा