सोमवार, ६ जुलै, २०२०

गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा ???

काल गुरू पौर्णिमा झाली.
अलीकडं त्या बाबतीत एक गोष्ट खटकते मला.माझे विद्यार्थी जे येऊ शकत नाहीत ते आणि ओळीतले लोक देखील ''गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा'' असा संदेश किंवा मेसेज पाठवतात.भावना चांगलीच असते सगळ्यांची.
पण,
हे नातं गुरू शिष्याचं अस असत.आणि हा दिवस शिष्या ने गुरुची भेट घेऊन त्याचे आशीर्वाद घ्यायचे या करता आहे.आजवर हेच रूढ होत.शुभेच्छा वाढ दिवशी किंवा अन्य सणवार किंवा काही आनंदाची गोष्ट घडली तर देतात.मग जर कुणी गुरू कडे जाऊ शकत नसेल तर त्याने फोन करून किंवा मेसेज मधून अस लिहावे कि, सर प्रत्यक्ष येऊ शकत नाही.पण आशीर्वाद असू दे.आजचा दिवस महत्वाचा आहे म्हणून मेसेज किंवा फोन वरून आशीर्वाद मागतोय. यथावकाश प्रत्यक्ष भेट घेईनच. जे शिष्य शिकत आहेत ते देखील गुरू स न भेटता मेसेज वर काम भागवतात.
वेळ नसतो कुणाला हे खरं आहे.पण हा दिवस आपल्या संस्कृतीत गुरू भेट घेऊन त्याचे ऋण मानून ,जमेल तशी गुरू दक्षिणा देऊन गुरू चे आशीर्वाद घ्यायला राखून ठेवला आहे.शिक्षण पूर्ण होतच नाही कधी.तरीही जे शिकून गेलेत त्यांनी या दिवशी गुरुची आठवण ठेऊन त्यांना भेटणे महत्वाचे असते.
मदर डे, फादर डे, फ्रेंड शिप डे हे साजरे करावे लागतात !शुभेच्छा देऊन? ती नाती देखील गुरू च्या तोडीची महत्वाची आहेत.
त्या बद्दल राहू दे पण गुरू गृही जाऊन त्याची भेट घेऊन,वंदन करून आशीर्वाद घेणे हे महत्वाचे आहे. बरेच वर्ष हे खटकत आलाय म्हणून लिहिलं.
आणि हे माझ्या बाबतीत लागू होत नाही हे देखील प्रांजळपणे नमूद करतो.मी तबला शिकवतो पण स्वतः ला गुरू अजिबात समजत नाही.ते पद खूप खूप उंच आहे.मी तिथवर पोचू शकणार नाहीये.त्या मूळ माझ्या शिष्यानी (शिकतात माझ्याकडे म्हणून शिष्य म्हटलं.नाहीतर मी त्यांना माझे सह अध्यायी समजतो.जे माझ्या नंतर शिकायचा प्रयत्न करू लागलेत. आणि दोन अक्षर त्यांच्या आधी शिकून मी आहे म्हणून त्यांना मार्गदर्शन करतो)
माझ्या पाया पडावं हि देखील अपेक्षा नाही.
पण या दिवशी गुरुगृही जाऊन त्यांचे आशीर्वाद घेणं याला महत्व आहे हे लक्षात ठेवा.नाही जमलं तर दुसऱ्या दिवशी जा. वर्षातून एकदा गुरू भेट घ्यावीच.
त्या मूळ माझ्याकडे शिकतायत त्याना आणि जे मित्र यादीत आहेत त्यांना प्रेमाने विनंती करीन कि,
गुरू पौर्णिमा शुभेच्छा म्हणू नका.आपापल्या गुरुची भेट घ्या त्या दिवशी.ती देखील मनाला वाटलं तर.कारण आपल्या कडे गुरुस मोठा दर्जा,स्थान दिलेलं असलं तरी हे देखील म्हटलं जातं,गुरू सुद्धा पारखून करावा.
आणि तसा जर तो तुम्ही केला असेल तर त्याचे आशीर्वाद मागा. त्याला शुभेच्छा नका देऊ.
जे मला योग्य वाटत नाही.
मनात बरीच वर्षे येत होतं ते मांडल.आवडलं नाही तर सोडून द्या.
या वर्षी प्रथमच माझी गुरू भेट कोरोना मूळ राहिली.त्याची रुख रुख आहे.पण काल सरांना फोन करून आशीर्वाद मागितले आणि त्यांनी ते फोनवरून भरभरून दिलेही.माझी गुरू पौर्णिमा साजरी झाली.
सदैव सर्व गुरुजनांच्या ऋणात असलेला
आपला,सलील जोशी🙏🏻🌹

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा