बुधवार, ८ जुलै, २०२०

अदृश्य राक्षस.

सगळीकडे कोलाहल माजलेला. नगरजन त्रस्त झालेले. एकेकाळी नव्हे ,तर अगदी काल परवा पर्यंत सुरळीत सुरू असलेलं जन जीवन आज पूर्ण विस्कळीत झालं होत.
नगरीचे रस्ते सुनसान पडलेले.जे अहोरात्र चैतन्य राखून होते ते मार्ग,महामार्ग आज ओस पडलेले दिसत होते.शहर वाढल्याने संकुचित झालेल्या वनश्री मधली वन्य श्वापदे आता आपल्या भूमीवर झालेल्या अतिक्रमणाचा बदला घेण्यास बाहेर पडून निश्चिन्त मनाने शहर भर फिरत होती.आधीच भेदरून घरात लपून बसलेले नगरजन, त्या प्राण्यांना तस फिरताना आपापल्या गवाक्ष्यातून चिंतीत नजरेने बघत बंद असलेली दारे अजून घट्ट बंद करायचा प्रयत्न करत होती.सर्वत्र त्राहीमाम माजलेत होत.घरात बसून साठवलेली अन्न धान्य रसद आता तळ गाठू लागली होती. अन्न आणायला धन उरले नाही.ते मिळवायचे तर उद्योग करायला बाहेर पडायला हवं.पण या समयी सर्व ठप्प झालेलं.आता घरी राहू तर उपाशी मरू.बाहेर पडू तर ती श्वापदे खातील.त्यातून वाचलो तर तो अदृश्य राक्षस आपला घास घेईल हे नक्कीच झालं होतं.
होय.या संपन्न भारत देशावर आलेलं ते अदृश्य संकट होत.एक अचानक प्रगटलेला पण न दिसणारा दैत्य या देशावर यम होऊन घाला घालायला आला होता.
राजसत्तेचे सर्व सेनाधिकारी,निष्णात वैद्य राज या अदृश्य राक्षसाच्या नायनाट करायला अनेक उपाय योजित होते. पण यशवंती प्रसन्न होतंच नव्हती.आठवडे गेले.महिने गेले तरी तो राक्षस मागे हटत नव्हता कि दिसत नव्हता.पण बळी मात्र नित्यनेमाने घेत होता.
तिकडं या शहरी भागातून दूर एकांतवासी असा एक औघड दुरून हे सगळं न्याहाळत होता.
कुणीतरी लायक नरश्रेष्ठ पुढं येऊन या विपदेतून सर्वांस बाहेर काढील अशी त्याला आशा होती.तो आपल्या साधनेत मग्न होत होता.
परंतु आज एका गिद्धा च्या समूहास त्याने नगरच्या दिशेने उडताना बघितले.नदीत उभा राहून तो सूर्यास अर्घ्य अर्पण करत होता. ते झाल्यावर तो काही काळ सूर्य बिंबाकडे एकटक बघत नेत्र त्राटक करत असे.पण आज ते करणं राहील बाजूला.कारण जसे त्याचे नेत्र सूर्याकडे रोखले गेले नेमका तेंव्हाच तो गिद्ध समूह नगराच्या दिशेने आकाश कापत जाताना त्याच्या दृष्टीस पडला.
त्याला ते ठिक वाटलं नाही.काही अघटित घडतंय याची जाणिव त्याला झाली.दिनमान मोजून बघितले तर लक्षात आलं त्याच्या कि काही मास गुजरलेत मध्ये.आपण साधनेत मग्न होतो त्या मूळ इकडं लक्ष गेलं नाही.
मग तो त्याच त्राटक तसच सोडून नदीच्या पात्रातून बाहेर निघाला.
पर्णकुटी जवळ असलेल्या कुंडात त्यानं पुन्हा एकदा हातपाय धुतले.आत जाऊन त्याच्या व्याघ्र चर्मा वर बसला.समोरच्या धुनीत बाजूस ठेवलेल्या हवन द्रव्यातून धूप दाणा उचलून धुनीत अर्पण केला.सर्वत्र धुम्र वलय पसरत गेलं आणि त्याची पर्णकुटी व्यापून राहील.आता त्यानं कमंडलू तून पाणी घेऊन हाती घेतल.या अरिष्टया मागे कारण काय?ते जाणून घ्यायचा संकल्प सोडला.क्षणात त्याची समाधी लागली.शरीर हलकं भासू लागलं आणि एक तेजाकृती त्याच्या अंतर्मनास दिसू लागली.त्यांन त्या तेजास प्रथम नमन केलं.खूप आतून ,खोल पोकळीतून आल्या सारखा तो परिचित आवाज त्याला ऐकू आला,बोल साधका!काय पृच्छा आहे तुझी?
हे नियंत्या हे नगरात सध्या काय सुरू आहे?का सुरू आहे?या वर उपाय नाही का?
परत तो गूढ पण आश्वासक आवाज आणखी धीर गंभीर होत म्हणाला,
साधका,तू हे निस्वार्थपण आणि लोक कल्याणा करता विचारत आहेस म्हणून तुला सांगतो ते नीट ऐक. यात काही पाप पुण्याचे हिशोब होत आहेत,काही निसर्ग देव समतोल साधत आहे.योग्य वेळ येताच सर्व काही ठिक होईलच.पण या बाबत एक गोष्ट तुला सांगतो.ती श्रवण कर म्हणजे तुझं शंका निरसन पूर्ण होईल. एक गोष्ट अजून जाणून घे.जर तू माझ्याकडून ती गोष्ट ऐकलीस तर तुझ्या साधनेच फळ जे तुला  मिळायला आलं होतं ते नष्ट होईल.बोल,चालेल?
प्रभू, मला कसला पाश उरला नाही.तेंव्हा संचय करावं असं कधी मनी येत नाही.तेंव्हा आपण ती गोष्ट कथन करावी.निदान माझ्या देश बांधवास हा त्रास का होत आहे हे तरी मला कळेल.
साधका, तुझी हि साधू वृत्ती बघून मी प्रसन्न झालो आहे.तुला ती गोष्ट तर सांगतोच पण तुझी साधना वाया जाणार नाही असा वर हि देतो.परंतु त्या वराचा वापर तू त्या राक्षसी ताकदीशी लढायला वापरू शकणार नाहीस.कारण ते विधीलिखित आहे.
आता ऐक ती गोष्ट,
हे तुमच कलियुग सुरू होताना कली महाराज देवास म्हणाले, एकूण माझ्या सत्ता काळी दुराचार माजणार अस आहे.मग तो बकासुर ,हिडीम्ब या सारखे राक्षस माझ्या युगी का नसावेत?
तेंव्हा प्रभू त्यास म्हणलेत,तथास्तु.
असे राक्षस तुझ्या काळात भरपूर असतील.कलियुगी शके 1942 मध्ये एक अदृश्य राक्षस हाहाकार माजविल. त्यास रोखणे कुणास शक्य होणार नाही. काही लहान मोठी पिशाचे त्यास साहाय्य करत राहतील. काही बलवन्त मंडळी गोरगरीब जनतेच्या हक्काचे अन्न धान्य गिळंकृत करतील.
तुझ्या काळच्या महिमे मूळ अस काही ठराविक कालावधीत होतच राहील.पण पापाचे घडे उशीरा का होईना भरतीलच.त्या राक्षसांचा देखील उचित वेळी प्रायश्चित्त समय येईलच.मग कली महाराज समाधान पावले.
तेंव्हा हे साधका अस असल्याने हि सगळी उलथापालथ तुझ्याच देशात नव्हे तर सर्व विश्वात सुरू आहे.त्यानं तू आता अधिक कष्टी होऊ नकोस.
मग साधक म्हणला,हे प्रभू एक मागणे अजून आहे.
बोल.
माझ्या साधनेच फळ मला नको आहे.पण ते जर का जमा झाल असेल आपल्या चरणी,तर या संकटात असलेल्या निष्पाप जीवांस काहीतरी प्रमाणात विभागून आपणच देऊ करा.म्हणजे जनसामान्य टिकून राहतील आणि त्यांचा आपल्या वरील विश्वास देखील तसाच राहील.
वा,साधका ! तुला खरच साधना जमली आहे म्हणायची.मी या मूळ संतोष पावून तुला आश्वस्त करतो , तुझ्या मना सारखे होईल.
हळूहळू मनःपटलावरील ती आकृती धूसर होत गेली तरी तिचा आशीर्वाद देत असलेला हात त्याला जाणवत राहिला.तो सुद्धा समाधी अवस्थेतून समाधानाने बाहेर आला.एक दिर्घ निश्वास सोडून तो आसन सोडून फलाहार आणण्यास जंगलात जायला निघाला.

सोमवार, ६ जुलै, २०२०

गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा ???

काल गुरू पौर्णिमा झाली.
अलीकडं त्या बाबतीत एक गोष्ट खटकते मला.माझे विद्यार्थी जे येऊ शकत नाहीत ते आणि ओळीतले लोक देखील ''गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा'' असा संदेश किंवा मेसेज पाठवतात.भावना चांगलीच असते सगळ्यांची.
पण,
हे नातं गुरू शिष्याचं अस असत.आणि हा दिवस शिष्या ने गुरुची भेट घेऊन त्याचे आशीर्वाद घ्यायचे या करता आहे.आजवर हेच रूढ होत.शुभेच्छा वाढ दिवशी किंवा अन्य सणवार किंवा काही आनंदाची गोष्ट घडली तर देतात.मग जर कुणी गुरू कडे जाऊ शकत नसेल तर त्याने फोन करून किंवा मेसेज मधून अस लिहावे कि, सर प्रत्यक्ष येऊ शकत नाही.पण आशीर्वाद असू दे.आजचा दिवस महत्वाचा आहे म्हणून मेसेज किंवा फोन वरून आशीर्वाद मागतोय. यथावकाश प्रत्यक्ष भेट घेईनच. जे शिष्य शिकत आहेत ते देखील गुरू स न भेटता मेसेज वर काम भागवतात.
वेळ नसतो कुणाला हे खरं आहे.पण हा दिवस आपल्या संस्कृतीत गुरू भेट घेऊन त्याचे ऋण मानून ,जमेल तशी गुरू दक्षिणा देऊन गुरू चे आशीर्वाद घ्यायला राखून ठेवला आहे.शिक्षण पूर्ण होतच नाही कधी.तरीही जे शिकून गेलेत त्यांनी या दिवशी गुरुची आठवण ठेऊन त्यांना भेटणे महत्वाचे असते.
मदर डे, फादर डे, फ्रेंड शिप डे हे साजरे करावे लागतात !शुभेच्छा देऊन? ती नाती देखील गुरू च्या तोडीची महत्वाची आहेत.
त्या बद्दल राहू दे पण गुरू गृही जाऊन त्याची भेट घेऊन,वंदन करून आशीर्वाद घेणे हे महत्वाचे आहे. बरेच वर्ष हे खटकत आलाय म्हणून लिहिलं.
आणि हे माझ्या बाबतीत लागू होत नाही हे देखील प्रांजळपणे नमूद करतो.मी तबला शिकवतो पण स्वतः ला गुरू अजिबात समजत नाही.ते पद खूप खूप उंच आहे.मी तिथवर पोचू शकणार नाहीये.त्या मूळ माझ्या शिष्यानी (शिकतात माझ्याकडे म्हणून शिष्य म्हटलं.नाहीतर मी त्यांना माझे सह अध्यायी समजतो.जे माझ्या नंतर शिकायचा प्रयत्न करू लागलेत. आणि दोन अक्षर त्यांच्या आधी शिकून मी आहे म्हणून त्यांना मार्गदर्शन करतो)
माझ्या पाया पडावं हि देखील अपेक्षा नाही.
पण या दिवशी गुरुगृही जाऊन त्यांचे आशीर्वाद घेणं याला महत्व आहे हे लक्षात ठेवा.नाही जमलं तर दुसऱ्या दिवशी जा. वर्षातून एकदा गुरू भेट घ्यावीच.
त्या मूळ माझ्याकडे शिकतायत त्याना आणि जे मित्र यादीत आहेत त्यांना प्रेमाने विनंती करीन कि,
गुरू पौर्णिमा शुभेच्छा म्हणू नका.आपापल्या गुरुची भेट घ्या त्या दिवशी.ती देखील मनाला वाटलं तर.कारण आपल्या कडे गुरुस मोठा दर्जा,स्थान दिलेलं असलं तरी हे देखील म्हटलं जातं,गुरू सुद्धा पारखून करावा.
आणि तसा जर तो तुम्ही केला असेल तर त्याचे आशीर्वाद मागा. त्याला शुभेच्छा नका देऊ.
जे मला योग्य वाटत नाही.
मनात बरीच वर्षे येत होतं ते मांडल.आवडलं नाही तर सोडून द्या.
या वर्षी प्रथमच माझी गुरू भेट कोरोना मूळ राहिली.त्याची रुख रुख आहे.पण काल सरांना फोन करून आशीर्वाद मागितले आणि त्यांनी ते फोनवरून भरभरून दिलेही.माझी गुरू पौर्णिमा साजरी झाली.
सदैव सर्व गुरुजनांच्या ऋणात असलेला
आपला,सलील जोशी🙏🏻🌹

रविवार, ५ जुलै, २०२०

जांभूळ.

जांभुळा चा रस.!!!
झक्कास लागतो.आज सायंफेरीस गेलो तेंव्हा जांभळ मिळाली.धुवून गरम पाण्यात एक उकळी काढली.मग थंड झाल्यावर बी पट्कनी निघते.उरलेला गर थोडी साखर टाकून मिक्सरमध्ये फिरवून घेतला.मजा आली.
पोयनाडचे दिवस आठवले.खाली चादर धरून कुणीतरी वर चढून फांदी हलवायाचा.अलगद जांभळं चादरीत टपकत.त्या जांभळीवरून दरवर्षी दोन चार जण तरी निसटून पडत.झाड कुणाच्या मालकीच नव्हतं.शेजारी डोंगरी होती ती जांभळी ची डोंगरी म्हणूनच होती.पण आमच्या वयी ला लागून असलेली जांभूळच आम्हाला आवडायची.त्या जांभळी खाली एक दिवस तिन्ही सांजेस एक कातकरीण बाळंत झालेली लांबूनच आमच्या आवाडातून बघितली.तिची सासू सोबत होती.तिन तीच सगळं केलं उघड्यावरच.मी बघत होतो झाडा आड काय करतायत दोघी.मग आजी म्हणली,अरे तिला बाळ होतंय बहुतेक.इतक्यात तिने बाळाला जन्म दिलाच. मग आजी न चार कपडे आमच्याकडचे आणि भाकऱ्या,थोडं दूध मला तिला नेऊन द्यायला सांगितल होत.तिला म्हणावं उद्या येऊन जा काही लागलं तर सांग.ती म्हातारी मला मला हात जोडून म्हणली,हो रे बाबा.आजी बाईला नमस्कार सांग.परत येऊन आजीला विचारलं कोण ग ती?कधी बघितली नाही आपल्या कडे.तिकडं वाड्यावर असते का आपल्या?आजी म्हणली,नाही रे.असेल शिरगावची वगैरे.
अस रस्त्यावरच आटोपलेलं बाळंत पण दुरून बघितलं.मला वाटलं ती तिचा जुना मळका पंचा धरून उभी आहे जांभळं झेलायलाआणि झाडावर तर कुणी बाप्या चढून नाही.म्हणून बघत बसलो होतो.
जुनी आठवण आली.संध्याकाळ मस्त झाली.

शुक्रवार, ३ जुलै, २०२०

गोल्डन वर्ड ऑफ झाकिर हुसेन.

तू स्टेज वर का वाजवत नाहीस?
तू ऑर्केस्ट्रात का वाजवत नाहीस?
तू tv वर प्रयत्न करा न!
असे मला म्हणणारे बरेच सुहृद आहेत.नक्की ते माझ्या वरच्या प्रेमान म्हणतात.त्यांना माझ्या परीने सांगत असतो माझ्या साठी तबला काय आहे?
थोडक्यात सांगायचं तर मला तबला शिकताना आनंद मिळतो म्हणून मी तबला वाजवतो.
आता त्यातून अर्थार्जन जे काही होत त्यात अजून तरी ठिक सुरुय.खूप नाही पण पोटापुरतच का होईना जे मिळत ते तबल्या मूळ.
लॉक डाऊन मध्ये सगळ्यांची परिस्थिती बिकट आहे झालेली.
काही लोक प्रेमापोटी न काळजीनं म्हणतात,अरे दिवस वाईट आलेत दुसर काही कर मिळेल ते.
ओके. करेक्ट म्हणतात ते.त्या माग हेतू चांगला आहे पण,
आमच्या सारखे लोक आयुष्यभर हेच करत आलेत त्यांना दुसर काही आता जमेल का?वेळ आली तर शेवटी करीनही जे करावं लागेल ते.पण हे कुणी लक्ष्यात घेत नाही आमचं लक्ष दुसऱ्या कशात लागत नाही.
आणि जे करतोय ते अस नाही कि करू नये ते करतोय.
तर हि माझ्या सारख्या लोकांची व्यथा सांगणे कठीण आहे.
सांगायचं कारण ,झाकीर भाईंचा एक  शेअर करतोय.त्यात ते जे म्हणलेत ते ऐकलेत तर मी काय म्हणतोय हे कळेलच पण,
या कोरोना आणि त्या मूळ तयार झालेल्या परिस्थितीत सगळे टेन्शन मध्ये आहेत.त्यांना नीट अर्थ बघितला ते म्हणलेत त्याचा तर रोजच आयुष्य जगताना फायदा होईल.कलाकार असाल तर कलेकडे आणि सादरीकरणाकडे बघायचा एक प्रगल्भ विचार मिळेल.
बघा आवडतंय का.🙏🏻
सोबत लिंक देतोय https://youtu.be/QyrUXQ5VVzI