गुरुवार, १८ एप्रिल, २०२४

तलखी.

 लाईट गेलेत.खूप उकडतंय.घराची आठवण आली.तिथ सेम असंच असायचं.लाईटचा भरोसाच नाही.नेमक दुपारी आणि रात्री गायब.पण आता ब्लॉक मध्ये आणि त्या वेळच्या घरात यात बरीच तफावत आहे.

तेंव्हा,बाहेर पडवी च्या गजाना बाबांनी पडदे करून लावले होते.त्यावर मस्त पाणी शिंपडून घ्यायचं दुपारी जेवण झाली कि. अंगणातून झळ मारत असते गरम हवेची ती मग जाणवत नसे.उन्हाळा जरा कमी दाहक होई.आमचे तात्या तर उकाडा कमी करायला अंगावर पंचा ओला करून पांघरत. मग त्यांनी पूजेकर्ता वापरलेल्या चंदनाचा आणि फुलांचा सुगंध त्यांच्या भोवती दरवळू लागे. मी नी बाबा पण तसच करत असू.झोप झाली कि झोपाळ्यावर झोके घेत बसायच.माज घरात सारवलेल्या जमिनीवर अंग टाकून झोपलं कि गार वाटे.बाळंतीणी च्या खोलीतून आढी तले आंबे सुवासाने आमंत्रण देत.चहा झाला कि सर्व जण मागच्या पडवीत किंवा स्वयंपाक घराच्या उंबऱ्यात पिकलेल्या आंब्यांची रोवळीच घेऊन बसत.चुपून आंबे खायचे नी साली बकुळीच्या अंगणात टाकून ठेवायच्या. मग गोळा करून गायी बैलांना द्यायच्या. अख्खे रायवळ आंबे पण गुरांना देत असू.आवाडात मागच्या आंब्यावर कोकीळ कुहू कुहू करत बसे.

अंगणात पाणी शिंपडलं कि मस्त वाटे.संध्याकाळी कुपणी पलीकडील मोठ्या झाडाची पडलेली जांभळ वेचायला जायचं.मित्रांसोबत भरपूर खेळून दमल कि त्याच झाडा पुढून गेलेल्या रस्त्याच्या बैल गाडी नी st जाऊन पडलेल्या चाकोऱ्यात असलेल्या मऊ पण गरम लाल मातीत पाय बुडवून बसायच.मग पाय दुखत असतील तर बर वाटे.आणि गुर पाण्यावर न्यायची.तळ्यात आधी उभ राहून ती पाणी पिताना बघायला मस्त वाटे.बैलगाडी तळ्यात बैला सह उतरवून गुडघा भर पाण्या उभी करायची.मग बैलांना काथ्याच्या घासणी न घासून अंघोळ घालायची.बैल देखील सुखावून हि सेवा करू देत.तोवर उन्ह उतरली असत.संध्याकाळ वेगळी असे.

आत्ता सगळं आठवलं.पण आता ते सगळं नाही.उरली फक्त तलखी.


बुधवार, ३ एप्रिल, २०२४

लय

 तबल्याची किंवा गाण्याची मैफिल संथ लयीत सुरु होऊन मध्य नी मग दृत लयीत संपते.

पण आता वाटत,आयुष्याची मैफिल मात्र उलट प्रवास करते.बालपण, तारुण्य,दृत लयीत केंव्हा गेल समजतच नाही.मग मध्यवय आलं कि आयुष्य मध्य लयीत प्रवेश करत.मग येणार वार्धक्य शेवटी इतकी विलंबीत,संथ लय पकडत कि मैफिल शेवटा कड आली तरी संपता संपत नाही.


काही नाही,सहज आलं मनात.मध्य लयीत आहोत तिथंच मैफिल संपावी वाटत.हा उलट लयी चा प्रवास इथवरच ठिक. पण संगीतात रसिकांची इच्छा मैफिल लांबवते.आयुष्यात मात्र देवा च्या इच्छे वर भैरवी कधी ते ठरत.

सोमवार, १६ ऑक्टोबर, २०२३

दिवाळी

 

दिवाळी.
सणांची चाहूल आता tv आणि इतरत्र जाहिराती वरून लागते.
अलार्म काका ची जाहिरात बघितली नी दिवाळी जवळ आल्याची जाणीव झाली.
अश्या वेळी मग मन भूतकाळात जात.
गावाकडच मोठ घर.सभोवती भरपूर चौ.फु.जागा इतकी कि...
आधी शाळेत दिवाळीच्या अभ्यासाची वही सजवायची असे.
मुंबईत चाळीत आणि रस्त्यावर लगबग सुरु होई.बाजार पेठ बहरात आजही येते.पण त्यावेळच अप्रूप वेगळच होत.महागाई तेंव्हाही होती पण आजच्या इतकी जाणवत नव्हती मध्यम वर्गास.फटाके शे दीडशे मध्ये खूप येत.त्या लड्या एकदम न वाजवता सुट्या करून एकेक पुरवून फोडायची पद्धत होती.व्यापारी मात्र रस्त्यावर फटाक्याचा ढीग फोडत.
किल्ले व्हायचे बच्चा कम्पनीचे.गावी मस्त सारवलेली अंगणी भुरळ घालत.रात्री तिथ मांडवा खाली झोपायची ऐश उपभोगलीय याच समाधान आजही वाटत.
गावी व्यापारी लोक आजोबांना शिधा आणि टोपली भर फटाके घर पोच करत.फराळ तयार करायला शेजारणी मदतीस येत एकमेकींच्या.जाताना आणि दिवाळीत फराळाची देवाण घेवाण होत असे.अंघोळीस कुणी बसला कि अंगणात फटाके वाजत.घरीच केलेला पारंपरिक बांबू चा कंदील झक्कास दिसे.
मुंबईत आयते मिळत.चांदणी तीही फोल्डिंग ची फेमस होती.
एक आठवण आजही कोरून राहिलीय मेंदूत.
माझा मामा तेंव्हा गावाहून मुंबईस आमच्याकडं आला.तेंव्हा 15 वर्ष्य वय असावं त्याच.नोकरी नव्हतीच.आई वडील गेलेले लहानपणी म्हणून बाबांनी त्याला गावच्या घरी आणलं.तो तिथ आजी आजोबा सोबत राहत असे.आजोबानी प्रवास खर्च आणि थोडे जास्तीचे म्हणजे विस पंचवीस रु त्याला दिले होते.तो यायच्या आधी आई खुश होतीच पण तिन मला सांगितलं,मामा येतोय पण त्याला त्रास द्यायचा नाही हट्ट करून कसलाही म्हटलं,मी कधी कुणा कड तसा हट्ट केलाय का?
तस नाही रे.पण त्याला खर्चायला पैसे नसतात.तो कमवत नाही न अजून.तात्यांनी उतार खर्च दिला असेल तितकाच.
तू नको काळजी करू.मी नाही काही मागणार त्याच्या कड.
आणि एक दिवस आधी मामा आला.आजही लख्ख आठवतंय मला.किरकोळ शरीर्यष्टी चा मामा दोन जड पिशव्या घेऊन आला.खूप आनंद झाला तो आला म्हणून.मग आईन सांगितल्या प्रमाणे मी गप्प बसलो.त्याच चहा पाणी झाल नी तो मला म्हणला,तू का गप्प?ये इकडं.
आणि त्याम एक पिशवी मोकळी केली.त्यात आजीन दिलेला फराळ,मेतकूट अस काय काय होत.आणि दुसरी पिशवी मात्र मला जवळ घेऊन उघडत म्हणला,हे तुझ्या करता.
चक्क फटाके होते त्यात.इतक मस्त वाटलं.मग त्यातलं एक पाकिट काढत तो म्हणला,हे बघ हे विशेष आहे.नवीन आलंय अस दुकानदार म्हणाला.बघितलं तर ते स्वस्तिक च्या आकारातलं भुई चक्र होत.पेटवलं तर प्रत्येक दांडी वेगळी पेटली आणि उलट सुलट फिरली बराच वेळ.
आई म्हणाली,अरे इतका खर्च का केलास?कुठून आणलेस पैसे.
अगो तात्यांनी दिले मला त्यातले वापरले.मी कुठून आणणार पैसे?
अरे मग तुलाच ठेवायचे त्याला फटाके का आणलेस?
असू दे.भाचा आहे माझा तो.मग मला जवळ घेऊन एक पापी घेतलीन.त्या दिवशी इतका आनंद झाला ते चक्र बघून कि सांगता येत नाही.आणि तस चक्र दादरला देखील आलं नव्हतं म्हणून जास्तच खुशी.
पण आता इतकी वर्ष गेल्यावर आणि आयुष्याच्या थपडा खाल्ल्यावर त्या प्रसंगाचा वेगळा अर्थ समजून मामाला मनापासून दंडवत असत माझं.
लहानपणी आई वडील गेले.आधी वडील गेले.त्यांच्या घरी अन्न छत्र होत.रेवदंडा समुद्र किनाऱ्या लागत त्यांच घर होत.नारळाची वाडी होती.दुध दुभत घरच होत.पावसाळा सोडला तर बंदरात बोट लागली नी माणस उतरून जाऊ लागली कि आजोबा तिथ जाऊन मोठ्या आवाजात,कुणी अतिथ आहे का?अशी हाक देत.कुणी परगावं चा प्रवासी असेल तो हो म्हणत असे.मग त्याला घरी घेऊन येत.जेवायला वाढून दक्षिणा देऊन तृप्त करत.मग तो पुढील प्रवासास जाई.
तर अस सुरळीत चालू असता आजोबांची दृष्टी अचानक गेली.मग आजारपण त्यांना घेऊनच गेल.नातलगानी फसवलं. रहात घर सोडून म्हणजे,आल्या किमतीस विकून आजी मामाला घेऊन पेणं ला भाड्यान घर घेऊन राहिली.जिच अन्न छत्र होत,साई बाबा जिवंत असताना तिन लहानपणी शिर्डीत राहून त्यांची सेवा केली होती त्या बाईवर हि परिस्थिती आली.का? दैव कस वागेल सांगता येत नाही.मग आजी 4 घरी स्वयंपाक करून दिवस काढत होती मामा सोबत.मामाला काही ब्राह्मणांनी वार लावून दिले होते आपणहून.म्हणजे,रोज त्यांच्या दारी जाऊन ओम भवती भिक्षांदेही म्हणायचं.मग झोळीत घर धणीन जे वाढील ते घरी घेऊन यायच.आणि रोज फक्त एकच घर.तिथ जे मिळेल तेच .या श्रमान किंवा मला वाटत मानसिक खचून आजी लवकरच गेली.मामा एकटा पडला.मग बाबा आजीच्या दिवस कार्यास गेले ते त्याला घेऊनच आले.मग तो आमच्या गावी बरीच वर्ष राहिला.आजी आजोबांची सेवा केलीन.तिथ एकूण तीन वृद्ध माणसां ची त्यानं अहोरात्र सेवा केली.शेवटची दुखणी काढलीन.मग तो आमच्याकडं मुंबईत आला तो आजही माझ्या सोबत आहे.तो मला मामा न वाटता मोठा भाऊ वाटतो आणि आतातर वडिलांच्या जागी आहे.तिकड त्या माणसाचं केलंन तसच इकडं आमच्या घरी त्याच्या ताई च आणि मेव्हण्यांचं शेवटच आणि दीर्घ आजारपण देखील त्यानं काढलं.आम्ही यावेळी त्याच्या जोडीला होतो.तरी त्याची कमाल आहे.
आज त्याच वय 75 असावं.आजही पहाटे उठून कामाला लागतो.याच काम कमी व्हाव म्हणून मी केल तर हा दुसर काम करत बसेल.कधीही चिडत नाही.शांत असतो.कुणीही हाक मारली तरी हा जाऊन मदत करणारच.याला कसलं व्यसन नाही.कुठली छान छोकी नाही.फक्त रोज पेपर लागतो.
आजवर एकदाही त्याच्या तोंडून निराशेचा बोल ऐकला नाहीये.कधीही म्हणला नाही कि,काय साल नशीब आहे माझं!इतक सगळं माझ्याच वाट्याला का?अजिबात चकार तक्रार नाही.अजात शत्रू आहे.जातो तिथ सख्य होत याच.
त्या वर्षी दिवाळीत मला फटाके त्यान् आणलेन त्यातून आणि त्याच्या दीर्घ सहवासातून  मी  शिकलोय कि,
आपली ऐपत नसली तरी आपल्या वाटच आपल्या माणसाशी वाटून घ्यावं नव्हे तर त्याला ते देऊन टाकाव.कितीही विपरीत परिस्थिती असली तरी तोंडातून निराशा आणि संतापाचे बोल काढायचे नाहीत.सतत पडेल ते काम करत आनंदी रहावं .
पण मला ते त्याच्या सारखं खरच जमत नाही अजून.
कुणी माझ्याशी नीट वागला नाही मी नीट वागूनही तर मला चिड येते.मामा मात्र शांत राहील.उलट कुणी याला बेदम चोपला अकारण तरी हा त्याला म्हणेल,खूप दुखले असतील हात तुझे दाबून देऊ?
मामा हेच मला पटत नाही तुझं.अरे गांधी नी शाम व्हायचे दिवस गेले आता.जशास तस वाग.पण ते तुला जमणार नाही हे देखील कळतंय.तेंव्हा नको.तू आहेस तसाच रहा.मी जिवंत आहे तोवर त्या दिवाळीत तू मला दिलेला आनंद मला आयुष्य भर पुरेल रे.त्या करता दिवाळीची आवश्यकता नाही.रोज दिवाळीच असते अश्या आठवणींची.

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३

* तारुण्याच्या वेशी वरच्या सर्वांस*

 या वयात नवे पंख फुटतात.ते उत्सुकतेचे,शिक्षणाचे,धाडसाचे असे असतात.उत्साह खूप असतो.धोक्याच वळण देखील इथंच असत.या वळणावर जर गाडी घसरली तर पुन्हा मार्गावर येण खूप कठीण असत.बरेचदा आयुष्य नासून जात.फक्त एकच व्यक्तीचं नव्हे,तर कुटुंबाचे देखील.

व्यसन खुणावतात ती याचं वयात.त्या पासून दूर रहा.जाहिरातदारांना तुम्ही कस जगावं हे शिकवू देऊ नका.एखादा हिरो जाहिरातीत मस्त कपडे घालून,आलिशान गाडी चालवत सिगरेट ओढतांना बघून फसू नका.तस करण म्हणजे पौरुषत्व नसत.

पण मला दुसरी धोक्याची जागा सांगायचीय.

ती म्हणजे प्रेमात पडायची.तस होण साहजिक आहे.फक्त प्रेम म्हणजे काय? हे समजत नसत.बरेचदा ते शारीरिक आकर्षण असत. सहवासाने माणूस उलगडत जातो.कधी बरीच वर्ष जाऊन देखील अस होत नाही.तेंव्हा या वयातच हे ठरवावं कि, इथून पुढ प्रत्येक महत्वाचा निर्णय बुद्धी वर घासून घेईन.भावनेच्या आहारी जाऊन नाही.

जोडीदार आपल्या एकूण स्थितीला योग्य आहे का हे बघावं.

त्याची शरीर भाषा अभ्यासावी.त्यातून माणूस बराच प्रगट होत असतो.अधिकार गाजवत राहणारा आहे का? आपण जसे आहोत तसे स्वीकारणारा आहे का? संयमी आहे का?आपल्या मताची ,आवडीची किंमत ठेवणारा आहे का?अस बरंच तपासून पहावं. मग निर्णय घ्यावा.कारण हे नात आयुष्यभर सांभाळायचं आहे.नातेवाईक निवडून घेता येत नाहीत.मात्र मित्र नी जोडीदार निवडता येतात.

आणि समजा काही दिवसांनी बिनसलं,ब्रेकप झाला तर दुनिया संपत नसते हे नक्की.जन्मा पासून आपल्याला वाढवणारे जन्मदाते असतातच कि आपल्या सोबत.मित्र मैत्रिणी सुद्धा.त्यामुळं अचानक कुणीतरी आपल्या आयुष्यात येतो नी आपल्याला सोडून जातो तर जाऊ दे कि.त्या एक माणसा करता आपण आपल नी कुटुंबाच आयुष्य का खराब करायचं? तुम्हांला वाढवायला आई वडिलांनी मेहनत घेतलीय.शिक्षण आणि इतर उत्तम गोष्टी अंगीकरून तुम्ही स्वतः आपल व्यक्तिमत्व उभ केलंय.ते अस कुणा एकाच्या करता वाऱ्यावर सोडायला नक्कीच नाही.

हे लिहायचं कारण,

माझा भाऊ प्रेमात पडला.आम्ही घराच्यांनी काहीच आडकाठी घेतली नाही.पण त्या दोघांच आपसात काही बिनसलं.ती मुलगी घरी येऊन सांगून गेली,मला हा नकोय.आत्ता अस वागावतोय पुढ काय करेल?

बस्स.तिथ पासून बंधूनच वागणं बदललं.रागीट झाला.सारासार विचार संपला.उलट सुलट विचार करून तिचे भास होऊ लागले.स्किझोफ्रेनिया चा पक्का रुग्ण झालाय.हॉस्पिटल मध्ये शॉक ट्रीटमेन्ट झाली मग जरा हिंसक कमी झाला.बरंच भोगावे लागतंय मला अजूनही.आई बाबा गेले.मी लग्न केलच नाही.कारण याचं वागणं बेताल असत.सगळं नाही सांगत बसत.पण जिवंत नरक भोगत आयुष्य काढतोय.एका वेड्या सोबत त्याच्या लहरी नुसार .

तेंव्हा ब्रेकप न खचून जाऊ नका.आयुष्य कुणासाठी थांबत नसत.वेळ निघून गेली तर ती परत येत नाही.आपणच आपले नसतो.आपल कुटुंब देखील या आगीत अकारण होरपळून निघत याची जाणीव ठेवा.

आणखी एक गोष्ट मुलींकरता.

हल्ली लव्ह जिहाद सुरूय.तो खरा हि आहे.केरला स्टोरी बघून घ्या.

कंव्हर्नजन् सिनेमा देखील बघा.

आपला धर्मच उत्तम आहे.तो धर्म स्वीकारे पर्यंतच ,मेरा अब्दुल ऐसा नही है म्हणू शकाल.एकदा लग्न झाल कि किंवा मुलगी झाली नी मोठी झाली कि त्यांचं खर रूप समजेल.पण वेळ गेलेली असेल.

 बरेचदा हे आधीच हळूहळू सुरु होईल.तु जरा दुपट्टा डोक्यावरून घे न.कुणाशी बोलत होतीस फोन वर इतका वेळ?अस पझेसिव्ह वागणं सुरु होईल.आधी धर्म बदलला नाहीस तरी चालेल म्हटलं जाईल.पण मग निदान अम्मी कि खातीर नमाज शुरु करो अस म्हटलं जाईल.घरचे लोक टोमणे सुरु करतील.हळूहळू धर्मांतर केलच जाईल.

त्या धर्मातील धक्कादायक गोष्टी आपल्याला माहित नसतात.त्या करता एक्स मुस्लिम लोकांचे व्हिडीओ युट्यूब वर बघा.उदाहरण म्हणूंन सांगून ठेवतो त्यांचे व्हिडीओ बघा.हे मुस्लिमच होते.पण जसा धर्माचा अभ्यास केला तशी त्यातलं खर स्वरूप त्यांना कळलं.आणि कुणी यात नव्याने फसू नये आणि जे त्या धर्मात आहेत त्यांना खर कळावं म्हणून स्वतः चा जीव धोक्यात घालून हे लोक समाज जागृतीच काम करतायत.एक्स मुस्लिम साहिल आणि एक्स मुस्लिम adam seekar हे ते दोघे.यांच्या कडून नुसतच त्या धर्माच खर स्वरूप कळेल इतक नाही.तर एखाद्या गोष्टी चा कसा अभ्यास करावा नी मग त्या गोष्टी वर वाद विवाद कसा अभ्यास पूर्ण करावा याचं उत्तम उदाहरण मिळेल.साहिल शांत पण ,समजूतीन पटवतो.adam मात्र रोखठोक आहे.समोरचा ज्या पातळीवर असेल तस बोलतो.पण दोघांचा अभ्यास मात्र कमालच आहे.

शेवटी खास करून मुलींनी,स्त्रियांनी सोबत मुलांनी देखील आपल बँक खात आपणच सांभाळावं.वाढवावं.त्याच्यात कुणाचीही भागीदारी नको.मुलींनी घरावर आपल नाव घातलं जावं याची कटाक्षाने दखल घ्यावी.मी पुरुष असून देखील सांगतो कि,पुरुषांचा भरवसा नाही.कधीही म्हणतील,हे घर माझं आहे.इथ मी म्हणीन तेच होईल.पटल तर रहा नाहीतर चालू पडा.

आपली पूर्ण आर्थिक सुरक्षा जपूनच रहायचं.म्हणजे कुणी उगा अधिकार गाजवत नाही.एखादी कला किंवा स्किल नक्की आत्मसात करावं.जे तुम्हांला अर्थारन कधीही कुठंही करून देईल.नोकरीला निवृत्ती असते.स्किल ला नाही.

जमेल तितकं मिळून मिसळून रहावच.थोडी आपल्या मताला मुरड हि घालावी दुसऱ्य करता.पण जोवर आपण गुलाम होत नाही तिथवरच.

आपले फक्त आपणच असतो दुसरं कुणीही नाही.बिरबलाची माकडीणीची गोष्ट खरी आहे.नाती ताणली जात नाही तोवर छान वाटतात.तणाव वाढला कि तुटतात तेंव्हा कळतात.अशी नाती तुटलेलीच उत्तम.

अनेक शुभेच्छा सहित...


शनिवार, ३ जून, २०२३

एका मागणीची गोष्ट.

 वट सावित्री पूजन दिसलं आज सर्वत्र.

काल फणस येऊन पडले रस्तोरस्ती तेंव्हाच जवळ आलीय अस जाणवलं.

घरी पोचलो.निवांत झालो नी एक कल्पना सुचली.

आज पोरी गटवायला पोर काय करत असतील? कुठली प्रश्नोत्तर होत असतील? चालू वर्तमान काळ चालू घडामोडीत येतोच.तेंव्हा ,

 विल यू मॅरी मी,आज कस होईल?याच कल्पना चित्र तयार झाल.ते पेश करतोय.राजकीय हेतू नाही.प्रसंग पूर्ण पण काल्पनिक आहे.त्याचा कुठ संदर्भ नाही पण लागल्यास तो योगायोग समजावा.टाकतो,

                        *एका मागणी ची गोष्ट !*

कॉलेज मध्ये धीर करून तिला त्यानं लॉबी मध्ये कुणी बघत नाही अस पाहून थांबवलं.

थांब न जरा .

काय आहे?

तुझ्याशी मन कि बात कर्नी है.

हो ओ ss अले अले.

पेहले शिक्षा पे चर्चा

फिर

परीक्षा पे चर्चा

फिर

मन कि बात.त्यात रोजगार वार्ता.मग तुझा विकास किती झालाय बघीन.मग साथ द्यायची कि नाही ठरवीन.

अरे पण अजून शिक्षण पूर्ण झाल नाहीये आपल नी तू विकास आणी त्यावर साथ बोलतेस.समज नाही झाला विकास तुला हवा तसा माझा तर?

अगली बार तेरी हार😀

अस कस बोलू शकतेस?

अरे,मुलगी शिकली, प्रगती झालीय.

पण मला काहीच नाही जमलं तर,पकोडे तळीन, चहा विकिन.


बाबू,हर चाय वाला pm नही बनता.

तू तळ हा पकोडे मी एखाद दिवशी येईन चव बघायला.


तू अस नको बोलू.पकोडा तळण काय रोजगार नाही होत?


पॅकेज कितीच होऊन होईल तुझं?

कस सांगू?नशीबावर अवलंबून आहे.


मग घर कस घेशील?मुलांना शाळेत कुठल्या घालशील?त्या आधी कुठल्या हॉस्पिटल मध्ये डिलिव्हरी करता नाव घालशील माझं?

सोप्पय.

म सांग इसकटून.

आपण गुजराथ मध्ये स्थलांत्रित होऊ.

त्यानं काय होईल?

मी जे कमवेन त्यात भागेल.मॉडेल आहे गुजरात च न!

तुझं नाव पालिकेच्या रुग्णालयात् टाकणार.तिथ तुला दर महा फुकट तपासणी . दर महिन्यात स्वतः ची नी मग बाळाची कशी काळजी घ्यावी याची सचित्र मार्ग पुस्तिका मिळेल फुकट. डिलिव्हरी च्या वेळी पेशल गाडी गुलाबी रंगाची तुला न्यायला एक फोनवर येईल.परत सोडायला हि येईल.परिचारिका दर महिना विचार पुस करायला येतील.औषध फुकट.टॉनिक फुकट.

मुलगी झाली तर ठरावीक रक्कम धन लक्ष्मी योजनेत जमा होईल बँकेत.

शिक्षण फुकट.लग्नाच्या वेळी पण लाखभर मिळतील.pm योजनेत घर स्वतात मिळेल.पाईप गॅस कमी दरात.सोलर छतावर बसवलं कि वीज जवळपास फुकट.जास्तीची जमा होईल त्याचे पैसे वळते होतील.

तुझ्या नावावरच घर घेईन.म्हणजे आणखी सबसिडी लागू होईल.

सोलर ला मिळाली तशी.आपल्याला काही रोग झालाच तर सरकारी हॉस्पिटल मध्ये इलाज फुकट.

मग माझ्या भजी तळून मिळेल त्यात आपल भागेल कि नाही माझे भागू बाई?

अरे अस कस?

आता आहे तस तर तिकड.

कस शक्यय?

का नाही?

निवडणुकीत बोलतात ते सगळं तू मनावर घेतोस कि काय?

तू नाही घेत?आणि एखाद मॉडेल सेट केल्या शिवाय पुढचे प्रोजेक्ट कसे मिळणार?तेंव्हा तिकड आहे तस.

पण महाराष्ट्रात कुटुंब प्रमुख असून सुद्धा नाही तस . नी तू म्हणतो तिकड आहे तस?!?!

जाऊन बघूच न आपण.मग कळेलच.

आणि नाही जमलं तर?

पदरी पडलं कि सगळं पवित्र होताना बघत नाहीस का तू?

शी बाबा.तू म्हणजे अस्सा आहेस न,बोलण्यात पटाईत ..

मग मै ये रिश्ता पक्का समजू?

हो,बाकी कुणावर नसला तरी तुझ्यावर विश्वास आहे रे माझा.गुजरात का?कुठंही राहू आपण.प्रेम टिकलं कि संसार टिकायला अजून काय लागत?

वट सावित्री  दिनी आमच्या नायक नायिकेची कथा अयशस्वी कशी होईल.सो हॅप्पी एंडिंग.आणि ते राजा राणी सुखान नांदू लागले.त्यांना जस यश मिळालं तस सर्व प्रेमिकास मिळो.कुणाचाही लव जिहाद न होवो.

वसुधैव कुटुंबकम सुखान नांदो अशी त्या प्रभू चरणी प्रार्थना.



शनिवार, ६ मे, २०२३

सावंत कुटुंबीय.

 

मित्र परिवार नंबर दोन.

यांचं घर आणि त्यात ओटीवर ठेवलेलं बाकड हा आमचा अड्डा होता.

कुटुंब दादा,मामी,आजी आणि सावन्त भावन्ड अस कुटुंब.

विवेक,संजय,अविनाश आणि वंदना अशी मुल दादांची.

मोठा विवेक नाव सार्थ करणारा.तसा अबोल.कधी तक्रार म्हणून कसली नाही.अवी च्या पायाला भिंगरी लागलेली.सर्वत्र आणि सर्व ठरात वावर.घरात कमीच तो.ओळखी भरपूर.

संदीप लहान.तो त्याच्याच् नादात असणार.कामाला वाघ पण मनात नसलं तर संपलं.

वंदू कामसू,समजूतदार आणि लाजाळू .पण तशी खोडकर पण.आमच्या सर्व शेजारी असणाऱ्या मुल मुली एकत्र कुटुंब असावं तस नात होत.एकदा होळीला आम्हा मित्रांना आईन भेळ करून पार्टी दिली.आणि मुलींना बोलवायच राहील.तर वंद्या नी तिच्या मैत्रिणी न रात्री दारात मोठ मोठे दगड आणून रचून ठेवलेले.मग विचारलं तर म्हणली,त s तुम्ही पार्टी करा आम्हांला बोलवू नका मग असंच करणार आम्ही.

नंतर एकदा त्यांच्या घरून मी निघत होतो.सापाला नाही पण झुरळ मला आवडत नाही हे तिला कळलं होत.अचानक आतून थांब रे म्हणत आली.काय विचारलं तर हातात काडे पेटी ठेवलीन.हे काय?

काय नाय तुला दिली ती जा घेऊन.

मी उघडून बघितलं तर मोठ झुरळ बाहेर आलं.मी तशीच टाकून पळालो वेस्कटी कड.वंद्या तुला बघतो थांब नंतर म्हणत.अशी खट्याळ हि.आजही न चुकता राखी येते तिची.पोस्ट कृपेने मला मिळत नाही कधी ते वेगळं.

राहिला तो आमचा संजू बाबा.

हा पण रवी सारखा पढाकू.बुटका होता पण हेअर स्टाईल अमिताभ सारखी.कपडे अप टू डेट. गोट्या खेळण्यात संजू,उदय नी आमचे बंधू म्हणजे x पर्ट. तिघांच्या कड मोठ्या बरण्या भरून जिंकलेल्या गोट्या.संजू उदय कड आजही असतील कदाचित.

संजू शिक्षणात हुशार.दादा रिटायर्ड झाल्यावर घरची जबबादारी यान समर्थ पण अंगावर घेतलीय ती आज तागायत पेलतोय.आता घर नव्यान मोठ बांधलन.अनेक  व्यवसाय केलंन उत्तम पण.तब्येती मूळ मग शिकवण सुरु केलंन ते आज गावात संजू सरांचा क्लास म्हटलं तर कुणीही सांगेल कुठ ते.

याचं मला आश्चर्य वाटत.सकाळी 8 ते संध्याकाळी सहा हा क्लास रूम मध्ये शिकवत बसलेला असतो.इमानदारीत शिकवण हा आमचा दोघाचा स्थायी भाव.याच शिकवण बघून वाटत याला याच्या मेहनती चा योग्य मोबदला त्या गावात मिळतच नाहीये.मुंबईत असता तर खोऱ्यान ओढलं असत.

आई वडिलांना सुख व्हाव असा पुत्र.त्यांच्या मागे त्याचा संसार यान पूर्ण केला.भाऊ बहीण यांची लग्न.भावाना दुकान काढून दिलन आहे.

याच्या बद्दल तक्रार एकच असते माझी.हा माणूस घरा बाहेर निघतच नाही.दरवेळी बोलतो तर याच उत्तर,

कधी निघू सांग.सकाळ पासून बसलेला असतो शिकवत.मग बाहेर पडायला इच्छा होत नाही.

म्हटलं मेल्या निदान दुकानी तरी जात जा तुझ्या तरी ऐकत नाही.या माणसाला चप्पल बुट यावर खर्च करावा लागत नसणार.

तल्लाख शार्प.लक्ष माझ्या सारखं नेट वरून सर्वत्र असत.नव्या कल्पना याला सुचत असतात धंद्या च्या पण शिकवण्यात अडकून पडतो.

आणि आमच्यातलं साम्य म्हणजे दोघे ब्रह्मचारी.

रोज संध्याकाळी आमचं बोलण असतच जनरली.एकमेकांना त्याच त्या रोजच्या अडचणी सांगायला हक्काची जागा आहे.याला मी कधीही मनात येईल तेंव्हा फोन करू शकतो असा मित्र.एकमेकांचे सल्ले देण घेणं सुरूच असत आमचं.माझ्या आयुष्यात याच तिथ पलीकडं फोन वर का होईना असणं खूप धीर देऊन जात.

रव्या !



रविन्द्र महादेव पिळवणकर.आमचा मित्र रव्या.


याची माझी दोस्ती आम्ही पोयनाड ला मुंबई सोडून रहायला गेल्यावर झाली.

आमच्या सावंत बंधुच्या घरी सर्व मित्र दिवसात केंव्हाही ओटीवरच्या बाकड्यावर जमायचो.संध्याकाळी आमच्या घरी.

हा तसा मित भाषी.उंच.इमानदारीत अभ्यास करणारा.इतकच नव्हे तर स्वतः शिकत असताना आणखी काही लोकांना शिकवत असे.मला सुद्धा गणितात पास होण्यात याचाच सहभाग आहे.मी कधीही तयार नसे शिकायला गणित.हा घरी येऊन फक्त बसत असे.मला कधी रागावला नाही.पण मी जास्तच टाईम पास करतोय दिसलं कि,बर आपण आता बसूया अभ्यासाला कि मी जाऊ म्हणत असे.मग मी बसत असे.मी नाही तोच पास झाला गणितात पुन्हा एकदा.

गुगुल अलीकडं आलं.तेंव्हा गावात संध्याकाळी 6 च्या आत ट्यूब लाईट लावून ठेवली तर ती पेटत असे कारण मग लाईट लोड जास्त झाल्याने डिम होत.मग ट्यूब लागत नसे.अशी स्थिती.

युट्यूब ,नेट तर नावाच नव्हतं अस्तित्वात.

तर त्या काळी देखील याचं ज्ञान अप टू डेट असे.बर घरात सायन्स नियतकलिक वग्रे पडिक असत असही नव्हतं.हा सायन्स चाच विद्यार्थी तसा.पण आज आहेत तशी साधन अजिबात नव्हती.

तरी देखील याच्याकडं रेडिओ,स्टोव्ह,टेप रेकॉर्डर,एकतर प्रोजेक्टर आला होता अस सगळं रिपेअर करत असे.माझी सायकल त्यानं रायगड ट्रिप वेळी स्वतः केली होती तशी आज माझी बाईक देखील चालत नाही अशी मस्का तयार केली होती.माझा tv देखील बंद पडला तर यान उघडला आणि सरळ बाबांना मी म्हणतो तो नंबर लिहून दे.तो ट्रान्झिस्टर आणायला सांग tv चालू होईल.मी आ वासून बघतच राहिलो.तुला कस कळलं?

अ तो पॉवर सप्लाय चा आहे.तो उडाला.म्हणून बंद पडलाय tv.

पण तो बसवेल कोण?

मी आहे न!!!

तर अस हे ज्ञान तो कुठून गोळा करीत असे हे आजही कळत नाहीये मला.

एकदा मजा झाली.गावात काही आणायला गेलो तर व्यापाऱ्यांची पोर बाईक वर जात होती आणि येताना गोणीतून काही भरभरून आणत होती.काय सुरूय कळत नव्हतं.मग सावन्ताच्या ओटीवर जनरली सगळे असत तिथ बातमी लागली.कुठंतरी बोट फुटली नी त्यात काही माल आहे तो गोळा करून आणतायत.कोळी म्हणत होते,डायऱ्या आहेत कसल्या आणि खोके आहेत.रवी आला.म्हटलं काय रे असेल?

आ ss वर्णन ऐकून व्हिडीओ कॅ सेट न प्लेअर असतील.

हे काय असत?

तू ऑडिओ ऐकतोस न प्लेअर वर तस व्हिडीओ.

म्हणजे?

सिनेमा दिसेल तुला .

कुठ?

tv ला प्लेअर कनेक्ट करायचा.त्यात व्हिडीओ कॅसेट टाकायची.सिनेमा सुरु.

अस कस होईल?

होत.

मला पटल नव्हतं.पण लगेच काही दिवसात गावात व्हिडीओ प्लेअर भाड्यान मिळू लागला.आम्ही तो भाड्यान आणला तेंव्हा समजलं.

तो आणल्यावर देखील एकदा कॅसेट स्लो वाटू लागली.हा उठला आणि एक बटन पिळलं तर परत स्पीड जागेवर आला.

हे सगळं कुठ माहित झाल याला समजत नाही.

मला ब्रेच प्रश्न पडत असतात आजही.पण आज युट्यूब,नेट मदतीस आहे.गुगुल बाबा आहे.विचारलं कि सांगतो बिचारा.पण कधी तो हि निरुत्तर होतो मग आमचा ओरिजनल गुगुल बाबा ला आहे त्याला माझा फोन जातो.उत्तर मिळतच.

pc च्या बाबतीत पण हा निष्णात आहे.एकदा त्याच्या घरी गेलो होतो तेंव्हा यान त्याचा pc दाखवत सगळं प्राथमिक समजावलं. आता मी ड्युटी वर जातो तू बस pc वर नी हवं ते कर.

अरे पण मी काही चूक केली तर?

नाही करणार तू मला खात्री आहे.

आणि तुझं काही खाजगी ओपन झाल तर?

ते तस काही नाही त्यात.आणि असलं तरी निदान आज तरी तुला सापडणार नाही😀

म्हणून गेला नी मी त्याच्या pc वर बसलो होतो बघत सगळं कस चालत ते.

पुढ माझ्या एका स्टुडन्ट न या बाबतीत बरंच शिकवलं.

रवीन एकदा त्याच्या कड असेम्बल करायला आलेला pc मुद्दाम माझ्या समोर जोडून दाखवला होता.

आता भेट होत नाही रोजची.कधी काळी गेलो नी तो घरी असेल तर थोडावेळ भेट होते.

असे आणि काही मित्र भेटले पोयनाड ला जे इतकी वर्ष झाली तरी अत्यंत जवळचे आहेत.कधीही गेल तरी मधली गॅप बिलकुल जाणवत नाही.

त्यांच्या विषयी मग लिहीनच.

मुंबईत एक ग्रुप आणि पोयनाड चा एक असे दोन सेट आहेत आमचे मित्रांचे.दोन्ही प्रिय.आणि दोन तबल्यातले आहेत.

या सर्व लोकांमुळ आयुष्य समृद्ध होत.