नुकताच एक स्टुडंन्ट भेटून गेला.
सर,तुम्हि आहात तसेच आहात अजूनही.
तस नसत रे.काळ आपलं काम करतच असतो.
अजून तरी मी शिकायला सुरुवात केली तेंव्हा होतात तसेच आहात.
म देवाची कृपा रे,मी खास काही केलं नाही त्या करता.
आणखी हि एक गोष्ट आहे सर.
कोणती?
आजही तुम्ही कुणी काही म्हटलं तुम्हाला तर फक्त हसून उत्तर देता.कधी रागवत नाही समोरच्यावर.
कश्या बाबतीत रागावायच?
आम्ही नाही का तुम्हाला सारख म्हणत,सर हे का तुम्ही करत नाही सुरू!किंवा आणखीही सल्ले देताना बघितलंय लोकांना तुम्हाला.पण आज जाणवलं तुम्ही रागावून रिऍक्ट होत नाही कधी कि,तो माणूस गेल्यावर त्या बद्दल खन्त,चीड व्यक्त होत नाही तुमच्या कडून त्याच्या बद्दल.त्याच कारण काय?आणि मला ते जमलं तर बरच बर होईल अस वाटत आता म्हणून विचारतोय.
काय सांगू रे तुला?
जे तुम्हाला वाटत ते.कारण मला ते उपयोगी पडेल.मी फार चिडतो अस घरचे म्हणतात.पण मी काय उगाच चिडतो का?पण चिडतो हे खरय.कलीग रोजच काम बिघडवू लागला तर काय करायच?बॉस उगाच बोलतो.माझं फिल्ड मला नक्की माहितीय. शेवट माझंच म्हणणं करेक्ट निघत ,मग आधीच का ऐकल जात नाही.अस अनेक गोष्टीत होत असत.तुम्ही थंड कसे राहता?
अरे,
आज तुझ्या दृष्टीनं मी शिक्षक म्हणून बरा असेल.
नाही चांगलेच आहात.
तस म्हण.पण व्यावहारिक दृष्ट्या मी अपयशीच आहे न?
ते कसं?
बँक बॅलन्स नाही,म्हणून मग लग्न नाही वग्रे वग्रे.
पण सर तेच सर्व काही नसतं.
हे तू मला जुनी ओळख आहे म्हणून म्हणतोयस.तू सुद्धा म्हणत असायचास न,सर क्लास काढा.गुरू पौर्णिमा सुरू करा.जाहिरात करा इत्यादी इत्यादी.
हा सर पण,,
पण मी गप्प असायचो.
मला माझ्या क्षेत्रात बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे?
हो.
मग त्यातल्या खाचा खोचा मला माहित आहेत.बऱ्याच गोष्टी मी ही करून बघितल्या आहेत.मला आर्थिक स्थैर्य नकोय का?पण,
माझ्या वाट्याला काय आयुष्य आलंय!मी काय काय न कसं कसं भोगतोय हे बाहेर माहीत नसतं.हे भोगून माझी मानसिकता कशी आहे हे माहीत नसतं.अंतिम सुख हे नाव होण्यात नसत अस माझं मत लोकांना पटत नसलं तरी मला पूर्ण पटलं आहे.संगीत हे निखळ आनंद देण्याकरता आहे.ते करताना गरजे पुरत मिळतंय.आणखी हवंय पण ते उगा जीवघेण्या स्पर्धेत उतरून नकोय.नशिबाचे दोन टक्के यश 100 टक्के फिरवून आणू शकतात हे सत्य आहे.तिथं मी मार खाल्ला तर ते आपल्या हातात नसत.मी पूर्णपण उलट्या प्रवाहातून प्रवास करत आलोय.आता स्वसुखाय जगायच.कुणाला इम्प्रेस करायला नाही.
सर्वात शेवटी इतकंच सांगीन.तुला यश मिळेल तेंव्हा ते यश च तुझ्या करता बोलू लागेल.तू अयशस्वी ठरल्यास लोक बोलू लागतात.अश्या वेळी न चिडता ते ऐकायचं.कारण त्यातील काही लोक आपल्या काळजी पोटी बोलत असतात.फक्त आपली आतली परिस्थिती आणि त्या परिस्थितीनं केलेलं आघात त्यांनाही दिसत नसतात.ज्या दिवशी यश मिळेल तेंव्हा हि तू गप्प रहायचस.तेच लोक भरभरून बोलतील त्या विषयीही.
मग अपयशात आणि यशात दुनियाच बोलत असते आपण काही बोलायच कामच नसत.आपण आपलं चालत रहायच.आलेत तर तुमच्या सोबत.न आलेत ,तर तुमच्या शिवाय.कळलं😊
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.आणि केल्या कर्माचं फळ मागू नको हे श्री कृष्ण बजावून गेलाय न?मग?
समजलं सर.ग्रेट च.
ग्रेट मी नाही,तो👆🏻
सर,तुम्हि आहात तसेच आहात अजूनही.
तस नसत रे.काळ आपलं काम करतच असतो.
अजून तरी मी शिकायला सुरुवात केली तेंव्हा होतात तसेच आहात.
म देवाची कृपा रे,मी खास काही केलं नाही त्या करता.
आणखी हि एक गोष्ट आहे सर.
कोणती?
आजही तुम्ही कुणी काही म्हटलं तुम्हाला तर फक्त हसून उत्तर देता.कधी रागवत नाही समोरच्यावर.
कश्या बाबतीत रागावायच?
आम्ही नाही का तुम्हाला सारख म्हणत,सर हे का तुम्ही करत नाही सुरू!किंवा आणखीही सल्ले देताना बघितलंय लोकांना तुम्हाला.पण आज जाणवलं तुम्ही रागावून रिऍक्ट होत नाही कधी कि,तो माणूस गेल्यावर त्या बद्दल खन्त,चीड व्यक्त होत नाही तुमच्या कडून त्याच्या बद्दल.त्याच कारण काय?आणि मला ते जमलं तर बरच बर होईल अस वाटत आता म्हणून विचारतोय.
काय सांगू रे तुला?
जे तुम्हाला वाटत ते.कारण मला ते उपयोगी पडेल.मी फार चिडतो अस घरचे म्हणतात.पण मी काय उगाच चिडतो का?पण चिडतो हे खरय.कलीग रोजच काम बिघडवू लागला तर काय करायच?बॉस उगाच बोलतो.माझं फिल्ड मला नक्की माहितीय. शेवट माझंच म्हणणं करेक्ट निघत ,मग आधीच का ऐकल जात नाही.अस अनेक गोष्टीत होत असत.तुम्ही थंड कसे राहता?
अरे,
आज तुझ्या दृष्टीनं मी शिक्षक म्हणून बरा असेल.
नाही चांगलेच आहात.
तस म्हण.पण व्यावहारिक दृष्ट्या मी अपयशीच आहे न?
ते कसं?
बँक बॅलन्स नाही,म्हणून मग लग्न नाही वग्रे वग्रे.
पण सर तेच सर्व काही नसतं.
हे तू मला जुनी ओळख आहे म्हणून म्हणतोयस.तू सुद्धा म्हणत असायचास न,सर क्लास काढा.गुरू पौर्णिमा सुरू करा.जाहिरात करा इत्यादी इत्यादी.
हा सर पण,,
पण मी गप्प असायचो.
मला माझ्या क्षेत्रात बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे?
हो.
मग त्यातल्या खाचा खोचा मला माहित आहेत.बऱ्याच गोष्टी मी ही करून बघितल्या आहेत.मला आर्थिक स्थैर्य नकोय का?पण,
माझ्या वाट्याला काय आयुष्य आलंय!मी काय काय न कसं कसं भोगतोय हे बाहेर माहीत नसतं.हे भोगून माझी मानसिकता कशी आहे हे माहीत नसतं.अंतिम सुख हे नाव होण्यात नसत अस माझं मत लोकांना पटत नसलं तरी मला पूर्ण पटलं आहे.संगीत हे निखळ आनंद देण्याकरता आहे.ते करताना गरजे पुरत मिळतंय.आणखी हवंय पण ते उगा जीवघेण्या स्पर्धेत उतरून नकोय.नशिबाचे दोन टक्के यश 100 टक्के फिरवून आणू शकतात हे सत्य आहे.तिथं मी मार खाल्ला तर ते आपल्या हातात नसत.मी पूर्णपण उलट्या प्रवाहातून प्रवास करत आलोय.आता स्वसुखाय जगायच.कुणाला इम्प्रेस करायला नाही.
सर्वात शेवटी इतकंच सांगीन.तुला यश मिळेल तेंव्हा ते यश च तुझ्या करता बोलू लागेल.तू अयशस्वी ठरल्यास लोक बोलू लागतात.अश्या वेळी न चिडता ते ऐकायचं.कारण त्यातील काही लोक आपल्या काळजी पोटी बोलत असतात.फक्त आपली आतली परिस्थिती आणि त्या परिस्थितीनं केलेलं आघात त्यांनाही दिसत नसतात.ज्या दिवशी यश मिळेल तेंव्हा हि तू गप्प रहायचस.तेच लोक भरभरून बोलतील त्या विषयीही.
मग अपयशात आणि यशात दुनियाच बोलत असते आपण काही बोलायच कामच नसत.आपण आपलं चालत रहायच.आलेत तर तुमच्या सोबत.न आलेत ,तर तुमच्या शिवाय.कळलं😊
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.आणि केल्या कर्माचं फळ मागू नको हे श्री कृष्ण बजावून गेलाय न?मग?
समजलं सर.ग्रेट च.
ग्रेट मी नाही,तो👆🏻
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा