शुक्रवार, ९ मार्च, २०१८

नवी ओळख गावाची

घर विकून दशक उलटून गेली.तेंव्हा मुंबई हवीशी वाटली.परिस्थिती अशी नव्हती कि ती प्रॉपर्टी तशीच ठेऊन दुसरीकडे जागा घेऊन रहाता येईल.नाईलाजाने विकावे लागले.पण नंतर ते घर मनातली जागा मात्र सोडत नाही.एक एकर च्या आसपास जागेत घर होत.त्या विस्तीर्ण आवारा मूळ ओढ लागतेय का ? हा प्रश्न मनात आला.पण तेच एक कारण नाही असं जाणवलं.तिथं असताना जी माणसं आजूबाजूस होती त्यांनी जे प्रेम दिल घेतलं ते अजूनही खेच दाखवत असत.आजही गेलो तर माझ्या जागेत मी पाऊल हि ठेवत नाही.तिथं आता लोकांचे बंगले झालेत.पण काही मित्रांच्या घरी जातो.काहींची घर नवीन रूप घेऊन उभी राहिलीयत काहींची मात्र होती तशीच आहेत.काल तर इथं येऊन गेलो होतो इतकी तशीच.पण दोन्ही बाजूची माणस मात्र बरीचशी तशीच आहेत.आजही गेलो कि तिच जुनी सलगी मिळते.नात काही नाही शेजारी होते,पण नातलगांकड जात नाही तिथं मात्र जातो.फक्त गावातली पिढी बदलली त्या मुळे बाकी कुणी ओळखत नाही.
या खेपी मात्र खूप बदललेली परिस्थिती जाणवली.जमलं तर परत तिथं जागा घेऊ ,हे मत राह्यलं नाही.
पूर्वी गावात इतकी सुबत्ता नव्हती.शेती किंवा मुंबई पुण्यात नोकरी करणारे लोक होते.कातकरी संध्याकाळी मजुरी करून जाताना अड्ड्यावर घसा ओला करून घरी जाताना पिऊन धिंगाणा करत असत कधी तरी.गावात हि पिणारे होते पण ते कळत नसे बाहेर.सोमवार च्या बाजारात काही दिवस चक्री फिरत असे तितकंच.ते ही पोलीस बंद पाडत असत.आपसात काही भांडण ही होत .मग पोलीस स्टेशन गाजत असे.पण ते ही क्वचित च.बाकी गावं तस शांत होत.
काल मात्र वेगळं चित्र बघितलं.लोकांनी जमिनी विकून पैसे केलेत.त्या मूळ पैसा असेल तिथं येणाऱ्या अन्य विलासी किंवा तो पैसा काढून घेणाऱ्या गोष्टी आल्यात.जुगाराचे अड्डे,दारूची दुकान झालीत.एक ओळखीचा भेटला. त्याच गणितं माझ्याहून कच्च होत.पुढं शिक्षण डोकं चालत नाही सबब होणं नव्हतं हे तेंव्हाच नक्की झालं होतं.आजही घरच्या सपोर्ट वर आयुष्य सुरू आहे.तर त्याला मी विचारलं,या पोरांकड पैसे कुठून येतात आकडा लावायला?दारू प्यायला? तो शांतपण म्हणला, आकड्यातूनच. म्हटलं किती मिळतील?दारू न चखना चा खर्च निघतो?घरात देणं राहू दे.तो म्हणला, मग.
पण ते खेळतात कसं?किती इन्व्हेस्ट केले कि किती रिटर्न मिळतात?
तो मंद हसत म्हणला,ये सांगतो.मग एक पट्टी खिशातून काढलीन छापील.त्यावर वरची ओळ 1 ते 0 असे दहा आकडे होते. खाली तीन तीन आकड्याचे समूह.त्यांच्या एकाखाली एक रांगा होत्या.
आता हा सिक्वेन्स धरल्यास ही फिगर अपेक्षित आहे.मग त्याचा हिशेब असा होतो.असा आला तर ब्रॅकेट होत.अस आलं ,त्याला संगम म्हणायच.अस त्यानं 15 मिनिट माझं बौद्धिक घेतलं पण शेवटी ते ही गणित माझ्या डोक्यावरून गेलं.म्हटलं हे काही समजत नाहीये.तो हसून म्हणला,लावायला लागलं कि समजेल हळूहळू.मग किती लावू शकतो?
5रु पासून कितीही.
समज 10 किंवा 20 रु लावले तर किती मिळतात?
500रु ही.अरे त्या रूपक न परवा लावले बरेच तर त्याला 3लाख मिळाले.
मी उडालो.म्हटलं मग ते मिळतात कधी आणि रोख देतात का?
म!सकाळी लावले कि संध्याकाळी घेऊन जायचे मिळाले तर.त्याला आम्ही म्हटलं,आता मिळालेत तर कर्ज फेडून घे न मोकळा हो.पण ते कुठलं ऐकायला.परत सगळे घालवले.
हा कारभार सुरू झालाय गावात.तरणी पोर दारू च्या गुत्त्या वर,पानाच्या टपरीवर आकडे लावत किंवा टोळक्याने टिंगल टवाळी करत उभी असतात.शेती विकून किंवा बापाच्या जीवावर घेतलीय ती बाईक,केसांचा नवा भांग, तोंडात सिगरेट.अस नव्हतं पूर्वी.
हे गावातल्या लोकांचं असताना परदेशी लोक म्हणजे भय्ये,बंगाली वग्रे येऊन गावाभोवती असणाऱ्या कंपन्यात नोकरी करून गावात घर घेऊन राहिलेत.किंवा त्या कंपन्यांनी आवारात त्यांच्या करता घर बांधलीत.पाणीपुरी,चायनीज,फळ अस गाड्यावर विकतात आणि पैसे कमवतात.गावातली पोर मात्र  निरुद्योगी होऊन राह्यलेत.किंवा गुंडगिरी बरीच वाढलीय.गॅंग ही तयार झाल्यात.हल्ली काहीजण आत गेल्याने जरा शांत आहे म्हणे.हे कमी म्हणून का काय आता गांजा,ड्रग च्या गोळ्या ही आल्यात गावात.
एकूण निराशाजनक स्थिती बघून वाईट वाटलं.परत तिथं जाऊन राहू हे मत आता बदललं आहे.
आता फक्त जुनी पिढी आहे तो वर कधी तरी त्यांना भेटायला जायचे मग मात्र मनातल्या जुन्या आठवणी ची उजळणी स्वतः शी करण्यात च सुख आहे हे खरं.
काळ बदलला .
तरी साली पावलं तिकडं जाऊ पाहतील च पण पहिली ओढ नक्की नाही रहायची.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा