तू अस का करत नाहीस?
इतकी वर्षे झाली तरी रोज रियाज का हवाय?
फक्त एक दगडावर पाय नाही ठेवायचा.तू दुसरं काही कर न.आमच्या ओळखीची ती आहे न,ती टपर वेअर विकते.बक्कळ कमावते.तुझ्या स्टुडंन्ट्स ना विकता येईल.
तू आधीच वेगळं व्हायला हवं होतंस.
अरे तबल्यावर आयुष्य निघत का? तो झाकीर स्टार आहे.
वर्षभर करून बघायच मग दुसरी लाईन पकडायची.
तू झी वर सारेगमप त का जात नाही?
तू ऑर्केस्ट्रा त का जॉईन होत नाही?
इतकी फि कोण देणार?
इतकी कमी फि ठेऊन परवडेल कसं?
दर महीना 20 टक्के बचत खात्यात टाकत रहायचे.
गणपती ची किंमत कशी ठरवता?प्रत्येक मूर्तीला माती ते रंग आणि इतर प्री आणि पोस्ट प्रोडक्शन ला किती खर्च येतो ते एकदा काढून ठरवायची किंमत.तुम्ही अस करून बघा.
काही नाही तर वडापाव ची गाडी टक.
इथं काही जमत नसेल तर दुसऱ्या ठिकाणी जाऊन नशीब अजमावून बघ.
मुंबईत आहे तस इन्कम इतरत्र मिळणार नाही.
तू लग्न का नाही करत?
तू झब्बे च घालत जा मस्त पैकी.
अरे प्रोग्रामला ठिकय पण रोज झब्बा काय घालतो?
तू न कमी बोलतो.
असे बरेच प्रश्न आणि ते तसे विचारणारे लोक भेटतच असतात.
म उवयोग काय?
मग मी मनात म्हणतो,
बाकी काही नाही तरी तुमच्या सारख्या लोकांना तरी होतो माझा उपयोग.
दुसऱ्याला उपदेश करून कल्याण मार्ग दाखवल्याच,बघ मी कस केलं यश संपादन!अस म्हणायची जागा तर मिळवून दिली तुम्हाला.
😂
असो!एक गंमत सांगतो.
कोणे एकेकाळी अलिगढ हे ठिकाण कुलूप तयार करण्यात प्रसिद्ध होत.
आता मात्र प्रगती झाली.प्रत्येक राज्यात आणि परिणामी देश भर कुलुपं बनू लागली.जनतेला देखील ती घ्यावीच लागली.आधी फक्त ठोक मोठी कुलुपं तयार होत.मग त्यात वैविध्य म्हणून छोटी कुलूप पण आता होऊ लागलीयत.भारत भूमी कुलूपबंद झाली एकूण एक.
कधी मोठस🔒 घ्या कधी छोटस घ्या🔐 पण घ्या.नाही घेतलत तर....
💉💉💉💉💊💊💊💊
नवीन बातमी.नवा शत्रू शोधायला खास देश हितार्थ नवीन🔭 खरेदी करण्यात आलाय.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा