गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०१३

काही अनाकलनीय अनुभव

आमच्या घरी माजघरात एक बाळंतीणीची म्हणून एक अंधारी खोली होती. तिथे कुणीतरी हात धरल्याचा भास झालाय दोन वेळा. आमच्या विहिरीत फुल आणि आंबे वेचायला आलेली एक लहान मुलगी पहाटे पडली. कुणी जाग नसल्याने ते उशिरा समजल. पण तो पर्यंत ती गेली होती. पण त्या विहिरीत कधीतरी धप्पकन काही पडल्याचा आवाज होई. अश्यावेळी पाणी हि गढूळ होत असे.
 पोयनाड ला माझ्या मित्राकडून दुध आणायला मी सहा वाजता जात असे. सात वाजता दुध घेऊन येई, तासभर गप्पा होत. त्याने मागच्या अंगणातून मला जायला वई तून वाट केली होती. ती रोजची वाट. मध्ये एक तगर भरपूर मोठी आणि फुललेली अशी होती. ती डाव्या अंगाला टाकून वई कडे जाऊन झापाचा दरवाजा उघडून बाहेर पडायचं. अगदी अंधारात सुद्धा न चुकता जाईन एव्हडा सराव झालेला. एक दिवस मस्त चांदण पडल होत मी दुध घेऊन निघालो. बाकी काही आठवत नाही पण अचानक धोंड्या आमचा गडी खांद्यावर थाप देत विचारतोय '' काय रे बाला किती वेळ आई वाट बघून थकली. जेवाची तरी आठवण ठेव. चहाला दुध येतय म्हणून आई वाट पाहतेय ते आता जेवायची वेळ झाली. म्हटल का?किती वाजले ?दुध काढल्या वर लगेच निघालोय. अरे साडे नऊ झाले नारे. काही कळेच ना. मग धोंड्या म्हणाला तुला 'चकवा' लागला पौर्णिमेला .
अस झाल खर. नंतर काय अजूनही त्या घरी जातो पण तो प्रकार परत झाला नाही.
           घरी माझ्या आजोबांची एक खोली होती. तिथे कुणी झोपल कि थोबाडीत बसे. माझ्या मावस भावाला बसली होती. माझ्या बाजूला झोपला होता. गाल लाल झाला होता. मग ती खोली माझी झाली. मी तिथे खाट टाकली. रात्री माझ्या स्वप्नात आले. तू झोप तुला काही करणार नाही पण हि जागा सोडून झोप. दरदरून घाम सुटला होता. मग खाट दुसरी बाजूला ठेवली आणि काही त्रास झाला नाही कधी मला.
           शेतावर जाताना दोन न डोंगऱ्या लागत. तिथे निवडुंग भरगच्च होता. एकदा संध्याकाळी परत येताना जाम कळ आली म्हणून सुनील नावाचा मित्र बरोबर होता त्याला म्हणालो गाडी थांबव. त्याने का विचारल. मी करंगळी दाखवली. तो म्हणाला इथे नको घर जवळ आलय थांब थोडा. मग म्हटल आयला पाच तर वाजतायत कुठ भूत दिसतंय तुला. तरी त्याच नको नको चालूच. पण हट्टाने उठलो. कार्यभाग होतो न होतो तोच त्या निवडूंगात कसलस झाड होत त्या वरून मशीन गन ची फैर झडावी
तसे छोटे दगड रप्पकन  धुरळा उडवत पडले. मग धूम ठोकली. सुन्याच चाललं होतच ,तरी मी सांगत होतो .
            आणि उन्हाळ्यात आम्ही अंगणात झोपत असू. सगळे एका रांगेत. रोज रात्री काठीला घुंगुर लाऊन ती आपटत कुणी तरी अख्या घराला फेरी मारीत असे. कुणी दिसल कधीच नाही. आधी घाबर्य्चो. मग आजी म्हणाली तो राख्या आहे त्याचा काही त्रास नाही.
            असे काही अनाकलनीय अनुभव आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा