सोमवार, १६ सप्टेंबर, २०१९

अलीकड गाण्याच सादरीकरण

वा👌🏻जुन रेकॉर्डिंग, रंजना पेठे यानी गायलेलं मी मज हरपून बसले ग,व्हाट्सप वर आलं ते बघितलं.
मस्त वाटलं.जुन्या आठवणी जाग्या झाल्या.किती सुंदर कार्यक्रम कृष्ण धवल दूरचित्रवाणी वर सादर होत.
मग ती रंगीत झाली.मग zee वग्रे आलं आणि ते शो झाले.
हे सादरीकरण कसं आहे नीट बघा.त्या गाण्यापेक्षा, संगीत कार, कवी,वादक याहून मी किती हुच्च गाते याचा तोरा नाही.हावभाव गाण्यातील शब्दाचे भाव आकलन होऊन होत असत.त्यात कृत्रिम रित्या घातलेला उथळ भडकपणा नसे.आजही दिदी गायला उभ्या राहिल्या तर मनोभावे आरतीला च उभ्या आहेत अस वाटत.आशा ताई अवखळपणा करतील पण तो हि सुसंस्कृतपणा न सोडता.साडी कॅरी करणं या लोकांकडून शिकाव हल्ली च्या गायिकांनी.गाणं सर्वार्थाने नीट समजलं तर ती गान पूजा असते.ती सादर करताना सारख नाचाव लागत नाही.मूळ गायक गायिके पेक्षा अलीकडं नवे गायक
ते गाणं कित्ती अवघड आहे न मी कसं ते पेलतोय बघा,असलं प्रदर्शन करतायत अस वाटत.त्याही पुढं जाऊन काही जण किंवा जणी असे अविर्भाव करत असतात कि म्हणायला लाज वाटते पण ते विचित्र म्हणजे कसं सांगू?इतकंच म्हणीन कि,सेक्सी वाटतात.
एव्हढं होऊन वर वेगवेगळ्या अँगल मध्ये शूट,भडक कपडे,मागे सेट तसाच झगमगीत. बाकी सर्व तांत्रिक गोष्टी तर अति आधुनिक असतात.तरीही ते समाधान मिळत नाही.मग परत दिदी च किंवा किशोर दा च मूळ गाणं ऐकावं लागत तेंव्हा बरं वाटत.दिदीच्या साड्या भारी असतील.कानात घातलेली हिऱ्याची कुडी स्वतः तिचं गाणं ऐकून चमकत असतात अस वाटत.आणि डोक्यावरून घेतलेला पदर अशी ती उभी असते.पण ए मेरे वतन के लोगो ते गझल,प्रेमगीत त्यातील भावनेसह मनात उतरवते. रंजना पेठे नी गायलेलं हे गाणं हि तसच सादर केलंय.
अलीकडं खूप स्वकेंद्रित असत.
आता अकारण दिदीला ट्रोल केलं जातंय त्या कुणा नवीन गायिके वरून.दीदी म्हणली ते खरं नाही का?
आवाज सुंदर असला तरी कुणाची नक्कल करू नका.ती जास्त टिकत नाही हे सत्य आहे.यात त्या गैर काय म्हणाल्या?त्यांनी सर्वांनी जे करून ठेवलंय त्याला आजही तोड नाही.शंकर महादेवन, हरिहरन,कविता कृष्ण मूर्ती,अलका ते श्रेया घोषाल आपला ठसा जसा उमटवून आहेत तस काम करा कि. आम्ही कवतुक नक्कीच करू.
पण या मोठ्या लोकांना वादात ओढून स्वतः ची सवंग प्रसिद्धी करून उखळ पांढरे करणारे जास्त झालेत.बाय हुक ऑर क्रूक मी हिट होणारच.
व्हा बापडे.आमच आम्ही ठरवूच कुणाला ऐकायचं ते.
संगीत आपल्याला शिकावे लागत ते आपल्याला शिकत नाही.ते पर्वत शिखर मान खाली घालूनच चढाव लागत अन्यथा कोसळून पडायची शक्यता जास्त.
त्या पोस्ट मूळ इतकं मनात आलं.
सर्व गुणी कलाकारांस 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹

गुरुवार, १२ सप्टेंबर, २०१९

शेतातल भूत

*एक मजेशीर आठवण*
हेच गणपतीचे दिवस होते. बाबा पोयनाडला आले होते.घरचा उत्सव होताच.पण आज त्यांच्या शाळेच्या एका गुरुजींकडे गणपती निमित्त भजन होत.बाळ तू तबला वाजवायला हवासच हो,असा आग्रही निरोप भगवान मास्तरांचा आला होता.जेवण लवकर उरकून बाबांनी आमच्या धोंडू ला हाक मारली.
धोंड्या छकडी जोड.निघायचाय.खाऊन घेतलंस न?
हा जी .पन कूट निघताय बाळ भाऊ रातीच?
अरे भगवान मास्तर नी बोलावलंय.भजन आहे त्यांच्याकडे.आणि त्यांचा हुकूम मी टाळू शकेन का?
ते हायच. म अस करू,भजन सपल का जरा गप्पा टाकत बसा किंवा निवांत डुलकी काढा म तांबडं फुटल कि निगु.
ते आणि का?उद्या अण्णा शेतावर काही जायचे नाहीत अन तुलाही धाडायचे नाहीत.गणपती नाहीये का घरात.
पन तरी लगोलग निघायचं नाही.यिऊ कि 8वाजेपर्यंत आरतीला घरी.
तुला झालंय काय धोंड्या?का हुज्जत घालतोय?अस कधी वागत नाहीस तू.तब्येत नाही का बरी?तस असेल तर फक्त छकडी जोडून ठेव मी नेईन स्वतः.तू कर आराम.
ह्या,अस कुठं झालं का कदी?
आवरा तुमी मी जोडतो गाडी.तुमचा गालिचा द्या जरा. खाली अजून पेंढा टाकून त्या वर घालतो.
अरे बाबा बैलगाडी नाही न नेत आपण,छकडीत कशाला हवा गालिचा न पेंढा.आताच तर सजवून घेतलीत न?
हा पन,,, बरं चला म.
अस करत दोघे निघाले.
बाळ तू ती मुमै हून आणलेली बॅटरी घेतलीस न.कंदील हाय पण तिचा उजेड लख्ख पडतोय.कूट किडुक मिडुक असलं त दिसत.
हा पाणीही घेतलंय सूट तू आता.घोड्याला वैरण घेऊ नको मास्तरांकडे असेलच.
हा ते ठाव हाय.
शेवट छकडा मार्गी लागला.तिनविरा धरण आलं.लख्ख चांदण्यात त्यातलं पाणी मस्त चमकत होत. गार वारा हि सुटला होता.पावसाची अजिबात चिन्ह नव्हती.तरी धोंड्या अस्वस्थ असल्याचं जाणवत होतं.न राहवून बाबांनी त्याला विचारलंच,
धोंड्या,गप्प का रे?
भक्कन विडीचा धूर सोडतच तो म्हणला,तस काई नाही.
अरे मला सांगतोस का हे?आज ओळखतो का तुला?
बाळ भाऊ मंग सांगतो तुमाला.
नको आत्ताच बोल.का हुक्की आलीय घसा ओला करायची.धोंड्या शपथ आहे तुला हं,उत्सव सुरुय अजून तो वर घ्यायची नाही म्हणला होतास लक्ष्यात आहे न?
त.अस पाप हुईल का हातन.
अरे म बोल कि?
आता काय सांगू?हल्ली हिकडं पोर बी यायला घाबरतात.अचानक कुठल्या शेतात म्हण मोठी आकृती हुबी रहाते.ह्ये धा फूट हाय म्हण.म्हून म्हणत हुतो तांबडं फुटल का निगु.
धोंड्या तू घाबरावस या भाकड कथेला?
मी नाय ओ पण आज तुमी हायत संगती म्हून काळजी वाटते.
काही खरं नसत ते.रहा बिनघोर.त्यात गणपती आहेत म्हटल्यावर काय भितो तू.
हं ss म्हणत धोंड्याने एक मोठा झुरका घेऊन विडीचा धूर छाताडभर भरून घेतला.
बघता बघता मास्तरांचं घर आलं.गर्दी दिसत होती आणि वाद्य जुळवा जुळवी चे परिचित आवाज कानी पडले.छकडी चा आवाज ऐकून मास्तर धोतराचा सोगा हाती घेऊन वेस्कटित उभे राह्यले.
वा बाळ आलास का?ओळख ठेऊन आहेस बरं वाटत हो.म्हटलं मुंबईकर येतायत का नाही?
मास्तर तुम्ही हाक द्यावी न मी येऊ नये अस होईल का कधी.
बाबा मास्तरांच्या तिथंच अंगणात पाया पडले.पाठीवर प्रेमान हात मारत मास्तर पुटपुटले,शतायुषी भव.
ये हात पाय धुवून घे.तिथं खुंटीवत पंचा ठेवलाय तो घे हात पुसायला.झोपाळ्यावर पानाचे तबक हि आहे.तिथं विसाव जरा .मी आत जाऊन चहा सांगतो.कि आधी फराळाच काही आणू?
नको मास्तर फक्त चहा.
बार बार,आणि ए, ह्या आपल्या धोंड्या न तू?गाडी तिकडं आंब्या खाली सोड.चाकाला च घोड बांध.माग बेड्यात वैरण वग्रे लागली तर आहे.आड बाजूस घोड नको बांधू जनजनावर निघत.
जी म्हणून धोंड्या गेला.
बाबांनी हातपाय धुवून झोपाळ्यावर बैठक जमविली. चहा घेऊन विडा हि झाला जमवून मनासारखा.आत मंडळी वाट बघतच होती.
या या बाळ भाऊ.आता झक्क गवळण तर हुन द्याच पण चार नाट्य संगीत देखील ऐकवा बा. मग तबला हि बघा कसा पुडा झालाय.जमलाय का नाही सांगा.खास तुमच्याकर्ता सजवून घेतलीय जोडी.पेण हून आजच आणलीय.पेटी सुद्धा ट्यूनिंग करून आणून ठेवलीय लालबाग वरून.
झालं मग आधी बाबांनी पेटी हाती घेतली.मग तबला.शेवट बाळ भाऊ गवळण न नाट्यगीत हवंच तुमच्याकडून अशी फर्माईश आली. मग जवळची हत्यार सोडून बाबा गायला बसले.
आतून आवाज आला बाईंचा,
अरे त्याला किती दमवाल ,आधी चहा घे रे बाळ तू मग बसा गायला.सर्वांनी मध्यंतर घ्या हो जरा.
असा तो कार्यक्रम रंगत गेला.उत्तर रात्री सगळे निघाले.मास्तर म्हणू लागले,बाळ आज राहिनास हितच.दुपारी जेव न मग जरा आराम ,चहा घेऊन निघ.
थांबलो असतो मास्तर पण घरी गणपती आहे न.जाऊन जरा झोप काढीन. उद्या आमच्याकडे भजन आहे न.
हो हो ते हि आहे म्हणा.पण सावकाश जा रे.ए धोंड्या नीट हणायची छकडी उगा पळवू नको.
नाय जी.हाय मी तुमी बिनघोर र्हावा.
मग परत मास्तरांना नमस्कार करून बाबा छकडीत बसले.धोंड्या च्या इशर्तीवर कृष्णा दौडू लागली.
चांदण्यात डवरलेली शेत झुलत होती.मघाच्या भजनातले टाळाचे, पायपेटीचे सूर कानात अजून घुमत असताना त्यात रात किडे आपला सूर मिसळत होते आणि कृष्णा च्या टापा ताल धरून होत्या.
बाळ भाऊ चला हो मी लागतो हिकडं घरच्या वाटेला तुम्ही सांभाळून जावा
म्हणत भजनातला एकजण त्याच्या गावात शिरला सायकल घेऊन.आता रस्त्यावर फक्त आमची छकडी होती.
हा बोल रे आता काय सांगणार होतास?
राहू दे आता घरी जाऊ न झोपू.
अरे सांगतो का आता?
मग धोंड्या सांगू लागला.
मघा म्हणलो ते या परिसरातच दिसत.
हं बघू आपल्याला भेटायला येत का?
लांबवर तिनविरा दिसत होतं.
इतक्यात एका शेतात काही पांढुरक दिसू लागलं.धोंड्याच्या हातातील रेन खेचली गेली.घोडी हि न खिंकाळता जागी उभी राहिली.
हळूहळू काढ रे थांबू नको.
बाळ शेट पन,,
तू चल म्हणलो न
म्हणत बाबांनी धोंड्याला गाडी हाकायला लावली.ते शेत जवळ येऊ लागलं तशी ती आकृती उंच होऊ लागली.जवळ आल्यावर बाबा अचानक म्हणले,धोंड्या थांबव गाडी.
धोंड्याने आज्ञा पाळली.
गाडी थांबली तशी ती आकृती स्पष्ट दिसू लागली.एखादया कडक्या माणसाने पांढरा सदरा घातलाय न तो उभा आहे अस वाटलं.आणि बघता बघता त्या आकृती च डोकं वर वर जाऊ लागलं.त्यावर मुंडास होत ते आता दिसू लागलं. ते मुंडास चांगलं दहा फूट वर जाऊन थांबल.
बघा म्हंटल नव्हतं
धोंड्या म्हणला.
बाबांनी जवळ ठेवलेली बॅटरी काढून तिचा झोत त्या आकृतीवर टाकला.तशी मुंडाश्यात काठी दिसू लागली. ती दिसताच बाबांनी खाली उडी मारली आणि शेताकडे धावले.
कोण आहे रे तो?ये पुढं हिंमत असेल तर.म्हणत बांधावर पोचले सुद्धा.इकडं धोंड्या हि त्याची काठी घेऊन धावत आला रेन काठाला बांधून.
बॅटरीच्या झोतात एकजण न्हाऊन निघत होता.कोण रे तू?
ओ मी हाय बाळ भाऊ वळखल का?
पुढं ये.
तशी तो माणूस पुढं आला.तो भाल्या धनगर होता.देशावरून कोकणात यायचा दर साली.
काय रे हे?अस भिवतोस होय आमच्या लोकांना?
सांगतो शेट समद तुमाला.या कि हिकडं बसा घोंगडी वर.
आयल्या भाल्या तू?
आता धोंड्या हि आला.
बोल आता.
अहो मी दरसाली येतो का नाय मेंढर घेऊन तसा या साली बी अलतो.मेंढर बसवून राखतो रातीची.या साली जरा थांबलो घरला जायच तब्येत बिघडली म्हणून.म माझी गाय चरायला घेऊन रातीच हिंडत असतो.पण गावातली टारगट कुठं कुठं भेटतात पियाला बसलेली न मला तरास देतात.म हि शक्कल लढवली.तेंव्हा पासून कुणी फिरकत न्हाईत उशिराच.
बाबा जोरात हसू लागले.
पण करतोस काय अस?इतकं उंच जातंय तुझं मुंडास ते?
काय इशेस नाय बगा.हे खाली बुजगावन हाय का?त्याला पांढरा शर्ट अडकीवला.त्या शर्टाच्या मानेतून काठी काढली. त्या काठीव मुंडास ठिवल.कुणी येत आस वाटलं त आधी बुजगावन हलवतो.तरी त्यो पुढं येत राह्यला त काठी खाली बसून उच करतो.म जातंय मुंडास वर न माणसं घाबरून पळत्यात.
पर उपकार करा देवा ह्ये कुणाला सांगू नका.
बरा आहेस कि रे भामटा.चल निघतो आम्ही.
हा पर तुमी न्हाई घाबरलासा म्हणून तुमाला कळलं.पर बोलू नका कुणाला.
बाबा हसत शेतातून बाहेर आले,धोंड्या हि गालात हसत होता आणि त्याच्या छातीतून कफ वाजत होता.

बुधवार, ११ सप्टेंबर, २०१९

पैलवानाची बायको

*भयकथा*
कातरवेळी चाळ शांत झाली होती.घरोघरी स्वयंपाकाची तयारी सुरू झाली होती.पोर खेळून ,दमून घरी गेली त्या मूळ चाळी खालच पटांगण मोकळं झालं होतं.तरुण पोर मात्र चाळी समोरच्या जुन्या वडाच्या पारावर गप्पा हणत बसली होती.कुणी तमाकू ची मळी काढत होता तर कुणी मागच्या बाजूला बसून गुपचूप विडी ओढत होता.आजचा विषय जरा हटके होता.इतक्यात मारुतराव पैलवान सायकल घेऊन आला तालमीतून.
पोरांना बघून त्यान् विचारलं,कारे पोरहो कसली खलबत करताय?जा कि घरला.
ओ मारुत्राव या कि हिकडं जरा.
तस पैलवान सायकल हातात घेऊन पारावर आला.स्टँडला सायकल लावली न पोरांनी सरकून करून दिलेल्या जागेवर वडाला टेकून बसला.
हं बोला काय काढलं नवीन?
काय नाय पर मळी काढतो का आधी दादा मंग बोलू.
हा न म काय,काढ डबी.
नाऱ्या न दिलेली डबी हाती घेऊन पैलवान बार जमवू लागला.
आता उचकटता थोबाड का मी जाऊ खोलीवर?लेको तुम्ही घरी जाऊन आयत गिळताल मला अजून माझं करून घ्याच हाय.
इतकं म्हणून त्याने मळी हातावर झाडून तोंडात अलगद सोडली.
आता नाऱ्या सरकून पुढं येऊन म्हणला,दादा नवं ऐकल का ?
कसचं म्हणून राह्यलाय तू?
आर गावात नवीन बोंब पडलीय.येशीवर तो तिठा है का नाही तिथं म्हण एक बाई हुभी असतेय अलीकडं दोनचार रोज झाले.येणारा जाणारा दिसला त त्याला सरळ ईचारती,यिऊ का मी संगट.
कोण म्हणल?कुणी बगीतली?उगा आपलं काय बाय खुळ काढून बसता तुमी रिकामटेकडे लोक.
आर तस्स न्हाई.हे अक्षी खरय.बापू नाय का तो खाल्ल्या अळीचा गवळी,त तो म्हणत हुता. राती गवत कापून येत होतं बेन त त्याला दिसली.झालंच तर गणू अण्णा चा परतू तालुक्याहून उशिरा आला परवा.त्याच्या बुलेट ला पण आडवी आली न ती.धूम पळवली गाडी न घरी आला .मंग जो फंफंला तो अजून ताप उतरना झाला.सारखा घाबरलेला असतो.आज भागी मावशीला उतारा काढाय लावला तवा कूट जरा शांत झालाय.
आस्स?मला तरी बी पटना झालंय. अस कसं हुईल?न भेटलीच बाई तर समोर हूब राहून ईचाराय काय गेलत का कोण बाय तू? उगा एक म्हणला म्हून दुसऱ्याला भास झाला बाकी काई नाय.उगा कंड्या पिकवू नका ज घरला सगळे.मी बी निघतु.
नाय तुला पटच ना म्हण कि म?इतकं सांगून राह्यलो तरी?
आर कसं पटाव लेका?तुमी नुसतं फुशारक्या मारायच्या कामाचे.जरा तालमीत यिऊन शरीर कमवा मंग कसली भीती उरत नाय बगा. जय बजरंग बली म्हणून दंड थोपटले का सगळी भीती जातेय.वाटलीच त समोरच्याला वाटती.
आत्ता?म लावतो का पैज?
कसली?
आज रातच्याला तिठ्याव जायच.जर ती बया दिसली तर तूच तिची विचारपूस करून दाखव.तुला रविवारच्याला एक कोंबडी मी देतो.
का उगा इरला घालतो,मला काम हैत.असल्या पैजा लावाय येळ न्हाई मला.
म हरला म्हण कि.तुुला हिम्मत हुत न्हाई?
ए भैताड कोण घाबरतंय?
आर म घे कि पैज.
चल घेतली.पन कोन यील माज्या संगट मी खरच जातो का न्हाई बगाया?
हा हा आमी कुणी येत न्हाई बा.
म उद्या बोला।पैलवान गेलाच न्हाई उगा बाता मारतो.
तस कशान हुत?तू तिठ्याव गेला का तिकडं एक बाभळीच झाड नै का?त्यात एक खिळा मारून ये.आमी सकाळी तो बगू .
चालतंय कि.पण केलं तस त कोंबडी नक्की हा.
अरे एकदम नक्की.
बार बार सुटा आता मी जेवायचं बगतो माझं.
मग सगळे निघाले.पार खाली झाला.पैलवान चाळीतल्या पहिल्या मजल्यावरच्या आपल्या खोलीत गेला.जेवण करून बसला खाटेवर. पान जमवताना विचार करू लागला,खर असेल का हे?मायला जाऊनच बगू.पान खाऊन उठला.सदरा लेंगा घालून दारा जवळची लाठी न बॅटरी उचलून बाहेर पडला.सायकल घेतली.बॅटरीत नामुच्या दुकानातून नवीन मसाला भरून घेतला.म लागला वेशीवर जायला.चांदण पडलं होतं.बाजारपेठ माग पडली.नाक्यावर खाल्ल्या हाताला वळून वेशीकड बाभळीच्या झाडाकडे निघाला.आता कच्चा रस्ता सुरू झाला.सायकलची खडखड सुरू झाली.क्लिपवर बॅटरी अडकवली होतीच ती सुरू केली.तिचा झोत लांबवर पडला.जराश्यान वेशी वरची बाभूळ दिसू लागली.सावकाश पॅडल मारत चालत होता.
         अचानक ती बाभूळ पांढुरकी चमकते क काय असा भास होऊ लागला.चांदण्या मूळ तस दिसत असावं म्हणत पैलवान झाडाजवळ गेला.हिकडतीकडे बघितलं.रातकिडे सूर धरून होते.बाकी सामसूम होती.उगा एखादं वाळल पान उतरताना हलका आवाज करत होत तितकंच.
एला रोज त येतोय हितून कदी काय बघणं झालं न्हाई.हि कार्टी उगा घाबरत असतात.खिळा मारून कोंबडी नक्की करावी न निघावं झालं.उद्या परत तालमीत जायच हाय. अस मनात म्हणत पैलवानाने खिशातून खिळा काढला.तो ठोकायला दगड उचलायला म्हणून वाकला न बांगडी वाजली.
च्या भैन!कुणाची असलं का भास हुता म्हणत उभा राह्यला. आजूबाजूला बघितलं कुणी नाही.परत पुढं झाला तशी परत खसखस ऐकू आली जशी कुणी पदर साफ करून नीट अंगावर घ्यावा. आता मात्र हा भास नव्हता.पैलवान ताठ उभा राहून म्हणला,कोन त्ये?हिम्मत असेल त फूड या कि.अडून अडून का?
इतकं म्हणला न सर्रकन बाभळीच्या मागून एक एक बाई बाहेर आली.हातचा खिळा पडला.पण धीर करून म्हणला,कोन बाई तुमी?हित या वकती काय करतासा?
आता ती बाई त्याला स्पष्ट दिसत होती.मध्यम उंची.गोलाकार बांधा. डोईवर पदर.हातात चार सोन्याच्या बांगड्या चमकल्या.म्हणजे मघा भास नव्हता तर.
मी तुमच्या सोबत येऊ का?मला कोणी नाही.एकटी आहे.कुणाच्या तरी भक्कम आधाराची गरज आहे. तुमची सर्व काम करीन. काही कमी पडू देणार नाही.
आवाज तर इतका गोड आणि भारून टाकणारा होता.पैलवान आता अगदी समोर येऊन तिला न्याहाळू लागला.बाई हजारात देखणी होती.पैलवान मनातून तिच्यावर खूष झाला. असली बाई आपणहून सोबत येते म्हणतेय!
विश्वास ठेवा माझ्यावर.आता अजून स्पष्ट सांगते.मी तुमची बायको होऊन राहीन.तुम्हाला हवं ते देईन.खूष ठेवीन.
पण हे अस का?बदल्यात काय करावं लागल?आणि तुम्ही कोण कुठल्या?काहीच माहीत नसता आस्स क्स करावं मी₹
बदल्यात करायचं इतकंच कि,
मला कुठले असे प्रश्न विचारायचे नाहीत.मी घराबाहेत पडणार नाही.कुणाच्याही दृष्टीस येणार नाही.इतकं माझं ऐकायचं बाकी मी तुमच ऐकीन हा शब्द देते.मग येऊ सोबत?
पैलवान आता तिच्या पूर्ण कह्यात गेला होता.पटकन हो म्हणला.
म व्हा पुढं मी येते मागून.
पन म्या पैज लावली हुती.
म तो खिळा घ्या कि ठोकून अन उद्या बगू दे पोरांना.बाकी फक्त तुमच्या माझ्यात ठेवायच.कसं₹
हा हे बेस म्हणता बगा तुमी तसच करू.
मग पडलेला खिळा त्यानं झाडात दगडाने ठोकून ठेवला.आता येता त या कि सायकलीवर बसा. तशी बाई लाजली न म्हणली,पुढं नको माग बसते.पैलवान अजून खूष झाला.बाई बसल्यावर गावाकडे निघाला.पण कुणी बघितलं तर?हा विचार मनात आला तो बाईला बोलून दाखवला.ती म्हणली,बिनघोर रहा कुणी बघत नाही.
आओ पन कुनी बघितलं च तर?
मी सांगतेय न नाही होणार तस मग नाही होणार.खात्री बाळगा.
पैलवानाने मग सायकल खरच बिनघोर हाणली.तिला घरात घेतली.
आज तुम्ही थकला असाल इकडं बाजेवर झोपा मी खाली पडतो.भूक लागली असल न?परातीत भाकरी हाय ती घ्या कि.
नाही मला भूक नाही.आणि तुम्ही खाली का झोपणार?मी शब्द दिलाय न तुमच्या बायको सारखी राहीन म्हणून?म दोघे बाजेवर च निजू.
पैलवान हरखला आणि त्याने लाईट च बटन बंद केलं.भांडभर पाणी पिऊन तो बाजेकडे निघाला.


सकाळी उठून पैलवान बघू लागला कि स्वप्न बघितलंय का खर होत ते?
खोली झक्क आवरलेली होती.जमीन झाडून पुसून स्वच्छ. स्वयंपाक खोलीतून मस्त चहाचा वास येत होता.इतक्यात ती बाथरूम मधून आली. नुकतीच न्हाऊन आलेली होती.पैलवान तिचं रूप बघतच राहिला.बघताय काय नुसतं?तोंड धुवून घ्या चहा तयार आहे.तो आज्ञाधारक मुलासारखा उठला न तोंड धुवून आत गेला.त्याला बसायला तीन पाट सरकवला.चहा सोबत खारी होती. हे कोणी आणलं?आपण तर नाही. मग हिने आणली?
हे सर्व बघून ती हसत म्हणली,म्हटलं न आता तुम्हाला काही कमी पडणार नाही.
मग अंघोळी नंतर गरम गरम नाश्ता तयार होता. त्या नंतर पेलाभर बदाम पिस्ता घातलेल्या दुधाची चरवी आली. दुपारी जेवायला काय हवं फक्त सांगून जा तयार मिळेल याल तेंव्हा.पण आपली बोली लक्ष्यात ठेवा
मी इथं आहे याची कुणाशी वाच्यता करायची नाही.
नाही बा मी कशाला करतो?
ते पैज लावली होतित त्यांना काय बोलणार?
बोलायच काय?खिळा बघून या म्हणीन.कुणी बाई भेटली ना कुत्र.अस सांगीन.
हे ऐकून ती गालात अशी हसली कि पैलवान परत येऊ लागला जवळ.ती म्हणली,हं,आहेच मी आता न?तालमीत जा आता.
तशी तो हसत बाहेर गेला.दरवाजा लावून बाहेरून कुलूप लावा तितकं.आतून तिने बजावलं.त्यानं कुलूप लावून घेतलं.
कालची पोर त्याची वाट बघत होती पारावर.काय र काय बघितलं?
कसचं काय?म्हनल न उगा तुमचं कायबाय असतंय.कुनी बाई नाय कि बुआ नाय.जा खात्री करून या ठोकून आलोय खिळा. व्हय बाजूला मला तालमीत जायला उशीर हुतोय.अन ते रविवारी कोंबडी च मात्र नक्की हा.
पोर त्याच्या कड बघतच राहिली.
एकजण।म्हणलाच, याच नशीब जोरावर दिसतंय.काळवेळ जमली न्हाई म्हून सुटला.
आर हो पर माझी कोंबडी गेली कि त्या पैजेत.
हा ती त गेलीच.असू दे निदान गावावरची आफत गेली म्हणायच कि आता.

पैलवानाचे दिवस मस्त चालले होते.ती त्याच्या सोबत येत नव्हती कुठंही बाहेर इतकं सोडलं तर बाकी तिच्यात नाव ठेवण्या जोग काहीही नव्हतं.कुणाला कसला संशय हि आला नव्हता.त्याची खोली तशी रस्त्यावरून दिसत असे पण तरी तिला कुणीच बघितलं नव्हतं कधी.खोली एक बाजूला होती आणि अलीकडच्या खोल्या बंद असल्याने तिकडं कुणीच रहात नव्हतं.यथावकाश तिला मुलगा झाला.आता पैलवान आणि खूष झाला.पोर देखील अजिबात रडत नसे.फक्त गालात हसायचं.आश्चर्य वाटले त्याला पण कोणाला सांगणार.
एक दिवस दरवर्षी गावतल्या जत्रेस येणारा कासार आज पारावर येऊन बसला.तो नेहमी तिथं बसे.सकाळी न्याहारी उरकली कि टोपलीतल्या बांगड्या नीट मांडून विकायला बसे.येणाऱ्या जाणाऱ्या बाया बापड्या बांगड्या भरून घेत.
त्याच लक्ष पैलवणाच्या खोलीकडे गेलं न तो चरकला.काहीतरी वेगळं जाणवलं त्याला.एका नाथपंथी बाबा ची त्यानं सेवा केली होती त्या मूळ खूष होऊन बाबांनी त्याला काही विद्या शिकवली होती.अट मात्र घातली होती कि त्या विद्येचा वापर धंदा म्हणून करायचा नाही.फक्त अतिशय अडचणीत असलेल्या गरजूस मदत करायची ती विद्या वापरून.
त्या खोलीत काही वेगळं आहे हे त्याला जाणवलं.संध्याकाळी परत जायच सोडून तो पैलवानाची वाट बघू लागला. पैलवान येताच त्यानं त्याला हात केला.पैलवान त्याला ओळखत होताच.तो हि पारावर आला.काय काका कसं सुरुय धंदा पाणी?
सगळं ठीक बाबा.तुझं कस काय?
माझं हि ठीकठाक .
पैलवान एक महत्वाची गोष्ट बोलायचीय.
म बोला कि.
तुमच्या घरी कोण रहात?
पैलवान चरकला.
मी एकटाच कि.अस का ईचारल?
बघा खर सांगा लई वंगाळ बाब हाय.
कोणती पण?
घरी कोण आहे ते खरं बोला.मी विद्या जाणतो.मला काही दिसलंय जे वाईट आहे.तुमच नुकसान होईल.मी वाचवू शकतो तुम्हाला फक्त खर बोला.
आता पैलवानाचा नाईलाज झाला. त्यानं खर ते सर्व सांगितलं.
मग कासारान पिशवीतून एक ताईत काढला. पैलवानाच्या गळ्यात बांधला. आणि एका लाल रेशमी वस्त्रात बांधलेली उदी काढली. मग काही वेळ तो मंत्र पुटपुटत होता.ते झाल्यावर ती उदी एका कागदात बांधून ती खिशात ठेव.घरात गेलास कि उंबरठ्यावर ती उदी एक रेषेत टाक. तशीच खिडकीत हि टाक. जोवर ताईत आहे तुझ्या गळ्यात तोवर तुला काही होणार नाही.ती तो काढायचा प्रयत्न करेल ते होऊ देऊ नकोस.आणि दरवाज्या वर ती उदी देखील टाक म्हणजे ती कुठं जाऊ शकणार नाही.इतकं केलंस कि मी येईन आणि पुढच काम करीन. तिला तिच्या स्थानी परत पाठवून देईन.
पण तुम्ही म्हणता ते खरं कस मानू. मग आज बघच तू खात्री करून.आज तू पलंगावर झोपायच्या आधी मुलाला उचलून दूर पाळण्यात ठेव. मग तिच्यावत रात्री लक्ष ठेव.तुला समजेल काय आहे ते.
पैलवान घरी गेला.कासार म्हणला तस वागला. मुलाला दूर।पाळण्यात ठेवलं आणि बायकोच्या बाजूला झोपला.आता बाजेच्या भिंतीकडील बाजूस तो होता.रात्री मूल चळवळ करू लागल हे त्याला जाणवलं.हळूच चादरी खालून तो बघू लागला.बाजूला झोपलेली बायको देखील जागी झाली होती.मुलाला उठलेला बघून तिनं हात पाळण्याचा दिशेला केला.आणि हळूहळू तो हात पाळण्यात जाऊन पोचला लांब होत होत.तिनं त्या मुलास पंजाने उचललं आणि हात परत माग येऊ लागला.आता तो डोळे फाडून बघू लागला. हा प्रकार बघून तो घाबरून ओरडला.आता तिने पटकन वळून बघितलं.पैलवानाच्या गळ्यात ताईत चमकला.तिने मुलाला तिथेच टाकून बाजूला उडी मारली.रागाने म्हणून लागली,हे काय बांधलंत गळ्यात
आधी काढून टाका.तो नाही म्हणला तशी ती पुढं झेपावली. तिचा हात ताईतावर पडताच तिचं खर रूप दिसू लागलं. काळी बेंद्री विद्रुप स्त्री झाली ती. सुळे होते तिला ओठाच्या कडेला. पैलवणाला आठवलं उदी आहे आपल्याकडे जी उंबरठ्यावर टाकायला सांगितलंय.तो तसाच उठला न दाराकडे जाऊ लागला.ती त्याच्या अंगावर गेली धावून पण विजेचा झटका बसावा तशी माग झाली.ताईत असे पर्यंत तुला धोका नाही हे खरं झालं.तिने मग पलंगावरील मुलांकडे धाव घेतली न त्याचा गळा दाबला.तो ताईत काढ न ती उदी फेकून दे नाहीतर मुलगा मेला समज.तिची काळी नख पोराच्या नरडीचा घोट घेऊ लागली. तरी त्यानं ती उदी उंबरठ्यावर रेषा खेचत सांडली.तिनं मुलाचा जीव घेतला.इतक्यात दार वाजल. पैलवानाने उघडलं तर तो कासार उभा होता.तो आत आला.तशी ती आणि किंचाळत मागे हटली मुला पासून. काका आता हो?
घाबरू नकोस तिला तिच्या जागी पाठवतो. कासार तिच्याकडे बघत काही पुटपुटू  लागला.झोळीतूम कमंडलू काढून त्यातलं पाणी तिच्या अंगावर टाकलं.तो आता विव्हळू लागली.मला जाऊ दे म्हणून विनवू लागली.कासार काका म्हणला,तू गेलीस याची खूण काय देशील?
समोरच्या पारावरच्या झाडाची मोठी फांदी खाली पडेल.
तुझ्या मुलास हि सोबत घेऊन जाशील तर सोडतो.
ती हो म्हणली.मग अचानक खाडकन खिडकी उघडली गेली आणि ती आणि तिचा मुलगा काळा धूर होत त्या खिडकीतून बाहेर पडताना दिसली.
आता दार उघड.कासार काका म्हणले.पैलवानाने दार उघडलं.त्याच वेळी समोरच्या पारावरील मोठी फांदी झपकन खाली पडली करकर आवाज करत.
पैलवान घामाने चिंब झाला होता.
कासार काका म्हणले,पोरा मी जातो आता.माझं काम झालं.वाचलास तू .पुन्हा अशी चूक करू नकोस.आणि ते जिना उतरत दिसेनासे झाले.फक्त त्यांनी जाताना जागवलेला अल्लख निरंजन मात्र आसमंतात घुमत राहिला.
😊🙏🏻