मंगळवार, १७ एप्रिल, २०१८

पेणचे पोहे

आपण नेहेमी खातो ते पोहे कसे तयार होतात ते पहा . पेण एसटी स्थानकाच्या [ गावातल ] मागे हि गिरण आहे . गिरणीचे मालक कै . ल . के . जोशी . यांनी हि गिरण सुरु केली . पेण मधील बायका यांच्या कडून पोह्याच्या कण्या नेउन पापड करून मुंबईत विकत असत . पेणचे पापड इथून सुरु झाले . आता या गिरणीत सर्व प्रकारची पीठे,पापड,मिरगुंड,तांदूळ . कुरडया . तांदूळ असे अनेक जिन्नस मिळतात . वडीलांचा व्यापार मुलांनी अविरत कष्टाने वाढवून भरभराटीस आणला आहे .




*आणि बदनाम कुत्रा झाला*


माझा आवडता प्राणी.इमानदार शब्दाची मूर्तिमंत आणि जिवन्त व्याख्या. आवड आहे म्हणून त्या विषयी माहिती घेत असतो.नेटवर अचानक एक स्टिंग ऑपरेशन समोर आलं एका चॅनल च.पाकिस्तानी आहे अँकर पण समाजातील अनेक भ्रष्टाचार उघड करत असतो.ARY नाव चॅनल च.त्यांनी शोधलेला हा नवा फ्रॉड बघून चाट पडलो.
पाकिस्तानी सिंध ,पंजाब प्रांतात एक धंदा खूप जोरात आहे.माग काढणारे कुत्रे पैसे घेऊन मागविण्यात येतात. अश्या एजन्सीज खूप आहेत.कार्ड वर सैन्य दल किंवा पोलीस दलाचा लोगो असतो आणि एखादा मेजर हि उच्च पदावर आहे असं लिहिलेलं असत.
तिकडं गावात समजा म्हैस,बकरी किंवा अन्य वस्तूंची चोरी झाली तर या कुत्रे वाल्याना बोलावलं जात.ते 25 ते 50 हजार घेतात. मग आले कि पोलिसां सारखी चवकशी करतात.मग कुत्रा सोडला जातो.कुत्रा गावभर हुंगत एखादया घरात घुसतो आणि खाटेवर जाऊन बसतो.याचा अर्थ चोर त्या घरातून आला होता.मग त्या घरच्यांना गावाबाहेर हाकलून देतात.घर जाळून टाकलं जात.मग दोन्ही कुटुंबात पिढ्यान पिढ्यांच वैर सुरू होत शेकडो खून पडलेत.कारण काय ?तर कुत्रा जाऊन बसला म्हणजे खर आहे.
हे अस कैक वर्ष सुरू होत.अचानक एक माणूस चॅनल वाल्यांकड आला.तो म्हणला हे सगळं खोटं असत.निव्वळ फसवणूक होते आहे.मी ट्रेनर होतो. पण एक निष्पाप कुटुंब बळी पडल आणि मला पश्चाताप होतोय.तुम्ही हे दाखवा म्हणजे थांबेल सगळं थोतांड.
मग त्यांना त्या ट्रेनर न हे कसं केलं जातं ते सांगितलं.त्या चॅनलच्या माणसांनी एका गावातील लोकांना विश्वासात घेतले आणि सापळा रचला.कुत्रेवाले आले.पैसे घेतले.कुणावर संशय आहे विचारलं.नेमका त्या घरात कुत्रा जाऊन बसला.मग तो ट्रेनर पुढं आला आणि त्यानं तो कुत्रा परत हवा तसा चालवून दाखवला.तेंव्हा सगळं पितळ उघडे पडले.त्या लोकांनी गुन्हा कबूल केला.
आता होत काय होत नेमकं?तर,
कुत्रा सोडला कि ट्रेनर ओरडे, चल चल कि कुत्रा पळतो समोर.मग डावी कडे वळायला हवा असेल तर ट्रेनर म्हणतो शाबास शाबास,उजवी कडे ही असाच शब्द ठरलेला असतो.हवा त्या घरात घुसला कि कमांड असते,चल काम कर ,मग कुत्रा जागी च किंवा खाटेवर बसतो.म्हणजे ते घर चोराच ठरत आणि उध्वस्त होत.
अशी कैक घर उध्वस्त झालीत नि शेकडो खून पडून पिढीजात वैर निर्माण झालीत.
यात आणखी वाईट म्हणजे
कुत्रा बिचारा उगाच बदनाम झाला.🐶

युट्युबर

*यू ट्युबर*
जर तुमच्या पाल्यांनी म्हटलं कि, मॉम,डॅड मी यू ट्युबर होणार.
  तर दचकू नका.हे नवीन रोजगाराचे साधन निर्माण झालेल आहे.जर त्याच्याकडं कम्युनिकेशन स्किल आहे,ज्या विषयाचा vlog तो तयार करणार म्हणतोय त्या विषयात त्याला नुसता इंटरेस्ट नसून बऱ्यापैकी ज्ञान आणि अनुभव असेल तर प्रयत्न करून बघ म्हणायला हरकत नाही.
आधी blog होते जिथं तुम्ही लिहू शकत होता. ते आहेत अजूनही ,पण आता हे दृक्श्राव्य माध्यम आलं आहे.काय असत हे ?ज्यांना माहीत नसेल त्यांच्याकरता माहिती देतो.तू नळीवर तुम्ही आपलं चॅनल फुकट उघडू शकता.तिथं तुम्ही तुमचे व्हिडीओ अपलोड करू शकता. यात ते अपलोड होताना कुठल्या सर्च लोकांनी मागितला तर चॅनल च नाव यावं हा पर्याय असतो तो फीलअप करावा.म्हणजे समजा मी तबला अपलोड करतोय तर मला,तबला,तबला लेसन, इंडियन क्लासिकल म्युजिक वग्रे शब्द तिथं भरेन. म्हणजे या शब्दाचा शोध कुणी घेतला कि माझा व्हिडीओ दिसेल सर्च मध्ये.दुसरा मुद्दा असा कायदेशीर आहे कि, तुमचा व्हिडीओ हा तुम्हीच तयार केलेला असावा.म्हणजे रेकॉर्डिंग झालेली गाणी,सिनेमे किंवा त्याची क्लिपिंग त्यात नसावी जेणे करून संमधीत लोक त्यावर आक्षेप घेणार नाहीत.युट्युब हे इतकं कसोशीने पाळत कि समजा तुम्ही ट्रिप ला गेलात तो व्हिडीओ टाकलाय पण त्यात कुठंतरी फिल्म च गाणं वाजतंय कुणीतरी लावलेल्या स्पीकरवर तर तुम्हाला नोटीस मेसेज येतो कॉपी राईट भंग होतोय या मूळ.एकतर ते काढून टाका,अख्खा व्हिडीओ डिलीट करा.किंवा कंपन्या लक्ष ठेऊन असाव्यात.कारण मी नाट्य संगीताचा व्हिडीओ टाकला तेंव्हा मेसेज आला होता पण त्यात हे ही आलं कि कम्पनीला काही ऑब्जेक्शन नाही ठेऊ शकता.
चॅनल च नाव तुम्ही ठेऊ शकता.असे व्हिडीओ काही दिवस निरीक्षण केले जातात.युट्युब मग जर कुणी ऑब्जेक्शन घेत नाही तुमच्यावर याची खात्री झाली कि तुम्हाला जास्त लेंथ चे व्हिडीओ टाकण्यास परवानगी देत.मग तुमचे व्हिडीओ लोक जास्त संख्येने पाहू लागले तर तुम्हाला एक पर्याय उपलब्ध होतो.त्यात जाहिराती टाकल्या तर चालेल का ? हो म्हणालेत तर त्या येऊ लागतात व्हिडीओ च्या मध्ये.मग त्या व्हिडीओ ला अमुक एक हिट्स मिळाल्या तर त्याचे पैसे तुमच्याकडे जमा होतात कालांतराने.पण यात ही प्रकार आहेत.त्या जाहिराती संपूर्ण बघितल्या का स्कीप केल्या गेल्या त्या नुसार पेमेंट होत.अर्थात हे इतकं सोपं नसत.परत त्यात गुगुल चा ही हिस्सा असतो.उरलेलं काही टक्के तुम्हाला मिळतात.आणि एक महत्वाचा घटक म्हणजे तुमचे सबस्क्रायबर किती आहेत ?म्हणजे नुसते बघून जाणारे वेगळे.ते तुमच्या हिट्स वाढवतात.आणि काही जण चॅनल आवडला तर तुम्ही पुढं कधी काही पोस्ट केलंत तर लगेच कळावे म्हणून ते सबस्क्रायबर बटन दाबतात आणि तुमचे ग्राहक होतात म्हणा पैसे न देता😊
मग जास्त सबस्क्रायबर तर जास्त उत्पन्न तुमचं.
आता हे सगळं वाढीस लागायला तुमच स्किल,नॉलेज आणि सादरीकरण महत्वाचं ठरत.या करता यातील यशस्वी लोक स्वतः चा प्रोफेशनल सेटप ठेऊन असतात.व्हिडीओ करता नवा विषय घेणं,तो प्रोफेशनली रेकॉर्ड आणि एडिट करून प्रेझेंट करणं या करता हे गरजेचे आहे.म्हणजेच हा फुल टाईम बिझनेस आहे बऱ्याच लोकांचा.मग लोक कमेंट मध्ये आपली मतं मांडतात जी बरी वाईट दोन्ही असतात.इतर युट्युबर तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करायची शक्यता असते.हे सर्व सहन करून मार्ग काढत राहावं लागतं.
समजा तुम्ही ग्याजेट विषयी चॅनल चालवताय तर काही कम्पन्या तुम्हाला त्यांची प्रोडक्ट पाठवून रिव्ह्यू द्यायला सांगतात.यात प्रलोभन ही दिली जातात.काही मोबाईल कम्पन्या चॅनल वाल्याना गिफ्ट देतात किंवा चक्क परदेशवारी घडवून आणून मोबाईल विषयी रिव्ह्यू अनुकूल करून घेतात.पण लोक चाणाक्ष असतात हल्ली बरेचदा.असे पेड रिव्ह्यू त्यांच्या लक्षात येऊन तुमचे फॉलोअर्स कमी होऊ शकतात.
काहीजण आपलं दैनंदिन जीवनच टाकत असतात.मी उठल्यावर काय केलं,घरात कशी मस्ती चालते,माझा कुत्रा कसा आहे,माझी मॉम नवी गाडी घेउम आलीय अस दाखवत असतात आणि प्रचंड चाहता वर्ग असतो त्यांचा.अशा लोकांना मग युट्युब बक्षीस म्हणून लोगो असलेल्या बटणाची प्रतिकृती भेट करत.त्यात ही सोन्याचं,प्लॅटिनम च अस असत.
हे युट्युबर ग्राहक वाढवायला गिव्ह अवे करतात.म्हणजे चाहत्यांना बक्षीस देतात.
आपल्या चॅनल च गेट टू गेदर ठेवतात.तिथं त्यांचे चाहते त्यांना भेटायला येतात.गिफ्ट ही आणतात.आणि काय असाव चॅनल वर याची चर्चा होते.
सो एकदम सिरीयस बिझनेस न भौ.
काही कलाकार वेब सिरीज करतात.आपलं टॅलेंट आपण दाखवतात.
काही महिला पाकसिद्धी, रांगोळी,हस्तकला चे चॅनल चालवतात.त्यांच उत्पन्न भरघोस आहे.
काही निगेटिव्ह पब्लिसिटी करतात.धिंच्याक पूजा हे उत्तम उदाहरण. गाणं तिचं बेकार असलं तरी प्रसिद्धी,पैसे आणि काही चॅनल वर उपस्थिती मिळाली न तिला.
नवीन पर्याय आहे.करून बघायला हरकत नाही.

शुक्रवार, १३ एप्रिल, २०१८

*कौन्सिलर, सेमिनार*

*कौन्सिलर, सेमिनार*
एका मित्राच्या मुलाचा मेसेज आला लिंक सकट. काका याला ऐक. मस्त आणि सोपं करून समजावतो सगळं.म्हटलं ओकेज, बघतो. मग त्या माणसाचा व्हिडीओ बघितला.खरोखरीच उत्तम वक्ता होता.आणि तो स्वतः आयुष्यात सफल होता.म्हणजे आपल्या पायावर मेहनतीने उभा राहिलेला माणूस.
    मग विचार आला आमच्या त्या पुतण्या न हे ऐकल उत्तम च झालं.पण त्याला हे का आवडलं?
तर विचार केल्यावर अस वाटलं कि ते त्याच्या बाजूच वाटलं असावं त्याला.तो वक्ता सांगत होता,तुम्ही तुमच्या मनाचा आवाज ऐका. कुठल्याही फिल्ड मध्ये यशस्वी होऊ शकता. तुम्ही वेगळी वाट निवडलीत तर तुम्हाला ते करू नको म्हणणारे मिळतील.ते का नको म्हणतात,हे त्यांना विचारा. मग तुम्हाला अस आढळेल कि ते नको म्हणतात कारण तुम्ही जे करू पाहत आहात ते त्यांना जमणं शक्य नाही.आणि ते करू शकत नाहीत तर तू काय करणार?त्या लोकांना त्या क्षेत्रातील काहीच माहिती नसते.तुम्ही विचलित न होता पुढं जात रहा.
अस एकूण सगळं होत.पण त्या माणसाने सांगितलेल्या इतर गोष्टी कडे त्या मुलाचं ध्यान गेलं नसणार .जेंव्हा तो माणूस सांगत होता कि, मलाही मी वेगळं क्षेत्र निवडलं तेंव्हा विरोध झाला पण मी यशस्वी झालो.हे इतकंच लक्ष्यात येत या पोरांच्या पण त्याने नंतर त्या करता जे डोकं लढवल,जे श्रम घेतले आणि भांडवल आपलं आपण उभारल त्या कड हि पोर लक्षच देत नाहीत.
त्या पोराला हे पटण्याचं कारण,बघ काका आमच्या कडे हे असंच असत.मी काही करायचं म्हटलं तर घरचे लगेच विरोध करतात.म्हणजे त्याच्या म्हणण्याला दुजोरा देणार फक्त त्यानं घेतलंय.
  आता त्याच्या घरच्यांना त्याची लायकी माहीत असते म्हणून विरोध होत असतो.त्या माणसाच्या आड लपू पाहत होता तो पोर.स्वतः ला ओळखणं त्याला अजूनही जमत नाही हे माझं निरीक्षण.
हे कौन्सिलर, व्यक्तीमत्व विकास शिबिर वग्रे अलीकडची उपज आहे.ते वाईट नव्हे.जर समाजाला त्याची गरज असेल तर ते हवंच.सुधारणा नकोत अस अजिबात नाही.पण काही दशकांपूर्वी हे असलं काही नव्हतं.जरी तेंव्हा इतक्या सुधारणा,नवी क्षेत्र नव्हती तरी त्या काळी जे अपडेट होत ते होतच ना!
तेंव्हा शेतकरी आत्महत्या जवळ जवळ नव्हत्याच.अपवाद म्हणून कुठं घडलं असलं तर.
प्रेम भंग आणि त्यातून घडणारे गुन्हे ही इतके नव्हतेच.मग आज हे का घडत?
तर हल्ली कमी वेळात जास्तीत जास्त फायदा आणि तो हि लायकी नसताना हवा असतो.खूप कमी वयात मोठी पॅकेज घेतात तरुण.मुबलक पैसा असणं मग सांभाळणे जमत नाही.ती  किंवा कुठलीही ताकद सांभाळून रहाणं हे जास्त कठीण आहे.उदाहरणार्थ,समजा तुम्ही एखाद पिस्तुल खरेदी केलंत.ते बरेच दिवस पडून आहे पण ते वापरता येत नाही.अश्या वेळी ते वापरून बघायची इच्छा प्रबळ होते.ती कंट्रोल मध्ये ठेवण हे ते शस्त्र विकत घेण्याहून कठीण आहे.किंवा जर कुणी मनाविरुद्ध वागल तर ते शस्त्र बिनदिक्कत वापरलं गेलंय प्रगत राष्ट्रात.शाळेत गोळीबार का केला?तर काही नाही होत पिस्तुल बघितलं वापरून,हे उत्तर मिळाले मुलाकडून अस वाचनात आलं होतं. तसच,लंडनच हिथ्रो विमानतळ कुणा शाळकरी पोरानं हॅक करून सरकार ला जेरीस आणलं.त्याला पकडल्यावर तो ही हेच म्हणल्याच आठवतंय.म्हणजे इथं शस्त्र बदललं पण ते सांभाळून ठेवण आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी वापरणं हि ताकद कमी पडली.पुराणकालीन योद्धे हि त्यांची अस्त्रे उठसूट वापरत नव्हते.
जर आपण जबाबदारीने वागलो,स्वतः ची कुवत ओळखून वागलो,श्रम घेण्याची तयारी असली आणि पेशन्स असले तर कुणाच्या ही कौन्सिलिंग ची गरज नाही.गरज असते ती फक्त डोळसपणे जगण्याची.आयुष्य जे अनुभव देत असत ते दिलखुलास अंगावर घेऊन,त्यातून शिकून पुढं जाण्याची.हल्ली बरेचदा आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याने मुलांना नाही ऐकायची,वाट बघायची सवय राहिली नाही.मग मालकी हक्काची जाणीव मात्र तीव्र झाली .मी मोठा झाला.यातून ती किंवा तो मला नाही म्हणतो/म्हणते,मला डीच करते म्हणजे काय?मग ज्या व्यक्ती वर प्रेम केलं म्हणतात तिच्यावर हल्ला होतो.
त्या माणसाने हे ही विशद करून सांगितलंय त्याच्या लेक्चर मध्ये.तुम्ही ब्रेकप झाल्यावर उदास का होता?
तुम्ही प्रेमात पडायच्या आधी सुखी होतात?तर होतात. पडून दुःखी झालात?झालात.मग आनंद साजरा करा न!अरे मी दुःखातून बाहेर आलो.हवं तर दुसर प्रेम करा.नाही जमलं म्हणून निराश व्हायची काय गरज आहे?तुम्ही असे वागता कारण इतर सर्व तसेच वागत असतात.इतरांकडे गर्ल फ्रेंड आहे,इतरांकडे गाडी आहे माझ्याकडं नाही.या रॅट रेस मधून बाहेत या.कारण ती न संपणारी यादी आहे.मला गाडीची आत्ता खरच गरज आहे का?का मित्रांना किंवा समाजाला स्वतःची लायकी किंवा स्टेटस दाखवून द्यायला गाडी घ्यायचीय?तस केलंत तर तुम्ही कधीही सुखी होणार नाही.मग तुम्ही घेतलेली होंडा सिटी जी मिळवणं मध्यमवर्गीय लोकांना सहज शक्य नाही ती ही तुम्हाला सुख देणार नाही कारण तो वर तुम्हाला अस वाटेल अरे,bmw हवी.
एकूण पूर्वी हे सगळं घरचे किंवा इतर मोठी माणसं सांगत असत.आपल्या धर्मात हीच शिकवण आहे.कीर्तन आणि सो कॉलड बाबा लोक हेच सांगत असतात.खरंतर स्वतः ला वेळीच ओळखता आलं तर या लोकांची गरज च नसते.एकूण समाज मानसिक खचत चाललाय म्हणून बाबा लोकांची चलती सुरू आहे.कौन्सिलर बिझी होतायत.
मग अश्या समाजाला योग्य कौन्सिलर हवाच. फक्त त्याच म्हणणं नीट विचारपूर्वक ऐकून तस वागा हि.
हे सर्व त्या आमच्या पुतण्याला हि प्रत्यक्ष भेटलो तर सांगीनच.मग कदाचित तो म्हणेल,काका तू सुद्धा घरच्यासारखं च बोललास😀

सोमवार, ९ एप्रिल, २०१८

गिर अभयारण्य

टायगर च्या निमित्ताने वाचन केल तर गिर च अभयारण्य वाचनात आलं. त्याच तसही कुतूहल होतंच. तिथं फॉरेस्ट गार्ड म्हणून महिलांची टीम कार्यरत आहे. त्या रात्री ही बाईकवर पेट्रोलिंग करतात.सोबत टॉर्च,असलं तर पिस्तूल आणि वॉकी टॉकी. एकूण हे सर्व गार्ड सिंहांच्या अंगवळणी पडलेत.सिंहाचा कळप विसावलेला असतो आणि त्याच्या समोर हे गार्ड शेकोटी पेटवून डबे खायला बसतात.त्यांची मोजणी करतात.
    तर फार पूर्वी वाघ सिंह खूप होते.त्यांची शिकार इतकी झाली कि अशी अभयारण्य उभारावी लागली.हळूहळू हा प्रयत्न यशस्वी झाला.आज मला वाटत 500 वाघ सिंह आहेत तिथं.गावकरी हि या सिंहाना सरावलेत.त्यांच्या झोपडी बाहेर गावकुसाबाहेर सिंह एखादी म्हैस मारून खात बसलाय आणि थोड्या अंतरावर त्या झोपडीचा मालक आणि अन्य गावकरी हे दृश्य बघतायत.आणि त्यांच्या वर सिंह हल्ला करत नाहीत.गावात जाताना छोटा ओहोळ बाईक वर बसून दोन गावकरी पार करतायत आणि त्यांच्या बाईकला अगदी जवळून सिंहिण आपल्या पिल्लांना घेऊन निघून जातेय.हे दोघे ही बाईक उभी करून तिला जाऊ देतायत.जस पाळीव कुत्रा बाजूनं जावा.
झालं काय कि, अभय मिळाल्याने हरीण,माकड आणि सिंह यांची संख्या वाढली.आता सिंहाना खायला पंचाईत पडणार नाही असं वाटत आपल्याला पण झालं उलट.
माकडं हरिणांच्या कळपा सोबत फिरतात.त्यांची दोस्तीच झाली म्हणाना. मग सिंहाची चाहूल लागली कि माकड आरडा ओरडा करून हरिणांना सावध करतात आणि हरण पळून जातात.सिंहाची शिकार निसटते.
    इकडं गावकऱ्यांची शेत आहेत त्यातील पीक तयार झालं कि हि हरण रात्री येऊन पिकावर तुटून पडतात.त्यांना मारता येत नाही.मग गावकऱ्यांनी अनुभवांती एक इंटरेस्टिंग युक्ती सुरू केलीय.रात्री शेतात जातात आणि हरणांचा आवाज काढतात.त्या हाकेला फसून हरण शेतात येतात.
तिकडं सिंहाचा कळप गावा बाहेर जमलेला असतो रात्र अजून व्हायची वाट बघत.कारण जो वर गावकरी झोपत नाहीत आणि शेवटचा दिवा जात नाही तोवर वाट बघावी लागते.त्यात कुत्रे वेशीवर असतात ते लगेच भुंकू लागतात.तर हा दबा धरून बसलेला कळप गावकऱ्यांनी काढलेल्या हरिणांच्या आवाजात ओळखतो.हळूच खाली येऊन पोझीशन घेतात.हरणांचा कळप टप्प्यात आला कि चारी कडून योजनाबद्ध हल्ला करून शिकार साधली जाते.त्यांच्या कुटुंबाचं पोट भरत आणि गावकऱ्यांच पीक वाचत.कधी मधी एखाद गावातील जनावर किंवा कुत्र सिंहानी मारलं तर लोक समजून घेतात.अशी परस्पर सामंजस्य साधत सिंह आणि माणूस एक ठिकाणी राहायला शिकलेत.
वर म्हणलो तसे फॉरेस्ट गार्ड आणि गावकरी यांचे सिंहाचा कळपा जवळचे व्हिडीओ तू नळीवर बघायला मिळतील.
नुकताच मागील आठवड्यात आजोबा सिनेमा बघितला त्यात ही हे जाणवत आपण त्यांच्या घरात घुसलोयत लोकसंख्या वाढी मूळ.अर्थात हे समजून गिर च्या लोकांसारखं जिओ और जीने दो केलं तर हि वन्य संपत्ती आणि दुर्मिळ होत जाणारे प्राणी पुढील पिढीला प्रत्यक्ष जिवन्त बघायला मिळतील अन्यथा फक्त पुस्तकात किंवा ज्या फ्लिम्स केल्या आहेत त्यात बघावे लागतील.