शनिवार, ६ मे, २०२३

रव्या !



रविन्द्र महादेव पिळवणकर.आमचा मित्र रव्या.


याची माझी दोस्ती आम्ही पोयनाड ला मुंबई सोडून रहायला गेल्यावर झाली.

आमच्या सावंत बंधुच्या घरी सर्व मित्र दिवसात केंव्हाही ओटीवरच्या बाकड्यावर जमायचो.संध्याकाळी आमच्या घरी.

हा तसा मित भाषी.उंच.इमानदारीत अभ्यास करणारा.इतकच नव्हे तर स्वतः शिकत असताना आणखी काही लोकांना शिकवत असे.मला सुद्धा गणितात पास होण्यात याचाच सहभाग आहे.मी कधीही तयार नसे शिकायला गणित.हा घरी येऊन फक्त बसत असे.मला कधी रागावला नाही.पण मी जास्तच टाईम पास करतोय दिसलं कि,बर आपण आता बसूया अभ्यासाला कि मी जाऊ म्हणत असे.मग मी बसत असे.मी नाही तोच पास झाला गणितात पुन्हा एकदा.

गुगुल अलीकडं आलं.तेंव्हा गावात संध्याकाळी 6 च्या आत ट्यूब लाईट लावून ठेवली तर ती पेटत असे कारण मग लाईट लोड जास्त झाल्याने डिम होत.मग ट्यूब लागत नसे.अशी स्थिती.

युट्यूब ,नेट तर नावाच नव्हतं अस्तित्वात.

तर त्या काळी देखील याचं ज्ञान अप टू डेट असे.बर घरात सायन्स नियतकलिक वग्रे पडिक असत असही नव्हतं.हा सायन्स चाच विद्यार्थी तसा.पण आज आहेत तशी साधन अजिबात नव्हती.

तरी देखील याच्याकडं रेडिओ,स्टोव्ह,टेप रेकॉर्डर,एकतर प्रोजेक्टर आला होता अस सगळं रिपेअर करत असे.माझी सायकल त्यानं रायगड ट्रिप वेळी स्वतः केली होती तशी आज माझी बाईक देखील चालत नाही अशी मस्का तयार केली होती.माझा tv देखील बंद पडला तर यान उघडला आणि सरळ बाबांना मी म्हणतो तो नंबर लिहून दे.तो ट्रान्झिस्टर आणायला सांग tv चालू होईल.मी आ वासून बघतच राहिलो.तुला कस कळलं?

अ तो पॉवर सप्लाय चा आहे.तो उडाला.म्हणून बंद पडलाय tv.

पण तो बसवेल कोण?

मी आहे न!!!

तर अस हे ज्ञान तो कुठून गोळा करीत असे हे आजही कळत नाहीये मला.

एकदा मजा झाली.गावात काही आणायला गेलो तर व्यापाऱ्यांची पोर बाईक वर जात होती आणि येताना गोणीतून काही भरभरून आणत होती.काय सुरूय कळत नव्हतं.मग सावन्ताच्या ओटीवर जनरली सगळे असत तिथ बातमी लागली.कुठंतरी बोट फुटली नी त्यात काही माल आहे तो गोळा करून आणतायत.कोळी म्हणत होते,डायऱ्या आहेत कसल्या आणि खोके आहेत.रवी आला.म्हटलं काय रे असेल?

आ ss वर्णन ऐकून व्हिडीओ कॅ सेट न प्लेअर असतील.

हे काय असत?

तू ऑडिओ ऐकतोस न प्लेअर वर तस व्हिडीओ.

म्हणजे?

सिनेमा दिसेल तुला .

कुठ?

tv ला प्लेअर कनेक्ट करायचा.त्यात व्हिडीओ कॅसेट टाकायची.सिनेमा सुरु.

अस कस होईल?

होत.

मला पटल नव्हतं.पण लगेच काही दिवसात गावात व्हिडीओ प्लेअर भाड्यान मिळू लागला.आम्ही तो भाड्यान आणला तेंव्हा समजलं.

तो आणल्यावर देखील एकदा कॅसेट स्लो वाटू लागली.हा उठला आणि एक बटन पिळलं तर परत स्पीड जागेवर आला.

हे सगळं कुठ माहित झाल याला समजत नाही.

मला ब्रेच प्रश्न पडत असतात आजही.पण आज युट्यूब,नेट मदतीस आहे.गुगुल बाबा आहे.विचारलं कि सांगतो बिचारा.पण कधी तो हि निरुत्तर होतो मग आमचा ओरिजनल गुगुल बाबा ला आहे त्याला माझा फोन जातो.उत्तर मिळतच.

pc च्या बाबतीत पण हा निष्णात आहे.एकदा त्याच्या घरी गेलो होतो तेंव्हा यान त्याचा pc दाखवत सगळं प्राथमिक समजावलं. आता मी ड्युटी वर जातो तू बस pc वर नी हवं ते कर.

अरे पण मी काही चूक केली तर?

नाही करणार तू मला खात्री आहे.

आणि तुझं काही खाजगी ओपन झाल तर?

ते तस काही नाही त्यात.आणि असलं तरी निदान आज तरी तुला सापडणार नाही😀

म्हणून गेला नी मी त्याच्या pc वर बसलो होतो बघत सगळं कस चालत ते.

पुढ माझ्या एका स्टुडन्ट न या बाबतीत बरंच शिकवलं.

रवीन एकदा त्याच्या कड असेम्बल करायला आलेला pc मुद्दाम माझ्या समोर जोडून दाखवला होता.

आता भेट होत नाही रोजची.कधी काळी गेलो नी तो घरी असेल तर थोडावेळ भेट होते.

असे आणि काही मित्र भेटले पोयनाड ला जे इतकी वर्ष झाली तरी अत्यंत जवळचे आहेत.कधीही गेल तरी मधली गॅप बिलकुल जाणवत नाही.

त्यांच्या विषयी मग लिहीनच.

मुंबईत एक ग्रुप आणि पोयनाड चा एक असे दोन सेट आहेत आमचे मित्रांचे.दोन्ही प्रिय.आणि दोन तबल्यातले आहेत.

या सर्व लोकांमुळ आयुष्य समृद्ध होत.

गुरुवार, २७ एप्रिल, २०२३

काळ देहा सी आला खाऊ.

 काळ देहा सी आला खाऊ

आम्ही आनंदे नाचू गाऊ,,,


काळ खायला येण !या अभंगातलं वेगळं.पण तो तसा खायला येतो मलाही कधी,,नव्हे बरेचदा.


बाबांनी एक नाटक बसवलं होत.त्यातले डायलॉग मला पाठ झाले होते.पैकी एक,

व्यंक्या किती वाजले?

काय कि.पण एक ठोका ऐकला.

मग एक वाजला असेल.

जी.

कदाचित दीड.

हा.

कदाचित साडे बारा हि.

असेल जी.

काळाचे ठोके साडे बारा वर असोत एक वर वा दीड वर.तुझ्या साठी ठोका एकच!

व्यंक्या तुला कधी काळ खायला आल्याच नाही वाटत?


नाय जी.

मग लेका या भिंताडा सारखं तुझं जिण.कुणा एकाच्या वासनेची एक विट कुणा एकीच्या वासने ची दुसरी विट. त्यावर मारला मुलामा मुठ भर तांदुळाचा आणि त्यातून उभ राहील हे भिंताड जे उभ ते उभ.पून्हा एकदा कोसळण्याची वाट पहात.


त्यातला व्यंक्या हा नोकर आहे.त्याचा आता मला हेवा वाटू लागलाय.काळ त्याला खायला येत नाही हा त्याचा गुण विशेष.

त्याच नाटकात मुख्य पात्र आंग्रे सरकार.तो एका तरुणीला ,ती डोक दुखतंय म्हणते तेंव्हा म्हणतो,

दुखण्या इतपत का होईना तुम्हांला डोक आहे तर!

या डोक्यात देवान अजब ऑर्गन निर्माण करून ठेवलाय.मेंदू.

बर तो देखील एक मे दो कटिंग सारखा.एक मोठा एक लहान मेंदू.

तो मोठा दिवस भर तर्हा तऱ्हा चे विचार करतो,निर्णय घेतो.मग थकतो.त्याला रात्री विश्रांती.

पण देव तिथंच थांबला नाही.त्यानं स्टेपनी सारखी व्यवस्था करत लहान मेंदू जोडून दिलाय.साला तो एरवी सुप्तवस्थेत असतो पण रात्री स्टिअरिंग तो हाती घेतो ऑटो पायलट सारखं.

मग मोठ्या न दिवसभर,मागच्या आयुष्यात जे चिंतन केल,बघितलं,भोगलं ते याच्याशी मेमरीत बाय डिफॉल्ट पडिक असत.मग हे धाकटे भाऊ रात्री झोप लागू देत नाहीत आम्हास.साल सिनेमा सारखी स्वप्न दाखवतात.इतकी कि कधी खरी वाटून भिऊन उठायला होत किंवा स्वप्न स्वप्नात खर झाल्या सारखं वाटून जाग येते चक्क.मग मोठा जागा होऊन सूत्र हाती घेतो.त्याच विश्लेषण सुरु होत.परिणाम आमच्या झोपेच खोबर ते हि खवट.अश्या वेळी मग काळ खायला येतो.आपण चक्क टकटकीत जागे आणि दुनिया गाढ झोपलेली.

किंवा दिवसा देखील आपण या काळाच्या मिठीत करकचून बांधलेले आणि भोवताली सगळे त्यांच्या कामात गर्क.आपला वेळ शून्य झालेला.

याला काळ खायला येण म्हटलं जात असावं.

अभंगात आहे तसा काळ खायला प्रत्येकास येतोच .तेंव्हा त्याचा ग्रास होण आहेच.पण तो होताना काहींना त्रास होऊ शकतो.मला मात्र होणार नाही नक्की.कारण काळ तर आम्हास आयुष्य भर आलाय खाऊ.

सो आय माई सेल्फ इज खाऊ ऑफ काळ.हौ ब्लेस्ड न.मजा है.

शुक्रवार, १४ एप्रिल, २०२३

उन्हाळ्याची सुट्टी.

 आता सुट्टी शाळेला.म्हणजे रिझल्ट पचवून गावी जायची तयारी.जाताना उन्हाळी करता म्हणून खास ते सुटी हाफ शर्ट पांढरे खरेदी व्हायचे.बाबा बॅग मधे आठवणीन पाटणकर काढ्या च्या दोन बाटल्या घ्यायचेच ज्या प्याव्या लागत.मुंबईची चहा पावडर घ्यायची.st च आरक्षण बघायचं.

 स्टॅण्ड वर उतरताच लक्ष जायच्या आधी बैलगाडी लावून उभा असलेला आमचा गणपत दिसे. आम्ही उतरल्याच बघून तोंडातली विडी टाकून तो कासरे गाडीला बांधून पुढ येई सामान घ्यायला.आलावं म्हणत पुढ होऊन थांबे.गाडीत पेंढ्यावर स्वच्छ पोती टाकलेली असत बसायला.मग आम्ही चढलो कि बॅग्स ठेऊन तो बैलाच्या पाठीवर थाप मारून त्याला बाजूला करून कासरे हातात घेई.मी त्याच्या बाजूला सरकून बसे.त्याच्या विडी चा वास मजेशीर वाटे.   घरी  पोचताना दिवे लागण होई .लांबूनच घराच्या कौलातून मीणमीणता प्रकाश पाझरलेला दिसला कि आज्जी स्वयंपाक घरात आहे समजायच.जरा पुढ आलं कि ओटी वरची झोपाळ्या ची कुरकुर तात्या तिथ बसलेत सांगत असे.

गाडी खालच्या अंगणात गोठ्या समोर उभी राहिली कि आधी घरात पळत जायच.मग तात्या किंवा आजी,आधी मागील दारी जाऊन पाय धुवून ये म्हणत.आजी न चुलीवर चहाच आधण तयारच ठेवलेलं असे.मग हळूहळू ख्याली खुशाली विचारून सांगून बॅग उघडली जायची.

मगचे दिवस मोकाट असत.आढीचे आंबे,पडी चे आंबे,रानात जाऊन करवंद् खायची.जांभळ,जांभ अस कायकाय.पेंढा जनावरांना घालण.त्या उडवी वर बसणं.मग खाज येण. आणलेला पाटणकर काढा नको म्हणत पिण. एखाद दिवस डोळ्या ची साथ येते या दिवसात, म्हणत डोळ्यात कांद्या चा रस रडत रडत घालून घेणं.

ठेच लागली तर खोटेवर बिब्बा घालून वर राखुंडी लावणं.सकाळी पाण्याच्या चुलीवर पाणी तापवण.ते उरकलं कि त्या चुलीच्या उरलेल्या निखाऱ्यात बटाटे,रताळी,काजू बी टाकून दुपारी उकरून खाण. संध्याकाळी गुर घेऊन तळ्यावर् जाण.तिथ त्यांना चोळण हाती घेऊन चोळून अंघोळ घालण.

पहाटे उठून आई आज्जी फेण्या करत.त्या उतरल्या उतरल्या खाऊन फस्त करण.मग दुपारी फेण्या,चिकवड्या,पापड वाळत घातलेल असे त्याची राखण करत बसणं.एक आरसा तिथ ठेऊन आजी म्हणे,तुमची नको राखण.पाखर राहतील दूर आणि वाळवण होईल लंपास. अंगण्यात पाणी मारलं कि येणारा सुगंध म्हणजे,,,

पडवी ला बाबांनी पूर्ण पडदे लावलेले त्यावर पाणी शिंपडणं स्प्रे बॉटल न.मग जरा गारवा येई.अंगणातून गरम हाळ मारे.पंख्या ची हवा देखील गरम येई.घर आमच्या सरस्वतीने गोलाकार नक्षी काढत सारवलं आणि भिंती देखील सारवल्या म्हणजे जरा थंड वाटे.सारवलेल्या माजघरात दुपारी उघड्या अंगाने पालथ पडलं कि सुख वाटे.

रात्री अंगणात झोपायला गाद्या घालायच्या. उशाशी पाण्याचे तांबे,बॅटर्या, काठी ठेवायच.वर मांडव असे.आजीला गोष्ट सांग म्हणून पिडायचं.अजून एक करत बसल कि मग ती कापूस कोंड्या ची गोष्ट काढून बदला घेई.रात्री कसले पान पडल्याचे,काडी पडल्या चे आवाज आले कि भीती वाटे.पण तात्या रामरक्षा म्हणत शत पावली करत ते ऐकून धीर येऊन झोप लागे.

दिवस भर मित्र जमवून विटी दांडू,काठी उडवी,गोट्या,बॅडमिंटन मग क्रिकेट दम लागे तोवर खेळून समाधान  होत नसे.कधी आमच्या कधी मित्राच्या शेतावर बैल गाडीतून जायचं.तिथली मजा वेगळी.शेजारच्या मित्रांना दुपारी रात्री दगड उंच उडवून  रस्त्यावर टाकत आंबा पडला वाटायला लावून फसवायचं.पहाटे आमच्या विशाल बकुळीची अंगण भर चादरी सारखी पसरलेली फुल गोळा करायला हाती पेटत टमरेल घेऊन कोण कोण यायच्या आणि ओचा भर फुल घेऊन जायच्या. मग ती आणि आवाडातली गोकरणं,बिट्टी,चाफ्याची फुल वेचून परडी भरून तात्यांना पूजेस ठेवायची नेऊन.

मग एक दिवस परतायचा उजडे.पाय जड होत.आज गणपत कामावर येऊच नये वाटे.पण तो अचूक वेळी पहाटेच् येई आणि गाडी तयार करून ठेवायचा.इतक्या मोठ्या आवारात मनसोक्त हुंदडल्यावर परत मुंबईत टिचभर जागेत जाऊ नये वाटे.पण निघावं लागे.आजी जवळ घेऊन प्रेमान मेतकूट,भाजणी,लोणच,पापड अस काय काय देई.

ते सगळं देखील गेल आता.पुन्हा परत न येण्या करता.

सुख यातच मानतो,निदान हे सगळं काही काळ का होऊन अनुभवण्या इतक नशीब जोरावर होत.

शुक्रवार, ३१ मार्च, २०२३

लिमलेट!

 व्यायाम शाळेच्या पथकात प्रार्थना आटोपली आणि सर्व जण जायला निघणार इतक्यात सरांनी शिट्टी वाजवली.

लक्ष द्या रे.आपल्या दोन्ही शाखांची सहल रविवारी आयोजित केली आहे.त्याविषयी माहितीचा कागद सर्वांनी घेऊन जा.आणि जे येणार असतील त्यांनी त्यांची वर्गणी आपापल्या शाखेत जमा करायची आहे.हे माहिती पत्रक प्रत्येकाने घेऊन जा.

एकच कल्ला झाला.सगळे आनंदाने चर्चा करू लागले.काय न्यायचं,कुणी कुठं भेटायचं,सोबत आणायच्या वस्तूंच्या यादितल काय आपल्या कडे नाही या विषयी.

सम्या खुश ना?तू विशेष आनंदात असणार.त्या शाखेतून ती पण येणार.

हा मग.पण नाही आली तर?

अस कस होईल .

चंद्या ते हाय फाय शाळेत जातात.अभ्यास बुडेल म्हणून नाही आली तर?

छ्ट,ती टीम येणारच.बातमी लागली मला आधी.प्राजक्ता कालच म्हणाली मला.

ती कुठं भेटली तुला.

अरे ऑफिस मधे आली होती.त्यांच्या सरांनी काही कागदपत्र नेऊन दे म्हणून सांगितल होत.ते द्यायला आली होती अण्णांच्या कडे आमच्या.

मग.

मग काय.तीच म्हणाली,येणार न ट्रीप ला?आमचा अख्खा ग्रुप येणारे.आता पटली खात्री.

येस्स..

रविवारी आईने बॅग भरून देताना काय काय दिलेले आहे सोबत ते दोनदा सांगितल.लिंबू,मीठ,साखर मागे खणात आहे.लहान चाकू पण तिथच ठेवलाय.नीट बघून घे नाहीतर असून मिळायचा नाही .आणि सर्व गोष्टी नीट परत आणायच्या.

समीर च लक्ष नव्हत त्या बोलण्या कडे तरी हो हो करत होता.चला पळा आता नाहीतर उशीर होईल अस आईने म्हणताच  पळत सुटलो.धापा टाकत मैदान गाठल.

बस आलेलीच होती.माझा ग्रुप उभाच होता माझी वाट बघत. चंद्या पुढं आला .चल जागा पकडू आपण. आत शिरताच कुठं बसायचं प्रश्न पडला कारण त्या शाखेचा तो ग्रुप कुठं बसेल याची कल्पना नव्हती.चंदू सरळ मागे जाऊन बसला आणि ये इकडे म्हणाला.जाऊन बसलो.

इथ का?किती मागे आहे.ते लोक बहुतेक पुढं बसतील अस वाटतंय मला.

तू डोक नको लावू.तुझ्याच फायद्या करता इथ येऊन बसलोय.

म्हणजे?

अबे माहिती काढलीय मी.आपल्या शाखेच्या मुलांना पुढं त्या शाखेची मुल मागे बसतील.सीट मोजून बसलोय.आपल्या मागच्या सीट त्या शाखेच्या असतील.

ग्रेट आहेस तू.मी खिडकीत बसतो.

नाही .तू साईडलाच बस.

का?

मी सांगतो म्हणून.

तुला खिडकी हवीय सांग न सरळ.

तू न भोट च राहणार.तुझ्याच भल्या करता सांगतोय.

कस भल होईल माझं ते पण सांग.

अरे,,,आता तू आत बसलास आणि तिचा ग्रुप मागे बसला तर तुला ती दिसेल का चम्या?ये बस खिडकीत मी तिकड बसतो.

आयला,भारी डोक तुझं. थँक्यू मित्रा.

म,समजत नाही तुला.

इतक्यात तिच्या मैत्रिणी मागे येऊन बसल्या पण ती नाही आली.

चंद्या बघ ती येणार नाही बहुतेक.

गप रे.नीट वळून बघ. मागची अखंड आडवी सीट अर्धीच भरलीय तिच्या ग्रुप नी.आपल्या पलीकडील रांगेत जी खिडकी आहे मागे तिथं ती येऊन बसेल.ती बघ ती येत्येय.

मी पटकन बाजूच्या रांगेतील खिडकीतून बघितल तर ती दोन मैत्रिणी सोबत येत होती.

वेगळीच दिसत होती आज. ट्रॅक सूट घातला होता.त्या आल्या आणि चंदू म्हणाला त्या प्रमाणे सरळ मागे गेल्या आणि ती खिडकीत च बसली.

मी डोळे विस्फारून चंदू कडे बघितल .साल्या इतका खरा अंदाज कसा बांधला तू?

आपल असच आहे बॉ.तुला कळत नाही माझी हुशारी.

त्याला टाळी देत म्हटल,आज मानला तुला गड्या.

एकदा हजेरी घेऊन बस सुटली.

लक्ष सारखं मागेच जात होत.त्यांचं आपसात हसण खिदळण सुरू झालं होत.मधेच नजर मिळत होती.पण..

तोच मागून त्यांच्या ग्रुप मधून कुणीतरी ओरडून म्हणाली,अरे काय यार ट्रीप ला आलेत तरी सगळे वर्गात असल्या सारखे गप्पच का?ट्रीप साँग म्हणा.मुख्य शाखेतली टीम अगदीच थंड आहे बुआ. ए चल आपणच सुरु करुया .

ती इतकं म्हणली आणि त्या ग्रुप ने इंग्रजीत सुरू केलं मोठ्यानं,इन मॉर्निंग बाय द सी,,,,

चायला हे गाणं प्रथमच ऐकतोय रे.

हा ना,या मोठ्या शाळेतल्या ना मग इंग्रजी च गाणी म्हणणार .

त्यांची दोन झाल्यावर मात्र पुढं पक्याची सटकली.

अरे आपण काय गप्पच रहायचं का?

आपला पण हिसका दाखवू न.

होऊन जाऊ दे..

मग पक्याने मराठी गाणी सुरू केली

दिपवू साऱ्या चाळीतल्या बायका

थांब होऊ दे सकाळ...

मागून आवाज आला, ए हे काय ट्रीप साँग आहे का?

आमचं असच असत.

मी गप्प होतो .पक्या ओरडलाच,सम्या तू का गप्प?अस नाय चालायचं तू आपल्या शाखेचा असून गप्प का?

नाही रे जरा घसा बसला होता काल म्हणून.

पक्या मागे वाकून बोलला,मला कारण माहितीये तुझ्या गप्प बसण्याच,,त्याला पुढं बोलू न देता त्याच तोंड बंद केलं आणि,

माहितीये न? म चूप बस.

अरे पण त्या आपल्याला चिडवतात.

ते तू बघ.

सम्या हे बरोबर नाय.पण जाऊदे दोस्ती खात्यात तुला सोडलं.पण मी आपली गाणी बोलणार.मग आमच्या ग्रुपच्या आवाजात त्यांचा आवाज बंद झाला.

मुक्कामी पोचल्यावर दोन्ही शाखेचे चार तंबू लागले होते.त्यात दोन मुलांचे दोन मुलींचे.त्यात सगळे स्थानापन्न झालो .आता पाणी आणणे,स्वयंपाक करणे आम्हालाच करायचं होत.

सरांनी पाणी कुठून आणायचं ते दाखवून दिलं.मुलींनी स्वयंपाक करायचा पोळी भाजी सकट .

मुलांनी पाणी भरायच लागेल तितकं.भाज्या करायला ऐच्छिक होत .

अजून तिच्याशी बोलण झालच नव्हत.

तू काय घरी पोचलो ट्रीप झाल्यावर तेंव्हा बोलणार का तिच्याशी?

चंदू चांस च मिळत नाही.सतत ती 

 ढापणी तरी असते तिच्या सोबत किंवा प्राजक्ता तरी.

संधी मिळवायची मग मिळत नसेल तर.आज नाही तर कधी?बघ तूच.

तशी हळूच बघते रे.

वा वा,मग त्यातच खुश असशील तर जा पाणी भरायला.

इतक्यात तीच समोर बालदी घेऊन आली रिकामी.

ए जा पाणी आणून द्या.नुसते उभे काय राहिलात.आम्हीच काम करायची का?

आणतो की,पण काय करणार जेवायला?

ते गिळायला बसलात की कळेलच.

तुला काय करता येत?

म्हटल न बसलास की कळेल.आणि मला काय येत तुला काय करायचय.


अस कस,मलाच खायचेय ना.

म होईल तस मुकाट्याने खायचं.

पाणी आणा आधी.

जातो न,म्हणून मी निघालो तिच्या हातून बालदी घेऊन.चंदू पण आला मागून.

शाब्बास काहीतरी बोललास.

चायला पण ती धड बोलतच नाही.

चलता है रे.असू दे.

दुपारी पंगत बसली.सगळ मुलींनीच केलं होत.आमटी,बटाट्याची भाजी,चटणी,भात आणि पुरी.सरांनी श्रीखंड आणल होत ते देखील होत.एकेक जणी वाढायला येत होत्या.पुढं जात होत्या.स्वयंपाक बरा झाला होता पण पुऱ्या कडक आणि न फुगलेल्या होत्या.सरांच लक्ष होत म्हणून मान खाली घालून पुरी तोडायचा प्रयत्न करत होतो तर आणखी पुऱ्या धरलेला हात पानात दिसला एकदम.पटकन म्हणून गेलो,नको पुरी मला जाम कडक झाल्यात.पाणी पुरी ची पुरी पण कडक असली तरी खुसखुशीत असते.

आम्हाला काय सवय आहे रोज पुऱ्या करायची .किती मेहनत लागते माहिती आहे का?नुसत बोलायला काय जातंय.

चमकून वर बघितल तर ती!

 फणकाऱ्यात पुरी ची टोपली घेऊन पुढं झाली सुधा होती.

ए मला वाढ अजून पुरी.इती चंदू.

कशी रे झालीय?

अरे मस्त मला आवडते तशी.

बघ तुला आवडली ना!काहीजण उगाच नाव ठेवण्यात पटाईत.

असा राग आला चंदू चा.

तुला आयत कारण मिळालं ना इम्प्रेशन मारायला.

तू नाही ना मारलस मग मी मारल त्यात काय?

तू ये बाहेर मग सांगतो.

तो हसत पुरी दोन हातानी तोडत 

श्रीखंडात टोचत खाऊ लागला.

जेवून झालं आणि बाहेर हात धुतले.

प्राजक्ता वाटच बघत असल्या सारखी पळत आली जवळ.

ए बावळट काय बोललास ?ती रडत बसलेय.

बोमला.अरे मी काय बोललो?

पुऱ्या कडक झाल्या त्या कुणाच्या घश्या खाली उतरल्या नाहीत मग?

माझ्याच.पण सवय नाही न ग.आईची प्रत्येक पुरी फुगते.

तीन कपाळावर हात मारला.

अरे ती आई आहे.आम्ही कधी केलं नाही इतकं काम.आणि तिने कणीक मळण्या पासून सगळ केलं बराच वेळ. तळायला पण हट्टाने बसली.का?तर मला हेच जमेल म्हणून.बाकी मुलींना येत होत भाजी वगैरे करण थोडंसं.

तीच तुला माहितीये न,किती बक्षीस मिळलियत आणि त्या करता किती मेहनत घेते ते.पटकन बोलून मोकळा झालास.

अरे पण तीन इतकं मनाला का लावून घेतल.अपमान करायचा हेतू होता का माझा?

 नाही न,पण चटणी छान झालीय म्हणून बोललास की नाही.

हो बोललो.खाल्ल की चव सांगायची सवय आहे आमच्या घरी.नाही बोललो तर आई म्हणते,आज मनास आलेलं दिसत नाही काही. म त्यात काय झालं?

चटणी अनु ने केली होती.

बर मग.

शी बाबा.जा तू.तुलां काही कळतच नाही.

म्हणून प्राजक्ता निघून गेली.

कळेच ना काय झालं.

दुपारी थोड्या विश्रांती नंतर खेळ सुरू होते कुणाचे कुणी गप्पा मारत होते.

ती तंबूत च होती.दिसलीच नाही.

संध्याकाळी जवळच्या धरणावर फिरायला नेलं आम्हाला.तिथंही ती तिच्या ग्रुप मधेच होती.बघायला तयार नाही.

रात्री  कॅम्प फायर ला पण गप्प.चायला मुडच लागेना.त्यात एक त्या शाखेतला कुणी दिवटा स्केच करत होता. सरांचं झालं आणि कुणा कुणाचं झालं मग ती तंबू जवळ उभी होती तीच पण काढल.चंदू म्हणाला ,अरे चांगल काढतो रे.

बर बर .

तू का नाही बघितल?

तिन काढू का दिलं?

तिलाच विचार ना,मी कस सांगू.

एक दगड उचलला चंदू ला मारायला तर तो पळून गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर काही गलबला ऐकला म्हणून गेलो तर त्यांचा ग्रुप मीसिंग होता.सर आणि काही मुल शोधायला धावली होती.मी पण जायला निघालो तर शिट्टी वाजली म्हणून थांबलो.छोटू सर ओरडले,तुम्ही आणि कुठं निघताय ?नाहीतर तुम्हाला शोधायला जावं लागेल.मागे ये.

तंबूत चंदू ला म्हटल काय झालं रे?

अरे सकाळी त्या मॉर्निंग वॉक ला म्हणून धरणावर गेल्या आणि वाट चुकल्या .

थोड्या वेळाने सर आणि तिचा ग्रुप आला.वाट चुकल्या मग सरांनी खूप शोध घेतला तेंव्हा मिळाल्या.

धावत पुढं गेलो त्यांच्या तंबू जवळ.ती रडतच जात होती. ए थांब ना,काय झालं?

जग जाहीर झाल आणि तुला माहित नाही.

चिडू नको ना.काळजी वाटते म्हणून बोलतोय न.त्या तुझ्या सरांचा राग आलाय.अश्या वेळी ओरडत काय बसतात तुम्हाला.

तिच्या डोळ्यात अजून पाण्याची धार आली आणि ती तंबूत दिसेनाशी झाली.

सगळे चूप होते.शिट्टी वाजली म्हणून सगळे गोळा झाले.सर म्हणाले,आज खरतर आपण अजून काही वेळाने निघणार होतो पण नुकतच जे झालं त्यामुळे आपण लगेच निघत आहोत.उशीर झाला तर तुमच्या पालकांचे फोन येऊ लागतील तिकडे ऑफिस मध्ये.तर चला निघुया.

मग सगळी आवरा आवर करुन बस कडे निघालो.ती दिसली.तिच्या जवळ जाऊन म्हटल,अरे यार खरच सिरीयसली घेऊ नकोस सरांचं आणि माझंही.नकळत पुरी कडक झाली म्हणलो.पण पुरी अशीही छान लागते हे प्रथमच कळलं.

ऐकून तीन मान वर करून सरळ नजर भिडवून फक्त पहात राह्यली आणि झटकन पुढं गेली.

आम्हीही सीट पकडल्या.

ती त्याच खिडकीत बसली होती.अजूनही चेहेरा रडवेला होता.

तीन माझ्याकडे बघताच खूण करून रडू नको म्हटल.तिची मान परत खाली.

बस सुरू झाली . चंदूने बाही खेचली.

राहू दे मूड नाही तिचा.

मग मी पुढं बघत सीट वर डोक टेकल.

बस जाताना एकदम शांत होती.

अचानक मागून डोक्यावरून खाकी पुडी चेहेर्यावर आली.वळून बघितलं तर प्राजक्ता.

घे.

लिमलेट ची ऑरेंज गोळी होती मोठी.

पुडी भरलेली होती .

नको मला thanks.

घे.तिने तुला द्यायला सांगितली म्हणून देतेय.

चमकून मागे बघितल.प्राजक्ता म्हणली,अजून रडवणार तिला?

नाही.दोन दे.चंदू पण आहे बाजूला.

तीन दे त्याला.

मागून तिचा आवाज आला.

बघितल तर फक्त मंद हसली.खिडकीतून वारा आला आणि तिचे केस भुरभुर उडू लागले.बघतच राहिलो .ती परत खिडकीतून बाहेर बघू लागली .

चंदू घे.

एकच दे.दोन तुलाच द्यायला सांगितल्यायत.

दोन लीमलेट एकदम तोंडात टाकल्या.

इतकी वर्ष झाली .ती भेटली नाही मग.

पण लिमलेटची चव अजून रेंगाळून आहे जिभेवर.



बुधवार, १२ जानेवारी, २०२२

तू अस का करत नाहीस.

 तू अस का करत नाहीस?

इतकी वर्षे झाली तरी रोज रियाज का हवाय?

फक्त एक दगडावर पाय नाही ठेवायचा.तू दुसरं काही कर न.आमच्या ओळखीची ती आहे न,ती टपर वेअर विकते.बक्कळ कमावते.तुझ्या स्टुडंन्ट्स ना विकता येईल.


तू आधीच वेगळं व्हायला हवं होतंस.


अरे तबल्यावर आयुष्य निघत का? तो झाकीर स्टार आहे. 


वर्षभर करून बघायच मग दुसरी लाईन पकडायची.


तू झी वर सारेगमप त का जात नाही?


तू ऑर्केस्ट्रा त का जॉईन होत नाही?


इतकी फि कोण देणार?


इतकी कमी फि ठेऊन परवडेल कसं?


दर महीना 20 टक्के बचत खात्यात टाकत रहायचे.


गणपती ची किंमत कशी ठरवता?प्रत्येक मूर्तीला माती ते रंग आणि इतर प्री आणि पोस्ट प्रोडक्शन ला किती खर्च येतो ते एकदा काढून ठरवायची किंमत.तुम्ही अस करून बघा.


काही नाही तर वडापाव ची गाडी टक.


इथं काही जमत नसेल तर दुसऱ्या ठिकाणी जाऊन नशीब अजमावून बघ.


मुंबईत आहे तस इन्कम इतरत्र मिळणार  नाही.


तू लग्न का नाही करत?


तू झब्बे च घालत जा मस्त पैकी.


अरे प्रोग्रामला ठिकय पण रोज झब्बा काय घालतो?


तू न कमी बोलतो.


असे बरेच प्रश्न आणि ते तसे विचारणारे लोक भेटतच असतात.


म उवयोग काय?

मग मी मनात म्हणतो,


बाकी काही नाही तरी तुमच्या सारख्या लोकांना तरी होतो माझा उपयोग.

दुसऱ्याला उपदेश करून कल्याण मार्ग  दाखवल्याच,बघ मी कस केलं यश संपादन!अस म्हणायची जागा तर मिळवून दिली तुम्हाला.

😂

असो!एक गंमत सांगतो.

कोणे एकेकाळी अलिगढ हे ठिकाण कुलूप तयार करण्यात प्रसिद्ध होत.

आता मात्र प्रगती झाली.प्रत्येक राज्यात आणि परिणामी देश भर कुलुपं बनू लागली.जनतेला देखील ती घ्यावीच लागली.आधी फक्त ठोक मोठी कुलुपं तयार होत.मग त्यात वैविध्य म्हणून छोटी कुलूप पण आता होऊ लागलीयत.भारत भूमी कुलूपबंद झाली एकूण एक.

कधी मोठस🔒 घ्या कधी छोटस घ्या🔐 पण घ्या.नाही घेतलत तर....

💉💉💉💉💊💊💊💊

नवीन बातमी.नवा शत्रू शोधायला खास देश हितार्थ नवीन🔭 खरेदी करण्यात आलाय.

बदल


बाई पेटना माझी चूल नको नको हे चौथ मूल, अशी खट्याळ बायको मिळाली,माझी गंगू गावाकडं राह्यली,हि ऐका सत्य नारायणाची कथा, तूच सुख कर्ता, डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस ते कामगार सभेच आणि वनिता मंडळ ची सिग्नेचर ट्यून अजून रेंगाळत असते.

या या या गंमत जम्मत, सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत, रात्री पुन्हा प्रपंच टेकाडे भाऊजी न मिने मिने मिने ,ति

कडं विविध भारती वर मधु मालती,जयमाला आणि सिलोन ची सुपर हिट बिनाका गीत माला.

दादरला नाक्यावरच्या पान वाल्याकडे रेडियम सारखा हिरवा लाईट फाईन ट्यून स्टेशन लागलं कि आडवा पसरणारा रेडिओ होता त्यावर ऐकायला मजा येत असे. तेंव्हा हल्लीच्या मुलांचे आजोबा बसत असावे.उंच,गोरा माणूस.पांढरा झब्बा न धोतर नेसून असे मांडी घालून बसलेला.स्वतः तोंड पान खाऊन गच्च मिटून तबीयत मध्ये पान लावत बसलेला असे.

आता कट टू आज संध्याकाळी भावाच्या मुलांना घेऊन बागेत गेलो होतो.पोर इतकी उधळली कि बागभर धावली.घसरगुंडी ,सी सॉ, झोक्यावर भरपूर मुलं आपसात न भांडता भान हरपून खेळत होती.बाग मस्त हिरवळ,झाड,फुल आणि इतर साधनांनी भरलेली होती.मुलांचे पालक सुध्दा एकमेकांच्या मुलांना मदत करत होते झोका,घासरगुंडी वर.मन प्रसन्न झालं.

आत्ता मनात आलं,

बाग म्हटलं कि 

अजून त्या झुडुपाच्या मागे शेवंती लजवंती होते अशीही ओळख बागेची एका वयात होते. लहानपणी वर म्हटलं तस मनसोक्त हुंदडायची,वारा पीत धावायची जागा.

आयुष्याच्या संध्याकाळी कान  टोपी मफलर घालून आजी आजोबा बाकावर  बसायची जागा.मग त्या बाकावर जगलेल्या आयुष्याचे आणि घरातील सद्य परिस्थितीचे हिशोब एकमेकांना सांगायचे.

पण आज असे आजी आजोबा दिसलेच नाहीत.काही होते ते चालत होते हिरवळीवर किंवा नातवंडा सोबत त्यांना खेळायला प्रोत्साहन देत होते.

एक तरुण योगा आणि वॉरमप एक्सरसाईज करत होता.त्याला बघून आमचे पुतणे त्याला जॉईन झाले.


पोस्टमध्ये जुन्या आठवणी रेडिओच्या निघाल्या आणि वाटलं आपण म्हातारे झालो क काय चैला.


पण मग असंही वाटलं.

नक्कीच नाही.कारण,अजूनही दोन शिशु वर्गातली मुलं आपण हँडल करू शकतो त्यांच्या वयाचे होऊन.दॅट मिन्स अजून फिट आहे.

अरे नको त्या घसरगुंडी न झोक्यावर जाऊ मला जमणार नाही हं तुम्हाला सावरायला, अस मनातही आलं नाही.


मग हौ बौट बाग? एकेकाळी पार्कात क्रिकेट आणि हिरवळ बघायला रोज जायचो.आता हे सगळं मनात आलं म्हणजे ?


म्हातारे नाही झालो तर अनुभव संपन्न झालो.

मन तरुणच रहात नेहमी शरीराचं वय काहीही का असेना. आणि बागेच मोकळं ,निसर्ग सुंदर वातावरण मरगळ घालवत.सोबत बागेचे वयानुसार समजत गेलेलं अर्थ आणि उपयोग आता लक्ष्यात येतात.

आधी तुम्ही खेळत होतात तेंव्हा मोठी माणसं तुम्हाला सांभाळत होती.मग तुमच्या मुलांना तुम्ही संभाळत बागेत रमवलत.शेवट मात्र निसर्ग,मोकळी हवा आणि आजूबाजूची चिल्ली पिली हुंडताना बघून खूष होता येत.

आणि एक जण बागेतच भेटला.त्याची पोर देखील खेळत होती.आम्ही गप्पा मारू लागलो.तो म्हणला,मुझे अब कुछ साल हुए गुजरात आकर मगर अभीतक गुजराती ठिकसे नही आती.आप कैसे बोल लेते हो?

म्हटलं,उसमे क्या है?मराठी,हिंदी ,गुजराती आसपास एक जैसीही तो है.

मग तुम्ही काय करता?तर तो इन्कम टॅक्स मध्ये कामाला आहे.सुरत हुन बदली होऊन इकडं आलाय.मी तबला शिकवतो म्हटलं आणि त्यानं हातच मिळवला.अरे इतना अच्छा लगा आपसे मिलकर अब तो के पुछो मत.मै भी ढोलक बजाता हूं. मेरा एक दोस्त भी है जो जलदीही ट्रान्सफर होकर इधर आयेगा तो वॊ भी खूष होगा आपसे मिलकर.वॊ भी गाता बजाता है.

म्हटलं,सेम हिअर.आज जवळजवळ दीड वर्ष मी इथं आहे पण कुणीच स्वधर्मी भेटला नव्हता आज तुम्हाला भेटून आनंद झाला मलाही.मग अब तो आप नंबर दो मै रिंग देता हूं आप मेरा भी नंबर रखलो. फिर जरूर मिलुंगा आपसे तब पहचान रखीये.मग माझ्या युट्यूब चॅनल ची लिंक घेतलीन. घरी आलो तर व्हाट्सप वर त्याच तेच वाक्य परत आलं होतं,बहुत खुशी हुई आपसे मिलकर.

सेम हिअर लिहिलं.

मग आणखी कळलं.बागेतील मोकळ्या ,प्रसन्न आणि निसर्गरम्य वातावरणात मन मोकळे माणसंही भेटतात.आणि अनोळखी असून आपणही लहान मुलांसारखे लगेच ओळखीचे होतो रकमेकांच्या.

आठवणींचा खजिन्यात अजून भर पडते.वय वाढत पण आपण म्हातारे नव्हे तर अनुभव संपन्न होत जातं असतो.

हे होणं जेंव्हा थांबून फक्त आमचा जमाना कसा होता हेच उरेल तेंव्हा मात्र आपलं वय झालं समजावं.

आदरणीय गुरुवर्य, श्री अशोक गोडबोले.

 मी सकाळी लिहिलं त्या प्रमाणे आज खरंच पुन्हा एकदा पितृशोक झाला.

एक आपला जनक असतो जो जन्म देऊन वाढवतो.आणि दुसरा गुरू जो आपल्याला नुसतं साक्षर करत नाही तर अक्षर न अक्षर समजावून सांगतो.

जोवर पितृ छत्र असत तोवर आपण कितीही मोठे झालो तरी अडीअडचणी त त्यांचा आधार असतो. आपल्याला सावरायला ते असतात.आता कसं करू?हे हक्कानं विचारायला जागा असते.अरे काळजी करू नकोस होईल सगळं ठिक, अस त्यांच्याकडून ऐकलं कि हलकं वाटत.

कलेच्या बाबतीत पण सेम तसच असत.म्हणूनच घराणी आहेत संगीतात.गुरू हा पित्या समान असतो.

कितीही शिकलं तरी कुठंतरी गाडअडलं तर त्यांच मार्गदर्शन असत.बाहेर वावरताना त्यांच्या आधाराची,मायेची ऊब सोबत असते.

समोर ते बसलेले असताना वाजवताना ,  

बालपण तसच रहात आपलं.त्यामुळं कितीही वाढलेलं असलं तरी आपलं वय वाढत नाही.रियाज झालेला नसताना त्यांच्या समोर बसायला संकोच वाटतो होम वर्क न केलेल्या विद्यार्थ्यां सारखा.

ते गेल्यावर मात्र मानेवर जोखडाच वजन जाणवू लागतं. आता या दुनियेत आपल्यालाच आपला मार्ग काढायचाय हे कळत. गुरुपौर्णिमेस सरांकडे गेलो कि मस्त वाटायचं ,बरेच दिवसांनी घरी आल्यावर वाटत तस.

रीत म्हणून माझे विद्यार्थी पाया पडतात.ते मी परमेश्वर,आई वडील आणि गुरूंच्या चरणीच रुजू करतो मनातून.कारण त्यांचीच कृपा असते ती.

म्हणून आईवडील आणि गुरू जाण या सारख दुर्भाग्य नाही.आपल्याला पाया पडायला जागाच उरत नाही मग.


तरीही सर,

तुम्ही आई बाबांसारखेच मनात असता.आणि चरणी वंदन नेहमीच राहील.तुम्ही लोक असाल तिथून आशीर्वाद नक्कीच देत रहाल याची खात्री आहे.

बादवे सर,बरेच दिवस रियाज बंद आहे.पण आज तुम्हाला श्रद्धांजली म्हणून तबला घेऊन बसलो होतो.

आई बाबा आणि तुम्ही यांचं ऋण फिटणार नाही आणि ते फेडायची माझी क्षमता नाही ,इच्छाही नाही.

सदैव तुमचा ऋणी,🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹