कौल चाळून घेतली तरी पुढल्या ओटी चा घोणा दरवर्षी प्रमाणे गळतोय. पाणी वाश्यावर जातंय.सर्वत्र गुले झालेत सारखे अंगावर पडतात.मागच्या अंगणातून घातलेला बांध फुटला सगळं पाणी विहिरीत उतरलं.गाळ काढून घेतला होता मे मध्ये आता परत माती गेली विहिरीत.गोठ्याची जमीन एक पावसात उखळली.बकुळीची फांदी स्वयपाक घरावर पडायला झालीय.मोरीच भोक बाहेरून रात्री बूच घालून बंद करावं लागत आठवणीनं नाहीतर जनावर यायची भीती.मागच्या पावसाळ्यात हे थोरल जनावर आढ्याला लपेटून होत.मोरीत भरपूर काळ्या मुंग्या अंडी घेऊन धावतायत मंजे पाऊस जोरात आहे त्यांना कुंकू वाहील पाह्यजे.शेतात आवण कमी पडलं म्हणे .सलील चल पावसात फिरून येऊ ,........
आता अस काही नाही.त्या पावसाबरोबर ते दिवस वाहून गेले.