फिरायला जाताना सफाई कामगार त्यांच्या कामात दिसतात.जे एरवी कधी मी बघितले नव्हते कारण ते काम करून गेले कि बाहेर पडलेलो असायचो. पण आता रोज जाताना दिसतात.त्यात पुरुष ,बायका दोन्ही असतात.बायका फक्त झाडून पुढं जातात कचरा ठिकठिकाणी गोळा करून ठेवत.मग मागच्या गाडीत तो पुरुष कामगार उचलून टाकून निघून जातात.त्यात एक ग्रुप असतो जो मोठी गटार मधली झाकण उघडून साफ करतो. त्यांच्या कडे मोठ्या काठी च्या टोकावर काटा चमचा असतो तसा काटा असतो,त्यानं ते आतली घाण उचलून कडेला जमा करतात.मुंबईत बघितलं होत प्लाझा च्या मॅन होल आधी नुसतं झाकण उघडून तसच ठेवत.एका कामगाराला विचारलं होत अस का?तो म्हणला,बाबा यात विषारी गॅस तयार झालेला असतो तो निघून जातो त्या मूळ.मग ती माणसं कुठली सुरक्षा रक्षक साधने न वापरता त्यात उतरत.वरून बघितलं तर इतका वाईट वास येत असतो.काळा कुट्ट चिखल घाणीचा.त्यात कधी कधी तो छाती इतका ही असतो.कसे काम करतात हे लोक?
परत सोपऱ्यात येऊ,
तर त्यांचं काम थोडं थांबून बघितलं.तो जमलेला मैला आता पाणी त्यातून ओसरून गेल्याने ढीग होऊन पडला होता.दोघेजण आले आणि त्या ढिगात काठी खुपसून उलट सुलट करू लागले.म्हटलं अस का करतायत हे?सरळ गाडीत टाकायचा तर हे का ?मग पाह्यलं तर त्यात एकाने हात घालून काही बाहेर काढलं.ते चक्क पैशाच पाकीट होत.त्यानं ते उघडून बघितलं.भिजलेल्या कागदा सारख काही निघालं.त्यातील काही नोटा होत्या त्या त्यांनी करेक्ट ओळखून बाजूला काढून ठेवल्या.मग काही चिल्लर निघाली ती बाजूस ठेवली.नंतर एक लेडीज पर्स हि निघाली.मी बघत उभा होतो.मग त्यांनी सगळ्या कचऱ्यातून बिअर,एनर्जी ड्रिंक चे अल्युमिनियम कॅन,प्लास्टिक च्या पिशव्या आणि इतर वस्तू ही प्रत वारी करून घेतल्या. त्या एका गोणीत भरल्या.मग कचरा गाडीत भरून ती गोण घेऊन निघून गेले.एकजण मला बघत होता तो म्हणला,अब वो सब चीजे बेची जायेगी.बेचारो को उतनी हि उपर कि कमाई होती है.
परिस्थिती माणसाला काय काय करायला लावते.त्या लोकांना मानलं.अशी मेहनत करून जगतायत जीव पणाला लावून.
आणि एक गोष्ट अशीच मनाला चटका लावून गेली.
सुरेखा ताई पुणेकर यांच्या एका चॅनल वर झालेल्या मुलाखती मधला दीड मिनिटांचा भाग तू नळीवर बघितला.त्यात त्यांना त्यांच्या प्रेमा बद्दल विचारलं गेलं.त्यांच आयुष्यही खूप खडतर गेलंय. तर त्या प्रश्नावर त्या म्हणाल्या,
मी माझ्या लोकाकर्ता खूप केलं.आता नंतर च्या काळात मला कुणीतरी आवडला होता.तो हि प्रेम करत होता माझ्यावर.पण लग्न करू शकत नव्हता.मी ते समजून होते तरी प्रेम करत होते.आता यात कुणाला हरकत का असावी?ज्या कुटुंबा साठी पोरांसाठी मी आयुष्यभर काम केलं त्यांनी माझी ही इतकीच गोष्ट मानायला काय हरकत होती?पण नाही.त्यांनी खूप विरोध केला मग ते प्रकरण संपलं.
दोन्ही गोष्टी जरी वेगळ्या असल्या तरी जगताना कुणाला काय भोग भोगावे लागतील सांगता येत नाही.मग निदान अश्या आयुष्य भोगणार्या लोकांना त्यांच्या वर्तुळातील लोकांनी समजून घ्यायचा प्रयत्न न करता वागणं हे खूप निर्दयी वाटलं.आज सुरेखा ताईंचं नाव आहे.अमेरिकेत जाऊन कार्यक्रम सादर करून आल्यात.मराठी बिग बॉस मध्ये त्यांना घेण्यात आलंय. पण बाईच्या मनातली हि खन्त कशी दूर होणार?
या पार्श्वभूमीवर अस काहीही न भोगलेली माणस अश्या माणसांना उगाच नाव ठेऊ लागली कि अश्या लोकांची किव येते.हलकट हो यातलं 5 टक्के तुमच्या वाट्याला आलं असत तर तुम्ही नक्कीच टिकला नसतात.
पण नशीब कुणाला कुठं कसं ठेवेल सांगता येत नाही.
काल प्रेमा च्या विषयात मी म्हणलो कि प्रेम म्हणजे काय?तर त्या हत्ती न आंधळ्या लोकांसारखं आहे.ज्याच्या समोर,हाती जे लागेल ते चाचपून ते त्याला तस वाटेल.आयुष्याची हि तीच कहाणी आहे.प्रत्येकाची वेगवेगळी. आपल्या वाट्याचे आपण इमानदारीत जगावे.
फिरताना घडकेला किस्सा नंबर दोन.
काल अचानक आल्या चा सुगन्ध आला.बघितलं तर टपरी होती चहा ची.पुढं जाववल नाही.एक कटिंग दे म्हटलं.त्यानं टपरीच्या बाजूला एक बाक ठेवलाय त्यावर बसलो.नुकताच गाळून आलेला चहा त्या मूळ ग्लास गरम होता.तो बाजूस ठेऊन निववत ठेवला.इतक्यात बाजूनं एक म्हातारा गृहस्थ आला.टी शर्ट होता काळ्या पांढऱ्या पट्ट्याचा आणि पॅन्ट.दोन्ही मळलेल्या अवस्थेत. माझ्याकडं पाठ करून बसला.दोन्ही हात भरलेले होते.एक ग्लास पाण्याचा,एक चहा चा आणि ग्लुकोज बिस्कीट चा पुडा. शरीर कृष्. तो खाली बसला.हळूच सगळं खाली ठेवलं.बिस्कीट पुडा सोडायला त्याला बराच वेळ लागला.सुटल्यावर त्यानं पाण्याचा ग्लास घेऊन त्यात बिस्कीट बुडवून खाऊ लागला.तेंव्हा जाणवलं त्यांना दात नसावेत.नजर समोर ,पण कुठंतरी शून्यात बघत बसला होता.चहा तसाच होता बाजूला.एकेक बिस्कीट हळूहळू काढत होता न खात होता. मनात आलं कोण असेल हा?काय कहाणी असेल याची.चेहेरा अत्यंत सोज्वळ वाटत होता. कसलं दुःख हवेत बघत विरघळवत होता पाण्यात बुडणाऱ्या बिस्कीट सारख?मला खरच बघवल नाही.कारण माग एकदाच अश्या प्रसंगी मनात विचार आला,हेच आपलं झालं तर?
मग एक घोटात चहा संपवून उठलो.त्या टपरी वाल्याला पैसे दिले.तो त्या म्हाताऱ्या कड बघत होता एकटक.कदाचित ग्लास घेऊन पैसे बुडवून पळून तर नाही न जाणार !अस त्याच्या मनात असेल का?हा हि विचार आला.मग त्याला म्हटलं,त्यांनी पैसे दिले का? तो नाही म्हणला. किती होतायत त्यांचे?
सहा रु.
बिस्कीट?
वो लाया था .दिया होंगा किसिने.
तो ये उनका चाय का पैसे लिजीए.उनसे लेना नही.और पुछे तो बोलना, वो तुम्हारे साथ था वो दे के गया.
ठीक है साब.
मग त्या गृहस्थाकड न बघता त्याच्या मागून मी निघालो.तो अजूनही ग्लासात दिसायला तरी,बिस्कीट बुडवत होता.
मी भीक देत नाही जनरली.तसच कुणी म्हातारे, परावलंबी दिसलं तर जमत ते देतो.पण खायला मात्र देतो घेऊन.
का ? पुण्याची जोडणी?
बिलकुल नाही.ते मी कोण करणारा?पण अश्या लोकांत मी स्वतःला बघतो आणि स्वतः च स्वतःलाच मदत करतो.
कबीर कानात कोकलत असतो,
इतना ही देना स्वामी
ज्या मे कुटुंब समाय
मै भी भुखा न रहू
साधू न भुखा जाय
यात माझा आग्रह मात्र इतकाच
कि
*इतना तो देनाही*
परत सोपऱ्यात येऊ,
तर त्यांचं काम थोडं थांबून बघितलं.तो जमलेला मैला आता पाणी त्यातून ओसरून गेल्याने ढीग होऊन पडला होता.दोघेजण आले आणि त्या ढिगात काठी खुपसून उलट सुलट करू लागले.म्हटलं अस का करतायत हे?सरळ गाडीत टाकायचा तर हे का ?मग पाह्यलं तर त्यात एकाने हात घालून काही बाहेर काढलं.ते चक्क पैशाच पाकीट होत.त्यानं ते उघडून बघितलं.भिजलेल्या कागदा सारख काही निघालं.त्यातील काही नोटा होत्या त्या त्यांनी करेक्ट ओळखून बाजूला काढून ठेवल्या.मग काही चिल्लर निघाली ती बाजूस ठेवली.नंतर एक लेडीज पर्स हि निघाली.मी बघत उभा होतो.मग त्यांनी सगळ्या कचऱ्यातून बिअर,एनर्जी ड्रिंक चे अल्युमिनियम कॅन,प्लास्टिक च्या पिशव्या आणि इतर वस्तू ही प्रत वारी करून घेतल्या. त्या एका गोणीत भरल्या.मग कचरा गाडीत भरून ती गोण घेऊन निघून गेले.एकजण मला बघत होता तो म्हणला,अब वो सब चीजे बेची जायेगी.बेचारो को उतनी हि उपर कि कमाई होती है.
परिस्थिती माणसाला काय काय करायला लावते.त्या लोकांना मानलं.अशी मेहनत करून जगतायत जीव पणाला लावून.
आणि एक गोष्ट अशीच मनाला चटका लावून गेली.
सुरेखा ताई पुणेकर यांच्या एका चॅनल वर झालेल्या मुलाखती मधला दीड मिनिटांचा भाग तू नळीवर बघितला.त्यात त्यांना त्यांच्या प्रेमा बद्दल विचारलं गेलं.त्यांच आयुष्यही खूप खडतर गेलंय. तर त्या प्रश्नावर त्या म्हणाल्या,
मी माझ्या लोकाकर्ता खूप केलं.आता नंतर च्या काळात मला कुणीतरी आवडला होता.तो हि प्रेम करत होता माझ्यावर.पण लग्न करू शकत नव्हता.मी ते समजून होते तरी प्रेम करत होते.आता यात कुणाला हरकत का असावी?ज्या कुटुंबा साठी पोरांसाठी मी आयुष्यभर काम केलं त्यांनी माझी ही इतकीच गोष्ट मानायला काय हरकत होती?पण नाही.त्यांनी खूप विरोध केला मग ते प्रकरण संपलं.
दोन्ही गोष्टी जरी वेगळ्या असल्या तरी जगताना कुणाला काय भोग भोगावे लागतील सांगता येत नाही.मग निदान अश्या आयुष्य भोगणार्या लोकांना त्यांच्या वर्तुळातील लोकांनी समजून घ्यायचा प्रयत्न न करता वागणं हे खूप निर्दयी वाटलं.आज सुरेखा ताईंचं नाव आहे.अमेरिकेत जाऊन कार्यक्रम सादर करून आल्यात.मराठी बिग बॉस मध्ये त्यांना घेण्यात आलंय. पण बाईच्या मनातली हि खन्त कशी दूर होणार?
या पार्श्वभूमीवर अस काहीही न भोगलेली माणस अश्या माणसांना उगाच नाव ठेऊ लागली कि अश्या लोकांची किव येते.हलकट हो यातलं 5 टक्के तुमच्या वाट्याला आलं असत तर तुम्ही नक्कीच टिकला नसतात.
पण नशीब कुणाला कुठं कसं ठेवेल सांगता येत नाही.
काल प्रेमा च्या विषयात मी म्हणलो कि प्रेम म्हणजे काय?तर त्या हत्ती न आंधळ्या लोकांसारखं आहे.ज्याच्या समोर,हाती जे लागेल ते चाचपून ते त्याला तस वाटेल.आयुष्याची हि तीच कहाणी आहे.प्रत्येकाची वेगवेगळी. आपल्या वाट्याचे आपण इमानदारीत जगावे.
फिरताना घडकेला किस्सा नंबर दोन.
काल अचानक आल्या चा सुगन्ध आला.बघितलं तर टपरी होती चहा ची.पुढं जाववल नाही.एक कटिंग दे म्हटलं.त्यानं टपरीच्या बाजूला एक बाक ठेवलाय त्यावर बसलो.नुकताच गाळून आलेला चहा त्या मूळ ग्लास गरम होता.तो बाजूस ठेऊन निववत ठेवला.इतक्यात बाजूनं एक म्हातारा गृहस्थ आला.टी शर्ट होता काळ्या पांढऱ्या पट्ट्याचा आणि पॅन्ट.दोन्ही मळलेल्या अवस्थेत. माझ्याकडं पाठ करून बसला.दोन्ही हात भरलेले होते.एक ग्लास पाण्याचा,एक चहा चा आणि ग्लुकोज बिस्कीट चा पुडा. शरीर कृष्. तो खाली बसला.हळूच सगळं खाली ठेवलं.बिस्कीट पुडा सोडायला त्याला बराच वेळ लागला.सुटल्यावर त्यानं पाण्याचा ग्लास घेऊन त्यात बिस्कीट बुडवून खाऊ लागला.तेंव्हा जाणवलं त्यांना दात नसावेत.नजर समोर ,पण कुठंतरी शून्यात बघत बसला होता.चहा तसाच होता बाजूला.एकेक बिस्कीट हळूहळू काढत होता न खात होता. मनात आलं कोण असेल हा?काय कहाणी असेल याची.चेहेरा अत्यंत सोज्वळ वाटत होता. कसलं दुःख हवेत बघत विरघळवत होता पाण्यात बुडणाऱ्या बिस्कीट सारख?मला खरच बघवल नाही.कारण माग एकदाच अश्या प्रसंगी मनात विचार आला,हेच आपलं झालं तर?
मग एक घोटात चहा संपवून उठलो.त्या टपरी वाल्याला पैसे दिले.तो त्या म्हाताऱ्या कड बघत होता एकटक.कदाचित ग्लास घेऊन पैसे बुडवून पळून तर नाही न जाणार !अस त्याच्या मनात असेल का?हा हि विचार आला.मग त्याला म्हटलं,त्यांनी पैसे दिले का? तो नाही म्हणला. किती होतायत त्यांचे?
सहा रु.
बिस्कीट?
वो लाया था .दिया होंगा किसिने.
तो ये उनका चाय का पैसे लिजीए.उनसे लेना नही.और पुछे तो बोलना, वो तुम्हारे साथ था वो दे के गया.
ठीक है साब.
मग त्या गृहस्थाकड न बघता त्याच्या मागून मी निघालो.तो अजूनही ग्लासात दिसायला तरी,बिस्कीट बुडवत होता.
मी भीक देत नाही जनरली.तसच कुणी म्हातारे, परावलंबी दिसलं तर जमत ते देतो.पण खायला मात्र देतो घेऊन.
का ? पुण्याची जोडणी?
बिलकुल नाही.ते मी कोण करणारा?पण अश्या लोकांत मी स्वतःला बघतो आणि स्वतः च स्वतःलाच मदत करतो.
कबीर कानात कोकलत असतो,
इतना ही देना स्वामी
ज्या मे कुटुंब समाय
मै भी भुखा न रहू
साधू न भुखा जाय
यात माझा आग्रह मात्र इतकाच
कि
*इतना तो देनाही*