मी सकाळी लिहिलं त्या प्रमाणे आज खरंच पुन्हा एकदा पितृशोक झाला.
एक आपला जनक असतो जो जन्म देऊन वाढवतो.आणि दुसरा गुरू जो आपल्याला नुसतं साक्षर करत नाही तर अक्षर न अक्षर समजावून सांगतो.
जोवर पितृ छत्र असत तोवर आपण कितीही मोठे झालो तरी अडीअडचणी त त्यांचा आधार असतो. आपल्याला सावरायला ते असतात.आता कसं करू?हे हक्कानं विचारायला जागा असते.अरे काळजी करू नकोस होईल सगळं ठिक, अस त्यांच्याकडून ऐकलं कि हलकं वाटत.
कलेच्या बाबतीत पण सेम तसच असत.म्हणूनच घराणी आहेत संगीतात.गुरू हा पित्या समान असतो.
कितीही शिकलं तरी कुठंतरी गाडअडलं तर त्यांच मार्गदर्शन असत.बाहेर वावरताना त्यांच्या आधाराची,मायेची ऊब सोबत असते.
समोर ते बसलेले असताना वाजवताना ,
बालपण तसच रहात आपलं.त्यामुळं कितीही वाढलेलं असलं तरी आपलं वय वाढत नाही.रियाज झालेला नसताना त्यांच्या समोर बसायला संकोच वाटतो होम वर्क न केलेल्या विद्यार्थ्यां सारखा.
ते गेल्यावर मात्र मानेवर जोखडाच वजन जाणवू लागतं. आता या दुनियेत आपल्यालाच आपला मार्ग काढायचाय हे कळत. गुरुपौर्णिमेस सरांकडे गेलो कि मस्त वाटायचं ,बरेच दिवसांनी घरी आल्यावर वाटत तस.
रीत म्हणून माझे विद्यार्थी पाया पडतात.ते मी परमेश्वर,आई वडील आणि गुरूंच्या चरणीच रुजू करतो मनातून.कारण त्यांचीच कृपा असते ती.
म्हणून आईवडील आणि गुरू जाण या सारख दुर्भाग्य नाही.आपल्याला पाया पडायला जागाच उरत नाही मग.
तरीही सर,
तुम्ही आई बाबांसारखेच मनात असता.आणि चरणी वंदन नेहमीच राहील.तुम्ही लोक असाल तिथून आशीर्वाद नक्कीच देत रहाल याची खात्री आहे.
बादवे सर,बरेच दिवस रियाज बंद आहे.पण आज तुम्हाला श्रद्धांजली म्हणून तबला घेऊन बसलो होतो.
आई बाबा आणि तुम्ही यांचं ऋण फिटणार नाही आणि ते फेडायची माझी क्षमता नाही ,इच्छाही नाही.
सदैव तुमचा ऋणी,🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा