बुधवार, १४ मार्च, २०१८

लिमये काका

माझे मेहुणे होते ,अवलिया माणूस. ssc पास .पण कार्गो शिपवर कप्तान होते.दुनियाभर फिरून आलेला स्मार्टनेस आणि इंग्रजीवर प्रभुत्व.सहा फूट उंच न भारदस्त शरीर.
मी कॉमिक्स, चांदोबा,किशोर वग्रे वाचत असे.एकदा त्यांच्याकडे रहायला गेलो होतो.त्यांना दोन मुली.ज्या माझ्या भाच्या लागतात पण आमच्यात दोस्ती खूप होती.मोठीला माझ्या सारख वाचायला आवडायचं.ती हँडर्सन च्या परीकथा वाचायची.मेहुण्यांनी हे हेरलं होत.अचानक संध्याकाळी आम्हा दोघांना बोलावली त्यांनी.आम्ही येऊन त्यांच्या पुढं उभं राहिल्यावर खिशातून नोटांचा छोटं बंडल काढून माझ्या हाती दिल.म्हणले,सलील तू न उज्वल पुस्तक वाचता अस बघतोय मी.आज आता जाऊन गिरगावतल्या पुस्तकाच्या दुकानातून तुम्हाला हवी ती न हवी तेव्हढी पुस्तक आणा आणि वाचा सुट्टीत. आम्हाला आनंद झाला.निघताना परत त्यांनी हाक मारून सांगितलं,जर पैसे हरवले तर चौपाटीवर जाऊन रडत बसू नका.मला फोन करा किंवा घरी या मी परत पैसे देईन.पण हे न होईल असं बघा.
आम्ही उड्या मारत दुकानात गेलो.आवडतील ती पुस्तक घेतली.उज्वलन मात्र मला सांगितलं,आपण थोडे पैसे ठेवूनच खरेदी करू.सर्व पैसे सम्पवून आले अस नको.( आता कळत तिला व्यवहार त्या वेळीच समजला होता😊)
मग घरी आलो न पुस्तकाचा ढीग बघत बसलो.बहीण आली न म्हणली,अहो पुस्तक आणायला पैसे दिलेत ते ठीक पण त्या दोघांनाच काय पाठवलेत? मी गेले असते न सोबत.काही वेडंवाकडं झालं असत म्हणजे ?
मेहुणे म्हणले,त्यांना आता बऱ्यापैकी समज आली आहे.सलील एकटा दादरहून गिरगावात येतो न? त्यांना सवय आता पासूनच करायला हवी स्वावलंबी व्हायची.आणि मी त्यांना तस काही झालं तर घरी फोन करा मी इथं बसून आहे म्हणलो होतो.
तुमच बाई एकेक भलतंच असत. बहीण म्हणली.
मग मेहुणे उठले आणि आमची खरेदी नीट बघितली.आणि दोघांकडे बघत म्हणाले,
तुमच्या खरेदीत परीकथा आणि तत्सम स्वप्नरंजन करणाऱ्या गोष्टींची पुस्तकं दिसतायत.विज्ञान विषयावर ची पुस्तक नाहीत.सलील तू शेरलॉक होम्स च आणलं स पण या पुस्तकात श्रीमान योगी सारखी किंवा ज्ञानेश्वरी,दासबोध का नाही आणावे वाटलं पुस्तक ? बहीण म्हणली,अहो त्यांच वय काय आणि तुम्ही दासबोध काय वाच म्हणताय?
तुला ही समजलं नाही.इतर त्यांच्या वयानुसार पुस्तक आणली ती ठीकच आहे.पण त्या पुढच वाचन हि त्यांनी करायला हवं ते ही याच वयात.त्यांनी जर आज ज्ञानेश्वरी ,दासबोध वाचला आणि त्यातील अगदी थोडं जरी त्यांना समजलं तरी त्यांचा आयुष्य आता कुठं सुरू होईल ,तेंव्हा पुढील आयुष्यात ते वाचलेलं प्रत्यक्ष्यात वापरता येईल त्यांना.जेंव्हा म्हातारे होतील तेंव्हा दासबोध कळून उपयोग नसणारेय कारण जे कर्तृत्व दाखवायचं किंवा लढायचं वय असत ते निघून गेलेलं असत.तेंव्हा दासबोध समजून काय फायदा होणार?म्हणून वाचन आता पासून च चौफेर हवं.
हे बहिणीला पटलं नाही म्हणा पण ती गप्प बसली.
मला ही त्या वेळी काही नीटस समजलं नाही.उज्वला ला म्हटलं,काका अस म्हणले ते आपण जास्त खरेदी केली म्हणून का ?
अरे नाही तस वाटत.आणि तसही मी म्हटलं होतं न तुला कि थोडे तरी पैसे परत देऊ त्यांना.ते दिले न आपण.
मग मला काही कळेना अस का म्हणले ते!
पण आता इतक्या वर्ष्यानी समजतंय त्यांना काय म्हणायच होत.
आणि मग रात्री ते हे हि म्हणले जेवताना, हि पोर टिपिकल मध्यम वर्गीय विचार करू लागलीयत आतापासून.
का म्हणता अस ?या बहिणीच्या प्रश्नावर ते हसून म्हणले होते,चैला याना भरपूर पैसे दिले होते मनमुराद खरेदी करायला त्यातले हि वाचवून मला आणून दिली.
😃

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा