सगळीकडे कोलाहल माजलेला. नगरजन त्रस्त झालेले. एकेकाळी नव्हे ,तर अगदी काल परवा पर्यंत सुरळीत सुरू असलेलं जन जीवन आज पूर्ण विस्कळीत झालं होत.
नगरीचे रस्ते सुनसान पडलेले.जे अहोरात्र चैतन्य राखून होते ते मार्ग,महामार्ग आज ओस पडलेले दिसत होते.शहर वाढल्याने संकुचित झालेल्या वनश्री मधली वन्य श्वापदे आता आपल्या भूमीवर झालेल्या अतिक्रमणाचा बदला घेण्यास बाहेर पडून निश्चिन्त मनाने शहर भर फिरत होती.आधीच भेदरून घरात लपून बसलेले नगरजन, त्या प्राण्यांना तस फिरताना आपापल्या गवाक्ष्यातून चिंतीत नजरेने बघत बंद असलेली दारे अजून घट्ट बंद करायचा प्रयत्न करत होती.सर्वत्र त्राहीमाम माजलेत होत.घरात बसून साठवलेली अन्न धान्य रसद आता तळ गाठू लागली होती. अन्न आणायला धन उरले नाही.ते मिळवायचे तर उद्योग करायला बाहेर पडायला हवं.पण या समयी सर्व ठप्प झालेलं.आता घरी राहू तर उपाशी मरू.बाहेर पडू तर ती श्वापदे खातील.त्यातून वाचलो तर तो अदृश्य राक्षस आपला घास घेईल हे नक्कीच झालं होतं.
होय.या संपन्न भारत देशावर आलेलं ते अदृश्य संकट होत.एक अचानक प्रगटलेला पण न दिसणारा दैत्य या देशावर यम होऊन घाला घालायला आला होता.
राजसत्तेचे सर्व सेनाधिकारी,निष्णात वैद्य राज या अदृश्य राक्षसाच्या नायनाट करायला अनेक उपाय योजित होते. पण यशवंती प्रसन्न होतंच नव्हती.आठवडे गेले.महिने गेले तरी तो राक्षस मागे हटत नव्हता कि दिसत नव्हता.पण बळी मात्र नित्यनेमाने घेत होता.
तिकडं या शहरी भागातून दूर एकांतवासी असा एक औघड दुरून हे सगळं न्याहाळत होता.
कुणीतरी लायक नरश्रेष्ठ पुढं येऊन या विपदेतून सर्वांस बाहेर काढील अशी त्याला आशा होती.तो आपल्या साधनेत मग्न होत होता.
परंतु आज एका गिद्धा च्या समूहास त्याने नगरच्या दिशेने उडताना बघितले.नदीत उभा राहून तो सूर्यास अर्घ्य अर्पण करत होता. ते झाल्यावर तो काही काळ सूर्य बिंबाकडे एकटक बघत नेत्र त्राटक करत असे.पण आज ते करणं राहील बाजूला.कारण जसे त्याचे नेत्र सूर्याकडे रोखले गेले नेमका तेंव्हाच तो गिद्ध समूह नगराच्या दिशेने आकाश कापत जाताना त्याच्या दृष्टीस पडला.
त्याला ते ठिक वाटलं नाही.काही अघटित घडतंय याची जाणिव त्याला झाली.दिनमान मोजून बघितले तर लक्षात आलं त्याच्या कि काही मास गुजरलेत मध्ये.आपण साधनेत मग्न होतो त्या मूळ इकडं लक्ष गेलं नाही.
मग तो त्याच त्राटक तसच सोडून नदीच्या पात्रातून बाहेर निघाला.
पर्णकुटी जवळ असलेल्या कुंडात त्यानं पुन्हा एकदा हातपाय धुतले.आत जाऊन त्याच्या व्याघ्र चर्मा वर बसला.समोरच्या धुनीत बाजूस ठेवलेल्या हवन द्रव्यातून धूप दाणा उचलून धुनीत अर्पण केला.सर्वत्र धुम्र वलय पसरत गेलं आणि त्याची पर्णकुटी व्यापून राहील.आता त्यानं कमंडलू तून पाणी घेऊन हाती घेतल.या अरिष्टया मागे कारण काय?ते जाणून घ्यायचा संकल्प सोडला.क्षणात त्याची समाधी लागली.शरीर हलकं भासू लागलं आणि एक तेजाकृती त्याच्या अंतर्मनास दिसू लागली.त्यांन त्या तेजास प्रथम नमन केलं.खूप आतून ,खोल पोकळीतून आल्या सारखा तो परिचित आवाज त्याला ऐकू आला,बोल साधका!काय पृच्छा आहे तुझी?
हे नियंत्या हे नगरात सध्या काय सुरू आहे?का सुरू आहे?या वर उपाय नाही का?
परत तो गूढ पण आश्वासक आवाज आणखी धीर गंभीर होत म्हणाला,
साधका,तू हे निस्वार्थपण आणि लोक कल्याणा करता विचारत आहेस म्हणून तुला सांगतो ते नीट ऐक. यात काही पाप पुण्याचे हिशोब होत आहेत,काही निसर्ग देव समतोल साधत आहे.योग्य वेळ येताच सर्व काही ठिक होईलच.पण या बाबत एक गोष्ट तुला सांगतो.ती श्रवण कर म्हणजे तुझं शंका निरसन पूर्ण होईल. एक गोष्ट अजून जाणून घे.जर तू माझ्याकडून ती गोष्ट ऐकलीस तर तुझ्या साधनेच फळ जे तुला मिळायला आलं होतं ते नष्ट होईल.बोल,चालेल?
प्रभू, मला कसला पाश उरला नाही.तेंव्हा संचय करावं असं कधी मनी येत नाही.तेंव्हा आपण ती गोष्ट कथन करावी.निदान माझ्या देश बांधवास हा त्रास का होत आहे हे तरी मला कळेल.
साधका, तुझी हि साधू वृत्ती बघून मी प्रसन्न झालो आहे.तुला ती गोष्ट तर सांगतोच पण तुझी साधना वाया जाणार नाही असा वर हि देतो.परंतु त्या वराचा वापर तू त्या राक्षसी ताकदीशी लढायला वापरू शकणार नाहीस.कारण ते विधीलिखित आहे.
आता ऐक ती गोष्ट,
हे तुमच कलियुग सुरू होताना कली महाराज देवास म्हणाले, एकूण माझ्या सत्ता काळी दुराचार माजणार अस आहे.मग तो बकासुर ,हिडीम्ब या सारखे राक्षस माझ्या युगी का नसावेत?
तेंव्हा प्रभू त्यास म्हणलेत,तथास्तु.
असे राक्षस तुझ्या काळात भरपूर असतील.कलियुगी शके 1942 मध्ये एक अदृश्य राक्षस हाहाकार माजविल. त्यास रोखणे कुणास शक्य होणार नाही. काही लहान मोठी पिशाचे त्यास साहाय्य करत राहतील. काही बलवन्त मंडळी गोरगरीब जनतेच्या हक्काचे अन्न धान्य गिळंकृत करतील.
तुझ्या काळच्या महिमे मूळ अस काही ठराविक कालावधीत होतच राहील.पण पापाचे घडे उशीरा का होईना भरतीलच.त्या राक्षसांचा देखील उचित वेळी प्रायश्चित्त समय येईलच.मग कली महाराज समाधान पावले.
तेंव्हा हे साधका अस असल्याने हि सगळी उलथापालथ तुझ्याच देशात नव्हे तर सर्व विश्वात सुरू आहे.त्यानं तू आता अधिक कष्टी होऊ नकोस.
मग साधक म्हणला,हे प्रभू एक मागणे अजून आहे.
बोल.
माझ्या साधनेच फळ मला नको आहे.पण ते जर का जमा झाल असेल आपल्या चरणी,तर या संकटात असलेल्या निष्पाप जीवांस काहीतरी प्रमाणात विभागून आपणच देऊ करा.म्हणजे जनसामान्य टिकून राहतील आणि त्यांचा आपल्या वरील विश्वास देखील तसाच राहील.
वा,साधका ! तुला खरच साधना जमली आहे म्हणायची.मी या मूळ संतोष पावून तुला आश्वस्त करतो , तुझ्या मना सारखे होईल.
हळूहळू मनःपटलावरील ती आकृती धूसर होत गेली तरी तिचा आशीर्वाद देत असलेला हात त्याला जाणवत राहिला.तो सुद्धा समाधी अवस्थेतून समाधानाने बाहेर आला.एक दिर्घ निश्वास सोडून तो आसन सोडून फलाहार आणण्यास जंगलात जायला निघाला.
नगरीचे रस्ते सुनसान पडलेले.जे अहोरात्र चैतन्य राखून होते ते मार्ग,महामार्ग आज ओस पडलेले दिसत होते.शहर वाढल्याने संकुचित झालेल्या वनश्री मधली वन्य श्वापदे आता आपल्या भूमीवर झालेल्या अतिक्रमणाचा बदला घेण्यास बाहेर पडून निश्चिन्त मनाने शहर भर फिरत होती.आधीच भेदरून घरात लपून बसलेले नगरजन, त्या प्राण्यांना तस फिरताना आपापल्या गवाक्ष्यातून चिंतीत नजरेने बघत बंद असलेली दारे अजून घट्ट बंद करायचा प्रयत्न करत होती.सर्वत्र त्राहीमाम माजलेत होत.घरात बसून साठवलेली अन्न धान्य रसद आता तळ गाठू लागली होती. अन्न आणायला धन उरले नाही.ते मिळवायचे तर उद्योग करायला बाहेर पडायला हवं.पण या समयी सर्व ठप्प झालेलं.आता घरी राहू तर उपाशी मरू.बाहेर पडू तर ती श्वापदे खातील.त्यातून वाचलो तर तो अदृश्य राक्षस आपला घास घेईल हे नक्कीच झालं होतं.
होय.या संपन्न भारत देशावर आलेलं ते अदृश्य संकट होत.एक अचानक प्रगटलेला पण न दिसणारा दैत्य या देशावर यम होऊन घाला घालायला आला होता.
राजसत्तेचे सर्व सेनाधिकारी,निष्णात वैद्य राज या अदृश्य राक्षसाच्या नायनाट करायला अनेक उपाय योजित होते. पण यशवंती प्रसन्न होतंच नव्हती.आठवडे गेले.महिने गेले तरी तो राक्षस मागे हटत नव्हता कि दिसत नव्हता.पण बळी मात्र नित्यनेमाने घेत होता.
तिकडं या शहरी भागातून दूर एकांतवासी असा एक औघड दुरून हे सगळं न्याहाळत होता.
कुणीतरी लायक नरश्रेष्ठ पुढं येऊन या विपदेतून सर्वांस बाहेर काढील अशी त्याला आशा होती.तो आपल्या साधनेत मग्न होत होता.
परंतु आज एका गिद्धा च्या समूहास त्याने नगरच्या दिशेने उडताना बघितले.नदीत उभा राहून तो सूर्यास अर्घ्य अर्पण करत होता. ते झाल्यावर तो काही काळ सूर्य बिंबाकडे एकटक बघत नेत्र त्राटक करत असे.पण आज ते करणं राहील बाजूला.कारण जसे त्याचे नेत्र सूर्याकडे रोखले गेले नेमका तेंव्हाच तो गिद्ध समूह नगराच्या दिशेने आकाश कापत जाताना त्याच्या दृष्टीस पडला.
त्याला ते ठिक वाटलं नाही.काही अघटित घडतंय याची जाणिव त्याला झाली.दिनमान मोजून बघितले तर लक्षात आलं त्याच्या कि काही मास गुजरलेत मध्ये.आपण साधनेत मग्न होतो त्या मूळ इकडं लक्ष गेलं नाही.
मग तो त्याच त्राटक तसच सोडून नदीच्या पात्रातून बाहेर निघाला.
पर्णकुटी जवळ असलेल्या कुंडात त्यानं पुन्हा एकदा हातपाय धुतले.आत जाऊन त्याच्या व्याघ्र चर्मा वर बसला.समोरच्या धुनीत बाजूस ठेवलेल्या हवन द्रव्यातून धूप दाणा उचलून धुनीत अर्पण केला.सर्वत्र धुम्र वलय पसरत गेलं आणि त्याची पर्णकुटी व्यापून राहील.आता त्यानं कमंडलू तून पाणी घेऊन हाती घेतल.या अरिष्टया मागे कारण काय?ते जाणून घ्यायचा संकल्प सोडला.क्षणात त्याची समाधी लागली.शरीर हलकं भासू लागलं आणि एक तेजाकृती त्याच्या अंतर्मनास दिसू लागली.त्यांन त्या तेजास प्रथम नमन केलं.खूप आतून ,खोल पोकळीतून आल्या सारखा तो परिचित आवाज त्याला ऐकू आला,बोल साधका!काय पृच्छा आहे तुझी?
हे नियंत्या हे नगरात सध्या काय सुरू आहे?का सुरू आहे?या वर उपाय नाही का?
परत तो गूढ पण आश्वासक आवाज आणखी धीर गंभीर होत म्हणाला,
साधका,तू हे निस्वार्थपण आणि लोक कल्याणा करता विचारत आहेस म्हणून तुला सांगतो ते नीट ऐक. यात काही पाप पुण्याचे हिशोब होत आहेत,काही निसर्ग देव समतोल साधत आहे.योग्य वेळ येताच सर्व काही ठिक होईलच.पण या बाबत एक गोष्ट तुला सांगतो.ती श्रवण कर म्हणजे तुझं शंका निरसन पूर्ण होईल. एक गोष्ट अजून जाणून घे.जर तू माझ्याकडून ती गोष्ट ऐकलीस तर तुझ्या साधनेच फळ जे तुला मिळायला आलं होतं ते नष्ट होईल.बोल,चालेल?
प्रभू, मला कसला पाश उरला नाही.तेंव्हा संचय करावं असं कधी मनी येत नाही.तेंव्हा आपण ती गोष्ट कथन करावी.निदान माझ्या देश बांधवास हा त्रास का होत आहे हे तरी मला कळेल.
साधका, तुझी हि साधू वृत्ती बघून मी प्रसन्न झालो आहे.तुला ती गोष्ट तर सांगतोच पण तुझी साधना वाया जाणार नाही असा वर हि देतो.परंतु त्या वराचा वापर तू त्या राक्षसी ताकदीशी लढायला वापरू शकणार नाहीस.कारण ते विधीलिखित आहे.
आता ऐक ती गोष्ट,
हे तुमच कलियुग सुरू होताना कली महाराज देवास म्हणाले, एकूण माझ्या सत्ता काळी दुराचार माजणार अस आहे.मग तो बकासुर ,हिडीम्ब या सारखे राक्षस माझ्या युगी का नसावेत?
तेंव्हा प्रभू त्यास म्हणलेत,तथास्तु.
असे राक्षस तुझ्या काळात भरपूर असतील.कलियुगी शके 1942 मध्ये एक अदृश्य राक्षस हाहाकार माजविल. त्यास रोखणे कुणास शक्य होणार नाही. काही लहान मोठी पिशाचे त्यास साहाय्य करत राहतील. काही बलवन्त मंडळी गोरगरीब जनतेच्या हक्काचे अन्न धान्य गिळंकृत करतील.
तुझ्या काळच्या महिमे मूळ अस काही ठराविक कालावधीत होतच राहील.पण पापाचे घडे उशीरा का होईना भरतीलच.त्या राक्षसांचा देखील उचित वेळी प्रायश्चित्त समय येईलच.मग कली महाराज समाधान पावले.
तेंव्हा हे साधका अस असल्याने हि सगळी उलथापालथ तुझ्याच देशात नव्हे तर सर्व विश्वात सुरू आहे.त्यानं तू आता अधिक कष्टी होऊ नकोस.
मग साधक म्हणला,हे प्रभू एक मागणे अजून आहे.
बोल.
माझ्या साधनेच फळ मला नको आहे.पण ते जर का जमा झाल असेल आपल्या चरणी,तर या संकटात असलेल्या निष्पाप जीवांस काहीतरी प्रमाणात विभागून आपणच देऊ करा.म्हणजे जनसामान्य टिकून राहतील आणि त्यांचा आपल्या वरील विश्वास देखील तसाच राहील.
वा,साधका ! तुला खरच साधना जमली आहे म्हणायची.मी या मूळ संतोष पावून तुला आश्वस्त करतो , तुझ्या मना सारखे होईल.
हळूहळू मनःपटलावरील ती आकृती धूसर होत गेली तरी तिचा आशीर्वाद देत असलेला हात त्याला जाणवत राहिला.तो सुद्धा समाधी अवस्थेतून समाधानाने बाहेर आला.एक दिर्घ निश्वास सोडून तो आसन सोडून फलाहार आणण्यास जंगलात जायला निघाला.