वा👌🏻जुन रेकॉर्डिंग, रंजना पेठे यानी गायलेलं मी मज हरपून बसले ग,व्हाट्सप वर आलं ते बघितलं.
मस्त वाटलं.जुन्या आठवणी जाग्या झाल्या.किती सुंदर कार्यक्रम कृष्ण धवल दूरचित्रवाणी वर सादर होत.
मग ती रंगीत झाली.मग zee वग्रे आलं आणि ते शो झाले.
हे सादरीकरण कसं आहे नीट बघा.त्या गाण्यापेक्षा, संगीत कार, कवी,वादक याहून मी किती हुच्च गाते याचा तोरा नाही.हावभाव गाण्यातील शब्दाचे भाव आकलन होऊन होत असत.त्यात कृत्रिम रित्या घातलेला उथळ भडकपणा नसे.आजही दिदी गायला उभ्या राहिल्या तर मनोभावे आरतीला च उभ्या आहेत अस वाटत.आशा ताई अवखळपणा करतील पण तो हि सुसंस्कृतपणा न सोडता.साडी कॅरी करणं या लोकांकडून शिकाव हल्ली च्या गायिकांनी.गाणं सर्वार्थाने नीट समजलं तर ती गान पूजा असते.ती सादर करताना सारख नाचाव लागत नाही.मूळ गायक गायिके पेक्षा अलीकडं नवे गायक
ते गाणं कित्ती अवघड आहे न मी कसं ते पेलतोय बघा,असलं प्रदर्शन करतायत अस वाटत.त्याही पुढं जाऊन काही जण किंवा जणी असे अविर्भाव करत असतात कि म्हणायला लाज वाटते पण ते विचित्र म्हणजे कसं सांगू?इतकंच म्हणीन कि,सेक्सी वाटतात.
एव्हढं होऊन वर वेगवेगळ्या अँगल मध्ये शूट,भडक कपडे,मागे सेट तसाच झगमगीत. बाकी सर्व तांत्रिक गोष्टी तर अति आधुनिक असतात.तरीही ते समाधान मिळत नाही.मग परत दिदी च किंवा किशोर दा च मूळ गाणं ऐकावं लागत तेंव्हा बरं वाटत.दिदीच्या साड्या भारी असतील.कानात घातलेली हिऱ्याची कुडी स्वतः तिचं गाणं ऐकून चमकत असतात अस वाटत.आणि डोक्यावरून घेतलेला पदर अशी ती उभी असते.पण ए मेरे वतन के लोगो ते गझल,प्रेमगीत त्यातील भावनेसह मनात उतरवते. रंजना पेठे नी गायलेलं हे गाणं हि तसच सादर केलंय.
अलीकडं खूप स्वकेंद्रित असत.
आता अकारण दिदीला ट्रोल केलं जातंय त्या कुणा नवीन गायिके वरून.दीदी म्हणली ते खरं नाही का?
आवाज सुंदर असला तरी कुणाची नक्कल करू नका.ती जास्त टिकत नाही हे सत्य आहे.यात त्या गैर काय म्हणाल्या?त्यांनी सर्वांनी जे करून ठेवलंय त्याला आजही तोड नाही.शंकर महादेवन, हरिहरन,कविता कृष्ण मूर्ती,अलका ते श्रेया घोषाल आपला ठसा जसा उमटवून आहेत तस काम करा कि. आम्ही कवतुक नक्कीच करू.
पण या मोठ्या लोकांना वादात ओढून स्वतः ची सवंग प्रसिद्धी करून उखळ पांढरे करणारे जास्त झालेत.बाय हुक ऑर क्रूक मी हिट होणारच.
व्हा बापडे.आमच आम्ही ठरवूच कुणाला ऐकायचं ते.
संगीत आपल्याला शिकावे लागत ते आपल्याला शिकत नाही.ते पर्वत शिखर मान खाली घालूनच चढाव लागत अन्यथा कोसळून पडायची शक्यता जास्त.
त्या पोस्ट मूळ इतकं मनात आलं.
सर्व गुणी कलाकारांस 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
मस्त वाटलं.जुन्या आठवणी जाग्या झाल्या.किती सुंदर कार्यक्रम कृष्ण धवल दूरचित्रवाणी वर सादर होत.
मग ती रंगीत झाली.मग zee वग्रे आलं आणि ते शो झाले.
हे सादरीकरण कसं आहे नीट बघा.त्या गाण्यापेक्षा, संगीत कार, कवी,वादक याहून मी किती हुच्च गाते याचा तोरा नाही.हावभाव गाण्यातील शब्दाचे भाव आकलन होऊन होत असत.त्यात कृत्रिम रित्या घातलेला उथळ भडकपणा नसे.आजही दिदी गायला उभ्या राहिल्या तर मनोभावे आरतीला च उभ्या आहेत अस वाटत.आशा ताई अवखळपणा करतील पण तो हि सुसंस्कृतपणा न सोडता.साडी कॅरी करणं या लोकांकडून शिकाव हल्ली च्या गायिकांनी.गाणं सर्वार्थाने नीट समजलं तर ती गान पूजा असते.ती सादर करताना सारख नाचाव लागत नाही.मूळ गायक गायिके पेक्षा अलीकडं नवे गायक
ते गाणं कित्ती अवघड आहे न मी कसं ते पेलतोय बघा,असलं प्रदर्शन करतायत अस वाटत.त्याही पुढं जाऊन काही जण किंवा जणी असे अविर्भाव करत असतात कि म्हणायला लाज वाटते पण ते विचित्र म्हणजे कसं सांगू?इतकंच म्हणीन कि,सेक्सी वाटतात.
एव्हढं होऊन वर वेगवेगळ्या अँगल मध्ये शूट,भडक कपडे,मागे सेट तसाच झगमगीत. बाकी सर्व तांत्रिक गोष्टी तर अति आधुनिक असतात.तरीही ते समाधान मिळत नाही.मग परत दिदी च किंवा किशोर दा च मूळ गाणं ऐकावं लागत तेंव्हा बरं वाटत.दिदीच्या साड्या भारी असतील.कानात घातलेली हिऱ्याची कुडी स्वतः तिचं गाणं ऐकून चमकत असतात अस वाटत.आणि डोक्यावरून घेतलेला पदर अशी ती उभी असते.पण ए मेरे वतन के लोगो ते गझल,प्रेमगीत त्यातील भावनेसह मनात उतरवते. रंजना पेठे नी गायलेलं हे गाणं हि तसच सादर केलंय.
अलीकडं खूप स्वकेंद्रित असत.
आता अकारण दिदीला ट्रोल केलं जातंय त्या कुणा नवीन गायिके वरून.दीदी म्हणली ते खरं नाही का?
आवाज सुंदर असला तरी कुणाची नक्कल करू नका.ती जास्त टिकत नाही हे सत्य आहे.यात त्या गैर काय म्हणाल्या?त्यांनी सर्वांनी जे करून ठेवलंय त्याला आजही तोड नाही.शंकर महादेवन, हरिहरन,कविता कृष्ण मूर्ती,अलका ते श्रेया घोषाल आपला ठसा जसा उमटवून आहेत तस काम करा कि. आम्ही कवतुक नक्कीच करू.
पण या मोठ्या लोकांना वादात ओढून स्वतः ची सवंग प्रसिद्धी करून उखळ पांढरे करणारे जास्त झालेत.बाय हुक ऑर क्रूक मी हिट होणारच.
व्हा बापडे.आमच आम्ही ठरवूच कुणाला ऐकायचं ते.
संगीत आपल्याला शिकावे लागत ते आपल्याला शिकत नाही.ते पर्वत शिखर मान खाली घालूनच चढाव लागत अन्यथा कोसळून पडायची शक्यता जास्त.
त्या पोस्ट मूळ इतकं मनात आलं.
सर्व गुणी कलाकारांस 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा