मंगळवार, ३० मे, २०१७

प्रवास


प्रवास करताना ट्रेन बरी का लक्झरी ? माझे बडोद्याचे भाऊ आहेत त्यांना ट्रेन च आवडते.का ? तर अतिशय सेफ.निसर्गाची हाक आलीच तर ओ द्यायला डब्यातच सोय असते जी कधीही वापरता येते.बस न त्यांना भीती वाटते.
मला स्लीपर कोच आवडतो.पार्टिशन सारखा दरवाजा लावून घेतला कि आपण आपल्या रूम मध्ये असल्या सारखे निवांत.हवं तर खिडकी उघडा नाहीतर नको.ac चा व्हेंट हवा तसा अडजेस्ट करा.बरं गाडी ठराविक ठिकाणी खानपान करायला थांबवतात.निसर्गाची हाक आलीच तर तिथं सोय असते किंवा रात्री वग्रे ड्रायव्हर ला सांगितलं तर गाडी थांबवतात.
इतकी मोठी गाडी पण सस्पेंशन चांगलं असेल तर धक्का न देता नेते.
कधी कधी जोरात हॉर्न वाजवत ओव्हरटेक होतो. गाडी 90 अंशाचा कोन साधत गररकन वळते तेंव्हा ,
घाटात हेअर पिन बेंड ड्रायव्हर लीलया घेतो तेंव्हा शरीरातील आंड्रेलीन क काय ते वाढवलं जाऊन रोमांचकारी अनुभव ही येतो ज्याच वेगळं भाडं लागत नाही.ऑफ सिझन तर बऱ्याच कमी भाड्यात प्रवास होऊ शकतो. याच ही बुकिंग ऑन लाईन होत त्या मुळे ती ही सोय आहे.
ट्रेन मध्ये दिवसा बरेच विक्रेते येत असतात.रेल्वे चे लोक ही चहा वग्रे घेऊन सारखे फिरत असतात.रात्री हे नसत.पण दिवसा कुणी वर झोपत नसल्यानं खाली च बसतात .मग आडवं होता येत नाही.गुज्जू पब्लिक असेल तर बडबड आणि खाण्याचा सोहोळा रंगत असतो.म्हणून ट्रेन प्रवास करताना लोअर साईड बर्थ बरा वाटतो.
मग स्वतः च व्हेईकल सर्वात मस्त.बाईक प्रवास सबके बस कि बात नही.निसर्गाशी थेट जवळीक असते.थंड उष्ण जे असेल ते वार सरळ येत असत अंगावर.पाऊस ही तसाच भिडतो. पावसाचे थेंब तर चक्क चिंकुटा च काढतात जबरदस्त.मध्ये किंवा मुक्कामी थांबलं कि आरश्यात बघून किंवा नुसते हात बघून समजत किती प्रदूषण होत रस्त्यावर.शरीरभर काळा तपकिरी स्प्रे झालेला असतो.
पण हे अस निसर्गाशी सरळ जुडल जाणच मला आवडत.बाईकने अजून तरी दगा दिला नाही पण जर बया रुसून बसली तर तिला ढकलून न्यावं लागत ते टाके ढिल करणार असत.आधी न नंतर ऑइल चेंज वग्रे करावं लागतं.
पण दुसरे फायदे,
कुठलाही टोल नाका आला तरी त्याच्या नाकावर टिच्चून फु कट जाता येत.भयंकर जॅम मध्ये ही बायकर्स कडकडन पसार होतात.
मग चार चाकी.
हे प्रशस्त वग्रे वाहन.मस्त ac लावा.मुजिक सिस्टम वर आवडत संगीत ऐका. गाडी क्रूझ मोड वर टाका, एवंच ऐश असते.मध्ये खण असतो त्यातून थंड वाटली जी ठेवली असाल तिचा आस्वाद घ्या.पण जास्त गर्दी करू नये नाहीतर st बरी म्हणावं लागेल.तोटा म्हणजे गाडी बघून रस्त्यावर असणारे विक्रेते जास्त च भाव घेतात. पेट्रोल खर्च जास्त. पण गाडी बाळगणारा याची पर्वा करणारा नसतोच.
St प्रवास हि वेगळी मजा आहे.तिकिटाच्या किमतीत पूर्ण शरीराचा आटूक म्याटिक मसाज समाविष्ट असतो. सह प्रवासी वेगवेगळे नमुने भेटतात.कधी कधी मस्त दोस्ती होते.वाहकाशी लांबच्या प्रवासात ओळख होतेच, मग तो आपण चढलो का नाही हे बघूनच डबल बेल देतो.ड्रायव्हर बदलतात त्या मूळ दोन ड्रायव्हर ची ड्रायव्हिंग अनुभवता येते.गाडी मधेच बंद पडली तर डेपोतून दुसरी यायची शक्यता असते.किंवा वाहक दुसऱ्या st त सोय करून देतो.घाटावर च्या गाड्यात खिडकीत जवळ बसताना नीट बघून बसावे.तिकडच्या लोकांना गाडी बरीच लागते अस निरीक्षण आहे.त्या मूळ खिडकीततून ऑक केलेलं असत बरेचदा.हे लाल मातींन मढलेलं वाहन बऱ्याच लोकांच्या मनात जवळीक करून आहे अजूनही. गावाकडं नेणारी st.
सायकल ही उत्तम .पण ग्रुप हवा.कमीत कमी सामान घेऊन जाण महत्वाचं.शारीरिक क्षमता ही हवी.
शेवट आपल्या टू बाय टू न जाणे ही मस्तच.पाठ जितकं वाहून नेऊ शकेल तितकं गाठूड घ्यावं न निघावं.
प्रवास करणे म्हणजे अनुभव संपन्न होणं.तो मात्र घाईघाईत करू नये.वाटेत भेटणारा निसर्ग आणि माणसं यांचा अनादर न करता भेटावं.हे सर्व पाय चालतायत तो वर जरूर करावं मग,
जिंदगानी तो रहेगी
नौ जवानी फिर कहा

गुरुवार, ११ मे, २०१७

मुकद्दर का सिकंदर

फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला होता. नंतर हि
 दोन तीन वेळा गेलो होतो बघायला .जॅम आवडला होता सिनेमा.अमिताभ च एकटेपण,त्यात ही आई सारखी माया करणारी आई नि बहीण मिळणं, बाल पणीच प्रेम,ती मोठेपणी परत भेटणं.जिवाभावाचा मित्र मिळणं. मग त्याच्या साठी त्याग वग्रे मसाला ठासून भरलेला.त्यात रेखा न अमजद,रणजित च कॅरेक्टर टाकलेलं.गीत सेठी ची योग्य प्रमाणात असलेली कॉमेडी.त्याचा न अमिताभ चा पिंटाक झाल्यावरचा झक्क जमलेला सीन.
तर अगदी cd संग्रही ठेवली होती.
पण नंतर बरेच वर्षांनी बघितला परत तर मात्र मत बदललं.त्या वेळी आयुष्याचा अनुभव नव्हता,आताही खूप आहे असं म्हणणं नाही.पण सोसलंय बरच ते ही जाणीव पूर्वक.
या सिनेमात त्याच प्रेम पात्र त्याचा आयुष्यात बालपणी आलंय. ती बिचारी सहानुभूतीने याच्याशी वागते त्याला हा प्रेम समजतो.
ते बालपणी ठिकय. साहेब मोठे झाले तरी तिला विसरू शकत नाही.हे ही ठीक.पण एक प्रसंगी ती याला स्पष्ट सांगतेय,कि बाबा झालं गेलं विसर.ते बालपणी घडलं.माझ्या मनात तुझ्या करता तस काही नाही.तेंव्हा दुसरी बघ न हो मोकळा. पण नाही,हे महाशय देवदास होऊन च बसलेत.
मग यांचा परम प्रिय मित्र आणि ती,यांचं जमत.आता मित्र म्हणतो तर सांग न त्याला खुल्लम खुला आधीच,कि बॉ मी या समोरच्या बंगलेवाली वर इतकुसा होतो तेंव्हा पडून टप्पे टाकून राह्यलोय. म्हणजे तो टप्पे टाकताच नाही.
मग येते जोहरा बाई. हे पात्र याच्या प्रेमात पडत.पण मित्र सांगून जातो सिकंदर च्या आयुष्यातून दूर हो तर ही हिरा चावून जीव देते.तीच एक ठीक .पण सिकंदर बंद दरवाजा ठोकत म्हणतो,
देख जोहरा दरवाजा खोल दे नही तो मैं दिल जला हूं दुनिया जलाकर राख कर दुंगा!!!!!!
क्यो भाई,दुनिया ने क्या बिगाडा तेरा इसमे , अगर जोहरा दरवाजा नही खोलती तो उस्को बोल खोलने को प्यार से.किंवा का उगा जीव आटवतो ,ती नाय म्हणते न म सम्पल न भौ. छोड दे.
त्या अमजद च कॅरेक्टर पण फुकट मरत.जोहरा सिकंदर पे मरती है बातमी बरोबर पण सिकंदर जोहरा को नही चाहता न भाय. वो बात समझ लेता तर शेवट,
या अल्ला ये आखरी वक्त मै भोत बडी गलती कर बैठा
म्हणावं लागलं नसत.
तर अस माझं मत बदललं नंतर.
तरीही सर्व कलाकारांचा अभिनय,स्क्रिप्ट न एकूण ट्रीटमेंट सिनेमा लक्ष्यात ठेवते.गाणी ही सर्व मस्त.रेखा चा कोठा तर मस्त उभा केला होता.मुजरा हा प्रकार करावा तर फक्त आणि फक्त रेखानेच.तिचा मुजरा यात आणि उमराव जान मध्ये बघताना सलाम करावा तिला.शृंगार रस किती खानदानी पद्धतीनं नृत्यविष्कारात उभा करते बाई कि वाह !कुठंही बटबटीत मादकता वग्रे नाही.शालीनता फक्त कुणा खानदानी घरातच नसते तर ती कोठ्यावर ही असते हे च ठासवते रेखा. अदबीने केलेला  आदाब म्हणजे काय तर रेखा चा बघावा.,
तर अस जाणवत जात आपल्याला आवडलेल्या सिनेमातील एकेक .त्या वेळी भयानक चांगला न त्रुटी हीन वाटलेला सिनेमा नंतर त्यातल्या चुका दिसू लागतात.तरीही तो मनात घर करून रहातोच.

रविवार, ७ मे, २०१७

शिवाजी मंदिर


शिवाजी मंदिर!!!!
तिथं जाण हा मनोरंजन नव्हे तर संस्कृतीचा भाग होता. सण असल्यासारखं वाटायचं.त्या बाबतीत माझं भूत झालंय. म्हणजे त्या काळात अडकून पडलोय.
बाबा आवर्जून सर्वांच बुकिंग करीत असत.आधी स्वतः पण लवकरच ती जबाबदारी माझ्यावर आली. दरवेळी बाबा निक्षून सांगत.मिळेल तेव्हड पुढचं न गॅंग वे जवळच बुक कर.तीच सवय मलाही लागली होती.मग प्रयोगाच्या दिवशी मस्त कपडे घालून निघायचं.बाबांना अत्तराचा षोक होता.ते अत्तर आम्हाला ही लावत.मग आईला मध्ये ठेऊन आजूबाजूला आपण बसायचं हे सांगणे होई.तिथं गेलं कि जाहिराती बघायच्या.आगामी आकर्षण कुठलंय,आपण पाहिलंय का? मग काका तपकीर वाले होते तिथं बाबा तपकीर ही घेत.जिन्यात लावलेला मोठा आरसा लक्ष वेधून घेई.पब्लिक ,विशेषतः स्त्री वर्ग तिथून रेंगाळत च चाले.थिएटर मध्ये शिरलं कि सुखद गारवा स्वागत करायचा. डोअर किपर सीट दाखवायला असेच.सर्व मराठी माणस लग्नाला आल्यासारखी आलेली असायची.अत्तर,गजरे याचा मंद सुगन्ध दरवळू लागे. तरी गोंगाट नसे.स्थानापन्न झालं कि समोर शिवकालीन महाला समोर बसल्या सारख वाटे.सज्जा ,खिडक्या अस दृश्य.वर मखमली पडदा.त्यावर हार.दोन्ही कोपऱ्यात ढाल तलवारी मोठ्या साईझ च्या.हळू हळू दिवे मंद होत तिसरी घंटा होई.सर्व जण कान अन डोळ्यात प्राण आणून स्टेज कड पाहू लागत.मग आकाशवाणी झाल्या सारखी उदघोषणा होई,
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम.
चंद्रलेखा सादर करीत आहे तीन अंकी नाट्य प्रयोग
गारंबीचा बापू,,,
मग सर्व माहिती झाली कि,
आणि dr काशीनाथ घाणेकर,,,
मग टाळ्यांचा प्रचंड कडकडाट.
पडदा हळुवार वर जाई एकेक घडी आवरत.समोर साकारलेल नेपथ्य परत टाळी घेई अन रंग देवता प्रसन्न होई.
मध्यनतरात बाहेर वडा आईस्क्रीम वाट बघत असे.नाटक सम्पल कि तृप मनाने परतत असता कुणी कलाकार अवचित दिसे,मग त्याच्या भोवती गराडा होई.येताना बाबा हॉटेलात नेत ती वेगळी मेजवानी.आईला परत गेलं कि जेवण करायला नको म्हणून.
दादरला रहात असल्याने नातेवाईक,ओळखीचे,त्यांच्या ओळखीचे खरेदी किंवा शिवाजी ला नाटक पाहायला येत ते आमच्या कडेच उतरत.यायच्या आधी निरोप येई,मामा सल्याला पाठवून बुकिंग कर अमुक नाटक अमुक दिवशी आहे ते पहायला येतोय. मग मी बुकिंग करायचो.कधी कधी मला ही सोबत म्हणून नेत. मग त्यांची तान्ही बाळ संभाळायला आई कड ठेवीत.कधी रडू लागली तर त्यांना फिरवून आणायचं काम ही करावं लागे. पण त्यात हि आनंद होता.
मग आमचा बब्या नावाचा मित्र तिथं डोअर किपर म्हणून लागला.मग ऑर्केस्ट्रा वग्रे असला कि तो सांगे,या भाई आज.म पव्या ,मी गेलेलो आठवतंय.
प्रदीप,प्रशांत दामले शिवाजी च्या कट्ट्यावर बसलेले दिसत.दामल्या तर मस्त पैकी मळी काढताना पाह्यलाय. मग कलाकारांच्या विषयी बऱ्या वाईट खबरा हि बब्या मुळ कानी पडत.घाणेकर युग सम्पत आलं होतं. दामले,विजय चव्हाण,प्रदीप ,लक्ष्या अन मग भरत जाधव यांचं वादळ आलं.नंतर दादर शी सम्पर्क तुटला.
आता त्या नाट्य संस्था ही नाहीत,ते कलाकार,ते लेखक ही नाहीत.जरा वेगळं वाटत.हल्ली तर जावसच वाटत नाही.त्या वेळी कलाकार कोण या बरोबर लेखक ही जबरदस्त होते.कानिटकर,दळवी सारखे.
आता हि आहेत नवे जुने लोक पण ती मजा येत नाही.तेंव्हा कोवळ्या मनावर कोरल गेलेलं अजून पुसलं जात नाही इतकंच.
तर शिवाजी मंदिर ला साभार दंडवत.अन त्या सर्व लोकांनाही ज्यांनी अश्या आठवणी चा खजिना आमच्या हवाली कायमचा करून दिला.🙏🏻🌹