रविवार, ३० एप्रिल, २०१७

रोमांच

काय झालं होतं रे ?
पित्ता मुळे रॅश आला होता,थोडा ताप अस सुरू होत.उन्हा मुळ झालं.
पण असं कसं? एकदम!
म्हटलं,
त्याच काय आहे,आयुष्यात रोमांच उभे राहावेत असा प्रसंग कधी आला नाही.बाहेर पडलोच सकाळी लवकर तर सूर्या कड पहात गायत्री मंत्र मनात म्हणतो कधी कधी.
त्या दिवशी ट्युशन ला 8ला बाहेर पडलो.सूर्य दिसला,नमस्कार केला.हेल्मेट मधून त्याला मनातनच विचारलं,
काय हो देवा हे रोमांच वग्रे लोक्स म्हणतात ते काय प्रकरण आहे.
तुला अजून अनुभव नाही?
नाय बॉ.
थांब माझ्या परीने तुला समजावून सांगतो,नव्हे प्रत्यक्ष अनुभव देववितो.
मी खुश.2 किमी.झाले तरी काही अनुभव नाही.
काय देवा चेष्टा केली का राव तुम्ही आमची.
तो गालात हसत म्हणला,
वत्सा,आज माझी ड्युटी समाप्त होण्या आधी तुला प्रत्यय येईल धीर धर.
मग काय संध्याकाळी पित्त वाढून पुळ्या आल्या.महाराज ड्युटी सम्पवून जात होते.त्यांना म्हणलो,
हे काय देवा! असा असतो होय रोमांच!चैला ब्र होत नव्हता अनुभव तर.
बालका,तस नसत ते.पण तू माझ्या कडे मागणी केलीस.तुझ्या वरच्या प्रितीने मी माझ्या पद्धतीनं तुझी मदत केली न अनुभव दिला.😅
तर असं झालं होतं आजाराचं कारण.
@सलील जोशी.

शनिवार, २९ एप्रिल, २०१७

मोबल्या घेताना

मोबल्या घेताना,
गेले महिनाभर मोबाईल बिघडला म्हणून नवा घेताना कुठला घ्यावा,याचा शोध घेताना काही माहिती जमा झाली.तुमच्या शी शेअर करतोय.उपयोग झाला तर बघा.
आखूड शिंगी बहु दुधी असच आपण शोधत असतो.हल्ली मार्केट मध्ये चायनीज कम्पन्यांचं वर्चस्व आहे.मोटोरोला हि लिनॉव्हो न घेतलीय.
फोन मध्ये काय हवं?आपला उपयोग काय ? यावर फोन कुठला घ्यावा हे ठरवावं.
जर तुम्ही टेक्नो सॅव्ही नाहीत,गेम वग्रे खेळत नाहीत.फोन जास्त करून दुसऱ्याशी बोलायला,मेसेज करायला आणि कॅलक्युलेटर सारखं ऍप वापरता,कधी नेट वर थोडं सर्च करता तर खूप लो बजेट फोन 4 हजार च्या आसपास मिळतील.
पण नेट वर असणार आहात, कॅमेरा वापरणार आहात, हाय एन्ड गेम खेळणारे आहात, मॅप भटकंतीत वापरता तर मात्र त्यात काही गोष्टी बघाव्या लागतील.
सर्व प्रथम मेमरी किती आहे,कॅमेरा कसा न किती mp आहे,os म्हणजे कार्य प्रणाली कुठली आहे ,सर्विस सेंटर जवळ आहे का? कम्पनी च आजवरचे रेप्युटेशन कस आहे,हे पहावं.
मोबाईल मध्ये असलेली app नीट चालायला त्याला उपयुक्त सेन्सर्स लागतात.
त्यातले काही बहुतेक सर्व फोन मध्ये असतात.
प्रोक्सीमेटी सेन्सर सारखे.म्हणचे फोन बोलायला गाला जवळ नेला कि स्क्रीन आपोआप बंद होतो,तो सेन्सर.
बाहेर किती प्रकाश आहे त्या नुसार तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून स्क्रीन कमी जास्त प्रमाणात प्रखर करणं हे काम करणारा सेन्सर.लाइट सेन्सर.
मॅग्नेटिक सेन्सर असतो ज्या मूळ होका यंत्र असणार app चालत.जर हा सेन्सर नसेल तर दिशा दर्शक app चालणार नाही.
जायरो स्कोप सेन्सर
तू नळी वर हल्ली 360 डिग्री व्हिडीओ आलेत ते बघायचे असतील किंवा गुगुल चा किंवा अन्य कँपन्यांचा vr बॉक्स काम करणार नाही.फोन फिरवला गेलाय याच ज्ञान सिस्टीम ला हा सेन्सर करून देतो.
एक हॉल सेन्सर हि येतो जो चुंबकीय क्षेत्र वग्रे मोजतो.
ब्यारो मीटर मला वाटत समुद्र सपाटी पासून किती उंचावर आहोत ते दाखवतो.
हिट सेन्सर तपमान दाखवतो.
तर आपल्याला काय वापरायचं आहे त्या नुसार सेन्सर फोन मध्ये आहेत का ? हे बघावं.सेन्सर मदर बोर्ड वर असतात.जे डाऊन लोड करता येत नाहीत.
दुसरं प्रोसेसर कुठला आहे,त्याला किती कोअर आहेत,त्याचा स्पीड किती आहे आणि सध्या कुठला प्रोसेसर नवा आलाय याची माहिती आंजावर घ्यावी.
Ram म्हणजे मेमरी किती आहे ते बघावं.ram जास्त असेल तर काम पटकन करतो फोन.
स्क्रीन साईझ किती आहे,त्यावर गोरिला ग्लास सारखं प्रोटेक्शन दिलंय का आपल्याला घ्यावं लागेल ते हि पहावं.
जो फोन निवडाल त्याच्या बद्दल वापर केलेल्या लोकांचं काय मत आहे ते जालावर शोधावं.
चायनीज कम्पन्या च आपल्या कडे न सर्वत्र जास्त आहेत.शाओ मी , कुल पॅड हे फोन मोदींच्या मेक इन इंडिया कॅम्पेन नुसार भारतात अनुक्रमे आंध्र आणि औरंगाबाद येथ तयार होतात.म्हणजे आपल्या देशात तयार होणारा फोन ज्या मूळ आपल्या बऱ्याच लोकांना रोजगार मिळतोय.सो आपली देश भक्ती,प्रेम अबाधित राहायला हि हरकत नाही.
आता सॅमसंग सारखी जुनी कम्पनी आहे जिचं नेटवर्क खूप आहे.सर्विस सेंटर खूप आहेत.
पण ते लोक उगा वेगळी मॉडेल आणून हे हवं ते न देता जास्त किमतीत देतात असं जाणवलं.त्यांचे फोन लवकर हँग होऊ लागतात असा सूर जालावर जाणवला.
ओपो व्हीव्हो सारख्या कम्पन्या चीन च्या असल्या तरी त्या जास्त किमतीत फोन विकतायत. त्या नुसार हवं ते फोन मध्ये नसत.हे लोक डीलर ला जास्त कमिशन देऊन धंदा वाढवतात असं वाटलं.
शाओ मी,कुल पॅड या कम्पन्या ऑन लाईन विक्री जास्त करतात.त्या मूळ डीलर च कमिशन व इतर खर्च कमी होऊन हे ग्राहकाला जास्त सुविधा देत आहेत.ज्या मुळ जालावर फ्लॅश सेल मध्ये हि कधी कधी मिळत नाहीत.
शाओ मी च्या साईट वर डायरेक्ट जाऊन प्री ऑर्डर करता येते.
कुल पॅड फोन खूप चांगला आहे पण माझा मदर बोर्ड निकामी झाला दीड वर्ष्यात .तो रिपेअर करायचा तर 3 हजार खर्च आणि 20 दिवस वेटिंग सांगितलं म्हणून शाओ मी घेतला.खूप चांगला वाटतोय आज तरी.काही ओळखीच्या लोकांकडे 4 वर्ष विना तक्रार चालू आहे म्हणून घेतलाय.शेवट हि उपकरण चालणं न चालणं यात नशिबाचा भाग हि आहेच.
आणि सांगायचं राह्यलं ते म्हणचे बॅटरी किती पॉवर ची आहे? हल्ली बऱ्याच फोन ची बॅटरी नॉन रीमुव्हेंबल असते.ते हि चेक करावं.हायब्रीड स्लॉट असतो ज्या मूळ 2 सिम किंवा एक सिम एक मेमरी कार्ड असच चालू शकत नव्या फोन मध्ये.
अजून एक गोष्ट फोन आवडला तरी तो कधो लॉन्च झालाय ते बघावं.कारण जुना असेल तर जिओ किंवा 4g त्यात चालणार नाही जर वापरणार असाल तर.
इतकं केलं कि पसंतीचा फोन जालावर तुलना करण्यास टाकावा म्हणजे जास्त कळेल.बरेच फोरम आहेत ते वाचावे.तू नळीवर प्रत्येक फोन चे रिव्ह्यू आहेत ते पाहावे.
मग फोन घेतला कि देवाचं नाव घेऊन वापरणं सुरु करावं.
लवकर बिघडला तर
सर्व अशाश्वत असत हे तत्वज्ञान आठवावे
समजा नीट चालला दोन तीन वर्षे तर खुशाल म्हणावं
म!घामाचा पैसा आहे अन नीट बघून घेतला होता😃
सो हैप्पी फोनिंग
सलील जोशी

गुरुवार, ६ एप्रिल, २०१७

कुणी तरी आहे घरात

परत यायला उशीर करू नको.आणि येताना त्या पडक्या धर्म शाळेत डोकवायला जाऊ नको.
अश्या सूचना गावी मिळत असत.रिकाम्या ,पडक्या वास्तूत भूत असत म्हणे. त्या ठिकाणी कसलेसे आवाज येतात.कुणी तरी कपडे धुतय असा आवाज येतो.काही वाटल्या सारख पाटावरवंट्याचा आवाज येतो.
            आता तस काही राहील नाही.पण नीट निरीक्षण केलं तर आजही हे होत असत.अद्ययावत साधनांनी युक्त घर आहेत.पण घरात राहायला कुटुंबियांना वेळ नाही.मग ही साधन घराचा ताबा घेतात.
       गृहिणी मशीन ला प्रोग्रॅम सेट करून बाहेर पडलेली असते.ते मशीन मग 10 वाजता प्रोग्रॅम सुरू करून तासाभरात कपडे ड्राय करून तश्रीफ हलवत उभं रहात.
       क्लास ला गेलेली तरुण कम्पनी सेट टॉप बॉक्स ला अमुक कार्यक्रम रेकॉर्ड कर म्हणून सूनवून गेलेली असतात.तो ही दिली वेळ सुरू होऊन कार्यक्रम रेकॉर्ड करून स्टॅन्ड बाय रहातो आपल्या फुल hd रेडी दोस्ता सकट.
         रात्र पाळी करून आले कि गरम मिळावा नाष्टा मालकांना म्हणून टैमर लावलेला मावे मालक यायच्या जरा आधी आपलं काम बजावून वाट बघत असतो.
       चिरंजीवानी विषाणू शोधून नष्ट कर न मग बंद हो रिपोर्ट ठेऊन सांगितलेला संगणक आपलं काम सम्पवून सिस्टीम बंद करून घेत असतो.
      काही फ्रीज तर आपले आपण पोटातले जिन्नस सम्पले कि मॉल ला ऑर्डर देतात ,पाठवा ही लिस्ट.
     Cctv डोळे न मिटता सर्व क्षण चित्र टिपून घरावर लक्ष ठेऊन असतात. मालकाला जीवन्त प्रक्षेपण ही उपलब्ध करून देत असतात.
     एखादं वेळी दिवे लागणी ला आपोआप सुरू होऊन सूर्य किरण आली कि  सैतान गायब होतो तशी बंद होणारी यंत्रणा ही आपलं काम चोख करीत असते.
        आणि ज्यांच्या साठी घर आहे ती जीवन्त माणसं मात्र काहीच तास इथं वास्तव्याला असतात. बरेचदा ती ही एकत्र एक वेळी नव्हे तर पाळी असेल तशी.
  तेंव्हा जुन्या काळी पडके वाडे हुडे भूत बंगले असतं, आता राहती घर ही तशीच होत चाललीत हळू हळू असं वाटत.