*अभ्रक!*
याला मायका म्हणतात.इस्त्री बिघडली कि कुणी बघितलं असेल कॉईल बदलताना तर मायका दिसला असेल.दोन मायका च्या लेअर मधून कॉईल गेलेली असते.ती कॉईल हिट होते ज्याने इस्त्री गरम होते.इथं मायका इन्सुलेटर म्हणून काम करतो.
या गोष्टीची माझी ओळख झाली ती बाबांच्या गणपती च्या कारखान्यात. तिथं मूर्तीस चकाकी देण्या करता याचा उपयोग करतात.हा मायका खनिज पदार्थ आहे.याचे तुकडे भूगर्भात मिळतात.पारदर्शक असतात.ते आम्ही धुवून भिजत ठेवत असू.मग मऊ झाले कि भाताच्या तुसात एका फडक्यात घालून पाणी लावत घासत बसलं कि पाण्यात या मायकाची वस्त्र गाळ पावडर उतरते.हे द्रावण मग थोडं गम घालून तयार मूर्तीवर स्प्रे केलं कि मूर्तीला नैसर्गिक चमक येते.पण अति कौशल्याने आणि योग्य प्रमाणात झालं पाह्यजे. गणपती जरा घाम आल्या सारखाही वाटतो मग.आणि चमक अतिशय सुंदर दिसते.तयार पूड मध्ये हे साधत नाही.
आज मुद्दाम हा विषय लिहायच कारण एक माहितीपट.जो एका विदेशी महिलेने तयार केला होता.तिला मायका सौंदर्य प्रसाधनात सर्रास वापरला जातो हे कळलं.ज्या मूळ चकाकी येते जिथं लावला जातो त्या भागावर.सोबत हे हि कळलं कि याची आयत मुख्यत्वेकरून भारतातून होते.आणि या कामात लहान मुलांना कामगार म्हणून वापरलं जातं.मग ती इकडं आली. बिहार झारखंडमध्ये याच्या खाणी आहेत हे कळलं.मग थेट तिथं गेली.चित्रफीत बघितली मी.
तिथं गरीबी खूप आहे.त्या मूळ या खाणीत काम करतात त्या 4/5 ते 14/15वर्ष्याच्या मुली आणि काही मुलं हि. गावाबाहेर किंवा कुणाच्या घर वा गोठ्या खाली खूप घुशी ची बीळ होतात तेंव्हा आदिवासी लोक बोलावून त्यांना त्या घुशीना हुसकवण्याचं काम दिलं जात.ते धूर करून घुशी बाहेर काढून मारतात आणि खायला नेतात.तर ती बीळ असतात तश्या त्या खाणी वाटल्या.त्या चिमुकल्या मुली जमीन खणत खड्डा करत जातात भूगर्भात.आत मायका मिळेल तस खणत भुयार तयार होत. आतली माती घमेल्यात भरून बाहेर आणतात.तिथं ती चाळणी वर टाकून मायका वेगळा केला जातो.आत कुठंही आधार केला जात नाही माती ढसू नये म्हणून.अपघात होत असतात.मुली मातीत गाडल्या जातात.खाणी पासून जवळ विट भट्टी आहे तिथं त्यांचे आई बाप काम करत असतात.तेच येऊन मग अश्या वेळी त्यांना आतून काढतात.एकिला विचारलं हे नको वाटत का?यावर ती छोटी म्हणली,मग खाऊ कसं?
आता तिथं त्यांच्यातली एक छोटी मुलगी त्यांना अक्षर शिकवते.एक स्वयंसेवी संस्था काम करतेय तिथं.पण त्या पोरींचे बालपण अश्या धोकादायक मजुरीतच सुरू होतय. आणि हा असा मिळवलेला मायका मग मोठं मोठ्या सौंदर्य पसाधन तयार करणाऱ्या कंपन्या विकत घेतात.आता विदेशात या बाबत जागरूकता तयार होत्येय.काही कंपनीच्या धोरणात बदल होऊन त्या कंपनी आता या नैसर्गिक मायका ऐवजी सिंथेटिक मायका वापरू लागल्यात या बाल मजुरी मूळ.
सहज कळलं पण बघून मन उदास झालं.मागे ब्लड डायमंड बघून असच वाटलं.कुणी महागडा हिरा फुकट दिला तरी नको वाटलं तिथं हिऱ्या च्या खाणीतले अत्याचार बघून.
याला मायका म्हणतात.इस्त्री बिघडली कि कुणी बघितलं असेल कॉईल बदलताना तर मायका दिसला असेल.दोन मायका च्या लेअर मधून कॉईल गेलेली असते.ती कॉईल हिट होते ज्याने इस्त्री गरम होते.इथं मायका इन्सुलेटर म्हणून काम करतो.
या गोष्टीची माझी ओळख झाली ती बाबांच्या गणपती च्या कारखान्यात. तिथं मूर्तीस चकाकी देण्या करता याचा उपयोग करतात.हा मायका खनिज पदार्थ आहे.याचे तुकडे भूगर्भात मिळतात.पारदर्शक असतात.ते आम्ही धुवून भिजत ठेवत असू.मग मऊ झाले कि भाताच्या तुसात एका फडक्यात घालून पाणी लावत घासत बसलं कि पाण्यात या मायकाची वस्त्र गाळ पावडर उतरते.हे द्रावण मग थोडं गम घालून तयार मूर्तीवर स्प्रे केलं कि मूर्तीला नैसर्गिक चमक येते.पण अति कौशल्याने आणि योग्य प्रमाणात झालं पाह्यजे. गणपती जरा घाम आल्या सारखाही वाटतो मग.आणि चमक अतिशय सुंदर दिसते.तयार पूड मध्ये हे साधत नाही.
आज मुद्दाम हा विषय लिहायच कारण एक माहितीपट.जो एका विदेशी महिलेने तयार केला होता.तिला मायका सौंदर्य प्रसाधनात सर्रास वापरला जातो हे कळलं.ज्या मूळ चकाकी येते जिथं लावला जातो त्या भागावर.सोबत हे हि कळलं कि याची आयत मुख्यत्वेकरून भारतातून होते.आणि या कामात लहान मुलांना कामगार म्हणून वापरलं जातं.मग ती इकडं आली. बिहार झारखंडमध्ये याच्या खाणी आहेत हे कळलं.मग थेट तिथं गेली.चित्रफीत बघितली मी.
तिथं गरीबी खूप आहे.त्या मूळ या खाणीत काम करतात त्या 4/5 ते 14/15वर्ष्याच्या मुली आणि काही मुलं हि. गावाबाहेर किंवा कुणाच्या घर वा गोठ्या खाली खूप घुशी ची बीळ होतात तेंव्हा आदिवासी लोक बोलावून त्यांना त्या घुशीना हुसकवण्याचं काम दिलं जात.ते धूर करून घुशी बाहेर काढून मारतात आणि खायला नेतात.तर ती बीळ असतात तश्या त्या खाणी वाटल्या.त्या चिमुकल्या मुली जमीन खणत खड्डा करत जातात भूगर्भात.आत मायका मिळेल तस खणत भुयार तयार होत. आतली माती घमेल्यात भरून बाहेर आणतात.तिथं ती चाळणी वर टाकून मायका वेगळा केला जातो.आत कुठंही आधार केला जात नाही माती ढसू नये म्हणून.अपघात होत असतात.मुली मातीत गाडल्या जातात.खाणी पासून जवळ विट भट्टी आहे तिथं त्यांचे आई बाप काम करत असतात.तेच येऊन मग अश्या वेळी त्यांना आतून काढतात.एकिला विचारलं हे नको वाटत का?यावर ती छोटी म्हणली,मग खाऊ कसं?
आता तिथं त्यांच्यातली एक छोटी मुलगी त्यांना अक्षर शिकवते.एक स्वयंसेवी संस्था काम करतेय तिथं.पण त्या पोरींचे बालपण अश्या धोकादायक मजुरीतच सुरू होतय. आणि हा असा मिळवलेला मायका मग मोठं मोठ्या सौंदर्य पसाधन तयार करणाऱ्या कंपन्या विकत घेतात.आता विदेशात या बाबत जागरूकता तयार होत्येय.काही कंपनीच्या धोरणात बदल होऊन त्या कंपनी आता या नैसर्गिक मायका ऐवजी सिंथेटिक मायका वापरू लागल्यात या बाल मजुरी मूळ.
सहज कळलं पण बघून मन उदास झालं.मागे ब्लड डायमंड बघून असच वाटलं.कुणी महागडा हिरा फुकट दिला तरी नको वाटलं तिथं हिऱ्या च्या खाणीतले अत्याचार बघून.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा