गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०१३

काही अनाकलनीय अनुभव 2

खूप वर्ष्या पूर्वी रायगडला सायकली घेऊन जायचं ठरलं. माझा रवि म्हणून मित्र आहे. त्याने माझी सायकल अशी काही तयार केली कि नंतर कुठल्याही सायकलवाल्याला जमल नाही. मड गार्ड काढली होती. टायर, ट्यूब,आणि डायनामा सगळ नव खरेदी करून लावल होत. आम्ही दोघ आणि दोन जण तयार झाले. राजा आणि संजय . पोयनाड ते रायगड. डायनामा माझ्या आणि संजूच्या सायकल ला होता. तो पुढे आणि मी मागे राहायचं अस ठरल. कारण पहाटे निघून उन चढायच्या आत प्रवास करायचा बेत होता. महाडला रव्याची मावशी राहत होती तिथे पोचलो दहा वाजता. जेवण करून जरा आराम केला आणि उन उतरल्यावर मजेत पाचाडला पोचलो. काळोख पडला होता. कुणी जाणारे येणारे हि नव्हते. सायकली खाली हॉटेल जवळ ठेऊन चढायला सुरुवात केली. दमल्याने चाल अगदी सावकाश होती . च्यैला असे उजडेल पोचे पर्यंत काही जवळची वाट असती तर बर झाल असत अस मी म्हणालो. तेव्हड्यात कुणी तरी धोतर वाला येताना दिसला. त्याला थांबवल आणि वाट आहे का दुसरी विचारल. तो म्हणाला यामागून मी वरच चाललोय दुध घेऊन. आणि आम्ही चालू पडलो त्याच्या मागे. अगदि वीस मिनिटात गडावर आलो. चला बर का तुम्ही मी जातो म्हणून तो गेला. मग रूम घेऊन राहिलो गड पाहिला आणि येताना पायर्या उतरू लागलो. सहज मी म्हटल ,कुंच्या लक्ष्यात येतंय कारे काल कुठून चढलो त्या माणसा बरोबर? कुणालाच काही कळेना. म्हटल थकव्या मुळ जाणवल नसेल काही. संध्याकाळ झाली होती पाचाड हून सायकली घेतल्या आणि रात्री प्रवास करून सकाळी पोयनाड गाठायचं ठरल होत. सायकली ,डायनाम्या सकट मस्त सुरु होत्या. महाडला नदी काठाने रस्ता आहे तिथे पोचलो. उतारावरसंजयचा डायनामा बंद झाला. माझाही बंद. माझा तर नवा मग काय झाल?तरी सायकली दामटत होतो. मग मस्त धुपाचा वास भरपूर आला. रव्या इथे दर्गा आहे कारे ?मी विचारल. तो म्हणे काय माहित नाही. मग मोगरा ,पारिजात असे सुवास बदलत राहिले. मग मात्र सगळे जरा घाबरलो. पण संजा ओरडला कुणी थांबायचं नाही प्याडल मारत राहा. तो हे बोलतोय तो त्याची चेन पडली. कशीबशी बसवली आणि सुसाट निघालो. पुढे एक टेम्पो उभा होता तिथे जाऊन थांबलो. सगळे धापा टाकत होते. तो टेम्पो पेपरचा होता. त्याने विचारल ,कायरे काय झाल ?कुठे निघालात. मग झाला प्रकार सांगितला. तो म्हणाला जाऊदे आता घाबरू नका. नदीजवळ झाल न? तिथे असे सुवास येतात अलीकडे. नाटकवाल्यांची बस नदीत पडली तेंव्हापासून. कधी मधी मी हि अनुभव घेतलाय. ते ऐकून पोटात गार वाटल. मग टपरी उघडली तिथे चहा घेतला आणि निघालो. आता पाहिलं तर दोघांचे डायनामे व्यवस्थित सुरु होते. घरी पोहोचलो सकाळी दहा साडे दहाला तो पर्यंत कुणाचीच चीन पडली नाही. आता बाईकवर रात्री जाऊन आलो गडावर पण तो अनुभव काही परत आला नाही. तो भेटलेला माणूस,त्याने कुठून नेल अनिते सुवास आणि डायनामा बंद पडण ,चेन पडण हे कधीच विसरणार नाही. वेगळा अनुभव होता हे नक्की.

काही अनाकलनीय अनुभव

आमच्या घरी माजघरात एक बाळंतीणीची म्हणून एक अंधारी खोली होती. तिथे कुणीतरी हात धरल्याचा भास झालाय दोन वेळा. आमच्या विहिरीत फुल आणि आंबे वेचायला आलेली एक लहान मुलगी पहाटे पडली. कुणी जाग नसल्याने ते उशिरा समजल. पण तो पर्यंत ती गेली होती. पण त्या विहिरीत कधीतरी धप्पकन काही पडल्याचा आवाज होई. अश्यावेळी पाणी हि गढूळ होत असे.
 पोयनाड ला माझ्या मित्राकडून दुध आणायला मी सहा वाजता जात असे. सात वाजता दुध घेऊन येई, तासभर गप्पा होत. त्याने मागच्या अंगणातून मला जायला वई तून वाट केली होती. ती रोजची वाट. मध्ये एक तगर भरपूर मोठी आणि फुललेली अशी होती. ती डाव्या अंगाला टाकून वई कडे जाऊन झापाचा दरवाजा उघडून बाहेर पडायचं. अगदी अंधारात सुद्धा न चुकता जाईन एव्हडा सराव झालेला. एक दिवस मस्त चांदण पडल होत मी दुध घेऊन निघालो. बाकी काही आठवत नाही पण अचानक धोंड्या आमचा गडी खांद्यावर थाप देत विचारतोय '' काय रे बाला किती वेळ आई वाट बघून थकली. जेवाची तरी आठवण ठेव. चहाला दुध येतय म्हणून आई वाट पाहतेय ते आता जेवायची वेळ झाली. म्हटल का?किती वाजले ?दुध काढल्या वर लगेच निघालोय. अरे साडे नऊ झाले नारे. काही कळेच ना. मग धोंड्या म्हणाला तुला 'चकवा' लागला पौर्णिमेला .
अस झाल खर. नंतर काय अजूनही त्या घरी जातो पण तो प्रकार परत झाला नाही.
           घरी माझ्या आजोबांची एक खोली होती. तिथे कुणी झोपल कि थोबाडीत बसे. माझ्या मावस भावाला बसली होती. माझ्या बाजूला झोपला होता. गाल लाल झाला होता. मग ती खोली माझी झाली. मी तिथे खाट टाकली. रात्री माझ्या स्वप्नात आले. तू झोप तुला काही करणार नाही पण हि जागा सोडून झोप. दरदरून घाम सुटला होता. मग खाट दुसरी बाजूला ठेवली आणि काही त्रास झाला नाही कधी मला.
           शेतावर जाताना दोन न डोंगऱ्या लागत. तिथे निवडुंग भरगच्च होता. एकदा संध्याकाळी परत येताना जाम कळ आली म्हणून सुनील नावाचा मित्र बरोबर होता त्याला म्हणालो गाडी थांबव. त्याने का विचारल. मी करंगळी दाखवली. तो म्हणाला इथे नको घर जवळ आलय थांब थोडा. मग म्हटल आयला पाच तर वाजतायत कुठ भूत दिसतंय तुला. तरी त्याच नको नको चालूच. पण हट्टाने उठलो. कार्यभाग होतो न होतो तोच त्या निवडूंगात कसलस झाड होत त्या वरून मशीन गन ची फैर झडावी
तसे छोटे दगड रप्पकन  धुरळा उडवत पडले. मग धूम ठोकली. सुन्याच चाललं होतच ,तरी मी सांगत होतो .
            आणि उन्हाळ्यात आम्ही अंगणात झोपत असू. सगळे एका रांगेत. रोज रात्री काठीला घुंगुर लाऊन ती आपटत कुणी तरी अख्या घराला फेरी मारीत असे. कुणी दिसल कधीच नाही. आधी घाबर्य्चो. मग आजी म्हणाली तो राख्या आहे त्याचा काही त्रास नाही.
            असे काही अनाकलनीय अनुभव आहेत.