मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०१७

किल्ले रोहिडा

रोहिडा बघायचा होता पण जमत नव्हतं.काल अचानक जावंस  वाटलं रात्री आठ च्या सुमारास निघालो परळ डेपोत दहा ला पोचल्यावर समजलं सव्वाअकरा न सव्वा बारा अश्या गाडया  आहेत. मग १तास वाट बघत सव्वा अकराची गाडीपकडली.पाचला भोरला उतरलो.दोन पेपर वाले पेपर लावताना दिसले स्टॅन्ड बाहेर. त्यांना विचारलं बाजारवाडी गाडी कधी आहे. एक म्हणला ,मी नवीन आहे इथं मला माहित नाही. दुसरा म्हणला आठ ला येईल गाडी. परत  स्टॅन्ड मध्ये गेलो .. मी आणि दोन म्हातारे गृहस्थ स्टॅन्ड मध्ये होतो .
भटकंती करताना अपरिचित लोकांची भेट होत होत असते . कधी चांगले कधी वाईट अनुभव मिळतात . पण मला जास्त चांगलेच लोक भेटलेत आजवर . सुरुवात या दोघांपासून झाली आजची . बाजारवाडी बस कधी विचारलं तर म्हणले सांगतो कि आली  कि .  गप्पा सुरु झाल्यावर तुम्ही कुठले वग्रे  झालं. तेंव्हा समजलं हे दोघेही बोरिवली च्या सरकारी ऍन गोदामात हमाली करतात. आधी १०० किलो ची गोण  असायची हो,आता आल्यात ४०न २५किलो च्या. मग तुम्हाला पाठदुखी लागली असेल.
तर काय हो ,हे गुढघे आता चालून देत नाहीत. इतक्यात एक गाडी लागली. चालक आणि महिला वाहक कुणी प्रवासी नाही म्हणून जाऊ लागले तर त्या काकांनी थांबवून मला हाक दिली,चला जा हि गाडी जाते बाजारवाडीहून . त्यांचे आभार मानून गाडीत बसलो. दहा मिनिटात बाजारवाडीत उतरलो. गाव शांत. अजून नीट उजाडलं हि नव्हतं . गड मात्र दिसत होता त्याच्या रोखाने पुढं निघालो. एक बाई शेणाची टोपली जमिनीवर रिकामी करत होत्या त्यांना विचारलं,
गडाची वाट हीच का ?
कुठून आला दादा ?
विरार .
मंजे आताच उतरला न ?
हो भोर वरून आलो ती गाडी गेली तिने.
मग चहा नाश्ता काही केलंच नसेल ?
नाही.
जरा थांब,या इतक्या लावतो मग माझ्या घरी ये चहा घे मग निघ गडावर.हे इतकं लावून झालं का निघू. हे काय हाय माहितीय का ?
हो,शेणी थापताय न.न.मग हसली न म्हणली, हा रे . हल्ली लोकांना माहित नसत म्हणून म्हणलो. तिच्या शेणी लावून झाल्यावर तिच्या सोबत निघालो. समोरच छोटं  घर होत. नवरा बाहेर अंघोळ करत बसला होता दारातच त्याला म्हणली,अवो बगा  गडावर निघालेत त्यांना घेऊन अली. चहा घेऊन निघा म्हणलो. तो हि पटकन म्हणला , या आत बसा जाऊन. जेमतेम बारा फुटी घर. दारा नंतर अगदी छोटी पडवी  तिच्यात म्हैस बांधलेली. पूढं  बाजेवर बस म्हणली तिथं बसलो. बाई चहा करायला लागल्या. काल  तर गडावर जत्राच होती माणसांची. शाळेच्या ट्रिपा , बाकी हि लोक. खालपासून वर पर्यंत रंग लागली होती .आम्ही हि देतो करून कुणी म्हणलं तर नाश्ता,जेवण . नवरा शर्ट चढवून आला. म्हैस आता ओरडू लागली न जागीच पुढं माग  होऊ लागली. तिचं खाण्याचं टाइम झालं का ?हा ,धार काढायची आहे तिची. तिला वर मंदिरा जवळ बांधली तर रहात नाही, आम्ही जवळ लागतो. इतक्यात चहा घेऊन बाई आल्या . स्टील चा ग्लास होता. तुम्हाला बशी लागलं का ? हो हे खूप गरम झालंय . मग त्यांनी बशी दिली. चहा पिऊन निघताना म्हटलं,पैसे किती द्यायचे?हट  , पैसे कसले? चहा  नाश्ता न करताच गडावर निघाला म्हणून बोलावलं ,पैसे नको. तरी मी ठेवले पैसे म्हटलं,अहो सकाळी सकाळी असच कसा घेऊ ?पुन्हा येईन तो कालवून येईन मग जाताना नाश्ता आणि जेवण तुमच्याकडे करीन . फोन नंबर देऊन ठेवा. त्यांनी दिला. मग बाई परत  मला वाट दाखवायला आल्या. या पाण्याच्या टाकी खालून जो रस्ता गेला न तो सोडायचा नाही. काही काळजीच कारण नाही वाट अगदी सरळ आहे. मग सुरुवात इतकी प्रेमळ माणसं  भेटून झाली म्हणल्यावर आनंदानं निघालो. गड दिसत होता पण वाट अजिबात नाही. जस जसा पुढं गेलो तशी वाट उलगडत गेली. एक गुराखी पोरगा भेटला त्याला म्हणलो, नीट चाललोय ना रे गडावर ? तो हि म्हणला , हि वाट सोडूच नका. पायवाट च आहे . बांधीव पायऱ्यांची ऐश नाही. चालायची सवय सुटल्याने दमछाक होत होती. पण ऊन चढलं नव्हतं न वातावरण हि गार  असल्यानं मस्त वाटत होत. मध्ये विश्रांतीला बाके हि ठेवलेली आढळली त्यांचा उपयोग केला . शेवटी दरवाजा दिसला पण तो हि आपल्याला सन्मुख नाही. राजांच्या गडाचं वैशिष्ट्य. दरवाजा दिसतच नाही समोरून. तीन दरवाजे पार करून गडावर पोचलो. बऱ्या पैकी विस्तीर्ण आहे गड . थोडाही तटबंदी आणि मला वाटत ७ बुरुज अजूनही उभे आहेत. पाण्याची टाकीही आहे मुबलक ज्यात पाणी आहे. एक तर पाहल्या दरवाजात आहे . रोहिडेश्वर मंदिर बंद होत. त्या समोर काही फुलझाडं लावलेली दिसली. जे कुणी हि बाग  फुलवतायत त्याचं कौतुक वाटलं . काही वाड्याचे अवशेष आहेत बाजूस त्या मध्ये गडावर सापडलेले जात्याचे,, मातीच्या मडक्याचे वगैरे तुकडे लोखण्डी टेबल वर  मांडून ठेवले आहेत. जे कुणी घेऊन न जाताट  तिथंच राहू दिलेत हे बघून बर  वाटलं. गवत गड भर वाढलं होत. आणि अख्ख्या गडावर मी एकटाच होतो. हँड पाहायला तासभर लागतो . बाकी गड  इथून दिसतात म्हण पण धुक्यामुळं दिसत नव्हतं. बाजी प्रभूंची आणि राजांची भेट इथंच झाली. मग खाली निघालो . गडाचा दरवाजा काम करतोय हे जाणवलं. उतरताना रस्त्यात तिघे वयस्क लोक गप्पा मारत  होते त्यांना रामराम केला. मग त्यानी चौकशी केली माझी.
कुठून आले दादा ?
विरार. तुम्ही इथलेच दिसता ?आज गडावर निघाले का ?
अहो रोज जातोय कि,फुलझाडं लावलीयत त्यांना पाणी घालायला.
बघितली तो उत्तम काम करताय . धन्यवाद तुम्हाला राजांचा गाद आज हि असा राखताय .
तुम्ही वस्तीला होता का /
नाही आज लवकर आलो न आलो गडावर जाऊन .
पण तुम्ही सर्व गड बघितला का नीट ?
हो तर . तुमची बाग बघितली,सर्व बुरुज आणि पाण्याची टाकी बघितलं .
हा , मग ठीकाय, पण अंघोळ केली का न्हाय ?
नाही हो.
बर बर . पुढल्या खेपी रहायला या. पाणी पाणी हाय अंघुळी ला ,राहायची बी सोय  हाय.
नक्की नक्की म्हणून त्यांचा निरोप घेऊन उतरू लागलो. एक वळणावर आलो त्या वाटेतून दुसरी वाट दिसली म्हटलं जावं बघून . पण ती बरीच निसरडी होती. बसूनच उतरावं लागलं सर्कस करत . हा माझा प्रयत्न एक माणूस खालून बघत होता. त्याच्या जवळ पोचल्या वर म्हणला ,
गेले त्या वाटंनंच उतरायचं हुत कि , तिकडन का आलात.
काही नाही उगा म्हटलं बघू जाऊन. मग त्यानं चौकशी केली कुठून आलात वगैरे. त्याचा निरोप घेऊन गाडी पकडायला चौकात आलो . भाड्याच्या गाड्या लागल्या होत्या त्यानी बघताच विचारलं,सर भोर ला जाणार का ? हो तुम्ही कधी निघणार ? हे काय माणसं  जमली का निघालो.मग जरावेळ वाट बघावी लागली. काही बाया न म्हातारे आले. आधी मी, एक आजोबा न ड्रायव्हर असे पुढं होतो. इतक्यात एक शाळेचा मुलगा हि येऊन बसला. तो उतरला थोडं पुढं गेल्यावर पण अजून एक आजोबा येऊन बसले . आता हा गाडी कशी चालविल?हा विचार आला मनात . बसलेले दोन्ही बाजूचे म्हातारे हि ऍडजेस्ट करत बसले, त्यांच्या पायाखाली हात घालून तो गियर बदलत होता . भोर येस्तोवर माझ्या उसण भरते तस  झालेलं. त्या ड्रायव्हरला म्हटलं कमल आहे बॉ तुंचीकाशी चालवू शकता गाडी तुम्ही इतक्या अडचणीत .
अहो सर सवय आहे आम्हाला आणि पासिंजर लोकांना हि. तुम्ही होते आज म्हणून एक सीट कमीच भरली मी. बापरे म्हणजे पुढं पाच लोक घेऊन जातात हे .
मग त्याला रायरी गड  किती लांब विचारलं.
तिकडं सर आज जाऊ नका तुम्ही जर परतायचं असेल लगेच आज तुम्हाला तर. कारण रस्त्याची काम सुरु आहेत म्हणून st  कमी आहेत. आमचे गाडीवाले हि तिकडं कमी असतात. तिथं जायला तास दीड तास ,वर  जाऊन यायला तीन तास परत उतरायला तासभर . म्हणजे खाली आल्यावर गाडी मिळालं नाय मिळेल . पुढं भोर ला हि गाडी पुण्याची नाही मिळाली तर मुक्काम करावा लागेल . त्या पेक्ष्या परत या जमलं तस. आपल्या कड तस  कुणी बाइकवाला  जात  असलं त्याला म्हणला  का मला सोड बाबा तर सोडतात हा लोक पण नाहीच मिळाला कुणी तर तुमची पंचाईत व्हायची.
मग राहूदे, तुमचे किती झाले .
दहा रुपये सर. मी वीस देऊ केले तर निग्रहाने घेतले नाहीत. पण म्हणला राजवाडा बघून जा तो जवळ आहे भोर स्टॅन्ड पासून . मग एक पासिंजर ला म्हणला सरांना  वाट दाखवून जा रे . त्या माणसाने दाखवलेल्या वाटेने जाऊन राजवाडा बघितला. आत कन्नड फिल्म च शूटिंग सुरु होत मग परत आलो. मिसळ ला तब्ब्ल पन्नास रुपये मोजावे लागले हाटेलात . पुणा  गाडी न पुण्याला उतरलो न बाजूला सोपारा गाडी लागलीच होती ती पकडली नि घरी सडे आठला  पोचलो . गड बघून झालाच पण इतकी चांगली माणसे भेटली याचा आनंद जास्त झाला .









शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७

आबा

*आबा*
त्याच नाव अर्जुन जाधव होत.पावणे सहा फूट उंच.भक्कम शरीर.माझी त्याची ओळख त्याच्या म्हातारपणी झाली.75 चा तरी असावा.
आमच्या आजोबांचा तांदळाचा व्यापार होता.शेती ,नाटकाचे थिएटर होत.त्या कारणाने बरीच भ्रमंती वेळी अवेळी होत असे.हा अर्जुन जाधव तेंव्हा तरुण होता.दिवसभर कुठं तरी काम करायचा न संध्याकाळी दारू पिऊन असायचा. मारामाऱ्या ही  करायचा कुणी काही वावग म्हणल तर.आजोबांकडे काम मागायला आला.त्यांनी हट्टाकट्टा गडी म त्याला बॉडी गार्ड म्हणून त्यांनी ठेऊन घेतला.तेंव्हा पासून जवळपास तो मरे पर्यंत आमच्याकडे च होता.त्याला का कुणास ठाऊक पण सर्व धोंड्या म्हणून हाक मारत.दारू पिणे सोडलं तर बाकी सज्जन माणूस.कामाला वाघ आणि इमानी.त्याला शरीर रक्षक म्हणून ठेवला पण आमच्याकड आल्या पासून मार खाऊन येऊ लागला.अस का रे ? विचारलं आजोबांनी तर म्हणला,अण्णा तुमच्या कडे आलो न डाळ भात खाऊन न तुमच्या संगती न क काय कळना पण हात उचलत च नाही मारामारी करायला.आजोबांची सावली च होता.ते गेले तेंव्हा घरातल्या माणसाहून अधिक तोच धाय मोकलून रडला अस माझे बाबा म्हणत.मग शेती वग्रे उरली नाही तशी त्याला काम च उरलं नाही.
खूप वर्षांनी आम्ही तिथं रहायला गेलो तेंव्हा हा सत्तरीच्या आसपास असावा.अचानक येऊन ओटीवर बसला.बाबांना म्हणला,बाळ आता तू अलायस बायका पोर घेऊन हिथ तर आता मी तुझ्या कडच रहाणार.
अरे पण आता शेती नाही आपली मग काम काय करशील.
आवडात खपीन. पडेल करीन.बाईंना पोरांना सोबत होईल माझी.बाहेर शेती ची काम असतील तर तिकडं जाईन पण आता आपल्या पायरीवर च राहीन.
मग तो आमच्याकडे राह्यला.माझ्यावर खूप जीव होता.सकाळी आई ऊठ ऊठ म्हणून रागवायची तर तिला हा म्हणत असे,असू दे तुम्ही नका तरास देऊ त्याला.
अरे त्याची अंघोळ व्हायचीय पाणी आटून जातंय न बाहेर चुलीवर.
ते मी बघतो तुम्ही जावा तो उठेल जराश्यान.
मी ही त्याला धोंड्या म्हणून एकदा हाक मारली तर बाबा ओरडले.तू त्याला आबा च म्हणायचं आमची गोष्ट वेगळी आहे.तुझ्या आजोबाच्या वयाचा आहे तो.
मग त्याची माझी गट्टी जमली.थोडी शेती होती तिकडं गाडी जोडून नेत असे.मे महिन्यात आमच्या सागर गडावर न्यायचा.जाळीतली करवंद,जांभळं,अळीव खाऊ घालायचा.आई कडून माझ्या करता गूळ पोहे बांधून घ्यायचा.
बाबांना एकदा म्हणला,बाळ मला देतोस ते पैसे तुझ्या कड जमा करून ठेव.फक्त 2रु तेव्हढे देत जा रात्री ग्लास करता.बाबांनी विचारलं,का साठवतायस पैसे.
तर,सलीन शेट न अण्णांची छकडी बघितली नाय.एकदा तरी त्याला घोड्या च्या छकडी त फ़िरवून आणीन मग हवं तर विकून टाकू.
असा प्रेम करणारा माझ्यावर आणि आमच्या घरावर.
बाबा शनिवारी यायचे.हा रात्री पिऊन मागच्या अंगणात झोपायचा.पण आम्ही tv लावला कि याची बडबड सुरू.
अरे ती काय काचेवर निर्जीव माणसं बघतोस.तुझ्या आज्याच थिएटर होत. खरी खुरी माणस काम करीत.मोठं मोठे लोक इकडं राहून न काम करून गेलेत.थिएटर ला मी तिकीट विक्री केलीय.नाटक झालं कि थेटर झाडताना आमची गडी माणसात भांडण होत कोण झाडणार या वरून.कारण चवली पावली पडलेली मिळायचीच.न तुम्ही हे त्या tv काय बघून राह्यलेत.
मग आई एकदाच दम द्यायची.आबा sss मी जागी आहे अजून.बडबड बंद कर पाहू झोपायचं मला.
मग हो हो बाई तुम्ही झोपा मी गप रहातो.म्हणून हा बकुळी खाली हांतरूण घेऊन जात असे.
शेवटी एकदा शेती च्या सिझन ला एका जवळच्या गावात कामाला गेला तो बरेच दिवस आलाच नाही.मला चैन पडना. चवकशी केली तर आबा आजारी आहे असं कळलं.मग त्या गावात प्रथमच गेलो सायकल घेऊन.आबा कुणाकडे कामाला आहे असं दिसेल त्याला विचारत गेलो.एक दोघे पटकन म्हणले,तू सलीन शेट काय ? सदू भडजींचा नातू! म्हटलं ,हो.
अरे तुझी आठवण काढत असतो म्हातारा सारखी.चल तिकडं त्या घरी आहे.ताप भरलाय त्याला.
त्या घरी गेलो त्यांनी ही कधी मला बघितलं नव्हतं पण आबा च्या बडबडी मूळ ओळखलं.म्हणले तापात पण तुझं नाव घेत असतो. सलीन शेट चला अंगुली धुवा.
हा माग गोठ्यात हांतरुणावर पहुडलेला.
आबा ,कसा आहेस रे ?
आवाज ऐकलन न म्हातारा उठून बसला.
या बया !बघ कस डुकली काढून बसलं ते.अरे बोलतच नव्हता काही.तू हाक दिलीस न बघ उठला.
ते माझं तस नकळत वय असलं तरी डोळ्यात पाणी आलं.
तुझीच वाट बघत होतो रे पोरा.
मला शोधत आलास, तुज्या पायरीवर जन्म काढला त्याच सार्थक झालं.त्याच्या ही डोळ्यात पाणी होत.हात लावून बघितलं तर अंग ऊन ऊन होत पण जास्त ताप वाटला नाही.
तू नको काळजी करू.आता बर वाटतय मला.दोन चार रोजात ठीक झालो कि यिन घरी सांग बाईंना न आत्या बाईला. या लोकांची पण शेतीची काम करायची आहेत.तू निघ अंधारू लागलंय बाई काळजी करतील.
मी माझ्या खिशात दहा रु होते ते त्याच्या भक्कम मुठीत कोंबले न निघालो.मग आणखी काही दिवसांनी बातमी आली ती घरून,तुझा आबा गेला रे.
अजून एक जोडी आमच्याकडे आयुष्यभर होती.गणपत आणि त्याची बायको सरस्वती.
तिला काही वर्ष्या पूर्वी तिकडं गेलो तेंव्हा भेटलो जाऊन.तिची नात घरी होती.डॉक्टरकी शिकतेय म्हणली.आजी आता पटकन कुणाला ओळखत नाही पण तुमच्या घराची आठवण सारखी काढत असते तुम्हाला ओळखेल बघा.आत गेलो तर सरस्वती बसलेली कोचावर.डोळ्यात फक्त पाणी न पांढर फुल.ओळखलं स का गो
म्हणलो न तिच्या पुढ्यात खाली बसलो.चेहेऱ्यावर हात फिरवलन न म्हणली, बाळा तू आलास मला भेटायला .तुझ्या पायरीवर जन्म काढला त्याच सार्थक केलंस रे.तुम्हाला भेटायची इच्छा राह्यली होती.आता दिसत नाही न चालवत नाही.
ही सुद्धा थेट आबा सारखच म्हणली.
तीही आता नसेल.
त्या काळची माणस वेगळी च होती.
न ती आम्हाला विसरली न आम्ही त्यांना.कुटुंबाचे च सदस्य होते.
अश्या लोकांना 🙏🏻🌹

मंगळवार, २४ ऑक्टोबर, २०१७

रंगावलीकार श्री.शैलेश पाटील.

जूचंद्र गावाचे नाव आता रांगोळी या कले करता सर्व ज्ञात झालंय. जवळ राहून हि कधी तिथं जाण जमलं नव्हतं.आज मी आणि भाऊ दोघे गेलो होतो.तिथलं देवीचं मंदिर हि बघायचं होत.आधी तिथं गेलो.मग आम्हाला तिथल्या रांगोळीच्या प्रदर्शनाची उत्सुकता होती.दिवाळीत होत ते,पण जाण जमलं नाही.आज आलो आहोत तर बघू असेल तर अजून म्हणून गेलो तर बघायला मिळाले. शाळेत दोन खोल्या मध्ये काढलेल्या रांगोळ्या बघितल्या.कलाकारांना भेटावं अस वाटलं.विचारपूस केली तर लोकांनी अतिशय आत्मीयते

शैलेश पाटील यांच्या घराचा पत्ता सांगितला. मग सरळ त्यांच्या घरी काही ओळख नसताना जाऊन उभे राह्यलो.
खालच्या मजल्यावर गणपतीच्या मुर्त्या बघायला मिळाल्या. वर गेलो तर ते स्वतः भेटले.मग त्यांच्याशी त्यांच्या कले विषयी जाणून घ्यायचाय म्हणलो तर ते अतिशय मन मोकळे बोलले.स्वागत तर इतकं आपुलकीने केलं कि भारावून जायला झालं.त्यांच्या पत्नी ने सरबत आणून दिल. मग त्यांनी माहिती सांगितली.
सगळं गाव कलाकारांचं आहे.मोदी दुबईत गेले होते तेंव्हा काढलेली रांगोळी यांचीच होती.गावात रांगोळी सोबत नाटक,संगीत चित्रकला यात ही लोक प्राविण्य मिळवून आहेत.जास्त जाणवलं ते हे कि, सर्वांना एकमेकांविषयी आपुलकी,प्रेम आणि आदर आहे.शैलेशजी रांगोळी ,वारली पेंटिंग,मूर्ती कला अशा विविध कलांमध्ये पारंगत आहेत.त्यांच्या काही कलाकृतींचे फोटो त्यांनी दाखवले.माग भिंतीवर दिसतंय ते वारली पेंटिंग त्यांचंच आहे. घरातलं इंटिरिअर ही त्यांची ओळख सांगत .रांगोळी कशी काढली जाते, रंग कुठले वग्रे माहिती हि दिली.ते स्वतः रांगोळी काढायला शिकवत असतात.इतका मोठा कलाकार असून हि त्यांच्यातली नम्रता प्रकर्षाने जाणवते.बोलताना कुठं ही गर्वाचा स्पर्श ही जाणवला नाही.संभाजी महाराजांच रांगोळी चित्र वॉट्स अप ला फेमस झालं.ते ज्यांनी ती भूमिका साकारली त्या ,श्री अमोल कोल्हे यांच्या पर्यंत पोचल्यावर त्यांनी स्वतः एक व्हिडिओ मेसेज त्यांना पाठवला तो ही त्यांनी दाखवला.इतकी दाद मिळवून निगर्वी आहे माणूस.त्यांचं वागणं बघून माझं जे मत आहे कलाकाराच्या बाबतीत ते अजून पक्क झालं.
कलाकार आत जसा असतो तेच कलेच्या रुपात बाहेर येत असत.माणूस म्हणून तो आधी चांगला हवा.शैलेश पाटील अगदी तसेच आहेत.कधी गेलात तर मुद्दाम भेटा. त्यांच्या रांगोळ्या आपण प्रसार माध्यमातून बघत असतोच.त्याच कौतूक ही वाटत पण हे सर्व त्यांना भेटून सांगता आलं तर जे समाधान मिळत ते और च असत.
शैलेश पाटील ,तुमच्यावर ईश्वराची अशीच कृपा राहो आणि उत्कृष्ट कलाकृती तुमच्या हातून घडत राहो अशी सदिच्छा देऊन त्यांच्या घरातून तृप्त मनाने बाहेर पडलो.

गुरुवार, ७ सप्टेंबर, २०१७

गणपती कारखान्यातली एक गंम्मत.

एक किस्सा बाबानी सांगितला होता. आमचा पोयनाडला गणपती चा कारखाना होता. तेंव्हा चा.
साच्या चा गणपती आतून पोकळ असतो.बाबा आठवण सांगायचे,पोयनाडी एक दीड शाना माणूस होता.गणपती आमच्या च कारखान्यात ला हवा असे.पण दरवर्षी येऊन मूर्ती खालून वरून तासभर बघायचा.मग ,ही ठेव बाळ मला म्हणायचा.आणि बदलली तर मला समजेल हो.चक्क टिचक्या मारायचा मूर्ती ला.
बाबांना एक दिवस राग आला.पण त्याला विचारली, का हे करता अस?आमच्यावर विश्वास नाही का ? आम्ही कुणालाही भंगलेली मूर्ती देत नाही.
तुमचं काय सांगता येत का ? बेमालूम चिकटवून दिलीत तर मला काय समजणार!
म्हणताय ते खरंय. नाहीच समजायचं तुम्हाला,आणि गणपती हि न मोडता विसर्जन होईल .पण आम्ही कधीही अस करत नाही.
तरी तो टिचकी वाजवायचा थांबला नाही.
मग बाबांनी त्याची खोड मोडायची ठरवलं.कामगार हि म्हणले,भाऊ लय च झालं याच .आम्ही बघितलंय तो विटेवर नखाने खूण करतो माग म्हणून त्याला मूर्ती त्यानं निवडलेली समजते.मग सर्वांनी ठरवलं याला त्याच साच्या चा दुसरा गणपती द्यायचा.
गणपती शाडू माती चे असत.करताना थोडी चिर जाणे ते कुठं विट फाटणे हे होत च असत.मग तो तयार होताना ते दुरुस्त केलं जातं.मग धोका नसतो.मग या लोकांनी त्यानं केलेली खूण जी विटेवर होती मागच्या बाजूस ती पॉलिश कामात गुळगुळीत केली.एक मूर्ती जरा तडली होती ती व्यवस्थित दुरुस्त केली.तयार झाल्यावर तो न्यायला आला तेंव्हा सर्व मूर्ती न्याहाळू लागला.बाळा यातली माझी कुठली ?बाबा म्हणले तू ओळ्खतोस न नेमकी?मग घे तुझी कुठली आहे ती.त्याला काही जमलं नाही.मग म्हणला,बाळ मी हरलो. तूच दे कुठली ती.मग त्याला ठेवलेली मूर्ती दिली गेली.त्यानं टिचकी मारून बघितली च.टण आवाज करून बघितलंन.हं हा च रे.
पुढील वर्षी अशी खूण वग्रे न करता म्हणला, बाळ मी काय म्हणतो,माझी मूर्ती खालून बंद करून दे.
साच्या ची मूर्ती आतून पोकळ असते.हे त्याला माहित होतं.तरी उगाच आपलं काही चालवायला म्हणत होता.
मग बाबांनी सांगितलं त्याला.
अरे तुला विश्वासाने आम्ही मूर्ती देत आलोय.कधी तरी भंग पावली का? तरी येऊन तयार गणपती वर टिचक्या कसला मारून बघतोस दर वर्षी.आता तुला खर सांगतो ऐक. तुझ्या या अति शहाणपणा मूळ वैतागून तुला तू ठरवलेली मूर्ती न देता दुसरी च पण त्या च साच्याची दिली गुदस्ता. जी थोडी भंगली हि होती.असे गणपती आम्ही परत भिजवून माती त घालून टाकतो.पण तुला मुद्दाम ती दिली.असा रिपेअर केलेला गणपती जास्त च तणतण वाजला.तू खूष होऊन घेऊन गेलास.तुझी खूण आम्हाला समजली जी आम्ही पुसून टाकली होती. आता या वर्षी म्हणतोस कि खालून माती न बंद करा मूर्ती.देतो करून.पण मग काय होईल ते सांगतो.आत भरपूर एअर बबल राहील.विसर्जन करताना मूर्ती पाण्यात बुडवलीस तर तुझ्या आधी गणपती वर येईल.बोल, म्हणत असशील तर खालून बंद करतो.मग मात्र बाबांच्या अक्षरशः पाया पडून म्हणला,माझे डोळे उघडलेस बाबा.या पुढं फक्त मूर्ती ठेव मला.तू देशील ती आनंदाने घेऊन जाईन.

शनिवार, १९ ऑगस्ट, २०१७

उस्ताद झाकीर हुसेन

*झाकीर भाई*
लहानपणी बाबांनी कॅसेट आणून दिली.तबला तबला करतोस न ऐक हे.ती ऐकून स्तिमित झालो.अरे हे काय ऐकलं !अस वाजत हातातून?ते झाकीर भाई होते.मग अब्बाजीं ना ही ऐकलं न उगम स्थान समजलं.बाबांना म्हटलं ,शिकीन तर हाच तबला.मग अब्बाजीं कडे शिकायला ही मिळालं.पण आत्ता फ़क्त झाकीर विषयी माझं मन काय म्हणत ते लिहितो.
झाकीर भाई उस्ताद अल्लारखा साहेब चे सुपुत्र.त्यांना दोन भाऊ आहेत ते ही उत्तम तबला वादक आहेतच.फजल भाई आणि तौफिक भाई.आणि बहिणी ही आहेत.
त्यांच्या घरात इंग्रजी माध्यमात शिकलेला प्रथम मुलगा तेच.
ते सकाळी उठत तबल्याचा रियाज करत.जे सरस्वती माते स वंदन करून.मग शाळेत ख्रिशन पद्धतीत प्रार्थना होई.मुसलमान आहेत म्हणून नमाज वग्रे ही असतच.त्या मूळ ते म्हणतात मी सर्व धर्मीय आहे.आणि सर्व धर्म मला तितकेच सारखे आहेत.त्यांना उत्तम तबला वादक म्हणून ओळखतात च लोक.पण ते आधी उत्तम माणूस आहेत हे प्रथम लक्ष्यात घेतलं पाह्यजे.माझं अस मत आहे,कुठलं ही काम करा त्यात तुम्ही हे आत असता तेच बाहेर देता. तर सर्वात आधी त्यांचा हा गुण अतिशय महत्वाचा आहे.
आता तबल्याविषयी सांगायच तर,
अब्बाजिनी त्यांच्या कानात बारश्याला काही कुराण च्या ओळी म्हणायच्या असतात वडिलांनी.त्या ऐवजी तबला च म्हटला. जे अब्बाजींच हि कलाकार म्हणून तबल्यावरच प्रेम ,भक्ती दर्शवत.असे संस्कार असल्याने तबल्याचा ओढा होताच.पण अब्बाजीं नी कधी ही शिक आता माझ्याकडे म्हटलं नव्हतं.त्यांच्या स्टुडंन्ट ना शिकवताना झाकीर भाई बघायचे.ऐकून वाजवू लागले थोडं. मग बऱ्या पैकी.तो वर गल्लीत मुस्लिम सणांना आणि हिंदू सणांना ढोल ताशा वाजवत असत.लहान पोर इतकं तयार वाजवतो म्हणून लोक बोलवून नेत आणि बक्षीस देत.एक दिवस मात्र अब्बाजिनी हे पाहून बसवलं जवळ आणि म्हटलं,तुझे सिखना है दिल से.हे हो म्हणले.फिर कल से तालीम शुरु 'तेरी.त्या दिवशी रात्री प्रोग्रॅम वाजवून घरी आल्यावर अब्बाजिनी उठवलं.हे बघ हे अस वाजवत ,तू ते कसं वाजवशील.अस करत शिक्षण सुरू झालं.
दरम्यान अब्बाजीना कार्यक्रमात वाजवायला या म्हणून पत्र येत जी इंग्रजी असत.झाकीर भाई वाचून परस्पर लिहीत,मैं नही आ सकता मेरा बेटा आयेगा.मग हे जाऊन वाजवून येत.वय पंधरा असावं.
शिव जी रेकॉर्डिंग ला वाजवायला नेत असत.हळू हळू नाव झालं.मग अमेरिकेत अली अकबर यांच्या संस्थेत तबला शिक्षक म्हणून नोकरीत राह्यले.तिथं अजून प्रोग्रॅम मिळाले.रवी जी नी ही साथीला घ्यायला सुरुवात केली.आणि झाकीर हे नाव चमकू लागलं.
फक्त हिंदुस्थानी संगीतात न रहाता तिथं फेमस बँड मध्ये यांनी वाजवायला सुरू केलं.अब्बाजिनी तबला तिकडं फेमस केला होताच तो झाकीर भाई मूळ अजून फेमस न आवडता झाला.सोलो कार्यक्रम ही सुरूच होते.जे आज तागायत सुरू आहेत.हा एक असा तबला वादक आहे ज्याला दुनियाभर सर्वात जास्त प्रोग्रॅम वाजवणारा म्हणून रेकॉर्ड आहे.
त्यांच्या वादन शैली विषयी म्हणायच तर अप्रतिम तयारी च वाजवणं.फक्त माझं घराणे चांगलं तेच वाजविन अस न करता सर्व घराण्यात जे जे उत्तम आहे ते त्या त्या उस्तादचे नाव घेऊन वाजवून दाखवतात आजही.त्यांचा बाया, म्हणजे डावीकडे असणारा डग्गा अतिशय बोलका असतो.थेट हृदयात उतरणारा. त्याना बाया प्लेअर ही म्हटत लोक.आणि दाया बाया च मिश्रण ही लाजवाब असत.तबल्याचा फिक्स कम्पोझिशन असतात च पण उपज नावाचा प्रकार हिंदूस्थानी संगीतात आहे.गुरू न शिकवलं त्या पलीकडं जाऊन वाजवणं.हे झाकीर भाई कडे आहे. त्यांचा तबला हा नुसता तयारीचा नसून प्रचंड बुद्धी चा तबला आहे.म्हणून त्यांनी आज वाजवलेला कायदा उद्या च्या प्रोग्रॅम ला ऐकलात तर काही नवे असत.म्हणून च लोक अजुनी त्यांना ऐकायला जातात.माझं निरीक्षण अस आहे कि, त्यांचे शेकडो कायदे तयार असतील पण कार्यक्रमात ठराविक कायदे ते बरेचदा वाजवत असतात पण आज वाजवला तसा तो उद्या नसतो.हा बुद्धी चा भाग असल्याने झाकीर च्या देह बोली ची किंवा तबल्याच्या टोन ची नक्कल करू शकाल एकवेळ पण तबल्यातील त्याच्या विचारांची नाहीच.तिथं तो माणूस अत्युच पातळी वर असतो नेहेमी.
तबलजी बरेच वेळी सोलो साठी,इन्स्ट्रुमेंटलिस्ट साठी,भक्ती संगीत किंवा नाट्य संगीत साठी,नृत्या करता,फिल्म संगीत करता आपलं प्रभुत्व मिळवून असतात.पण कुठल्याही प्रकारात आणि कुठल्याही आर्टिस्ट बरोबर कधीही उत्तम वाजवू शकेल असा झाकीर च.शिव जी म्हणतात,बाकी कुणी असलं साथीला तर मी त्याला सांगतो कि, मी हे वाजवतोय हा ठेका आहे.पण झाकीर असेल तर मी डोळे मिटून मनात येईल ते सुरू करतो आणि तो अगदी अचूक मला साथ देतो.
ते मान डोलवतात वग्रे म्हणून लोक म्हणतात गिमिक्स वापरतो झाकीर.पण याच उत्तर झाकीर भाईंनी दिल होत ते अस,
मी विदेशात रॉक जॅझ बरोबर वाजवतो.ते लोक केस वाढवून डोकं हलवीत मग मी ही केलं.आणि मी इतकं गुंग होतो लयीत कि ते आपोआप होत.दुसरं लोकांना ही त्यातून बोलांचा भाव समजतो.
त्यांना रेकॉर्डिंग आणि त्याची साधन याच उत्तम ज्ञान आहे.त्या मूळ अमुक गोष्टी ला नेमका इक्विलायजर कसा हवा हे ते नेमकं सांगू शकतात.
फक्त वादन नव्हे तर सिने संगीत ही त्यांनी कम्पोज केलंय. गाण्यात वाजवलाय ही.
उत्तम शिक्षण आणि व्यसनाधीन नसणं ही देखील त्यांची जमेची बाजू आहे.
देश विदेशात भ्रमण करून ही न थकता एअर पोर्ट वरून सरळ स्टेज वर वाजवलेल पाह्यलंय.थकवा नाहीच.कधी ही वेळेत च येतात.जबाबदारीने वागणं त्यांच्यात आहे.गोळ्या घेत वाजवताना पाह्यलंय.
नवीन कलाकारांना समभाळून आणि प्रोत्साहन देत त्यांच्या बरोबर वाजवणं,जुन्या लोकांच्या पाया पडून त्यांचा मान राखून रहाणं आणि समवयस्क लोकांत थोडी चेष्टा मस्करी करत वाजवणं हा ही वेगळं गुण च त्यांचा.
मीडिया समोर बोलताना कुठं ही भरकटुन कधी ही बोलत नाहीत.
देशाचा उल्लेख नेहेमी मेरा हिंदुस्थान असाच करतात.मंदिरात ,गुरुद्वारात ही जाऊन वाजवतात निःसंकोचपणे पण आणि आदर भक्ती न.सरस्वती वंदना संस्कृत मध्ये असख्लीत म्हणतात.गणेश परण न लाजता म्हणून तबल्यावर तसाच वाजवतात.
खूप खूप लिहिण्या सारख आहे.माणूस आभाळा इतका असल्यानं मी खुजा पडतोय लिहिताना.
थोडक्यात सांगायचे तर
अफाट परिश्रम,गजब हुकूमत वाद्यावर, प्रचंड बुद्धी च वादन
आणि माणूस म्हणून ही सर्वांग सुंदर अस लोभस व्यक्तीमत्व.बघितलं की आपोआप हात त्यांच्या पायाकडे च जातात.
त्यांचे दोन्ही भाऊ ही उत्तम वाजवतात.फजल भाई तबला च वाजवतात.तौफिक भाई मात्र झेंबे वादक झालेत.
नितीन झाकीर भाई वेगळे का ? तर त्याच उत्तर थोडं मला शक्य होत तस वर लिहिलंय.
पण त्यांचे सख्खे भाऊ मात्र हात तयार असून त्यांच्या सारखे होऊ शकले नाहीत.फजल भाई म्हणले होते, आमच्या घरी दोन वट वृक्षा सारखी मोठी माणसे असल्यानं आम्ही कितीही वाजवल तरी लोक म्हणतात,यार अब्बाजीं कि तरह नही या झाकीर कि तरह नही .तेच जर स्टुडंन्ट नी वाजवल तर कौतुक होईल पण आमची तुलना मात्र या दोन थोर कलाकारांशी होत राहते.म्हणून तौफिक भाई दुसऱ्या वाद्यांत तबल्याच ज्ञान वापरून वाजवू लागले नी यशस्वी झालेत.
शेवटी या प्रश्नाचं उत्तर असच
झाकीर ,अब्बाजीं सारखी माणसं येतानाच तयार होऊन येतात.अब्बाजीं झाकीर भाई विषयी म्हणले होते,
मैने उसे सिखाया जरूर पर उसे खुदा ने ही भेजा है के जा बेटा नीचे जा के लोगो को तबला सुना.
आणि काय लिहू ?
लेखन सीमा🖌

गुरुवार, १७ ऑगस्ट, २०१७

द वॉल

अमेरिकन स्नाईपर शेन त्याच्या स्पॉटर अॅलन सह एका साईटवर वाळवंटात आलेत.
स्पॉटर मंजे स्नाईपर च्या बाजूला च झोपून त्याच्या स्कोप मधून बघून सांगत असतो,
टार्गेट किती अंतरावर आहे.वारा कसा न किती वाहतोय.हवेत ह्युमीडिटी किती आहे.कारण या सर्व गोष्टी वर बुलेट चा प्रवास अवलंबून असतो.या सर्व गोष्टींचा अंदाज घेऊन ठरवलं जात कधी शॉट घ्यायचा.समोर च्या स्नाईपर न डागलेली गोळी सुटली कि जो आवाज येतो तो जरासा उशिरा येतो.त्या आवाजाला किती सेकंड लागले यावरून अंतर मोजल जात अदमासे.हे सगळं या प्रकारच्या सिनेमात बघायला मिळत.
तर हे दोघे साईट वर दबा धरून बसल्याला 22 तास झालेत.समोर वाळूत एकीकडे क्रेन आहे.एक गाडी आहे,कचऱ्याचा ढिगारा दूर आहे.आ8णि एक दगड रचून उभी केलेली भिंत आहे.
शेन उठून उभा रहातो.आता धोका नाही असं वाटून आणि मैदानात उतरतो खात्री करून घ्यायला कि धोका नाही .एक मुडदा गाडी च्या बाजूला पडलेला आहे.तिकडून जाताना त्याला काही जाणवत तोच एक गोळी त्याच्या शरीरात घुसते आणि तो कोसळतो.पलीकडचा स्नाईपर अजून दबा धरून असतो आणि हे गाफील पण त्याच्या समोर येतात.जोडीदार पडला म्हणल्यावर अॅलन झिग झ्याग धावत येतो.म्हणजे स्नाईपर ला निशाणा घेता येऊ नये म्हणून.पण त्याला ही अचूक टिपलं जात.पायात गोळी बसते.तो त्या भिंती च्या माग आश्रय घेतो.जोडीदाराशी वॉकि टॉकी वरून बोलू लागतो.जराही हलू नको सांगतो.रेडिओ वरून सुटके करता मदत मागू लागतो तर रेडिओ नाकाम होतो.
पायातली गोळी काढतो.इतक्यात वॉकि टॉकी वर आवाज येतो.तू कुठं आहेस.पोझिशन सांग.हा सांगू लागतो. पण बातचीत सुरू असताना त्याला पलीकडच्या ची भाषा अमेरिकन नसल्याच जाणवत.मग सरळ विचारतो तू कोण बोलतोयस ?
त्या स्नाईपर न त्यांची रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्यून करून तोच बोलत असतो.तो म्हणतो माझ्याशी बोलत रहा नाहीतर जोडीदाराला गोळी घालेन तो अजून मेला नाहीये. नाईलाजाने हा बोलत रहातो.दरम्यान शेन शुद्धीत येऊन रायफल घेऊन कचऱ्या च्या ढिगाऱ्याच्या दिशेने शॉट घेऊन बघतो तर पलीकडून गोळी खातो. आता भिंती माग अॅलन एकटाच आहे.तो युक्ती न रायफल हस्तगत करून घेतो.हेलिकॉप्टर चा आवाज ऐकू येऊ लागतो.आपली सुटका करायला येतायत हे दिसताच अॅलन ती भिंत हातानं ढकलतो.या मूळ येणाऱ्या ना आपली उपस्थिती ही कळेल आणि समोर चा स्नाईपर जर हलला किंवा शूट करू लागला तर ते ही समजेल.मग स्वतः रायफल हाती घेऊन त्या ढिगाऱ्याच्या दिशेने नेम धरतो. तिथून 2 बुलेट फायर होताना दिसतात.याच्या आजूबाजूने जातात.त्या फायर च्या रोखाने हा बंदुकीतली एकच असलेली गोळी फायर करतो.पलीकडून उत्तर येत नाही.म्हणजे समोरचा सम्पला. हेलिकॉप्टर लँड होत. दोघांना स्ट्रेचर वर घेऊन विमानात घेतलं जातं.टेक ऑफ होतो ,,,,,
मग
बघा.थ्रिलिंग आहे.

सोमवार, ७ ऑगस्ट, २०१७

मंगळा गौर

 काल आबांच्या वाड्यावर थोरल्या सून बै ची मंगळागौर झाली म्हण.जाता जाता गडबड दिसली म्हणून डोकावलो तेंव्हा समजलं.
लहानपणी माझ्या बहिणींच्या मंगळागौरी झाल्या त्या आठवल्या.
सगळ्या बायका रात्री जमत.पुरुषांना बाहेर पिटाळले जाई. ते सर्व लोक्स मग बाहेरच्या अंगणात पत्त्यांचा डाव मांडीत. आम्हाला ही बाहेर खेळा म्हणत.फक्त मुलींना न बरणी लोक ना आत एंट्री असायची.
आई ताई आत्या सकट सर्व जणी पूजा करायला जमल्यात मग आता जोरात हशा ,टाळ्या न बडबड ती ही मोठ्याने कसली चाललीय म्हणून डोकावलं तर वेगळंच दृश्य.
बसून घालतात म्हणून बस फुगडी,पिंगा,खुर्ची का मिरची वग्रे खेळ असतात ते बघितलं.प्रथमच.त्या ही पेक्ष्या आश्चर्य म्हणजे आई ला हे सगळं सॉलिड जमतंय न सर्वजणी मामी मामी करतायत!एला आई ती गाणी ही फटाफट म्हणतिय!!हे शिकली कधी?घरात एकदाही ऐकलं नाही.या धक्क्यातून बाहेर पडायच्या आधी ,ए मुला तिकडं जा पाहू बाहेत इकडं आज नाही यायच.आई काही यायची नाही.
ओ पण तहान लागलीय.
खेळतोय आम्ही न तुला रे कशी तहान लागते?
सल्या sss आलाच आहेस तर ते कॉफी च ताट ने न दे पुरुष मंडळी ना.पान सुपारी ही बघ बाहेरच्या ताटात सम्पलीय का ती.नसली तर आतून नेऊन दे.आम्ही ही विसावतोय पाच मिनिटं.मग परत आत नाही घेणार.मग कॉफी, पान सुपारी दिली नेऊन.आम्ही ही हाणली दोन दोन कप.मी न माझा आते भाऊ. खडाक, परत दार लागलं.मग आतून परत कल्ला सुरू झाला. या गावचा त्या गावचा पाटील नाही आला ,सुरू.
बाबा ना जाऊन म्हटलं,ओ तुमची बायको बघा कसली गाणी म्हणतिय,खेळतेय.
हा रे म्हैतीय.ताई ची मंगळागौर आहे न.म्हणून न आलोय इकडं.तेच सुरू आहे.मग परत वाटलेली पान हातात घेत म्हणले,किलवर किलवर हुकूम माझा. तिकडून नाना म्हणले,चैला बाळ माझ्या कडे बघायचस तरी करण्या पूर्वी.अस्सा घोटाळा करतोस.ए सल्या ती काता ची डबी दे इकडं.अन बडीशेप सारी सम्पवलीत न टोणग्यानो.
साला इकडं हे लोक बिझी तिकडं त्या आत घी ना त.
एक बरं होत इतक्या रात्री आम्ही क्रिकेट ची बॅट काढली तरी कुणी काही बोलत नव्हतं.हळूच रस्त्याकडेला असलेल्या विहिरी च्या काठावर बसून आलो तरी कुणी काही बोलत नाही.आजूबाजू च्या घराच्या बाहेर चे दिवे सुरू असल्याने लख्ख उजेड दिवाळी सारखा.
मग मध्यरात्री नंतर घुमून घुमून सर्व घुमा बाई दमल्यावर दार उघडलं बॉ एकदाच.त्या वेळी अश्या प्रसंगी ठेवणीतले अत्तर काढलं जाई त्याचा उग्र पण सण समारंभाची जाणीव करून देणारा सुगन्ध ही दारा बाहेर आला.
आटोपलं का तुमच,परत एकदा कॉफी येऊ द्या आमचं नाही झालं अजून.म्हणून पुरुष लोक पुन्हा डावात रंगले.
तर हे सर्व आठवलं हो आबांच्या वाड्यात डोकावून. थोरल्या सून बाई ही झक्क नटल्या होत्या.असो.
मग एक तीव्र इच्छा झाली .त्या लाम्ब नाव वाल्याला सांगावं जाऊन,बघ लेका अशी असते मंगळागौर.
तशी नाही जशी तू दाखवलीस.पेशवीण बाई न मस्तानी खुर्ची का मिरची खेळल्या नसतील तू दाखवल्यास तश्या.
हल्ली ची पिढी हे अनुभवेल का नाही कुणास ठाऊक.हल्ली मंगळागौर ही हॉल घेऊन करतात.त्यात मजा नाही राव.आपल्या घरी मग ते वाड्यात ल नसलं चाळीतील असलं तरी त्यात मंगळागौर साजरी करणं यात च गम्मत होती खरतर त्या खेळात सर्वांग सुंदर व्यायाम ही होतो अशी रचना आहे.पूर्वी बायका स्वयंपाक घरातच जास्त असत. सतत दडपणा खाली.त्यांना या निमित्ताने मोकळीक मिळावी,ऐकमेकींशी थट्टा विनोद करून ताज तवाने व्हावं ही भावना असली पाह्यजे त्यात.
माझ्या आईच च मला आश्चर्य ,कौतुक न अभिमान ही वाटला. आश्चर्य या करता कि या बाईला इतकं सगळं येत ?
अभिमान या करता,
सर्व जणी मामी मामी करीत असत.ए मामी मला बस फुगडी शिकव न.ए मामी परवा पासून आलीय न तुझ्या कड मग आधी काय झालं होतं शिकायला,आत्ता मामी आपण पिंगा च घालूयात.
असा घोळका असे आई भवती.तिला इतकी प्रसन्न पाहून आम्ही ही खूष व्हायचे.
बाकी ही बायकांचं चाले ते ऐकायला मजा यायची.
शके ss कसली भारी साडीय!विदेशी दिस्तीय.
हो म जारजेट आहे जारजेट.यजमानांनी आणलीय हो फारीन हुन.
हं ss नवराच अस्सा गटवलन बोटी वरचा तिचे स्प्रे ही इंपोर्टेड असतात हो,न ती लिपस्टिक ही.
सासू बाई तुम्ही ही सांगा जावयाला म्हणावं एखाद बाटली दिली स सासूला तर काही बिघडत नाही.
हो मी मागतीय.हे आणतात न मला.
अगो आत्ये ते आपलं देशी ,विदेशी बघ वापरून कसं दरवळ त ते.
नको बै ,नाना हपिसातून येतात त्या रस्त्यावर आहे त्यांच ठरलेलं दुकान तिथून आणतात खस,वाळा. आम्हाला नकोत बाई ते विदेशी फवारे महागडे.
शके ही साडी मला नाही हं दाखवलीस अल्ये होते काल तर तुझ्या कड.काय ग किंमत असेल.
रजे बस कर हो चवकशा. तुला ही बघू हो बोटीवरचा नवरा.
ए मग त्या तिच्या हपिसातल्या राजेश खन्ना च कस ग होईल.
तुम्ही उगा भलत सुरू करू नका हो,मामी चल ग आपण खेळू.
अस कै कै चालायचं.