बुधवार, १२ जानेवारी, २०२२

तू अस का करत नाहीस.

 तू अस का करत नाहीस?

इतकी वर्षे झाली तरी रोज रियाज का हवाय?

फक्त एक दगडावर पाय नाही ठेवायचा.तू दुसरं काही कर न.आमच्या ओळखीची ती आहे न,ती टपर वेअर विकते.बक्कळ कमावते.तुझ्या स्टुडंन्ट्स ना विकता येईल.


तू आधीच वेगळं व्हायला हवं होतंस.


अरे तबल्यावर आयुष्य निघत का? तो झाकीर स्टार आहे. 


वर्षभर करून बघायच मग दुसरी लाईन पकडायची.


तू झी वर सारेगमप त का जात नाही?


तू ऑर्केस्ट्रा त का जॉईन होत नाही?


इतकी फि कोण देणार?


इतकी कमी फि ठेऊन परवडेल कसं?


दर महीना 20 टक्के बचत खात्यात टाकत रहायचे.


गणपती ची किंमत कशी ठरवता?प्रत्येक मूर्तीला माती ते रंग आणि इतर प्री आणि पोस्ट प्रोडक्शन ला किती खर्च येतो ते एकदा काढून ठरवायची किंमत.तुम्ही अस करून बघा.


काही नाही तर वडापाव ची गाडी टक.


इथं काही जमत नसेल तर दुसऱ्या ठिकाणी जाऊन नशीब अजमावून बघ.


मुंबईत आहे तस इन्कम इतरत्र मिळणार  नाही.


तू लग्न का नाही करत?


तू झब्बे च घालत जा मस्त पैकी.


अरे प्रोग्रामला ठिकय पण रोज झब्बा काय घालतो?


तू न कमी बोलतो.


असे बरेच प्रश्न आणि ते तसे विचारणारे लोक भेटतच असतात.


म उवयोग काय?

मग मी मनात म्हणतो,


बाकी काही नाही तरी तुमच्या सारख्या लोकांना तरी होतो माझा उपयोग.

दुसऱ्याला उपदेश करून कल्याण मार्ग  दाखवल्याच,बघ मी कस केलं यश संपादन!अस म्हणायची जागा तर मिळवून दिली तुम्हाला.

😂

असो!एक गंमत सांगतो.

कोणे एकेकाळी अलिगढ हे ठिकाण कुलूप तयार करण्यात प्रसिद्ध होत.

आता मात्र प्रगती झाली.प्रत्येक राज्यात आणि परिणामी देश भर कुलुपं बनू लागली.जनतेला देखील ती घ्यावीच लागली.आधी फक्त ठोक मोठी कुलुपं तयार होत.मग त्यात वैविध्य म्हणून छोटी कुलूप पण आता होऊ लागलीयत.भारत भूमी कुलूपबंद झाली एकूण एक.

कधी मोठस🔒 घ्या कधी छोटस घ्या🔐 पण घ्या.नाही घेतलत तर....

💉💉💉💉💊💊💊💊

नवीन बातमी.नवा शत्रू शोधायला खास देश हितार्थ नवीन🔭 खरेदी करण्यात आलाय.

बदल


बाई पेटना माझी चूल नको नको हे चौथ मूल, अशी खट्याळ बायको मिळाली,माझी गंगू गावाकडं राह्यली,हि ऐका सत्य नारायणाची कथा, तूच सुख कर्ता, डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस ते कामगार सभेच आणि वनिता मंडळ ची सिग्नेचर ट्यून अजून रेंगाळत असते.

या या या गंमत जम्मत, सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत, रात्री पुन्हा प्रपंच टेकाडे भाऊजी न मिने मिने मिने ,ति

कडं विविध भारती वर मधु मालती,जयमाला आणि सिलोन ची सुपर हिट बिनाका गीत माला.

दादरला नाक्यावरच्या पान वाल्याकडे रेडियम सारखा हिरवा लाईट फाईन ट्यून स्टेशन लागलं कि आडवा पसरणारा रेडिओ होता त्यावर ऐकायला मजा येत असे. तेंव्हा हल्लीच्या मुलांचे आजोबा बसत असावे.उंच,गोरा माणूस.पांढरा झब्बा न धोतर नेसून असे मांडी घालून बसलेला.स्वतः तोंड पान खाऊन गच्च मिटून तबीयत मध्ये पान लावत बसलेला असे.

आता कट टू आज संध्याकाळी भावाच्या मुलांना घेऊन बागेत गेलो होतो.पोर इतकी उधळली कि बागभर धावली.घसरगुंडी ,सी सॉ, झोक्यावर भरपूर मुलं आपसात न भांडता भान हरपून खेळत होती.बाग मस्त हिरवळ,झाड,फुल आणि इतर साधनांनी भरलेली होती.मुलांचे पालक सुध्दा एकमेकांच्या मुलांना मदत करत होते झोका,घासरगुंडी वर.मन प्रसन्न झालं.

आत्ता मनात आलं,

बाग म्हटलं कि 

अजून त्या झुडुपाच्या मागे शेवंती लजवंती होते अशीही ओळख बागेची एका वयात होते. लहानपणी वर म्हटलं तस मनसोक्त हुंदडायची,वारा पीत धावायची जागा.

आयुष्याच्या संध्याकाळी कान  टोपी मफलर घालून आजी आजोबा बाकावर  बसायची जागा.मग त्या बाकावर जगलेल्या आयुष्याचे आणि घरातील सद्य परिस्थितीचे हिशोब एकमेकांना सांगायचे.

पण आज असे आजी आजोबा दिसलेच नाहीत.काही होते ते चालत होते हिरवळीवर किंवा नातवंडा सोबत त्यांना खेळायला प्रोत्साहन देत होते.

एक तरुण योगा आणि वॉरमप एक्सरसाईज करत होता.त्याला बघून आमचे पुतणे त्याला जॉईन झाले.


पोस्टमध्ये जुन्या आठवणी रेडिओच्या निघाल्या आणि वाटलं आपण म्हातारे झालो क काय चैला.


पण मग असंही वाटलं.

नक्कीच नाही.कारण,अजूनही दोन शिशु वर्गातली मुलं आपण हँडल करू शकतो त्यांच्या वयाचे होऊन.दॅट मिन्स अजून फिट आहे.

अरे नको त्या घसरगुंडी न झोक्यावर जाऊ मला जमणार नाही हं तुम्हाला सावरायला, अस मनातही आलं नाही.


मग हौ बौट बाग? एकेकाळी पार्कात क्रिकेट आणि हिरवळ बघायला रोज जायचो.आता हे सगळं मनात आलं म्हणजे ?


म्हातारे नाही झालो तर अनुभव संपन्न झालो.

मन तरुणच रहात नेहमी शरीराचं वय काहीही का असेना. आणि बागेच मोकळं ,निसर्ग सुंदर वातावरण मरगळ घालवत.सोबत बागेचे वयानुसार समजत गेलेलं अर्थ आणि उपयोग आता लक्ष्यात येतात.

आधी तुम्ही खेळत होतात तेंव्हा मोठी माणसं तुम्हाला सांभाळत होती.मग तुमच्या मुलांना तुम्ही संभाळत बागेत रमवलत.शेवट मात्र निसर्ग,मोकळी हवा आणि आजूबाजूची चिल्ली पिली हुंडताना बघून खूष होता येत.

आणि एक जण बागेतच भेटला.त्याची पोर देखील खेळत होती.आम्ही गप्पा मारू लागलो.तो म्हणला,मुझे अब कुछ साल हुए गुजरात आकर मगर अभीतक गुजराती ठिकसे नही आती.आप कैसे बोल लेते हो?

म्हटलं,उसमे क्या है?मराठी,हिंदी ,गुजराती आसपास एक जैसीही तो है.

मग तुम्ही काय करता?तर तो इन्कम टॅक्स मध्ये कामाला आहे.सुरत हुन बदली होऊन इकडं आलाय.मी तबला शिकवतो म्हटलं आणि त्यानं हातच मिळवला.अरे इतना अच्छा लगा आपसे मिलकर अब तो के पुछो मत.मै भी ढोलक बजाता हूं. मेरा एक दोस्त भी है जो जलदीही ट्रान्सफर होकर इधर आयेगा तो वॊ भी खूष होगा आपसे मिलकर.वॊ भी गाता बजाता है.

म्हटलं,सेम हिअर.आज जवळजवळ दीड वर्ष मी इथं आहे पण कुणीच स्वधर्मी भेटला नव्हता आज तुम्हाला भेटून आनंद झाला मलाही.मग अब तो आप नंबर दो मै रिंग देता हूं आप मेरा भी नंबर रखलो. फिर जरूर मिलुंगा आपसे तब पहचान रखीये.मग माझ्या युट्यूब चॅनल ची लिंक घेतलीन. घरी आलो तर व्हाट्सप वर त्याच तेच वाक्य परत आलं होतं,बहुत खुशी हुई आपसे मिलकर.

सेम हिअर लिहिलं.

मग आणखी कळलं.बागेतील मोकळ्या ,प्रसन्न आणि निसर्गरम्य वातावरणात मन मोकळे माणसंही भेटतात.आणि अनोळखी असून आपणही लहान मुलांसारखे लगेच ओळखीचे होतो रकमेकांच्या.

आठवणींचा खजिन्यात अजून भर पडते.वय वाढत पण आपण म्हातारे नव्हे तर अनुभव संपन्न होत जातं असतो.

हे होणं जेंव्हा थांबून फक्त आमचा जमाना कसा होता हेच उरेल तेंव्हा मात्र आपलं वय झालं समजावं.

आदरणीय गुरुवर्य, श्री अशोक गोडबोले.

 मी सकाळी लिहिलं त्या प्रमाणे आज खरंच पुन्हा एकदा पितृशोक झाला.

एक आपला जनक असतो जो जन्म देऊन वाढवतो.आणि दुसरा गुरू जो आपल्याला नुसतं साक्षर करत नाही तर अक्षर न अक्षर समजावून सांगतो.

जोवर पितृ छत्र असत तोवर आपण कितीही मोठे झालो तरी अडीअडचणी त त्यांचा आधार असतो. आपल्याला सावरायला ते असतात.आता कसं करू?हे हक्कानं विचारायला जागा असते.अरे काळजी करू नकोस होईल सगळं ठिक, अस त्यांच्याकडून ऐकलं कि हलकं वाटत.

कलेच्या बाबतीत पण सेम तसच असत.म्हणूनच घराणी आहेत संगीतात.गुरू हा पित्या समान असतो.

कितीही शिकलं तरी कुठंतरी गाडअडलं तर त्यांच मार्गदर्शन असत.बाहेर वावरताना त्यांच्या आधाराची,मायेची ऊब सोबत असते.

समोर ते बसलेले असताना वाजवताना ,  

बालपण तसच रहात आपलं.त्यामुळं कितीही वाढलेलं असलं तरी आपलं वय वाढत नाही.रियाज झालेला नसताना त्यांच्या समोर बसायला संकोच वाटतो होम वर्क न केलेल्या विद्यार्थ्यां सारखा.

ते गेल्यावर मात्र मानेवर जोखडाच वजन जाणवू लागतं. आता या दुनियेत आपल्यालाच आपला मार्ग काढायचाय हे कळत. गुरुपौर्णिमेस सरांकडे गेलो कि मस्त वाटायचं ,बरेच दिवसांनी घरी आल्यावर वाटत तस.

रीत म्हणून माझे विद्यार्थी पाया पडतात.ते मी परमेश्वर,आई वडील आणि गुरूंच्या चरणीच रुजू करतो मनातून.कारण त्यांचीच कृपा असते ती.

म्हणून आईवडील आणि गुरू जाण या सारख दुर्भाग्य नाही.आपल्याला पाया पडायला जागाच उरत नाही मग.


तरीही सर,

तुम्ही आई बाबांसारखेच मनात असता.आणि चरणी वंदन नेहमीच राहील.तुम्ही लोक असाल तिथून आशीर्वाद नक्कीच देत रहाल याची खात्री आहे.

बादवे सर,बरेच दिवस रियाज बंद आहे.पण आज तुम्हाला श्रद्धांजली म्हणून तबला घेऊन बसलो होतो.

आई बाबा आणि तुम्ही यांचं ऋण फिटणार नाही आणि ते फेडायची माझी क्षमता नाही ,इच्छाही नाही.

सदैव तुमचा ऋणी,🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹