रामदास स्वामी आणि त्यांच्या शिष्यांची गोष्ट आठवली आज जी खूप फेमस आहे.
स्वामी आणि शिष्य परिवार जंगलातून मार्गक्रमण करत जात असतात.वाटेत एक छातीभर पाणी असणारा ओढा पार करून जायच असत.एक तरुण स्त्री तिथं उभी असते.तिला हि पलीकडे जायच असत पण पोहोता येत नाही म्हणून कुणी पार नेऊन सोडता का अस प्रत्येक शिष्याला विचारते.पत्येक जण तिला टाळून जातो.कारण आपण संन्यासी,स्त्री स्पर्श वर्ज.शेवटी रामदास स्वामी येतात.त्या स्त्री ला खांद्यावर बसवून पलीकडे नेतात.ती त्यांना पाया पडून निघून जाते.या लोकांचा हि पुढील प्रवास सुरु होतो.एक शिष्य मात्र स्वामींच्या मागे पुढं घुटमळत चालत असतो.शेवटी स्वामी थांबून त्याला विचारतात,
काय रे तुला काही विचारायचे आहे का?अस्वस्थ दिसतोस म्हणून म्हटलं.
स्वामी शंका जरूर आहे.पण धाडस होत नाहीये विचारायच.
किंतु न ठेवता विचार.
स्वामी आपण संन्यासी.तरी त्या स्त्री स आपण उचलून नदी पार केलीत.
मग? तिला मदत करायला नको होती?
तस नव्हे,पण त्या मूळ आपला संन्यासी धर्म ,,,,
याच उत्तर अस आहे कि, तिला खांद्यावरून उतरवून मी बराच पुढं निघून आलोय पण तुझ्या खांद्यावर मात्र ते ओझं अजून आहे.तिच्या विषयी माझ्या मनात कुठलीही भावना नव्हती.फक्त तिला नदी पार करण्यात मदत करणे इतकंच माणूस म्हणून,स्त्री दाक्षिण्य म्हणून मनात होत.मन साफ असलं कि पापाला त्यात उतरायला मिळत नाही.
हे लिहायला कारण कि,
फिरून येताना एक टोळकं उभं होत.जिथं एके ठिकाणी पायऱ्यांवर मी बसतो तिथं.
एक जण दुसऱ्याला म्हणला,
काय रे तुझी बहीण काय म्हणते?जाऊन भेटत वग्रे नाहीस तिला. तुला काळजीच नाही बहिणीची हं.अस काही बाही म्हणून तो निघून गेला.ज्याला म्हणला तो माझ्या ओळखीचा होता.तो अस्वस्थ होत जवळ येऊन बसला. खूप बेचैन होता.म्हटलं,क्या बावा क्या हुआ?
अरे यार काय सांगू काका तुम्हाला?
दोस्ती खात्यात मन मोकळं कर.कदाचित मी काही सांगू शकेन!
हा,तुम्ही नक्की सांगू शकाल.तुम्हीही यातून गेले असाल.
ते माहीत नाही पण यातून म्हणजे कशातून?
बोलू का सगळं?
बिनधास्त.
अहो,आमच्या ग्रुप मधला तो जो आत्ता बडबड करून गेला तो एका मुलीवर एकतर्फी प्रेम करतो.पण भिडायची हिम्मत नाही.ती मुलगी माझ्याशी मस्त बोलते.यात माझा काय दोष?पण
ते याला खपत नाही .मग मला जबरदस्ती बोलत असतो,तुझी बहीण काय म्हणते?मी त्याला कितीवेळा म्हटलंय माझ्या मनात तिच्या विषयी तस काहीच नाही.फक्त निखळ मैत्री आहे.तरी याची रेकॉर्ड तिथंच अडकलेली असते.मला नाहक मनस्ताप होतो.आता बोला कसं वागायचं?
आपण कसं वागायचं हे आयुष्य संपलं तरी कळणार नाही.कारण आपण इतरांना नको तो हक्क देतो.
आता मला सांग ती मुलगी तुझ्याशी मनमोकळं बोलते.
हा न.
ग्रुप मधील इतर मुली?
हो.इतर मुलीच का मुलंही माझ्याशी मनमोकळं बोलतात.
मग त्याला तेच खटकत असेल.
पण यात माझा काय दोषय.
कुठं आहे.अजिबात नाही.तू त्याला नाहक विचारात स्थान देतोस म्हणून हा त्रास तुला होतोय.
आणि एक लक्षात घे.जर स्त्रिया तुझ्याशी मनमोकळं बोलतात तर ते क्रेडीटेबल आहे दोस्त.कुठलीही स्त्री तुझा विश्वास असेल तरच तुझ्याशी बोलेल मनमोकळी.अन्यथा तुला चार हात लांब अंतरावर च ठेवेल.मुलंही तुझ्याशी तसच मोकळेपणी वागतात याचा अर्थ तू जग मित्र आहेस.तुझा स्वभाव, तुझं वागणं आश्वासक असल्याने तुला मित्र मैत्रिणी खूप आहेत.
पण मग हा असा का वागतो, इतर का नाहीत म्हणत तस?
कारण इतर जण ही निर्विकार मनाने मैत्री ठेऊन आहेत.त्या तुझ्या सो कॉलड मित्रा च्या मनात तिच्या विषयी वेगळी भावना आहे.जी तिच्याकडे व्यक्त करायची हिम्मत नसेल.मग असे तडफडते आत्मे असेच इतरांना छळत बसणार, कुढत बसणार.
अहो पण आता आम्हीही लहान राहिलोत का?याला समज कधी येणार?
समज आणि वय याचा बरेचदा समंध नसतो.कारण वय वाढलं म्हणून समज वाढते अस नसत.स्वकेंद्री,आकसाने जगणारे लोक सहन करता येत नाहीत तेंव्हा त्यांना टाळलेल उत्तम.त्यानं उगाच आपली मनस्थिती बिघडते.
अहो मी तर हा लोच्या च नको म्हणून ग्रुप मधून बाहेरच पडायचं म्हणतोय.
त्यानं तो बदलेल का?पण तुझे इतर मित्र मैत्रिणी विना कारण गमावशील.
म्हणता ते पटलं पण डोक्यात जातो ओ तो.
डिलीट मार भेजे मे.
यावर तो झक्क मनमोकळं हसला.काका,थँक्स.सगळं क्लिअर केलंत.
अरे असे मनात कुढत बसणारे असतातच पण मनमोकळं वागणारे ही असतात कि नै.
अश्या कुढ्या लोकांचा विचार करत आयुष्य दुःखी करावं कि इतर झक्क लोकांना आपलंसं करून रहावं हे आपणच ठरवाव.
त्याला जाऊ दे त्याच्या मार्गाने.स्वामीच ओझं त्यांच्या शिष्याच्या मानेवर होत.ते उपदेश मिळाल्यावर त्यानं खाली टाकलं पण ते तुझ्या त्या सो कॉलड मित्रा सारख्यांच्या खांद्यावर असत बसलेल.आपण स्वामींच्या आणि इतर शिष्य परिवारा सारख पुढं जात रहावं.
करेक्ट काका.अजून एक विचारू का?
आहेच का अजून काही?
नाही आमच्या पिढीचे होत हे पण तुमच्या वेळीही असे लोक होते का?
मग लेका उगा तुला उपदेश देऊ शकलो का .काहीच बदलत नसत यार.जुनीच फॅशन नव्याने येत असते.कालचक्र एकच आसा भोवती फिरत.
लक्ष्यात ठेव.कुठल्या पोरी विषयी काही वाटलं तर तिला स्वतः जाऊन बोलावं.ताकाला जाऊन भांड लपवू नये.हो म्हणली उत्तम.नाही म्हणली,,,दुसरी बघायची.नाही जुळत कधी कधी दोन्ही कडून.उसमे क्या है.जबरदस्ती त प्रेम नक्की च होऊ शकत नाही.ग्रो अप बडी.
दे टाळी,
त्यानेही कचकचीत टाळी दिली आणि आम्ही पायरी वरून उठलो.
स्वामी आणि शिष्य परिवार जंगलातून मार्गक्रमण करत जात असतात.वाटेत एक छातीभर पाणी असणारा ओढा पार करून जायच असत.एक तरुण स्त्री तिथं उभी असते.तिला हि पलीकडे जायच असत पण पोहोता येत नाही म्हणून कुणी पार नेऊन सोडता का अस प्रत्येक शिष्याला विचारते.पत्येक जण तिला टाळून जातो.कारण आपण संन्यासी,स्त्री स्पर्श वर्ज.शेवटी रामदास स्वामी येतात.त्या स्त्री ला खांद्यावर बसवून पलीकडे नेतात.ती त्यांना पाया पडून निघून जाते.या लोकांचा हि पुढील प्रवास सुरु होतो.एक शिष्य मात्र स्वामींच्या मागे पुढं घुटमळत चालत असतो.शेवटी स्वामी थांबून त्याला विचारतात,
काय रे तुला काही विचारायचे आहे का?अस्वस्थ दिसतोस म्हणून म्हटलं.
स्वामी शंका जरूर आहे.पण धाडस होत नाहीये विचारायच.
किंतु न ठेवता विचार.
स्वामी आपण संन्यासी.तरी त्या स्त्री स आपण उचलून नदी पार केलीत.
मग? तिला मदत करायला नको होती?
तस नव्हे,पण त्या मूळ आपला संन्यासी धर्म ,,,,
याच उत्तर अस आहे कि, तिला खांद्यावरून उतरवून मी बराच पुढं निघून आलोय पण तुझ्या खांद्यावर मात्र ते ओझं अजून आहे.तिच्या विषयी माझ्या मनात कुठलीही भावना नव्हती.फक्त तिला नदी पार करण्यात मदत करणे इतकंच माणूस म्हणून,स्त्री दाक्षिण्य म्हणून मनात होत.मन साफ असलं कि पापाला त्यात उतरायला मिळत नाही.
हे लिहायला कारण कि,
फिरून येताना एक टोळकं उभं होत.जिथं एके ठिकाणी पायऱ्यांवर मी बसतो तिथं.
एक जण दुसऱ्याला म्हणला,
काय रे तुझी बहीण काय म्हणते?जाऊन भेटत वग्रे नाहीस तिला. तुला काळजीच नाही बहिणीची हं.अस काही बाही म्हणून तो निघून गेला.ज्याला म्हणला तो माझ्या ओळखीचा होता.तो अस्वस्थ होत जवळ येऊन बसला. खूप बेचैन होता.म्हटलं,क्या बावा क्या हुआ?
अरे यार काय सांगू काका तुम्हाला?
दोस्ती खात्यात मन मोकळं कर.कदाचित मी काही सांगू शकेन!
हा,तुम्ही नक्की सांगू शकाल.तुम्हीही यातून गेले असाल.
ते माहीत नाही पण यातून म्हणजे कशातून?
बोलू का सगळं?
बिनधास्त.
अहो,आमच्या ग्रुप मधला तो जो आत्ता बडबड करून गेला तो एका मुलीवर एकतर्फी प्रेम करतो.पण भिडायची हिम्मत नाही.ती मुलगी माझ्याशी मस्त बोलते.यात माझा काय दोष?पण
ते याला खपत नाही .मग मला जबरदस्ती बोलत असतो,तुझी बहीण काय म्हणते?मी त्याला कितीवेळा म्हटलंय माझ्या मनात तिच्या विषयी तस काहीच नाही.फक्त निखळ मैत्री आहे.तरी याची रेकॉर्ड तिथंच अडकलेली असते.मला नाहक मनस्ताप होतो.आता बोला कसं वागायचं?
आपण कसं वागायचं हे आयुष्य संपलं तरी कळणार नाही.कारण आपण इतरांना नको तो हक्क देतो.
आता मला सांग ती मुलगी तुझ्याशी मनमोकळं बोलते.
हा न.
ग्रुप मधील इतर मुली?
हो.इतर मुलीच का मुलंही माझ्याशी मनमोकळं बोलतात.
मग त्याला तेच खटकत असेल.
पण यात माझा काय दोषय.
कुठं आहे.अजिबात नाही.तू त्याला नाहक विचारात स्थान देतोस म्हणून हा त्रास तुला होतोय.
आणि एक लक्षात घे.जर स्त्रिया तुझ्याशी मनमोकळं बोलतात तर ते क्रेडीटेबल आहे दोस्त.कुठलीही स्त्री तुझा विश्वास असेल तरच तुझ्याशी बोलेल मनमोकळी.अन्यथा तुला चार हात लांब अंतरावर च ठेवेल.मुलंही तुझ्याशी तसच मोकळेपणी वागतात याचा अर्थ तू जग मित्र आहेस.तुझा स्वभाव, तुझं वागणं आश्वासक असल्याने तुला मित्र मैत्रिणी खूप आहेत.
पण मग हा असा का वागतो, इतर का नाहीत म्हणत तस?
कारण इतर जण ही निर्विकार मनाने मैत्री ठेऊन आहेत.त्या तुझ्या सो कॉलड मित्रा च्या मनात तिच्या विषयी वेगळी भावना आहे.जी तिच्याकडे व्यक्त करायची हिम्मत नसेल.मग असे तडफडते आत्मे असेच इतरांना छळत बसणार, कुढत बसणार.
अहो पण आता आम्हीही लहान राहिलोत का?याला समज कधी येणार?
समज आणि वय याचा बरेचदा समंध नसतो.कारण वय वाढलं म्हणून समज वाढते अस नसत.स्वकेंद्री,आकसाने जगणारे लोक सहन करता येत नाहीत तेंव्हा त्यांना टाळलेल उत्तम.त्यानं उगाच आपली मनस्थिती बिघडते.
अहो मी तर हा लोच्या च नको म्हणून ग्रुप मधून बाहेरच पडायचं म्हणतोय.
त्यानं तो बदलेल का?पण तुझे इतर मित्र मैत्रिणी विना कारण गमावशील.
म्हणता ते पटलं पण डोक्यात जातो ओ तो.
डिलीट मार भेजे मे.
यावर तो झक्क मनमोकळं हसला.काका,थँक्स.सगळं क्लिअर केलंत.
अरे असे मनात कुढत बसणारे असतातच पण मनमोकळं वागणारे ही असतात कि नै.
अश्या कुढ्या लोकांचा विचार करत आयुष्य दुःखी करावं कि इतर झक्क लोकांना आपलंसं करून रहावं हे आपणच ठरवाव.
त्याला जाऊ दे त्याच्या मार्गाने.स्वामीच ओझं त्यांच्या शिष्याच्या मानेवर होत.ते उपदेश मिळाल्यावर त्यानं खाली टाकलं पण ते तुझ्या त्या सो कॉलड मित्रा सारख्यांच्या खांद्यावर असत बसलेल.आपण स्वामींच्या आणि इतर शिष्य परिवारा सारख पुढं जात रहावं.
करेक्ट काका.अजून एक विचारू का?
आहेच का अजून काही?
नाही आमच्या पिढीचे होत हे पण तुमच्या वेळीही असे लोक होते का?
मग लेका उगा तुला उपदेश देऊ शकलो का .काहीच बदलत नसत यार.जुनीच फॅशन नव्याने येत असते.कालचक्र एकच आसा भोवती फिरत.
लक्ष्यात ठेव.कुठल्या पोरी विषयी काही वाटलं तर तिला स्वतः जाऊन बोलावं.ताकाला जाऊन भांड लपवू नये.हो म्हणली उत्तम.नाही म्हणली,,,दुसरी बघायची.नाही जुळत कधी कधी दोन्ही कडून.उसमे क्या है.जबरदस्ती त प्रेम नक्की च होऊ शकत नाही.ग्रो अप बडी.
दे टाळी,
त्यानेही कचकचीत टाळी दिली आणि आम्ही पायरी वरून उठलो.