शनिवार, ६ मे, २०२३

सावंत कुटुंबीय.

 

मित्र परिवार नंबर दोन.

यांचं घर आणि त्यात ओटीवर ठेवलेलं बाकड हा आमचा अड्डा होता.

कुटुंब दादा,मामी,आजी आणि सावन्त भावन्ड अस कुटुंब.

विवेक,संजय,अविनाश आणि वंदना अशी मुल दादांची.

मोठा विवेक नाव सार्थ करणारा.तसा अबोल.कधी तक्रार म्हणून कसली नाही.अवी च्या पायाला भिंगरी लागलेली.सर्वत्र आणि सर्व ठरात वावर.घरात कमीच तो.ओळखी भरपूर.

संदीप लहान.तो त्याच्याच् नादात असणार.कामाला वाघ पण मनात नसलं तर संपलं.

वंदू कामसू,समजूतदार आणि लाजाळू .पण तशी खोडकर पण.आमच्या सर्व शेजारी असणाऱ्या मुल मुली एकत्र कुटुंब असावं तस नात होत.एकदा होळीला आम्हा मित्रांना आईन भेळ करून पार्टी दिली.आणि मुलींना बोलवायच राहील.तर वंद्या नी तिच्या मैत्रिणी न रात्री दारात मोठ मोठे दगड आणून रचून ठेवलेले.मग विचारलं तर म्हणली,त s तुम्ही पार्टी करा आम्हांला बोलवू नका मग असंच करणार आम्ही.

नंतर एकदा त्यांच्या घरून मी निघत होतो.सापाला नाही पण झुरळ मला आवडत नाही हे तिला कळलं होत.अचानक आतून थांब रे म्हणत आली.काय विचारलं तर हातात काडे पेटी ठेवलीन.हे काय?

काय नाय तुला दिली ती जा घेऊन.

मी उघडून बघितलं तर मोठ झुरळ बाहेर आलं.मी तशीच टाकून पळालो वेस्कटी कड.वंद्या तुला बघतो थांब नंतर म्हणत.अशी खट्याळ हि.आजही न चुकता राखी येते तिची.पोस्ट कृपेने मला मिळत नाही कधी ते वेगळं.

राहिला तो आमचा संजू बाबा.

हा पण रवी सारखा पढाकू.बुटका होता पण हेअर स्टाईल अमिताभ सारखी.कपडे अप टू डेट. गोट्या खेळण्यात संजू,उदय नी आमचे बंधू म्हणजे x पर्ट. तिघांच्या कड मोठ्या बरण्या भरून जिंकलेल्या गोट्या.संजू उदय कड आजही असतील कदाचित.

संजू शिक्षणात हुशार.दादा रिटायर्ड झाल्यावर घरची जबबादारी यान समर्थ पण अंगावर घेतलीय ती आज तागायत पेलतोय.आता घर नव्यान मोठ बांधलन.अनेक  व्यवसाय केलंन उत्तम पण.तब्येती मूळ मग शिकवण सुरु केलंन ते आज गावात संजू सरांचा क्लास म्हटलं तर कुणीही सांगेल कुठ ते.

याचं मला आश्चर्य वाटत.सकाळी 8 ते संध्याकाळी सहा हा क्लास रूम मध्ये शिकवत बसलेला असतो.इमानदारीत शिकवण हा आमचा दोघाचा स्थायी भाव.याच शिकवण बघून वाटत याला याच्या मेहनती चा योग्य मोबदला त्या गावात मिळतच नाहीये.मुंबईत असता तर खोऱ्यान ओढलं असत.

आई वडिलांना सुख व्हाव असा पुत्र.त्यांच्या मागे त्याचा संसार यान पूर्ण केला.भाऊ बहीण यांची लग्न.भावाना दुकान काढून दिलन आहे.

याच्या बद्दल तक्रार एकच असते माझी.हा माणूस घरा बाहेर निघतच नाही.दरवेळी बोलतो तर याच उत्तर,

कधी निघू सांग.सकाळ पासून बसलेला असतो शिकवत.मग बाहेर पडायला इच्छा होत नाही.

म्हटलं मेल्या निदान दुकानी तरी जात जा तुझ्या तरी ऐकत नाही.या माणसाला चप्पल बुट यावर खर्च करावा लागत नसणार.

तल्लाख शार्प.लक्ष माझ्या सारखं नेट वरून सर्वत्र असत.नव्या कल्पना याला सुचत असतात धंद्या च्या पण शिकवण्यात अडकून पडतो.

आणि आमच्यातलं साम्य म्हणजे दोघे ब्रह्मचारी.

रोज संध्याकाळी आमचं बोलण असतच जनरली.एकमेकांना त्याच त्या रोजच्या अडचणी सांगायला हक्काची जागा आहे.याला मी कधीही मनात येईल तेंव्हा फोन करू शकतो असा मित्र.एकमेकांचे सल्ले देण घेणं सुरूच असत आमचं.माझ्या आयुष्यात याच तिथ पलीकडं फोन वर का होईना असणं खूप धीर देऊन जात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा